नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महारांजाचें नाव द्या-- राज ठाकरे.
अरुण पाटील, भिवंडी, दिं.21 :
नवी मुंबई विमानतळ नामांतरा वरुन सर्वत्र वाद सुरु आहे पण, या नवी मुंबई विमानतळ हे शहरातच आहे, मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आहे, तेच नाव नवी मुंबईच्या विमानतळाला असणार आहे, आता हा विषय संपला आहे, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही यासाठी सहमती दर्शवली आहे.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्ण कुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी राज ठाकरे म्हणाले की, 'नवीन होत असलेल्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आहे. राज्य सरकारकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह आहे. मी त्यांच्यापुढे वस्तुस्थिती ठेवली. नवीन विमानतळे ही शहराच्या बाहेर होत असतात. जरी ते विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबईचे विमानतळ असणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
आता जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे तेच नाव तिकडे असणार आहे. मुंबईतील विमानतळ हे डोमेस्टीक असेल आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नाव देणे उचित असेल, ते विमानतळ या विमानतळाचा भाग आहे. त्याचा कोड BOM हेच असणार आहे, असंही राज ठाकरे यांनी समजून सांगितलं.
विमानांना पार्किंगला जागा नाही म्हणून मुंबई विमानतळाची ही अवस्था आहे. आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया, असा इशाराही राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत दिला.

No comments:
Post a Comment