Saturday, 14 June 2025

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !!

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !!

[ निवोशी | गुहागर : उदय दणदणे ]

भविष्यातील पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आज वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे,त्यामुळे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे आदर्श व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक चळवळीचे प्रेरणेते, जेष्ठ समाजसेवक तसेच श्री गजानन विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय लक्ष्मण होरंबे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शनिवार  दिनांक १४ जून २०२५ रोजी श्री गजानन विद्यामंदिर- निवोशी प्राथमिक शाळा परिसरात उपरोक्त मंडळाचे प्रतिनिधी मोहन धावडे यांच्या संकल्पनेतून श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी ) संलग्न:युवा मित्र मंडळाच्या वतीने वृक्षरोपण उपक्रम राबवून समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांना वाढदिवसाच्या आगळीक अशा स्नेह शुभेच्छा देण्यात आल्या, निवोशी अंगणवाडी व प्राथमिक शाळा ह्या ठिकाणी सदर उपक्रम संपन्न झाला.

गुलमोहर, बदाम, अशोक,  पिंपळ अशी विविध झाडे युवा मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप होरंबे यांनी मुंबई येथून आणली, युवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल रावणंग,‌ सेक्रेटरी लव ठोंबरे सह अरविंद धावडे, निलेश अवेरे, संदिप होरंबे, सुजित रांजाणे, अंकुश ठोंबरे, सखाराम सोलकर, सुनिल सोलकर, लक्ष्मण मांडवकर, शांताराम मांडवकर, नारायण अवेरे, कु. शुभम मांडवकर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका वैशाली घाणेकर, मदतनीस रश्मी धावडे तसेच ममता अवेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली कु.आदिती ठोंबरे, मनस्वी ठोंबरे, आर्यन पिंपळे, सोहम अवेरे, पुनम होरंबे, सेजल सोलकर या शालेय विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते सदर वृक्ष रोपे लावण्यात आली व उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला यांनी वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास घेतला. संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेत एक-एक वृक्षाची देखभाल पालनपोषण करण्याचा निश्चय केला. पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी ) संलग्न:युवा मित्र मंडळ, महिला व ग्रामस्थांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून ह्या आगळीक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Friday, 13 June 2025

मोहन्यातील लहुजी नगरमधील २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

मोहन्यातील लहुजी नगरमधील २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात !!

* घरघर शौचालय स्मार्ट सिटी स्वच्छ भारत योजना कागदावरच

कल्याण, संदीप शेंडगे - मोहने येथील लहुजी नगर येथील २ हजार ५०० नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर सौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आजही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास मजबूर आहेत. विशेषतः महिलांना यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. लहुजी नगरच्या अडीच हजार हून अधिक लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये जर एकही शौचालय नसेल तर नागरिकांनी जायचे कुठे पालिका नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली तीनशे रुपयांची वाढ केली असून त्या पैशाचं पालिका काय करते नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.

*प्रशासनाचे दुर्लक्ष की जाणीवपूर्वक अन्याय?*

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. स्थानिकांनी यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आंदोलने केली, तरीही योजनेच्या नावाखाली केवळ आकडेमोड व जाहिरातींचा दिखावा सुरू आहे.

‘घर घर शौचालय’ योजना कुठे गेली?

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘घर घर शौचालय’** योजनेच्या अनेक उद्घाटन सोहळ्यांनंतर देखील लहुजी नगरमधील वास्तव बदललेले नाही. शौचालये नसल्यामुळे अनेक आजारांनी येथे उगम घेतला असून, लहान मुले वयोवृद्ध नागरिक अनेक आजारांनी त्रस्त झाले आहेत रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत.

महानगरपालिकेकडून वारंवार “जागेअभावी” किंवा “अधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा” असे कारण सांगितले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांत एकच शौचालय बांधण्यात आले होते तेही तीन वर्षांपूर्वी अचानक कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात परंतु या ठिकाणी शौचालय उभारणी करून देत नाहीत असे कल्पना पायाळ यांनी सांगितले.

लहुजी नगरसारख्या ७५ वर्ष जुन्या आणि मागास वस्तीच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा स्थानिकांनी व्यापक रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Wednesday, 11 June 2025

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन !

पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे दुःखद निधन !

