मुरबाड- (मंगल डोंगरे) : राज्यातील चौदा हजार दोनशे ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी ला होणार असून सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबर आहे. परंतु शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी असणारी वेबसाईट जाम झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज भरण्यास सुमारे तीन ते चार लागत आहेत. अशा परिस्थितीत सर्व उमेदवारांचे अर्ज भरले जाणार नाहीत. सध्या आॕनलाईन सेंटर वर उमेदवार राञभर जागत आहेत परंतु सर्व्हर जॕम असल्याने फाॕर्म भरु शकत नाही अशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सुमारे ६0% उमेदवार अजूनही अर्ज भरायचे शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आॕफलाईन अर्ज स्विकारावेत अशी जोरदार मागणी उमेदवारां कडून झाल्या मुळे राज्य निवडणूक आयोगाने त्या मागणीची गंभीर दखल घेवुन आँफ लाईन अर्ज स्विकरण्याचे आदेश देवुन 30/12/2020 पर्यंत सांयकाळी 5.30 वाजे पर्यंत वेळ वाढवून दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!
वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...

No comments:
Post a Comment