अहमदनगर, अखलाख देशमुख, दि ३१ : राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी उशीरा का होईना राज्य सरकारला शहाणपण सुचले आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले. मात्र या नुकसान भरपाईत शेतकऱ्यालाच लुटण्याचे काम होत आहे. ही घटना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात आढळून आली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी बेधुंदपणे शेतकऱ्यांकडून पाहणीसाठी पैसे मागत आहेत. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ज्यातून उघडउघड लुटमार करण्याची हिंमत अधिकाऱ्यांना झाली आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा. अन्यथा आपलं सरकार हे बळीराजाच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे यावर निश्चितपणाने शिक्कामोर्तब होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !!
कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !! भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबतच्या बै...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...

No comments:
Post a Comment