Sunday, 4 July 2021

वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत : दुबार पेरणीचे संकट ओढवणार?

वरुणराजाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत : दुबार पेरणीचे संकट ओढवणार?


टिटवाळा, उमेश जाधव -: तोक्ते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्हात पावसाला सुरुवात झाली. यांनतर पावसाचा हुकमी जुलै महिना सुरु झाला. त्यामुळे या सर्व घटनांचा विचार करुन बळीराजाने पटापट भातपेरणी उरकून घेतली. पंरतू यानंतर वरुणराजाने दडी मारल्याने मात्र बळीराजा पूरता हवालदिल झाला आहे. पाऊस अशाच प्रकारे लांबला तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भिती देखील शेतकरी वर्गातून व्यक्त केली जातेयं. कोरोनाच्या सततच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकवूनही, लाँकडाऊणमुळे बाजारपेठा न उपलब्ध झाल्याने शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचे चित्र दिसून आले. आता काही प्रमाणात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. त्यामुळे यंदा पिक चांगले येईल या आशेवर बळीराजा होता. नूकतेत ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १ हजार ३४० क्विंटल भात बियाणे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. यामध्ये 'सुवर्णा, जया म्हसोरी, कर्जत३,  व ७, कोयम्टूर ५१, आदी जातींचा समावेश असून सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाणार आहे. काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जमीनीत थोडा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पंरतू आता पावसाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी सखल जमीन आहे, किवा जेथे ओल आहे तिथे कसेतरी भातरोपे उगवली।आहेत. परंतू इतर ठिकाणचे काय? दिवसेदिवस कडक ऊन पडत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भरच पडत आहे. त्यामुळे कोरोनाने मारले, पण निसर्गाने तारले असे म्हणायचे असेल तर वरुणराजाची कृपा होणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारचे मत फळेगांव येथील शेतकरी कमलाकर जाधव व कृष्णा जाधव यांनी आपले मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...