मी माणसे जोडणारा कार्यकर्ता आहे.- 'माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील'
उत्साळी, ता.चंदगड येथे रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारांभ !!
उत्साळी, (एस.एल.गुडेकर/ समीर खाडिलकर) :
माणुसकी जपून तालुक्यात विकास गंगा आणली व माणसे जोडत गेलो. असे गौरर्वोदगार माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील यांनी उत्साळी, ता.चंदगड येथे रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण प्रसंगी काढले. जी.प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम मार्गी लागले. आण्णा पुढे म्हणाले, उत्साळी गावासाठी अनेक विकास कामे दिली आणि देत आहे. मी आमदार असतांना१९९८ साली या रस्त्यावर डांबर पडले होते. त्यानंतर आता माझ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून रस्ता होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. उत्साळी गाव हे माझे असून लोकांनी मला मनापासून स्वीकारले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य वसंत सुतार व गुरुनाथ मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य भाजपा शिवाजीराव पाटील म्हणाले, माझी ओळख नसताना देखील आपल्या गावाने गेल्या विधानसभेला मला भरघोस मतदान केले आहे. त्याचे ऋण येत्या काही दिवसात गावच्या विकासकामातून व्यक्त करेन. जि.प सदस्य सचिन बल्लाळ म्हणाले, गावच्या मागणीनुसार अडकूर ते उत्साळी रस्त्यासाठी ५९ लाखाचा निधी लावण्यात मला यश आहे. येथून पुढे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळावी असे मत व्यक्त केले.यावेळी पंचायत समिती सदस्य बबन देसाई, अँड. विजय कडुकर, चंदगड चे नगरसेवक दिलीप चंदगडकर, जिल्हा सरचिटणीस रवी बांधिवडेकर, उदय देशपांडे, मुरली बल्लाळ, विजय गावडे, पुंडलिक दळवी, रामराव देसाई, अनिल वाईगडे, नाना देसाई, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देवळी, राजाराम आंबुलकर, शिवाजी आपटेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष सावंत भोसले यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य रुकमाना मटकर यांनी करुन सोहळ्याची सांगता केली.
फोटो ओळ...[ उत्साळी ता. चंदगड येथे, रस्त्याचे डांबरीकरणाचा शुभारंभ करताना माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, प. स. सदस्य बबन देसाई आदी मान्यवर...]

No comments:
Post a Comment