नामदार मुख्यमंत्री साहेब, जळगाव जिल्ह्यात आपले हार्दिक स्वागत -
जर - *आम्हा असंघटित कामगार यांचे ओके करा तरच आपल्या सरकार ओके राहील*
*महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आयटकचे अनाहूत पत्र*
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा येत आहात- ! स्वागत ! यावेळी भोकर खेडी भोकरी दरम्यान तापी नदीवरील फुलाच्या पायाभरणी चे उद्घाटनासाठी येत आहेत त्यांचे स्वागत जरूर ; पण महाराष्ट्रात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सरकार तर्फे मिळणारे पगाराचे अनुदान दोन महिन्यापासून थकीत आहेत. ग्रामपंचायत एकूण मिळणारा पगाराचा हिस्सा व सध्याच्या राहणीमान भत्ता कर्मचाऱ्यांना मिळतच नाही.
क्वचित पंचायती देतात त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी सरकारने जाहीर केलेल्या किमान वेतनाच्या निम्म्या वेतनावर काम करतात तेही सरकार वेळेवर देत नाही, त्यांना १०० टक्के वेतन मिळावे अशी अपेक्षा आहे ! आज कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे दुसरीकडे कोरोना काळात अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना गेल्या पाच वर्षापासून मानधनात वाढच केलेली नाही, मानधन थांबलेले आहे, तसेच 2018 पासून देण्यात आलेले भ्रमणध्वनी हे वॉरंटी गॅरंटी संपलेले असून कालबाह्य झालेले आहेत, त्यांना नवीन चांगला मोबाईल मिळावा म्हणून आयटक व कर्मचारी संघटना कृती समिती सरकारकडे गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करीत आहे ; त्यांना दहा हजार रुपयांचा मोबाईल द्यावा म्हणून ठराव केलेला आहे तसे परिपत्रक काढलेले आहे परंतु त्याची अंमलबजावणीच केलेली नाही 2014 पासून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख रुपये व मदतनीस यांना 75 हजार रुपये देण्याची योजना नामदार फडणवीस यांनी जाहीर केलेली होती ; परंतु 2017 पासून सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीस यांना सेवानिवृत्ती लाभाची रक्कमच मिळालेली नाही- आज त्यांचे वय 70 /72 झालेली आहेत आणि सेवानिवृत्ती लाभ मिळालेला नाही त्यामुळे त्यांचे आजारपण त्यांचे उदर निर्वाह यासाठी यासाठी त्यांचे जवळ पैसाच नाही, शंभर कोटी रुपये त्यांना देण्यासाठी आठ महिन्यापासून मंजूर झालेले आहेत पण अजून पर्यंत लाभत्यांचे पर्यंत पोहचलेला नाही तरी या वयोवृद्ध सेविका मदतनीस यांच्या हक्काची सेवा निवृत्ती लाभाची रक्कम तरी आपण ताबडतोब द्यावी व त्यांच्या दुवा घ्यावा अशी त्यांची आर्जवे आहेत त्याचप्रमाणे सेविका मदतनीस त्यांच्या वेतनात वृद्धी होणे गरजेचे आहे त्या येत्या 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाच्या तयारीत आहेत कोरोना काळात जनतेची सेवा करताना जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायत ती कर्मचारी अधिकारी मरण पावले; त्यांना 50 लाख रुपये अनुदान कोरोना गेला तरी मिळालेले नाही एसटी कर्मचारी यांचे वेतन रखडलेले आहे, आशा गटप्रवर्तक यांना नोकरीची शाश्वती व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळेल म्हणून त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
माननीय मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती की , आपण मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणीतरी उच्चवर्णीय वा प्रस्थापितांची मिरासदारकी राहिली नसून कोणीही कर्तबगार नेता मुख्यमंत्री होऊ शकतो असाच संदेश महाराष्ट्रातील जनतेला गेलेला आहे आणि सध्या तत्त्वाच्या राजकारण गप्पांपुरतं राहिलेले असून तत्त्वनिष्ठा या सर्व बाबी गौण झालेले आहेत, हे जरी असले तरी आपण काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आपला ठसा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये उमटवण्याच्या प्रयत्न करीत आहात हे खरोखर उजय आहे तेव्हा आपणास विनंती की, महाराष्ट्रातील रयतेचे शेतकरी मजूर आदिवासी दलित महिला वर्ग तसेच उपरोक्त नमूद अंगणवाडी ग्रामपंचायत बांधकाम कर्मचारी अाशा गटप्रवर्तक कंत्राटी कामगार यांचे ओके केले तरच आपले आपल्या सत्तेचे महाराष्ट्रात ओके राहील तेव्हा तेव्हा आपण सध्या तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत पगार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न स्त्री परिचरांचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न यांची थकीत वेतन विषयक बिल मार्गी लावून त्यांचे ओके करावे ही अपेक्षा म्हणजे आपोआप आपली महाराष्ट्रातील सत्ता ओके झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो आणि लवकरच जळगाव धुळे हायवे वरील गिरणा नदीवरील समांतर पुलाचे काम पूर्ण करून त्याच्याही उद्घाटनाला आपणच यावे अशी अपेक्षा! चूक भूल क्षमस्व! !
👏🏼👏🏼
.........आपला कॉम्रेड
अमृत महाजन, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, आयटक
संपर्क क्रमांक - +91 98605 20560
No comments:
Post a Comment