Sunday, 21 February 2021

कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम !!

कल्याणची सागर कन्या श्रावणी हिचा नवा विक्रम !!


कल्याण, अविनाश ओंबासे : ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची कल्याण येथील जलतरण पट्टू कु. श्रावणी संतोष जाधव हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 कि.मी. सागरी अंतर 3. तास 43 मी पोहून पूर्ण केले... कल्याण ची सागर कन्या म्हणून ओळख असणारी 


श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले असून दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणची डोली पाटील...तिच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी येणे मोठी मजल मारली आहे..

श्रावणी हिने हे अंतर पार केल्यानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई च्या माजी महापौर सौ. स्नेहल आंबेकर व स्थायी समिती सदस्या नगरसेविका सौ सुजाता सानप आणि स्विमिंग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे श्री किशोर शेट्टी व संतोष पाटील उपस्तिथ होते. व रुपाली रेपाळे ह्यांनी  निरीक्षक म्हणून काम पहिले. जलतरण पट्टू चे  स्विमिन्ग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे हार्दिक अभिनंदन....

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...