Sunday, 4 July 2021

कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे माजी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन !

कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे माजी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन !


टिटवाळा, उमेश जाधव : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि श्रींमत समजल्या जाणा-या म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि कल्याण तालुका वारकरी सांप्रदायचे माजी तालुका अध्यक्ष हरिभाऊ विठू म्हात्रे यांचे नुकतेच बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते.

कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्राम पंचायतीची स्थापना १९९४-९५ मध्ये झाली. पहिल्या सरपंच म्हणून सुमनताई खरात तर उपसरपंच पदी हरिभाऊ विठू म्हात्रे हे विराजमान झाले. यांनतर सरपंचावर अविश्वास दाखल झाल्याने उपसरपंच हरिभाऊ म्हात्रे हे सरपंच पदी विराजमान झाले. पहिल्यापासून भक्तीमार्गाकडे कलं असलेले सरपंच हरिभाऊ म्हात्रे यांना सर्व नाना म्हणत. सरपंच कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे केल्यानंतर ते राजकारणातून वेगळे झाले व   त्यांनी पुर्णवेळ स्वताला हरी भक्तीत वाहून घेले. त्यांच्या नावापुढे सरपंच ऐवजी हभप असे लावले जाऊ लागले. या काळात ते कल्याण तालुका वारकरी संप्रदायचे अध्यक्ष झाले होते. म्हारळ गावात म्हात्रे कुंटूंब अंत्यत मोठे असून भाऊ, मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा पांडूरंग हरिभाऊ म्हात्रे यांनी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले आहे. तर त्यांची सून म्हारळ ग्रामपंचायतीची सदस्या आहे. अशा या मोठ्या परिवारातील नाना हे सर्वांना पितृतूल्य असेच होते. नुकतेच बुधवारी त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे इतके होते. त्यांच्या निधनाने म्हारळ गावावर शोककळा पसरली असून कल्याण तालुका वारकरी सांप्रदायचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे अशा प्रकारच्या भावना तालुक्यातील वारीकरी व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...