 मुंबई (शांताराम गुडेकर) :

            आगासन गाव येथील शांत, सरळ व्यक्तिमत्व असणारे पांडुरंग कृष्णा मुंडे यांचे  बुधवारी ११ जून  रोजी अल्प आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सीताबाई पांडुरंग मुंडे, मुले चिंतामण, उदय, प्रदीप, बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नेहमीच शांत स्वभाव असणारे , तसेच सर्वांशी आपुलकीने वागणारे पांडुरंग  यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने मुंडे परिवार व आगासन ग्रामस्थांवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. आगासन येथील समश्यानभूमीत बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात मुंडे  कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक २० जून रोजी आगासन येथील गणेश घाट येथे होणार असून उत्तरकार्य तेरावा विधी दिनांक २३ जून रोजी मुक्काम आगासन पोस्ट दिवा, तालुका जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Tuesday, 10 June 2025

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर !!

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर !!

** शाहीर मधुकर खामकर,निर्माते उदय साटम यांच्यासह अनेकांचा समावेश

मुंबई, (शांताराम गुडेकर) ::

            लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
        या सोहळ्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी शाहीरी परंपरेतील जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत, तर लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना लावणी गौरव २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचा राजाराणी - २०२५ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
            तसेच सदर सोहळ्यात कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सोबत महासंघाच्यावतीने आयोजित नवरात्र सोहळ्यातील नवरंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात मुंबईतील नामवंत कलाकारांच्यावतीने दिमाखदार नृत्यविष्कारासह सांगितिक कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहे असे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.

"जॉय" चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

"जॉय" चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

मुंबई, (पी. डी.पाटील) : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य जॉय सामाजिक संस्थेचा दहावा वर्धापन दिन नुकताच जोगेश्वरी पूर्वेतील अस्मिता विद्यालयात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, ऍड जगदीश जायले, डॉ महेश अभ्यंकर, सत्येंद्र सामंत, ऍड रूशीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घरत यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन सन्मान केला. शुद्ध आणि प्रामाणिक भावना ठेवून जॉय कार्य करीत असल्याने यासारखी अनेक संस्था निर्माण व्हायला हव्यात असे दौंड म्हणाले. यावेळी अस्मिता चे संस्थापक दादा पटवर्धन शिक्षकांचे नेते जनार्दन कांगळे सर, तसेच ज्येष्ठ वृत्त पत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा !!

वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा !!

* 'स्वदेशी विचार' व 'नागरिक कर्तव्य' यांचा जागर

वाडा / प्रतिनिधी : 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त वाडेकर शासकीय आदिवासी औद्योगिक संस्था वाडा येथे प्रेरणादायी वातावरणात "शिवराज्याभिषेक दिन विशेष कार्यक्रम" पार पडला. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा संकल्पनेतून पार पडलेल्या सदर कार्यक्रमाचे देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ऑनलाईन प्रक्रियेद्वारे उद्घाटन करून त्यांनी दिलेला संदेश तसेच विभागाच्या सचिव  मनीषा वर्मा यांचा संदेश सर्व उपस्थित लोकांना ऐकविण्यात आला. 

या कार्यक्रमात मनीष देहेरकर  यांनी "स्वदेशी विचारांचा स्वीकार" या विषयावर तर शिव व्याख्याते स्वप्नील पाटील यांनी "नागरी कर्तव्य व शिष्टाचार" या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उद्योजक मिलिंद वाडेकर, विक्रांत काळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गट निर्देशक प्रिती वाणी तर सूत्रसंचालन श्री. सोनवणे यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाण्यात अनाधिकृत सीडी हटवण्याकरिता करावे लागत आहे अन्न त्याग उपोषण !!

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाण्यात अनाधिकृत सीडी हटवण्याकरिता करावे लागत आहे अन्न त्याग उपोषण !!

