Sunday, 11 June 2023

आळंदीत माऊलींच्या मंदिर परिसरात पोलिस- वारकऱ्यांमध्ये झटापट व लाठीमार !!

आळंदीत माऊलींच्या मंदिर परिसरात पोलिस- वारकऱ्यांमध्ये झटापट व लाठीमार !!

पोलिसांकडून लाठीमार, हे क्लेशदायक व दुःख देणारी -- अजित‌‌ पवार.

भिवंडी, दिं,१२, अरुण पाटील (कोपर) :
        संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून रविवारी (ता.११) आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थानाला सुरुवात झाली. त्यावेळी पोलीस वारकऱ्यांमध्ये झटापट झाली पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा प्रकार घडल्याने हे क्लेषदायी व दुःख देणारी असल्याची प्रतिक्रिया विधान सभेचे विरोधी पक्षनेते श्री.अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
        श्री.अजित पवार पुढे म्हणाले की, पालखी सोहळ्याचे योग्य नियोजन करून हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तास घडले नाही. पोलीस लाठीमारचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी निषेध करतो. श्री.अजित पवार पुढे म्हणाले की, कुठल्याही अध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूरवारी सारख्या सोहळ्यात सहभागी होताना सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा, ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेऊन बरित सहबागी व्हावं,असे आव्हान त्यांनी केले.
       रविवारी संध्याकाळी चार वाजता आळंदी येथून माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले. आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदीत जमले आहे.मात्र, या वारीला पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे.रविवारी संध्याकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान होणार असतानाच, पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली.
          माऊलींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी वारकरी पुढे जात होते. पण, याचवेळी पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी वारकऱ्यांनी पोलिस बंदोबस्तातील कर्मचारी आणि बॅरिकेट्स मागे करुन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. यात पुढे जाणाऱ्या काही वारकऱ्यांना पकडून पोलिसांनी मागे ढकलले.
         अशात पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. परंतु यातील काही वारकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारला. त्या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. या प्रकारानंतर पोलिसांनीही मंदिरात बंदोबस्त वाढवला आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...