Saturday, 27 June 2020

"चिनी माल विक्री बंदी : दोंडाईचा न .प . चे अनुकरण करा !"

"चिनी माल विक्री बंदी : दोंडाईचा न .प . चे अनुकरण करा !"


धुळे - धुळे, जिल्ह्यातील दोंडाइचा नगरपालिका ही संपूर्ण देशात चीनी वस्तुंच्या विक्रीवर बंदी आणणारी पाहिली नगरपालिका ठरली आहे . दोंडाईचा नगरपालिका देशात एक उत्कृष्ट नगरपालिका म्हणून नावलौकिक मिळवित असताना , त्याच नगरपालिकेने याबाबतचा ठराव केला आहे . त्यामुळे या पुढे आता दोंडाइचा  शहरात व्यापाऱ्यांना चिनी माल विक्रीसाठी ठेवता येणार नाही . सीमेवर चिनने जी धोकेबाजी चालविली आहे व आपल्या देशाचे वीस सैनिक मारले त्यामुळे देशभरात असंतोष आहे. देशभरात चिनी मालावर बहिष्काराची मोहिम सुरू आहे . चिनी मालाची होळी देखील जागो जागी होत आहे . चिनी अॅप  डिलिट करा , म्हणून मोहिम देखील चालविली जात आहे . एकिकडे देशप्रेमाचे हे वातावरण असताना दुसरीकडे गेल्या आठवड्यात नवीन लॉन्च झालेला चायनाचा महागडा मोबाईल भारतात  काही तासातच संपला . डोकलामच्या वेळी देखील अशी चिनी मालावर बहिष्काराची मोहिम चालली होती , पण  ती मोहिम वाढू शकली नाही , निकर्षाप्रत जावू शकली नव्हती. दरम्यान सरकारनेच शेकडो , हजारो कोटींचे ठेके चिनी कंपन्यांना देणे सुरु ठेवले . या प्रकारच्या बातम्या पाहून चिनी वस्तुंवरील जनतेची बहिष्काराची भावना कमजोर पडते . यासाठी जनतेला दोष देणे सोपे आहे . परंतू सरकारची भुमिकाही ' लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ! ' अशी असता कामा नये . म्हणूनच आता राज्य सरकारने चिनी कंपन्यांचे पाच हजार कोटी रूपये गुंतवणूकीचे प्रस्ताव रोखून धरले , केंद्र सरकारने सीमेस लागून असलेल्या देशांची गुंतवणूक  सरकारच्या संमतीशिवाय होणार नाही , असेही जाहिर केले . सरकारांच्या या कृतीचे जनतेने स्वागतही केले  आहे , त्याच प्रकारे दोंडाइचा नगर पालिकेने  चिनी माल विक्री वर बंदीच्या केलेल्या ठरावाचे जनतेत स्वागत होणार आहे . बऱ्याच नागरिकांच्या मनात अशी शंका असते की , चिनी माल आयातीवर सरकारच बंदी कां घालत नाही ? प्रश्न सरळ आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गॅट करारावर सही केलेली आहे . त्यामुळे सरकार म्हणून अशी बंदी घालता येत नाही . शिवाय चिनने इतक्या वर्षात विविध वस्तूंचे उत्पादन केंद्र बनून संपूर्ण जगाचे चिनवर मोठे अवलंबित्व  निर्माण करून टाकले आहे . हा सुध्दा एक मुद्दा आहे . असे असले तरी जनतेनेच चिनी वस्तू विकायच्या नाहीत, विकत घ्यायच्या नाहित असे ठरविले , तर  त्यास गॅट किंवा अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रिय कराराची बाधा येत नाही . त्यामुळे देशभरात जर नागरिकांनी चिनी वस्तु घ्यायच्या नाहित ठरविले , चिनी वस्तु विकायच्याच नाहित , असे दुकानदारांनी ठरविले तर त्यास कुठलीच बाधा येवू शकत नाही . आता दोंडाइचा न प ने शहरात अशा चिनी वस्तू विक्रीवर बंदीचा ठराव केला आहे . त्यांनी सर्व बाबी तपासून घेवूनच हा ठराव केला असेल . या ठरावाचे परिणाम व महत्व मोठे आहे . याच प्रकारे विविध ग्रा. पं. , नगर पालिका , नगरपंचायत , नगर परिषद , महानगर पालिका यांनी गावोगावी ठराव करुन चिनीमाल विक्रीस बंदी घातली तर देशभरात खूप मोठा रिझल्ट मिळू शकतो. शासनाने देखील ऑनलाईन विक्री होणाऱ्या मालावर तो कोणत्या देशात उत्पादित झाला आहे . हे नमूद करणे बंधनकारक केले आहे . बऱ्याच ऑनलाईन  व्यापार कंपन्या परदेशी आहेत . त्धांनी स्वतः मेड इन चायना , मेड इन पी आर  सी असणारे प्रॉडक्ट विकणे बंद केले नाहि , तरी  संपूर्ण देशभरातील डिलिव्हरी बॉय  यांनी ठरविले, की  आम्ही चायना मेड मालाची डिलेव्हरी करणार नाही , तरी सुध्दा खूप फरक पडू शकतो . यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहिम चालली पाहिजे . त्या दृष्टीने दोंडाईचा नगरपालिकेच्या या ठरावाप्रमाणे संपूर्ण देशात न .प .मनपांनी ठराव केले, आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली तर खूप मोठे काम होणार आहे .

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...