अहमदनगर, अखलाख देशमुख, दि ३१ : राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी उशीरा का होईना राज्य सरकारला शहाणपण सुचले आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले. मात्र या नुकसान भरपाईत शेतकऱ्यालाच लुटण्याचे काम होत आहे. ही घटना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात आढळून आली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी बेधुंदपणे शेतकऱ्यांकडून पाहणीसाठी पैसे मागत आहेत. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ज्यातून उघडउघड लुटमार करण्याची हिंमत अधिकाऱ्यांना झाली आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा. अन्यथा आपलं सरकार हे बळीराजाच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे यावर निश्चितपणाने शिक्कामोर्तब होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!
निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...
-
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !! मुख्यम...
-
लाचखोर सुनीता धनगर यांच्या घराची झडती - सोनं आणि कॅश बघून अधिकारी चक्रावले !! नाशिक, प्रतिनिधी - निलंबित मुख्याध्यापकाला कामावर ...
-
भटक्या प्राण्याकरीता कल्याण डोंबिवलीतील पहिले ट्रिटमेंट सेंटर डोंबिवली (पश्चिम) येथे सुरू !! डोंबिवली, प्रतिनिधी : फॅक्ट्स फॉरेव...
No comments:
Post a Comment