Wednesday, 25 June 2025

जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही -* विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? पालकांना प्रश्न !

जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही -
* विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? पालकांना प्रश्न !

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकाविनाच शाळेत बसून राहावे लागत आहे.

पालघर जिल्हा परिषदेकडून २०१७ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, या दोन वर्गांसाठी मानधन तत्वावर खाजगी शिक्षणाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे मानधन जिल्हा परिषद सेस फंडातून दिले जाते. मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन 15 दिवस होत आले तरीही सदर शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही शाळा अतिदुर्गम गावात आहेत, मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया
2023 सालापासून पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 44 शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत मात्र दरवर्षी या दोन वर्गांसाठी शतकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत खूप उशीर उशीर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत तातडीने कार्यवाही करून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.
- जयेश शेलार
अध्यक्ष : पालक संघ वाडा तालुका

No comments:

Post a Comment

कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !!

कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी  इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !! भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबतच्या बै...