ठाणे, प्रतिनिधी :
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष ठाणे शहर युवा आघाडी, पँथर साईनाथ खरात व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सुनीता शेट्टी ह्या दिनांक 12 जून 2025 रोजी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे थांबवण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी हे संविधानिक आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सुनील पांडे नामक व्यक्तीने सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात अनधिकृतपणे सीडी उभारलेली असून, याविरोधात सुनिता शेट्टी आणि पँथर साईनाथ खरात यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या. परंतु माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राजकुमार यादव यांच्या राजकीय दबाव व हस्तक्षेपामुळे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या कार्यकाळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पॅंथर साईनाथ खरात यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, दिनांक: ०२ डिसेंबर २०२४ रोजी अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनील पांडे यांनी आपल्या पत्नी आणि नात्यातील महिलांमार्फत कारवाई रोखण्यासाठी पेट्रोलसहित आत्मदहनाचा कट रचल्याचे आरोप आहेत, तरीदेखील संबंधितांवर अजून कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी न्यायालयाने सुद्धा महापालिका विधी विभागामार्फत D.P.L. ची प्रतिक्रिया करून कारवाई करण्याचे आदेश दिले असूनदेखील प्रभाग समिती अजूनही निष्क्रियच आहे. म्हणूनच निष्क्रीय प्रशासन आणि दबावाच्या व पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर प्रस्थापित राजकीय लोकांचं ऐकणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पँथर साईनाथ खरात सुनिता शेट्टी व स्थानिक रहिवासी यांनी संविधानिक मार्गाने अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मी फुले, शाहू आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा, एक छोटासा कार्यकर्ता व छोटासा पत्रकार असल्यामुळे आजवर मला योग्यरिते न्याय मिळाला नसल्याचा आरोप खरात यांनी निवेदनात केला.

परंतु एमपीएससी दर्जाचे नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त श्री सोमनाथ बनसोडे योग्यरीत्या कारवाई करतील अशी आशा देखील खरात यांनी व्यक्त केली आहे.

Monday, 9 June 2025

भारतीय जनता पार्टी आयोजित १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

भारतीय जनता पार्टी आयोजित १० वी व १२ वी उत्तीर्ण  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : दिनांक ८ जून २०२५ रोजी वॉर्ड क्र. ११७ मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीवर्षा निमित्त १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पार्टी व श्री. रविंद्र नारायण कदम (माजी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, ईशान्य मुंबई) यांच्या आयोजनाखाली डी.ए व्ही. कॉलेज, सभागृह, भांडुप (पूर्व) याठिकाणी यशस्वीरित्या पार पडला.

     या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष मा. दीपक दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी आमदार मा. मंगेश सांगळे, माजी नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, श्री युवराज मोरे जी अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष, विक्रोळी विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. रजनी रविन्द्र कदम ताई, विक्रोळी पूर्व मंडळ अध्यक्ष केतकी सांगळे, सौ श्रुती घोगळे वॉर्ड अध्यक्ष - ११९ आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती व प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.  

    याप्रसंगी  विद्यार्थ्यांना एम. आर क्लासेसचे मर्विन सर यांचे मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमात कांजूरमार्ग (पूर्व) परिसरातील जवळपास २५० गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
    सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी वॉर्ड अध्यक्ष सचिन करंजे, मंडळ अध्यक्ष अमोल पोखरकर, युवा वॉर्ड अध्यक्ष अभिषेक ढोले, जिल्हा पदाधिकारी स्नेहा जंगम, प्रवीण सरवणकर, संदीप फगरे, महेश चव्हाण, नरेश चव्हाण, वीरेंद्र महाडिक, सुनील जोशीलकर, धनंजय देऊळकर, जोतिबा जाधव, दशरथ घेवडे, किशोर जोशी, प्रीती जैन, जागृती नर, प्रणाली जाधव, सरोज विश्वकर्मा, गणपत भणगे, रितेश आजगावकर, राज विचारे, राहुल तिवारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Saturday, 7 June 2025

श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे भव्य प्रस्थान !!

श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चे गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे भव्य प्रस्थान !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक २४ चा भव्य प्रस्थान सोहळा आज गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. श्री पांडुरंग प्रतिष्ठान आणि श्री संत रोहिदास सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवासासाठी रवाना झाली. ही दिंडी १९७८ साली संस्थापक ह.भ.प. पांडुरंग कारंडे महाराज (कराडकर) यांनी सुरू केली. यंदा या पंढरपूर वारीच्या ४८ व्या वर्षाचे औचित्य साधण्यात आले आहे. परंपरेने जोपासलेली ही आध्यात्मिक वारी आजही श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाने तेवढ्याच निष्ठेने पार पाडली जात आहे.

            प्रस्थानप्रसंगी दिंडीप्रमुख ह.भ.प. चंद्रकांत कारंडे, पांडुरंग प्रतिष्ठानचे डॉ. शांताराम कारंडे, तसेच दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नारायण पाटील महाराज यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे राज्याचे रोजगार व कौशल्य मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी देखील या दिंडीस साक्षीदार होत उपस्थिती दर्शवली, यामुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. मुंबईतील विविध भागांतून आलेल्या शेकडो वारकरी भक्त टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात, विठूनामाच्या अभंगगायनात सहभागी होत पायी वारीस प्रारंभ केला.

              दिंडीचा पहिला मुक्काम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वडाळा येथे झाला असून, पुढील मुक्काम अनुक्रमे धारावी काळा किल्ला, मानखूर्द, आणि वाशी येथील जागृत शिवमंदिर येथे असणार आहेत. एक महिन्याच्या या भक्तिमय प्रवासानंतर दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी येथे पोहोचणार आहे. ऊन, वारा, पावसाचे आव्हान स्वीकारत, प्रेम, निष्ठा आणि समर्पणाने ही वारी पुढे सरकते. ही केवळ पायी वारी नाही, तर ती एक आध्यात्मिक चैतन्ययात्रा आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट...” या गजरात आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात भक्त हरवून जातात. श्री पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबईतील सर्व भाविक भक्तांना या दिंडीत सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Friday, 6 June 2025

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) तर्फे लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजीला सहारा !!

शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) तर्फे लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजीला सहारा !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          शिवसेना शाखा क्रमांक ६६ (उ.बा.ठा) विभागात राहणाऱ्या लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) या आजी रस्त्यावर राहात होत्या. त्यांच्याकडे झोपायला सुद्धा जागा उपलब्ध नव्हती. त्यांचा सांभाळ करायला किंवा काळजी घ्यायला कोणीच नाही अशी माहिती शिवसेना शाखा क्र. ६६च्या उप महिला संघटिका श्रद्धा वाल्मिकी व गटप्रमुख धर्मराज यांना मिळाली. त्यानंतर लता ताईंची व्यथा शाखेवर येऊन सांगितले. त्यांची अडचण लक्षात घेऊन मीनाली पाटील (शाखा संघटिका) यांनी लता गोपीनाथ शिंदे (वय-७६ वर्ष) यांना विरार येथील मराठा फॉउंडेशन विरार पूर्व या आश्रमात घेऊन जाण्याचा व तेथे त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करून सहारा दिला. या विभागाचे विधानसभा संघटक श्री. संजय मानाजी कदम व उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, उदय महाले (शाखाप्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेनेच्या पक्षाच्या आशीर्वादाने हे काम पार पडले असे मत यानिमित्ताने बोलताना मीनाली पाटील (शाखा संघटिका) यांनी व्यक्त केले.

🌳वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला ☀️ उत्स्फूर्त प्रतिसाद – निसर्गाशी जोडणारा अनुभवात्मक उपक्रम !!

🌳वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला ☀️ उत्स्फूर्त प्रतिसाद – निसर्गाशी जोडणारा अनुभवात्मक उपक्रम !!

वाडा, प्रतिनिधी : वनशक्ती संस्थेमार्फत दिनांक १६ ते २० मे २०२५ या कालावधीत ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी, हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते.

या शिबिरात मुलांनी भाजीपाला शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक साहित्याचा वापर करून हस्तकला तयार करणे, सकाळी ध्यानधारणा करणे व पक्षीनाद निरीक्षण, नदी परिसंस्थेचा अभ्यास, जलशुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती, वनस्पती व कीटक निरीक्षण, तसेच स्थानिक रोपवाटिकेला भेट देणे असे अनेक उपक्रम राबवले गेले. रोपवाटिकेत कंपोस्ट निर्मिती, रोपांची लागवड व कुंडी सजावटीचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.

कॅम्पच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना डोंगर व तलाव परिसरात निसर्गभ्रमंती घडवण्यात आली. या भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी साग, पळस, कोशिंबे, आळवे, यासारख्या झाडांचे निरीक्षण केले. तसेच कोकीळ, किंगफिशर, बुलबुल व कोतवाल यांसारख्या पक्ष्यांचे आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला. जलस्रोतांचे महत्त्व समजून घेत, त्यांनी गोळा केलेल्या बियांपासून डोंगरावर वृक्षारोपणही केले.

शिबिराच्या अंतिम दिवशी शंख, शिंपले, दगडांवर चित्रकला आदी हस्तकला सत्र आयोजित करण्यात आले. त्यानंतर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. समारोपप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

निसर्गभ्रमंतीचे मार्गदर्शन वनशक्तीचे प्रकल्प अधिकारी निशांत पाटील आणि योगिता कासार यांनी केले.

वनशक्ती संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे आणि भविष्यातही असे उपक्रम राबवणार आहेत.

📰 *जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डाकीवली फाटा येथे राबवली मोहीम*

📰 *जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डाकीवली फाटा येथे राबवली मोहीम*

*** तानसा नदी स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वनशक्ती संस्था | प्रतिनिधी

5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डाकिवली फाटा तानसा नदी परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून *सुमारे 400 किलोहून अधिक कचरा उचलण्यात आला.* प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, फाटके कपडे, काच, बाटल्या यांसारख्या पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर संकलित करण्यात आल्या.

ही मोहीम वनशक्ती संस्था, वनविभाग अंबाडी, कुणबी समाज संस्था ठाणे/पालघर जिल्हे, सुखभूमी संस्था, तसेच कृषी विभागाचे मा. श्री. संजय घरत साहेब यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आली. वनशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. निशांत पाटील आणि योगिता कासार मॅडम यांच्या पुढाकाराने व नियोजनाने ही मोहीम यशस्वी झाली.

विशेष म्हणजे या उपक्रमात चांबळे गावांमधील शाळेतील 25 पेक्षा जास्त विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी नदीकाठचा कचरा उचलणे, इतर नागरिकांना जनजागृतीवर संदेश देणे.

एकूण ४० पेक्षा अधिक स्वयंसेवक व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला. स्थानिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

शिवकृपा कंपनी बंद झाल्यास स्थानिकांचा रोजगार अडचणीत !!

शिवकृपा कंपनी बंद झाल्यास स्थानिकांचा रोजगार अडचणीत !!

* सर्व नियमांचे पालन करून कंपनी सुरू ठेवावी हा खासदार व आमदारांची भूमिका

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील तोरणे गावात 2008 पासून कार्यरत असलेली शिवकृपा अलाईज कंपनी ही गेल्या १७ वर्षांपासून स्थानिक नागरिकांना सातत्याने व स्थिर रोजगार उपलब्ध करून देणारी एक जबाबदार औद्योगिक संस्था आहे. या कालावधीत कंपनीने संबंधित सर्व शासकीय परवानग्या, ग्रामपंचायतीचे NOC आणि पर्यावरणविषयक मान्यताही वेळोवेळी प्राप्त केल्या आहेत.

ग्रामपंचायतीने २००८ साली कंपनीस NOC प्रदान केली होती, त्याच ग्रामस्थांनी आजवर कंपनीकडून विविध स्वरूपातील सेवा शुल्क, कामाचे मोबदले आणि इतर आर्थिक व्यवहार स्वीकारलेले आहेत, याचे अधिकृत दस्तऐवज कंपनीकडे सादर करण्यात आले आहेत.

अलीकडील काही दिवसांपासून काही व्यक्तींनी कंपनीविरोधात प्रदूषण आणि इतर कारणांवरून अर्ज करून कंपनीच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिणामी, कंपनीच्या नियमित कामकाजावर व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार  दौलतजी दरोडा व आमदार शांताराम मोरे यांनी सदर कंपनी सुरू राहावी व स्थानिकांचा रोजगार सुरळीत राहावा, यासाठी प्रशासनाला पत्र दिली आहेत.

खासदार व आमदारांनी परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन स्पष्टपणे सांगितले की – "स्थानिक रोजगार बंद होणे योग्य नाही. सर्व नियमांचे पालन करून कंपनी सुरू राहावी, ही भूमिका घेतली आहे.

