Monday 31 May 2021

दिलासादायक ! रुग्णसंख्येसोबत मृत्यूचा संख्येत सुध्दा घट !!

दिलासादायक ! रुग्णसंख्येसोबत मृत्यूचा संख्येत सुध्दा घट !! 


मुंबई : महाराष्ट्रात आज ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८८% एवढे झाले आहे.

आज राज्यात १५,०७७ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज १८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...