Friday, 18 September 2020

राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय पक्ष)पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक धुळे जिल्ह्यांच्या दौर्यावर...

राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय पक्ष)पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक धुळे जिल्ह्यांच्या दौर्यावर... 


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राष्ट्रीय स्वराज्य सेना( राष्ट्रीय पक्ष) चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. श्रीहरी बागल साहेब , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सदीप पवार साहेब व राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांचे  प्रमुख पदाधिकारी यांनी  शनिवार दिनांक १९ / ०९ / २०२० रोजी सकाळी आठ वाजल्या पासुन पाच दिवसांचा पश्चिम महाराष्ट्र व नाशिक, धुळे जिल्ह्याचा दौरा चालु केला आहे. 
महाराष्ट्रात अनेक ठीकाणी  मोठया प्रमाणात अवकाळी पावसाने शेती व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे होऊन शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणयासाठी व मराठा समाजाला कायमस्वरूपी  आरक्षण मिळावे अशी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांची भुमिका आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कसे मिळेल या साठी शांततेने कसे मार्ग निघतील या बद्दल जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे .
कोणताही अनुचित प्रकार घडू नये.समाजात कायदा व सुव्यवस्था टिकवून राहण्यासाठी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. 
केंद्र सरकार ने कांदा निर्याती वरील बंदी उठवण्यासाठी लेखी निवेदन नाशिक जिल्हा कलेक्टर यांना  देणयात येणार आहे. 
त्या वेळेस येवळा व परिसरातील शेतकरी वर्गाशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याच बरोबर स्वच्छता कामगार, डॉक्टर वर्गाचे प्रश्न समझुन त्याना न्याय देण्यासाठी महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून जिल्हा निहाय दौरे चालू केले आहेत.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...