Tuesday 31 August 2021

राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता !

राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता !


पुणे : राज्यात कालपासून सुरु असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच जोर धरलेला दिसून येत आहे.  पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यासह इतर अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, काल व आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.

त्यात हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे 95 टक्क्यांपर्यंत आहे. दिवसभरात अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांत अशाचप्रकारे हवामानाचं स्वरूप असणार आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील ३ ते ४ दिवस पावसाचा जोर असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...