शिवकृपा अलाईज कंपनी ही रोजगारनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, ती कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कार्य करत नाही. त्यामुळे ही कंपनी सुरळीत राहावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tuesday, 3 June 2025

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

***अनधिकृत बांधकाम करणारा भुमाफीया ओवेस पटेल ला महापालिकेचे संरक्षण...

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम येथिल टाकी पाडा करारी बाग येथिल इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच आहे  

.                                                    ओवेश पटेल 

भुमाफीया ओवेस पटेल यांच्यावर अनधिकृत बांधकामाबाबत MRTP अंतर्गत गुन्हे दाखल असताना हि पाच मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकांमावर कारवाई करण्याबाबत मागणी करून हि सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असुन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत.

.                                   सहायक आयुक्त (प्रभाग क्षेत्र - ई)

इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम उभे केल्यामुळे बांधकाम व्यवसायिक पटेल यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून हि त्याठिकाणी ५ मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करून सांडपाणी व इतर कचरा या तलाव सोडल्याने तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यामुळे येथिल महापालिकेचा इंदानी तलावाचे लिलाव टेंडर कोणीच घेण्यास तयार नसल्याने महापालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होते. 

तलावाचे संरक्षण व सुशोभिकरण करणे हि महापालिकेची जबाबदारी असताना हि महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे  प्रभाग समिती ई मध्ये  अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने शहरात बेकायदा ईमारती, गाळे, मोबाईल टॉवर उभारले जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत, 
प्रभाग समिती ई मधिल अनधिकृत बांधकामे रोखण्यात आणि बिल्डरांवर कारवाई करण्यात वसई विरार महानगरपालिकेला सपशेल अपयश आल्याने रोज अनधिकृत बांधकाम वाढत चालले आहे.

प्रभाग समिती ई  क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत सर्रास सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांवर कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने नागरीकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ गुन्हे दाखल न करता पाच मजली इमारत जमीनदोस्त करून शहराला लागलेली कीड समुळ नष्ट करा. अनेकदा अशी बांधकामे वाचविण्यासाठी नागरिकांना त्याठिकाणी आणले जाते. नागरिक रहायला आल्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून कारवाई करता येत नाही म्हणूनच अशा बांधकामांचे पेव फुटले आहे. त्यामुळे अशा बांधकामांमध्ये नागरिक रहायला येण्याआधी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त कैलास रघुनाथ पाचरणे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला सत्कार !!

शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त कैलास रघुनाथ पाचरणे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला सत्कार !!

पुणे, स्नेहा उत्तम मडावी (प्रतिनिधी) :

कैलास भाऊ पाचारणे यांनी निस्वार्थीपणे गेले छत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात जी सेवा केली त्यासाठी त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील सर होते. तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवर मा. माजी खासदार आढळराव पाटील, खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. बाबाजी शेट काळे, बांधकाम समितीचे माजी सभापती मा. मंगलदास बांदल, चाकण शिक्षण मंडळाचे विश्वस्त मा. मोतीलालजी सांकला, चाकण शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अविनाजी आरगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट), महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. राजमलाताई बुट्टे पाटील यांचे विद्यमान संचालिका, राजगुरूनगर सहकारी बँक ली व शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे सौ. अश्विनी पाचारणे आभार मानले.

सहभागी संस्था व मान्यवर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्यगण - चाकण महाविद्यालयाचे प्राचार्य, पाबळ महाविद्यालयाचे प्राचार्य,‌ हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिंगळे सर, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ जरे सर, शैक्षणिक संघटनांचे मान्यवर, महाराष्ट्र राज्य शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी म्हसे, महासचिव मा. त्रिभुवन सर, विविध महाविद्यालयांतील प्रशासकीय कर्मचारीवर्ग, खेड तालुक्यातील विविध राजकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे सर्व प्रतिनिधीगण, इ. सर्व उपस्थित होते.

Monday, 2 June 2025

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

कल्याण, (प्रतिनिधी सुनील इंगळे) :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षा चे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक प्रथमेश पुण्यर्थी यांनी आयोजित केले होते, यामध्ये शंभर ते दीडशे विविध गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला होता सदर शिबिरात डॉ. सिद्धार्थ मोरे प्रादेशिक संचालक श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट वर अत्यंत सुंदर प्रकारे विषय सादर केला. 

