Thursday, 29 July 2021

हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा ! "बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा"

हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा !
"बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा"


पुणे : राज्यांत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकणातही मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान पुढील ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम यला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई रायगड, पालघर, रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे २९ जुलैपासून ते २ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतरही भागांत हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत.

त्यामुळे विश्रांती घेतलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय होताना यला मिळणार आहे. कोकण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर ठाणे, पालघरमधील बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. पुढील पाच दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई रायगड, पालघर, रत्नागिरी या भागातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे

No comments:

Post a Comment

चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचा यशस्वी सहभाग " !!

*" राजभवन आयोजित ;  **चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट...