Sunday, 25 January 2026

राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक ' पेदेमरी व्यंकट सुब्बाराव' !!

राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक ' पेदेमरी व्यंकट सुब्बाराव' !!

आपली ''प्रतिज्ञा'' ही भारताविषयी कृतज्ञता दर्शवते, "भारत माझा देश आहे " ही भावना देशातील प्रत्येक नागरिकाने आत्मीयतेने म्हटली पाहिजे व देशाबद्दल असलेले प्रेम जपले पाहिजे. गांभीर्यपूर्ण शपथ, वचन किंवा दृढ निश्चय आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेमधून दिसून येतो. आपल्या देशासाठी चांगले काम करण्याचा संकल्प आणि देशभक्तीची भावना सुदृढ व्हावी, यासाठी घेतलेला आधार म्हणजे आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा .विवेकवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा संकल्प प्रतिज्ञे मध्ये दर्शवितात.

आपण सर्वजण शाळेत मोठ्या,मोठ्या आवाजात प्रतिज्ञा म्हणायचो आणि आजही अभिमानाने म्हणत आहोत 'भारत माझा देश आहे' ही आपली ''राष्ट्रीय प्रतिज्ञा" शालेय पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावरच नमूद असलेली प्रतिज्ञा ज्यांच्या लेखणीतून साकार झाली ते आंध्र प्रदेश मधील सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक म्हणजे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव.... 

खरंतर आजही अनेकांना माहिती नसेल की, आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली. खरतर लेखक नरेंद्र लांजेवार यांच्या लेखणी मधून आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक कोण आहेत हे समजले आहेत. महत्त्वाचे संशोधन 'वयम्' मासिकासाठी खास लिहून राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या मूळ लेखकाची ओळख प्रथम लेखक नरेंद्र लांजेवार यांनी लेख लिहून आपली प्रतिज्ञा कोणी लिहिली? याचा उलगडा सविस्तर लेख मधून केलेला आहे आणि या लेखचा परिपूर्ण फायदा आणि सविस्तर महत्वाची माहिती नागरिकांना आज मिळत आहे. प्रतिज्ञेची माहिती ज्यांनी शोधून काढली ते लेखक नरेंद्र लांजेवार यांचं २०२२ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी दुर्दैवी निधन झालं आहे. त्यावेळी नरेंद्र लांजेवार यांनी प्रतिज्ञेवर लिहिलेला लेख शाळाशाळांमध्ये वाचला गेला व फलकावर लावला गेला होता. २६ जानेवारी २०१२ मध्ये पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या मित्रपरिवाराने प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता तो आजचा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस ठरला आहे. याच दिवसा मुळे इतिहासाचे पाने पुन्हा रंगून गेली आहेत आणि इतिहासात ज्यांचं नाव प्रतिज्ञे सोबत जोडले आहे ते म्हणजे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीय 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९६५ पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली. म्हणजेच राष्ट्रीय प्रतिज्ञेचा ६४ वा वर्धापन दिन असे दोन्ही दिवस आज महत्त्वाचे ठरत आहेत.

"भारत माझा देश आहे" या वाक्यात देशा बद्दलची आत्मियता दिसून येते. "सारे भारतीय माझे बांधव आहेत" हे वाक्य भारतीय संविधानाची आठवण करून देत आहे. "माझ्या देशावर माझे प्रेम आहे" या वाक्यातून देशातील प्रत्येक नागरिकांने आपल्या देशाबद्दलचा आदर प्रेम राखून ठेवणे दिसून येते. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. जो भारत देश 
विविधतेने नटलेला आहे . ती भारताची सुंदरता आम्हाला सर्वांना सांभाळून ठेवायची आहे असे या ओळीतून म्हटले आहे. अशा अनेक बाबींचा उलगडा प्रतिज्ञेमधून दिसून येतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.

आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. शिक्षणाची आवड त्यांना होती. तर लिखाणाची आवड त्यांनी शेवट पर्यंत जिवंत ठेवली. विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. आपली नोकरी सांभाळून ते लिखाण करत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. आणि ती कादंबरी लोकप्रिय आहे.पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी म्हणून ओळख त्यांची आहे. आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून एक प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या एका शिक्षण खात्यातील मित्राला ही कल्पना खूपच आवडली.सुब्बाराव यांचे मित्र तेन्नेटी विश्वनाथम यांनी ही प्रतिज्ञा आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी.व्ही.जी. राजू यांच्याकडे ही प्रतिज्ञा पाठवली. शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. ‘डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया’ या समितीची स्थापना केलेली असते. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या ‘डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इंडिया’ची एकतिसावी मिटिंग तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११ आणि १२ ऑक्टोबर १९६४ मध्ये बंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तान्तामध्ये-
'शिक्षणाचा भारतातील विकास : स्वातंत्र्यपूर्व आणि पश्चात शैक्षणिक दस्तऐवजांचा ऐतिहासिक सर्वेक्षण' या पुस्तकाच्या पान १४० वर मुद्दा क्रमांक १८ मध्ये उल्लेख आढळतो की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित राहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये, तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी.याकरिता पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली "इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियंस आर माय ब्रदर ॲन्ड सिस्टर’ ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणममधील एका शाळेत प्रथम वाचून दाखवण्यात आली असून मोठा इतिहास रचला गेला.
त्या नंतर त्याच वर्षी इतर अनेक शाळांमध्येही ते वाचून दाखवण्यात आली. म्हणजेच हळूहळू ही प्रतिज्ञा सर्वांची ओळख होऊ लागली. त्यानंतर प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. 
१९६४ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत, त्यांच्या अध्यक्ष एमसी छागला यांच्या अध्यक्षतेखाली, शाळांमध्ये ही प्रतिज्ञापत्रे वाचून दाखवण्यात यावीत आणि ही पद्धत २६ जानेवारी १९६५ पर्यंत सुरू करावी असे निर्देश देण्यात आले. १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला.आज ही प्रतिज्ञा देशाचा अभिमान म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करत आहे.

२६ जानेवारी २०१२ मध्ये आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाने सुब्बारावांच्या मित्र परिवाराने प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. म्हणजेच प्रतिज्ञे बद्दलचा आदर आणि सन्मान व्हावा म्हणून पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी आणि प्रतिज्ञेबाबत आपली जबाबदारी पार पाडली आहे असे दिसून येत असून, देशातील प्रत्येक नागरिकांने राष्ट्राची एकदा अबाधित ठेवणे गरजेचे आहे. प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाल्या बाबतची बातमी ' टाइम्स ऑफ इंडिया' आणि दैनिक' हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरे लेखक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव आहेत याची ओळख झाली. जर प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा झालाच नसता त्याविषयी वर्तमानपत्रात बातमी छापून आलीच नसती , लेखक नरेंद्र लांजेवार यांनी संशोधन करून प्रतिज्ञे बद्दल लेख लिहलाच नसता तर आम्हाला आज पर्यंत राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण? हे समजू शकले नसते. 

आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आणि राष्ट्रगान बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जात आहे. पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर असलेली ही राष्ट्रीय प्रतिज्ञा' देशा बद्दल आदर ,प्रेम, निर्माण करते. सर्वांमध्ये बंधू भावाची भावना निर्माण करते. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारे मूल्ये हा आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञे मध्ये सापडतात. ज्या प्रमाणे कविता लिहिणाऱ्याच नाव असते, पाठ्यपुस्तकात ''धडा'' असतो त्याखाली लेखकाचे नाव असते त्याच प्रमाणे पुस्तकातील छापलेल्या प्रतिज्ञेखाली , ज्या लेखकाच्या लेखणीतून ही प्रतिज्ञा सारकारलेली आहे. त्याचं नाव आलेच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांना न्याय मिळेल. आज प्रतिज्ञेला ६४ वर्षं होऊन गेली आहेत. १३ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. निधनानंतरही, या राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या माध्यमातून आजही प्रत्येक भारतीय नारीच्या ,विद्यार्थ्याच्या मनात लेखक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव प्रतिज्ञेच्या रूपात जिवंत आहेत .या प्रतिज्ञेचे पालन करून आदराने सन्मान करू या.

'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय'


लेखक - मिलिंद सुरेश जाधव 
रा. पडघा, भिवंडी 
मो.८६५५५६९४३६

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...