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष  ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांनी गृहनिर्माण संस्थेतील, त्यातील सभासदांना येणाऱ्या विविध प्रश्न, अडचणी सादर करून विविध प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली, सरते शेवटी त्यांनी ग्राहक संरक्षण कक्षासाठी एक पंधरा-वीस वकिलांचे पॅनल बनवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी सदर वकील व मी निस्वार्थ सेवा देण्याचे आश्वासन देऊन त्यासंदर्भात कसे आणि कशाप्रकारे नियोजन करावे याचे सर्व अधिकार प्रथमेश  पुण्यर्थी यांना दिले.

त्यानंतर दुसरे प्रमुख अतिथी  सुधाकर पाटील जे प्रमाणित लेखा प्रशिक्षक, गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका, शेअर सर्टिफिकेट्स कसे ट्रान्सफर करावे  त्याबाबतीत काही नियम आहेत, सोबतच सभासदांच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आदी बाबत सखोल माहिती दिली.

या शिबिरात असोसिएशनचे संस्थापक व गृहनिर्माण संस्था पुनर्विकास प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट पीएमसी चे सल्लागार श्री. राजन शुल्क यांनीही डेव्हलपमेंट, कस्टर्ड प्रोजेक्ट याविषयी सखोल माहिती दिली सध्या रीडेव्हलपमेंटचा धुमाकूळ सर्वदूर पोहोचला आहे तो आपण बिल्डरला देणे अथवा स्वतःही डेव्हलपमेंट करणे या दोन्ही बाबतीतील एडवांटेजेस व डिसऍडवांटेज म्हणजे त्या संदर्भातील फायदे आणि तोटे समजावून सांगितले, व उपस्थित ग्राहकांना म्हणजे फ्लॅट धारकांना जे प्रश्न उद्भवत होते त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

सदर कार्यक्रमास कक्ष विभाग संघटक जयवंत टापरे, उदयभान सिंग व सौ. दक्षता तांबे यांनी प्रथमेश पुण्यार्थी  त्यांच्यासोबत सदर शिबिर संपन्न होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 

यावेळी जेष्ठ पत्रकार सुनील इंगळे यांनी असे मत व्यक्त केले की काही  सोसायटी असतात त्यामध्ये काही सभासद तात्पुरत्या स्वरूपात पद घेतात आणि स्वतःच्या घरामध्ये अनधिकृत तोडणी आणि जोडणी चे कार्य करीत असतात, आपल्यावरील थकबाकी सुद्धा माफ करून घेतात आणि ते केल्यावरती पद सोडून नामा निराळे राहतात आणि त्यावेळी चे सोसायटीचे पदाधिकारी त्यांच्याविषयी रजिस्टर निबंधकाकडे किंवा कोर्ट केसेस कडे कंप्लेंट करण्याविषयी अनुकूल नसतात कारण त्या झंझट मध्ये कोण पडेल हा सगळा प्रॉब्लेम असतो त्याविषयी या चर्चासत्रामध्ये चर्चा झाली.

आभार प्रदर्शनामध्ये श्री प्रथमेश पुण्यार्थी,कक्ष जिल्हा संघटक ठाणे ग्रामीण यांनी असे आवाहन केले आहे की फ्लॅट धारकांना कोणत्याही प्रकारची सेवा अथवा माहिती हवी असल्यास आपल्या ग्राहक संरक्षण कक्षाशी  संपर्क साधावा आपणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष नेहमी दक्ष असेल.

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४ प्रदान !

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४ प्रदान !
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) : हिंदी पत्रकार दिनानिमित्त  हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी
यांच्याकडून 2024 मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रांतील पुरस्कार देऊन भिवंडी धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, ज्यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक आणि वकील यांच्यासह इतरांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याला लोकांसमोर आणणे हा होता, जेणेकरून इतरांनाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा भिवंडी युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले, माजी नगरसेवक वसीम अंसारी, समाजसेवक अकरम मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक अनंता वाघ, वकील खदीजा खान (मुंबई उच्च न्यायालय), माहेनूर खान (मुख्याध्यापिका), पत्रकारांमध्ये डाॅ. श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दै.स्वराज्य तोरण, फिरोज मेमन, अमृत शर्मा, आचार्य सुरजपाल यादव, संदीप गुप्ता, सोहेल अंसारी, सय्यद नकी हसन यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार यूसुफ मन्सूरी यांनी केले होते तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सज्जाद अख्तर यांनी केले.

विरार येथे कुणबी समाजाचा भव्य रक्तदान शिबिर मोठया उत्साहात संपन्न !!

विरार येथे कुणबी समाजाचा भव्य रक्तदान शिबिर मोठया उत्साहात  संपन्न !!

*** सभासदांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुणबी बांधवांनी जपला जनसेवेचा वसा

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, विभागीय शाखा विरार, संलग्न कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ विरार यांच्या माध्यमातून विभागीय शाखा विरार चे खजिनदार  शैलेश बामणे, शाखेचे सहसचिव सिताराम नवाले तसेच पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था, भारतचे अध्यक्ष विजय चोघळा यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय शाखा विरारचे अध्यक्ष किशोर भेरे आणि कुणबी रणरागिणी मा.नगरसेविका तथा कुणबी महिला मंडळ विरारच्या अध्यक्षा सौ. संगीताताई भेरे, कुणबी युवा अध्यक्ष अविनाशजी पाचकले यांच्या मार्गदर्शनाने बोरिवली ब्लड बँक,दहिसर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर रविवारी ( १ जून) ज्युपिटर स्कूल, मनवेल पाडा येथे पार पडले. 
                 या कार्यक्रमाला विभागातील रक्तदात्यांनी सकाळपासूनच उत्फुर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्याच्या प्रतिसादाने दिवसभरात १५० पेक्षा जास्त रक्त दात्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १०१ रक्त दात्यांनी यशस्वी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाला नालासोपारा विधानसभेचे मा.आमदार क्षितिज ठाकूर यांची खास उपस्थिती लाभली.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस  कृष्णा वणे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस संतोष कांबळे, समाजसेवक कुळये गुरुजी, कुणबी बँकेचे संचालक पी.डी. ठोंबरे, ज्ञानदीप क्लास विरारचे संचालक दीपक भरणकर, माणगावचे कुणबी समाज सेवक प्रकाश दसाळे, समाजसेविका सौ. पालांडे ताई, कुणबी उद्योजक अनंत फिलसे, सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक कुणबी व्यावसायिक मस्कर, कुणबी युवा मुबंईचे शिलेदार मोरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रक्तदानाला उपस्थिती वि.आ.मा. युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर, संघटक अजीवजी पाटील, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, नगरसेविका सौ.चिरायूताई चौधरी, मीनलताई पाटील, रिटाताई सावरिया, पत्रकार दिपक मांडवकर, विरारचे प्रभोधनयोद्धा आयु.विजय कदम, रिअल इस्टेटचे सल्लागार कुणबी समाज सेवक सावंत, कुणबी युवा मुंबईचे माजी अध्यक्ष अनंत साळवी, मनवेलपाडा सामाजिक संस्थाचे पदाधिकारी गणेश गावडे, परशुराम नाईक, विक्रम चाळके, कोकण नगरचे विनायक शिगवण, कार्यक्रमासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून देणाऱ्या सौ. सामंत मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
               हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय शाखा विरारचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कुणबी युवा विरारचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य त्याच बरोबर कुणबी महिला मंडळ विरार च्या पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य याचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव एकनाथ डिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व रक्तदाते, मान्यवर, समाज सेवक, कार्यकर्ते, महिला मंडळ यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूरचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूरचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूर यांच्या ५९ व्या वर्धापन रविवारी (१जून) मोठया थाटामाटात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संचालक श्री.अनिल ठाकूर  सपत्नीक उपस्थितीत होते. तसेच शाखेचे पालक मंत्री श्री. भीमसेन आचरेकर, अध्यक्ष सौ. शोभना हेगडे व सदस्य श्री. प्रदीप गावंड, शाखा व्यवस्थापक श्री. रवींद्र लोटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
             अपना बाजार आरसीएफचे ग्राहक निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री.सतीश चौधरी यांनी अपना बाजार आरसीएफचे कौतुक करत पुढील उपक्रम आणि लोकसेवा कार्यास यानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या सुवर्ण दिनी शाखेचे सेवक श्री. प्रमोद महाडेश्वर यांचाही ५९ वा वाढदिवस होता. तो सेवक कु. पूजा राऊळ, कु. खेतना राणे, कु. हेमा चौहान, श्री.श्रीकांत कासार, श्री. राजू पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !!

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !! [ निवोशी | गुहागर : उदय दणदणे ...