Wednesday 30 June 2021

राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ दिसून आली ! रिकव्हरी रेट 96.02 टक्के तर मृत्यूदर 2.01 टक्के !

राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ दिसून आली ! रिकव्हरी रेट 96.02 टक्के तर मृत्यूदर 2.01 टक्के !



मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10, 353 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,19,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.02% टक्क्यावर गेला आहे.

तर राज्यात आज 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 16 लाख 37 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 61 हजार 404 (14.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 17 हजार 926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 173 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...