जव्हार- जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यातील पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांना ई केवायसी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र शेतकर्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सेवा केंद्र ठिकाणी जाऊन आपली ई केवायसी ७ सप्टेंबर २०२२पर्यंत अपडेट करुन घेणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकर्यांनी ७ सप्टेबर २०२२ पर्यंत ई केवायसी केली नाही त्या शेतकर्यांना या पुढील लाभ मिळणार नाही. असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. शेतकर्यांकडे ई केवायसी अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक आहे. जव्हार तालुकाक्यातील पी एम किसान योजनेतील पात्र व ई केवायसी अपडेट न केलेल्या शे तकर्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पुर्वी ई केवायसी करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार जव्हार यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment