पूरग्रस्त भवानीनगर येथील मुख्य नाल्याची दुरवस्था ! "कंत्राटदारांचा हातचलाखी की हलगर्जीपणा"
कल्याण, बातमीदार : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ३१ मे पर्यंत सर्व नालेसफाई चे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदार व संबंधित विभागाला दिले आहेत, तरी प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून आपल्या विभागातील कंत्राटदार व संबंधित अधिकारी कसे काम करत आहेत याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
कल्याण पश्चिम येथील भवानीनगर आधीच पूरग्रस्त विभाग म्हणून ओळखला जातो. येथील कंत्राटदारांकडून नालेसफाई मधे हलगर्जीपणा करण्यात आला आहे, भवानीनगर येथील मुख्य नाल्याची काय साफसफाई करण्यात आली हे वरील फोटो वरून दिसत आहे. हा हलगर्जीपणा नुसता प्रभागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण करत नसून या मुळे रोगराई सुध्दा पसरत असते. तरी प्रभागाचे प्रमुख म्हणून प्रभाग क्षेत्र अधिकारी (सहायक आयुक्त) यांनी याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, व संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत.
No comments:
Post a Comment