Thursday 29 July 2021

पुरग्रस्तांचे अश्रू पुसणा-या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले कडून दहा कोंटीची मदत, बाँलिवूडवाले कुठे लपले?

पुरग्रस्तांचे अश्रू पुसणा-या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले कडून दहा कोंटीची मदत, बाँलिवूडवाले कुठे लपले?


कल्याण, (संजय कांबळे) : अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सतत आघाडीवर असलेल्या लाखात एक देखणी अशी सुंदर मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले यांनी नुकताच सांगली कोल्हापूर या पुरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी उध्वस्त झालेला संसार बघून त्यांच्या डोळ्यांंच्या कडा पानावल्या़च, परंतु ते लपवून समोर ढाय मोकळून आक्रोश करणाऱ्या 'त्या' माऊलीला उराशी कवटाळून तिचें अश्रू पुसण्याचे काम तिने केले. 


ऐवढ्यावरचं न थांबता या पुरग्रस्तांंचे संसार पुन्हा एकदा नव्याने उभें रहावेत म्हणून दिपाली भोसले-सय्यद चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीन तब्बल सुमारे १० कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. अशा या गुणी अभिनेत्रीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. तर मुंबई-महाराष्ट्राच्या जीवावर मोठे झालेले'बाँलिवूडवाले'कुठे लपले आहेत? असाही संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


महाराष्ट्रात काही मोजकेच अभिनेते, अभिनेत्री आहेत की ज्यांनी चित्रपट क्षेत्रातासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे, नाम,फांऊंडेशन चे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मंकरंद अनासपुरे, प्रंशात दामले, जयवंत वाडकर, असे कितीतरी नावे घेता येईल, परंतु अभिनेत्री मध्ये गेल्या काही वर्षापासून सतत चर्चेचे नाव म्हणजे अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद, यांचेच आहे, त्याची कारणे देखील तसीच आहेत, कुठे नैसर्गिक आपत्ती आली, कुठे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेथे दिपाली सय्यद पोहचल्या नाहीत असे कधी झाले नाही. नुकताच त्यांनी सांगली-कोल्हापूर, भुदरगड, गारगोटी या पुरग्रस्त भागाचा दौरा केला, केवळ इतरांनप्रमाणे शो शाईनिंग न करता पुरग्रस्त भागात घरोघरी जाऊन संसार उध्वस्त झालेल्या माऊलींच्या आक्रोशाला उराशी कवटाळून तिचें अश्रू पुसून धिर देण्याचे काम केले, ऐवढ्यावरचं न थांबता पुरग्रस्तांंचे संसार नव्याने उभें रहावेत म्हणून दिपाली भोसले सय्यद चँरिटेबल ट्रस्ट तर्फे तब्बल१०कोटी रूपयांची मदत जाहीर केली. या वरुन या गुणी अभिनेत्रीची सामाजिक बांधिलकी दिसून आली.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पिंडच सामाजिकतेचा, समाजसेवेचा वसा घेतलेल्या या अभिनेत्रीचा प्रवास तसा खडतरच झाला, लोकांच्या मदतीसाठी धाऊन जाणे, हे स्वभावातच असल्याने, तसेच त्यांच्यात मिसळून काम करण्याची वृत्ती, "स्टार" असूनही पाय जमिनीवर असल्याने त्या कलारषिकासह, सर्वसामान्य जनतेच्या हद् य सिंहासनावर अधिराज्य गाजवत आहेत, लाखो करोडो फँन असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा जन्म १ एप्रिल १९७८ मध्ये कुर्ला मुंबई येथे मराठमोळ्या कुंटूबात झाला. प्रसिद्ध अशा नांलदा विद्यापीठातून फाईन आर्ट डिग्री घेतल्या नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले, 'जाऊ तिथे खाऊ' हा त्यांचा पहिला चित्रपट, १९९०च्या दशकात टिव्ही मालिका बंदिनी व समांतर भरपूर गाजल्या ,त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या, मुंबईचा डबेवाला, लाडी गोडी, होऊन जाऊद्या, करायला गेलो एक, ढोलकीच्या तालावर, उचला रे उचला, वेलकम द जंगल, आणि मला एक चाणसं हवा, असे ३० हून अधिक चित्रपट यांनी केले.

मे २००८ मध्ये त्यांनी बाँबी खान यांच्याशी लग्न केल्याने त्या दिपाली भोसल्यांच्या सुफिया जहागीर झाल्या. पण तरीही त्यांनी आपली ओळख दिपाली सय्यद-भोसले अशीच ठेवली.

सामाजिक कार्यातदेखील तितक्याच आत्मविश्वासाने काम केले, अहमदनगर येथील साकळाई उपसा सिंचन योजना पुर्ण व्हावी म्हणून ९आँगस्ट या क्रांती दिनी आमरण उपोषण केले, यावेळी अभिनेत्री मानशी नाईक, सीमा कदम, माधुरी पवार, श्रेया परदेशी, सायली परहाडकर, यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता.अखेरीस या उपोषणाला यश येवून महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी सुमारे ५ कोटी रुपये निधी मंजूर केला. यामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा सामाजिक कार्यात ठसा उमटला 

यांनतर सन २०१९मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या पुराच्या वेळी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या भागास भेट देऊन दिपाली सय्यद भोसले चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सुमारे ५ कोटींची मदत दिली, तसेच पुरग्रस्त भागातील मुलीच्या लग्नाकरिता प्रत्येकीच्या नावावर ५० हजार रुपये टाकले. त्यामुळे पालकांच्या डोक्यावरील ओझ कमी झाले. तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, गारगोटी तालुक्यातील पुराचा फटका बसलेल्या भागाचा दौरा केला .यावेळी डोळ्यादेखत काडी काडी जमवून उभा केलेला संसार पाण्यात वाहून गेल्याने आक्रोश करणाऱ्या' त्या' माऊलीला उराशी कवटाळून तिचें अश्रू पुसण्याचे काम दिपाली ने केले, तसेच या पुरग्रस्तासाठी सुमारे १० कोटी रुपयांची मदत ट्रस्ट च्या वतीने जाहीर केली,

तसे पाहिले तर मुंबई ने अनेक बाँलिवूड स्टारना करोडपती बनवले, मात्र जेव्हा महाराष्ट्रावर संकटे येतात, तेव्हा हे कोठे लपून बसतात, मदत करणे तर सोडा पण साधीसुधी सहानुभूती व्यक्त करत नाहीत अशावेळी त्यांना त्यांची जागा दाखवला हवी तर सदैव नैसर्गिक आपत्ती असो, मुलीचा प्रश्न असो, किंवा कोणतेही सामाजिक काम असो ,तत्परतेने तेथे जाऊन त्यांच्या दु:खात सहभागी होणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले यांच्या सारख्यांंना महाराष्ट्राने डोक्यावर घ्यायला काय हरकत आहे, अशा या गुनवान अभिनेत्री ला मानाचा 'सलाम'

प्रतिक्रिया : "मी या भागाचा दौरा केला तेव्हा भयानक चित्र दिसत होते, सर्वत्र चिखल, घरे वाहून गेलेली, काही कोसळली, आक्रोश करणा-या माताभगिनी, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, तरीही ते लपवून मी त्यांचे अश्रू पुसले, त्यांना आधाराची गरज होती, आहे,लवकरच मी कोकणाचा दौरा करणार आहे" -दिपाली सय्यद-भोसले

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...