ईडीची नामांकित ज्वेलर्सवर जप्ती, ३१५ कोटींच्या मालमत्त्यांवर कारवाई करत ७० मालमत्ता तात्पुरत्या जप्त !!
भिवंडी, दिं,१५, अरुण पाटील, (कोपर) :
राज्यात ईडीच्या कारवाईचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्रातील मुंबई, जळगाव, ठाणे, सिल्लोड, कच्छ भागात ईडीकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे ३१५ कोटी आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे.
ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये यांच्यासह इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे.
ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाणे (महाराष्ट्र) येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment