Thursday 27 May 2021

वाल्मिकी आबेडकर आवास योजना वसाहत कचोरे याला वाली कोण?-

वाल्मिकी आबेडकर आवास योजना वसाहत कचोरे याला वाली कोण?-  


'वेळेवर विकास कामे न केल्यास आमदार खासदार पालकमंत्री हरवले अशी तक्रार पोलीस आयुक्त ठाणे याच्या कडे करण्याची प्रहार पक्षाची  मागणी' - डॉ आदर्श भालेराव


कल्याण:- कल्याण शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विकास कामे करण्यात येत आहेत मात्र शहराचा भाग विकास कामापासून वंचित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. वाल्मीकि आंबेडकर आवास योजना वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक कचोरे 45 मधील परिसरात रस्त्याचे वाताहत झाल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या परिसरातून जाताना कसरत करावी लागत आहे. पथदिवे सुद्धा बंद अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळे चोरी व महिला छेडछाड सारखे गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यायाबात पोलीस यत्रना निकामी ठरत आहे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे परिसराला वाली कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पालिकेच्या असुविधा मुळे अनेक मुलांना अपघाताचा सामना करून आपला जीव गमवावा लागला. परिसरात रोग राई असल्याने आजारी पडून अनेक नागरिक दगावले असताना देखील पालिका प्रशासन गप्प!

परिसरात पथदिवे व संरक्षण भित नसल्याने मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाणात वाढ झाली आहे.

पालिकेने पुनर्वसन केलेल्या परिसरात संरक्षण भित नसल्याने अनेक भूमाफिया याच्या निर्माण झाला व त्याच्या मुळे परिसरात अनधिकृत बांधकामांचे शुरुवात झाली. पालिकेने पुनर्वसन केलेल्या वसाहत आता झोपडपट्टी च्या नावा ने ओळखले जाते. नक्की मुख्य धोरण हेच आहे का? पालिकेची हजारो घरे पडीत पडले आहेत त्या मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाणात वाढ झाली तरी पालिका प्रशासन मूग गिळून गप्प!

पुनर्वसन च्या नावाखाली खोटे आश्वासन देवून  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने केलेल्या पुनर्वसन कचोरे येथील वाल्मिकी आबेडकर आवास योजना वसाहत परिसरा ला कोणतेही सोय सुविधा न देणारे पालिका अधिकारी कोठे लापता झाले आहेत याचा ही शोध अद्यापही लागत नाही.
दुर्गाडी ते पत्रिपुल रस्ता रुंदीकरण करताना  सदनिका धारकांना मोठ मोठे आश्वासन देवून गेल्या 15 वर्षा पासून नागरिकांची फसवणूक करण्यात आले आहे. 60 एकर च्या परिसरात पुनर्वसन धारकांना अनेक विकास कामाचे आरखडे दाखवून शाळा आरोग्य केंद्र, समाज मंदिर, अंगणवाडी केंद्र, गार्डन चागले रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, मोठे नाले, कचरा कुंडी, परिसरास सुशोभीकरण साठी चौक व प्रवेशद्वार नागरिकांना संपूर्ण परिसर साठी संरक्षण भित असे अनेक आश्वासन पालिका अधिकारी याच्या कडून पुनर्वसन सदनिका धारकांना देण्यात आले होते. पण आता पर्यत एकही अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनकडे लक्ष दिले नाही. 60 एकर  च्या जागेत  पालिकेने वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, बी एस यु पी योजना वसाहत निर्माण केले आहे त्या सदनिकाधारक यांच्या साठी असलेले आरक्षण जागेत अनेक अनधिकृत झोपड्या ही बांधण्यात आले आहे त्यामुळे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे वाल्मीकि आंबेडकर आवास योजना वसाहतीतील नागरिकांसाठी विकास कामासाठी कोणतीही जागा शिल्लक उरलेली नाही महापालिकेने पुनर्वसन करतेवेळी संरक्षण भिंत निर्माण केली असती आज वाल्मीकि आंबेडकर आवास योजना वसाहतीतील नागरिकांना विकास कामासाठी शिल्लक असलेली जागेचा वापर करता आला असता अनेक वेळा वारंवार तक्रार करूनही अनाधिकृत बांधकामाला महापालिका अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात होते त्यामुळे त्या परिसरात शेकडो अनाधिकृत झोपड्या तयार करण्यास नागरिकांना यश आले आहे. पुनर्वसन झाल्या पासून एकही पालिका अधिकारी यांनी पुनर्वसन झालेल्या परिसराकडे लक्ष दिले नाही. हीच शोकांतिका आहे. खोटे आश्वासन देवून नागरिकांना राहत्या घरातून असुविधा असलेल्या वातावरण आणून सोडणे हे आहे का पालिकेचा विकास?  नक्की कोणत्या नागरिकांना साठी सुख सुविधा निधी खर्च करते गुंतलेल्या प्रशासनाला पुनर्वसन झालेल्या नुकसान पाहण्यासाठी वेळ मिळेल का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

श्रीकृष्ण नगर ते चौधरी वाडी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे नागरिकांना प्रवासी यांना जाण्या-येण्यात समस्या निर्माण होत आहे विकासापासून वंचित असणाऱ्या परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना रस्त्यामधील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे 
2019 मध्ये चौधरी वाडी ते श्रीकृष्ण नगर येते रिलायंस गॅस ची पाइपलाइन च्या कामा मुळे  रस्ता खराब झाल्या आहे. रस्ता. दुरुस्ती साठी रिलायन्स गॅस कंपनी कडून 3.60 लाख रुपये पालिकेत भरणा केली आहे तरी पालिकेने चौधरी वाडी ते श्रीकृष्णनगर पर्यंतचे रस्त्याचे काम करण्यास दुर्लक्ष केले आहे.

अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून देखील पालिका प्रशासन विकास कामासाठी निधी उपलब्ध नाही असे बतावणी करून नागरिकांच्या भावनेशी खेळत आहेत असे प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ अंबादास उर्फ आदर्श भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...