Friday, 9 June 2023

राष्ट्रीय महामार्ग विभागाने तोडलेल्या झाडांचे वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुलकडून पुनर्वसन, भविष्यात साडेबारा हजार झाडे लावण्याचा संकल्प !!

राष्ट्रीय महामार्ग विभागाने तोडलेल्या झाडांचे वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुलकडून पुनर्वसन, भविष्यात साडेबारा हजार झाडे लावण्याचा संकल्प !!

कल्याण, (संजय कांबळे) ::राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान रस्ता रुंदीकरण व सिंमेट काँक्रीटीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली वड, पिंपळ, जांभूळ, चिंच,आंबा व इतर इजांयली जातीचे वृक्ष तोडण्यासाठी कल्याण वनपरिक्षेत्र अधिकां-यानी काही अटी शर्तीवर परवानगी दिली होती. जेवढी झाडे तोडली जातील तेवढीच झाडे लावण्याचे बंधन असताना ते या अधिका-याकडून पाळले गेले नाही. उलट ही झाडे स्वतःच्या खर्चाने वाचूऊन त्यांचे वनजमीनीवर पुर्नरोपन करण्याचे काम वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुल या संस्थेने केले असून आज या परिसरात वनराई बहरली आहे. शिवाय भविष्यात सुमारे साडेबारा हजार झाडे लावण्याचा संकल्प संस्थेचे व्यवस्थापक अलबिन सर यांनी केला असल्याचे सांगितले.

कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान रस्ता रुंदीकरण व सिंमेट काँक्रीटीकरणचे काम २०२२ पासून सुरू आहेत. या रस्त्यावर आंबा, वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, उंबर अशी जादा आँक्शिजन देणारी झाडे होती. ही झाडे तोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाने कल्याण वनपरिक्षेत्र  कार्यालयात परवानगी मागितली होती. 

वनविभागाने काही अटी शर्तीवर परवानगी दिली. त्यामुळे महामार्ग विभागाने सुमारे ३०९ झाडे तोडण्याचे काम सुरू केले. मात्र ही झाडे तोडल्यानंतर तेवढीच झाडे लावावीत, त्यांचे संगोपन करावे अश्या सात अटी शर्ती घालण्यात आल्या, रस्ता सिंमेट काँक्रीटीकरणाचा असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार होते, कार्बनडाय आँक्साइडचे हवेतील प्रमाण वाढणार होते. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला अशी जादा आँक्शिजन सोडणारी झाडे असणे आवश्यक होते. मात्र याचे काही ही सोयरसुतक ना अधिकारी ना ठेकेदार यांना नव्हते. परंतु नेहमी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वरप येथील सेक्रेट हार्ट स्कूल चे व्यवस्थापक अलबिन सर यांनी पुढाकार घेऊन स्व: खर्चाने महादेव मार्बल जवळील वडाचे झाड, वरप बस स्टाफ जवळील उंबर अशा अनेक झांडाचे वनजमीनीवर पुर्नरोपन केले आहे. या शिवाय, काजू, पेरु, चिकू, पिंपळ, चिंच, जांभूळ, इतर सुंगधी झाडांची लागवड येथे केली आहे. येथे असलेला नैसर्गिक पाण्याचा झरा अधिक मोठा केल्याने आज मोर, पोपट, घार, कोल्हा, असे अनेक पशुपक्षी येथे पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत आहेत.
उन्हाळ्यात वृक्षांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून टेकडीवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. ऐवढेच नव्हे तर शाळेतील पक्षी मित्र शिक्षक भरत गोंडाबे याची झाडाच्या देखभालीसाठी नियुक्ती केली आहे. तर पाणी देणे, इतर साफसफाई करण्यासाठी पगारावर मजूर ठेवले आहे.
आजमितीस शाळेच्या मागील वनपरिसर हा हिरवागार झाडांनी बहरलेला आहे.

या बाबतीत शाळेचे व्यवस्थापक अलबिनसर यांना विचारले असता ते म्हणाले, म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सिंमेट काँक्रीटीकरण झाल्याने तापमानात वाढ होणार आहे. परंतु झाडे लावली तर ३/४ अंशांनी तापमानात घट होईल, शिवाय आँक्शिजन चे प्रमाण वाढेल, भविष्यात वनजमीनीवर आंध्र प्रदेशातून झाडे आणून ती लावली जाणार आहेत, ही झाडे १०/१२ फुट उंचीची असल्याने लवकर वाढतील, याचा फायदा पशुपक्षी व आसपासच्या आदिवासी बांधवांना होणार आहे. त्यामुळे नॅशनल अँथोरटीच्या अधिकां-यांनी वनविभागाने घातलेल्या बंधनाचे पालन करावे, त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्या वर गुन्हे दाखल करावेत, ते करणार नसतील तर जनहितासाठी मी गुन्हा दाखल करायला तयार आहे. असे अलबिनसरांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...