Wednesday 31 May 2023
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे रत्नागिरी येथे गोशाळेला मदतीचा हात !
स्फूर्ती फाउंडेशन आयोजित - एक दिवसीय शासकीय योजना व भारत सरकार पोस्ट कार्यालय योजना शिबिर !!
श्री क्षेत्र वेरूळ येथे वीर शैव कक्कया समाजाच्या वतीने दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर संपन्न !!
सौ.पूर्वा लवू धावडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित !!
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठपुराव्यातुन समेळगाव स्मशानभूमीत सुशोभिकरण व लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम पुर्ण महिला आघाडी शहर संघटक सौ. रूचिता नाईक यांच्या हस्ते उध्दघाटन संपन्न !!
Tuesday 30 May 2023
मनरेगा बचाओ ग्रामीण भारत बचाओ भारतीय खेत मजदुर युनियनची जंतर मंतर धरणे !!
खडुळ तलाव अमृत सरोवर अभियान अंतर्गत तलाव सुशोभीकरण कामाला सुरवात !
म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी देशमुख यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर !
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१५ तर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर सह मोफत वह्या वाटप आणि जेष्ठ नागरिकांना छत्री वाटपचे आयोजन !
कापूस खरेदी फेडरेशन सुरू करा किसान सभेची मागणी !!
Monday 29 May 2023
किरीट सोमय्या यांनी माझी नाहक केली बदनामी - अनिल परब
किरीट सोमय्या यांनी माझी नाहक केली बदनामी - अनिल परब
*अनिल परब यांच्याकडून किरीट सोमय्या यांचा समाचार*
मुंबई, प्रतिनिधी : दापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहे. विनापरवाना रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्यात आले आहे. तसेच रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. आघाडी सरकार असताना हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले होते. हरित लवादाकडेही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. हरित लवादाने यात तथ्य नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली. यानंतर दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाची हरित लवादाकडील याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली.
अनिल परब यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला. साई रिसॉर्टशी माझा संबंध नाही असे मी सातत्याने सांगत होतो. मात्र मला दोन वर्ष बदनाम करण्यात आले. आता प्रकरण अंगलट येणार असे, लक्षात येताच माघार घेतली. सोमय्यांनी पळवाट काढली असली तरी एकवेळ नाक घासून माफी त्यांना मागावीच लागेल किंवा शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा द्यावा लागेल, असे परब म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा बैठक संपन्न !!
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत असे सांगितले.
रब्बीच्या बाजरीच्या शेतात थप्पीच्या थप्पी भाव गडगडले ; खरिपाच्या पेरणीची चिंता !
Sunday 28 May 2023
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये पुतळ्याचे अनावरण !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये पुतळ्याचे अनावरण !
डोंबिवली, प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १४० वी जयंती आहे. त्यानिमित्त मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हे संमेलन मॉरिशसमध्ये संपन्न होतंय. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी सावरकरप्रेमींमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला.
जव्हार मध्ये जनजागृती शिबीराचे आयोजन !!
जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्षपदी विठ्ठल थेतले !!
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एस.पी चॅम्पियन्स ट्रॉफी संपन्न !!
Saturday 27 May 2023
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त...
वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते . त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला .त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते .ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते .लहानग्या सावरकरांनी चाफेकर बंधूंना फाशी देण्यात येण्याचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातन्त्रतेसाठी क्रांतीचा सेतू उभारून मारिता-मारिता मरेतो झुंजेंन अशी शपथ घेतली.सावरकरांनी जोसेफ मॅझिनीयांच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला नंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडन ला गेले.
लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात असे सांगितले. पॅरिस हुन लंडनला येताना सावरकरांना अटक करण्यात आली होती . पुढील खटला भारतात चालवला जावा म्हणून भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी घेतली पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून भारतात आणले.नाशिकला अनंत काणेकर यांनी नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणले इथे त्यांच्या वर खटला भरण्यात आला. त्यांना जन्मठेप म्हणून काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. मातृभूमीचे स्वातंत्र्य मिळविण्यासासाठी त्यांनी तब्बल 11 वर्षे छळ सहन करून देखील त्यांच्यात देश साठी करण्याची जिद्द होती. त्यांनी काळ्यापाण्यात असताना तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
त्यांनी तुरुंगात काळे पाणी असे पुस्तकाचे लेखन देखील केले.त्यांचे गीत " ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " हे आजतायगत लोकांचा मनात अजरामर आहे.
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानापन्न केले.त्यांनी हिंदूंच्या समाजाला संघटित करण्यासाठी अनेक कार्य केले.
त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली .त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालय सुरू केले जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचे आयोजन केले. पतितपावन या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश देणे सुरु केले.हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. आणि भारत छोडो चळवळीचा भाग बनले.हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी जातिभेदाचा विरोध करणारे. क्रांतिकारक, भाषा शुद्धी लिपिशुद्धी, साहित्य प्रचारक असे अनेक पैलूंचे धनी होते. सावरकरांना ''स्वातंत्र्यवीर सावरकर ''अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती.
त्यांनी अन्न आणि औषध वर्ज्य केले त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली.24 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते अनंतात विलीन झाले.
लेखन - नारायण सुरोशी
विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आयटीआयच्या वतीने आयोजित करियर मार्गदर्शन शिबिराचा ३५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
एसटीच्या अधिकृत थांब्यावर वाढीव दराने नास्ता किंवा छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे महामंडळाचे आदेश !
एसटीच्या अधिकृत थांब्यावर वाढीव दराने नास्ता किंवा छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे महामंडळाचे आदेश !
मुंबई, प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस करीता मंजूर केलेल्या खाजगी थांब्यांवर हॉटेल मालकाने 30 रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉटेल चालक या आदेशाचे पालन करीत नाहीत अशा तक्रारी समाजमाध्यमावर आल्या आहेत.
तसेच नाथजल हे बाटली बंद पाणी देखील कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल दरापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याच्या तक्रारी समाजमाध्यमावर येत आहेत.. अलीकडेच नाशिक रोड स्थानकात नाथजल हे बाटलीबंद पाणी कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल किंमतीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार समाजमाध्यमावर एका प्रवाशाने व्हिडीओ काढून केली होती.
या अनुषंगाने मार्ग तपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक आणि विभागातील अधिकाऱ्यांनी 30 रुपयातील नाश्ता दिला जात आहे का? आणि जादा दराने नाथजल विक्री होत असेल तर खातरजमा करावी. तसेच योजनेची अंमलबजावणी होत नसेल तर हॉटेल मालकाच्या ही बाब निर्दशनास आणून द्यावी, तसेच अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा, तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करावी असे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी पत्रक काढून दिले आहेत.
जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ !!
जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान नगरपालिका प्रशासनाकडून यशस्वी !!
रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!
रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...
-
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !! मुख्यम...
-
लाचखोर सुनीता धनगर यांच्या घराची झडती - सोनं आणि कॅश बघून अधिकारी चक्रावले !! नाशिक, प्रतिनिधी - निलंबित मुख्याध्यापकाला कामावर ...
-
भटक्या प्राण्याकरीता कल्याण डोंबिवलीतील पहिले ट्रिटमेंट सेंटर डोंबिवली (पश्चिम) येथे सुरू !! डोंबिवली, प्रतिनिधी : फॅक्ट्स फॉरेव...