कल्याणच्या गौरीपाडा येथील तलावात मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू !! "परिसरात खळबळ"
कासवांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाल्याची बाब धक्कादायक आणि गंभीर आहे. काही कासवांनी मात्र तलावाच्या बाजूला असलेल्या गवतात आसरा घेतला होता. तलावात माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तलावाच्या पाण्यात काही टाकल्याने प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान कासव हा उभयचर आणि दीर्घायुष्यी आहे. त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणो ही गंभीर बाब आहे. काही ग्रामस्थांनी मृतावस्थेत पडलेले नेमकी किती कासव आहे याची मोजणी केली किमान ८५ कासव मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते.


No comments:
Post a Comment