पुरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती ! उर्जामंत्री नितीन राऊत...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराचा मोठा प्रमाणात राज्याला फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्धवस्त होण्यासह काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पुराच्या परिस्थितीत गमवाले लागले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळी आता पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्तांना दिलासा मिळेल अशी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराचा तडाखा बसलेल्या भागात वीज बिलाच्या वसूलीसाठी स्थगिती देण्यात यावी.
नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराची परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नागरिकांकडून वीज बिल वसूल करु नका. तसेच पुरग्रस्त भागातील स्थिती पुर्ववत झाल्यानंतर बिल भरण्यासाठी सुद्धा नागरिकांना सवलत दिली जाईल असे ही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment