महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420.80 कोटी निधी वितरित !!
*मार्गदर्शकतत्वे शिथिल करून तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश*
नवी दिल्ली 12 : राज्यातील अतिवृष्टी, ओला दुष्काळ तसेच पावसाळ्यातील नुकसान भरपाईसाठी केंद्रसरकारने आज देशातील 22 राज्यांना आपत्ती निवारणासाठी 7 हजार 532 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 1420.80 कोटी रुपयांचा निधी अर्थ मंत्रालयाकडून त्वरित वितरित करण्यात आला आहे.
देशभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, अर्थ मंत्रालयाकडून याबाबत मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्यात आली आहेत आणि मागील आर्थिक वर्षात राज्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या उपयोग प्रमाणपत्राची वाट न पाहता ही रक्कम राज्यांना तात्काळ मदत म्हणून गृह मंत्रालयाच्या शिफारसीने जारी करण्यात आली आहे.
राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) चा वापर केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढग फुटणे, कीटकांचा हल्ला आणि शीतलहरी यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना तात्काळ मदत देण्यासाठी खर्च भागवण्यासाठी केला जातो.
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 48 (1) (अ) अंतर्गत प्रत्येक राज्यात स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड (SDRF) ची स्थापना करण्यात आली आहे. हा निधी अधिसूचित आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारांकडे उपलब्ध असलेला प्राथमिक निधी आहे. केंद्र सरकारचे SDRF मध्ये सर्वसाधारण राज्यांमध्ये 75% आणि उत्तर-पूर्व आणि हिमालयातील राज्यांमध्ये 90% योगदान असते.
No comments:
Post a Comment