Thursday, 5 December 2024

वाडा तालुक्यात गरजू शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या बियाणांचे वाटप !!

वाडा तालुक्यात गरजू शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या बियाणांचे वाटप !!

वाडा, समीर काळे : वाडा तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना भाजीपाल्याच्या बियाणांचे वाटप करण्यासाठी बॉम्बे रोटरी क्लब आणि दिगंत स्वराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे 40 एकर जमीन भाजीपाला लागवडीसाठी विकसित केली जाणार आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शाश्वत प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळेल.

या वर्षी या उपक्रमात पर्यावरणपूरक बदल करण्यात आले असून, सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड सुरू केली जाणार आहे. हे उत्पादन आरोग्यदायी असून पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देईल. दिगंत स्वराज फाउंडेशनने या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष आयोजन करून शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री आणि मार्गदर्शन दिले.

या वाटप कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. दिलीप तावटे, दिगंत स्वराज फाउंडेशनचे संचालक श्री. राहुल तिवरेकर आणि स्थानिक ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद दिसून आली.

हा उपक्रम शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपयुक्त ठरत असून पर्यावरणपूरक शेतीला चालना देत आहे. ग्रामीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...