रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. निर्मला ताई कदम यांनी कल्याण आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा !!
महाराष्ट्रात जवळपास 40 कर्मचाऱ्यांचे आत्तापर्यंत आत्महत्या केल्या आहेत एसटी कर्मचारी व कामगार वर्ग यांना एकजुटीचा नारा देत मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनास सुरुवात केली आहे .या आंदोलनात कामगारांचे मुला बाळा सहित कामगार आंदोलनाला बसले आहेत.
एसटी कामगारांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चाही केली.
कल्याण बस आगारातील बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनास प्रत्यक्ष भेटून रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. निर्मला ताई कदम, कल्याण अध्यक्ष संध्याताई निकम, उपाध्यक्ष मीनाताई वाघ, सन्माननीय भारती बुटाला ताई, नाभिक महामंडळाचे मा. आबासाहेब बिरारी यांनी आंदोलनाला नाभिक महामंडळातर्फे जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ .निर्मला ताई कदम यांनी सरकारला धारेवर धरले आहे. तसेच रयत क्रांती संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्राची तोफ आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार जोपर्यंत कामगारांचा प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत रहाणार नाही असे सांगितले.

No comments:
Post a Comment