Sunday, 5 November 2023

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार-२०२३" ने सन्मानित

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार-२०२३" ने सन्मानित 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         मुंबई, पूर्व -पश्चिम उपनगर  ठाणे सह महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक भगवे वादळ चा द्वितीय वर्धापन दिन दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत दणक्यात साजरा झाला. यानिमित्ताने "महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांतील मान्यवर" उपस्थित होते. दादर येथील, मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात आयोजित केलेल्या "पुरस्कार सोहळ्यात" सुरुवातीला काही कवींनी आपल्या  'कविता' सादर केल्या. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील कासार कोळवण गावचे कोकण सुपुत्र मोहन जयराम कदम यांना "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार-२०२३" देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी डॉ. सुकृत खांडेकर - संपादक दैनिक प्रहार, साहित्यिक व कवी विलास खानोलकर - सदस्य दिल्ली सेन्सॉर बोर्ड, प्रा.डॉ. राम नेमाडे - सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक, डॉ.जे.आर. केळुसकर - माजी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, तसेच श्री.सनी मुणगेकर - सुप्रसिद्ध अभिनेता नाटक अल्बत्या गल्बत्या, आणि नेहा पाटील - लावणी सम्राज्ञी ढोलकीच्या तालावर फेम, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. 

शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे कासार कोळवणचे पदाधिकारी व साई भक्त  ज्यांनी मंडळाच्या उन्नती कामासोबत महान समाजकार्याचा वसा घेतला.ज्यांनी हेच काम आयुष्यभर गावात राहून गावासाठी केले असे त्यांचे वडीलांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. याची पोच पावती  म्हणून आतापर्यंत त्यांना अनेक महत्वाच्या व मानाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. समाजात कुठल्याही फळाची अपेक्षा न करता  निःस्वार्थी पणे काम करून सर्वाना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव आज प्रसिद्ध  आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असा लौकीक असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन जयराम कदम यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या असून पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हिच, साई चरणी प्रार्थना केली आहे. मोहन कदम महाराष्ट्रात विविध संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, समाज शाखा मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी समाज प्रबोधन करत समाजातील ज्या आवश्यक नाहीत अशा काही अनिष्ठ प्रथा बंद करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. ज्याच्या पासून वेळ, पैसा वाचेल असे कार्य ते करत आहेत. लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि गरजेला घरच्या माणसासारखं धावायचं अशी ओळख मोहन कदम यांची आहे. त्यांना याकामी त्यांची पत्नी, मुले, भाऊ आणि मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभते. घरातून समाजसेवेचे मिळालेले बाळकडू आणि पत्नी, मुलांचे प्रेम या जोरावर मोहन कदम यशस्वी झाले आहेत. 

मला समाजसेवेचा वसा वडिलोपार्जित मिळाला आहे. लहानापासून आवड निर्माण झाली म्हणून जनसेवा ही ईश्वर सेवा असे समजून मी सतत काम करत असतो. लोकांचे आशीर्वाद हेच आमच्या साठी पुरस्कार आहेत असं मत मोहन कदम यांनी बोलताना व्यक्त केले. सा.भगवे वादळ चे यशस्वी संपादक श्री.दत्ता खंदारे व त्यांच्या निवड समितीचे आणि त्यांच्या टीम वर्क ने कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन आणि नियोजन उत्तम केले होते. त्याबद्दल मोहन कदम यांनी त्यांचे मनापासून  हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन केले आहे .

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...