Tuesday, 27 July 2021

भिवंडीतील "नागरी हक्क संघर्ष समिती"ने दिले मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांला निवेदन.!

भिवंडीतील "नागरी हक्क संघर्ष समिती"ने दिले मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांला  निवेदन.!


भिवंडी, दिं.28, अरुण पाटील-कोपर :
        ठाणे भिवंडी कल्याण " मेट्रो प्रकल्प 5 च्या कशेळी ते  अंजूर फाटा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत   " नागरी हक्क संघर्ष समिती "ने लेखी निवेदन देऊन  लवकरात लवकरच खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे मागणी केली आहे. त्या वेळी प्रकल्प अधिकारी श्री.सिंग यांनी काम लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले आहे दिले आहे.
      या प्रसंगी मेट्रोचे अधिकारी साळुंखे साहेब , नारपोली पोलीस ठाण्याचे निवृत्त पोलीस अधिकारी श्री अशोक जगताप, मेट्रोच्या वतीने चर्चेला उपस्थित होते .
         " नागरी हक्क संघर्ष समिती " च्या वतीने ड्याशिंग नेतृत्व असलेले श्री. नंदन पाटील माजी सरपंच दापोडे, ए टी पाटील, समाज सेवक, मनेश तरे, माजी सरपंच गुंदवली, कोपर गावचे विद्यमान उपसरपंच श्री.भारत गुरूनाथ पाटील ,श्री. संजय पाटील, पुर्णा गावचे माजी सरपंच अनिल खंडागळे साहेब, महिला सदस्या भारती भोईर मॅडम उपस्थित होत्या.
*या सात दिवसात रस्ता दुरूस्ती चे काम पुर्ण केले जाईल , असे आश्वासन मेट्रो प्रकल्प अधिकारी  श्री.सिंग  यांनी सांगितले.
         जर रस्त्याचे कामाला सुरुवात  " न " केल्यास पुन्हा जण आंदोलन करण्याचा इशारा श्री. नंदन पाटील यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना दिला आहे.
  ( नागरी हक्क संघर्ष समितीचे मान्यवर  )

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...