Wednesday, 29 April 2026

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालुका कृषी अधिकारी माणगाव 

        बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : माणगाव तालुक्यातील शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांत आपल्या तालुक्यातील भात शेतीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भात हे केवळ आपले पीक नसून ती आपली परंपरा आणि ओेळख आहे. चला, पुन्हा एकदा एकत्र येऊया आणि आपल्या शेतात सोन्यासारखा विषमुक्त भात पिकवूया !

         भात शेती का करावी?

✓ स्वयंपूर्णता : स्वतःच्या कुटुंबासाठी शुद्ध आणि विषमुक्त तांदूळ उपलब्ध होतो.
✓ पशुधनास आधार : भात शेतीतून मिळणारा पेंढा आपल्या गुरांसाठी मुख्य चारा आहे. जमिनीची सुपीकता: पीक फेरपालट आणि मशागतीमुळे जमिनीचा कस टिकून राहतो.
✓ शासकीय योजना : सुधारित बियाणे, खते आणि अवजारांसाठी कृषी विभागाकडून विशेष अनुदान.
✓ "शेत सोडू नका, साथ सोडू नका... कष्टाची भाकरी, सन्मानाने खा!"

अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत!
बियाणे निवड, खत व्यवस्थापन किंवा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहितीसाठी आजच संपर्क साधा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव, जि. रायगड.
चाळीसगावात गोदा नर्मदा जल यात्रेचे भव्य स्वागत: आमदार मंगेशदादांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक !!



*चाळीसगाव, दि. 23 एप्रिल 2026*

गोदा नर्मदा जल यात्रेचे चाळीसगावात आगमन होताच आमदार मंगेशदादा चौहान यांनी यात्रेचे उत्साहात स्वागत केले.

*यात्रेत मान्यवरांचा सहभाग*  
या जल यात्रा दिंडीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार रामराव वाकटे, धनगर समाजाचे लाडके नेतृत्व गोपीचंद पडळकर, चाळीसगावचे लाडके आमदार मंगेशदादा चौहान यांच्यासह सर्व नेतेमंडळी सहभागी झाली होती.

घाटरोड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल यात्रेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. नगारोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी यात्रेचे भव्य स्वागत केले.

*शिवाजी महाराज सभामंडपात स्वागत सोहळा*  
छत्रपती शिवाजी महाराज सभामंडपात स्वागताध्यक्ष आमदार मंगेशदादा चौहान यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*  
या कार्यक्रमाला धनगर समाज नेते गणेश जने, संदीप देवरे, नगरसेवक धर्मराज बच्छे, निलेश देवरे, चंद्रकांत अहिरे, भूषण अहिरे यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले. सर्व मान्यवरांनी जल यात्रेचे महत्त्व व पाणी बचतीचा संदेश दिला.

आमदार मंगेशदादा चौहान म्हणाले, “गोदा नर्मदा जल यात्रा ही केवळ यात्रा नसून जलसंवर्धनाचा जागर आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज बांधव व स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Tuesday, 28 April 2026

सफाई कामगाराच्या मुलाची UGC-NET मध्ये भरारी : मेहत्तर रुखी वाल्मिक समाजाचे सुपुत्र जतिन चव्हाण यांचा भव्य सत्कार !!

सफाई कामगाराच्या मुलाची UGC-NET मध्ये भरारी : मेहत्तर रुखी वाल्मिक समाजाचे सुपुत्र जतिन चव्हाण यांचा भव्य सत्कार !!

UGC-NET उत्तीर्ण जतिन चव्हाण यांचा भारत गायकवाड व सोन्याशेठ पाटील सत्कार करताना. शेजारी आई सौ. कांता चव्हाण.

कल्याण, दि. 28 एप्रिल 2026 :

मेहत्तर रुखी वाल्मिक समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य व महानगर सफाई कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी एक प्रेरणादायी सत्कार सोहळा पार पडला.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कामगार सौ. कांता विनोद भाणा चव्हाण यांचा मुलगा *जतिन चव्हाण* याने केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची अत्यंत अवघड मानली जाणारी *UGC-NET परीक्षा* उत्तीर्ण केल्याबद्दल त्याचा समाजाच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.


*समाजासाठी अभिमानाचा क्षण*  
सफाई कर्मचारी कुटुंबातून येऊन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जतिनने मिळवलेले हे यश संपूर्ण मेहत्तर रुखी वाल्मिक समाजासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे जतिनने आपल्या यशातून दाखवून दिले.

*सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती*  
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महानगर सफाई कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष *भारत गायकवाड* यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

UGC-NET उत्तीर्ण जतिन चव्हाण यांचा भारत गायकवाड व अविनाश गायकवाड (महेश गायकवाड यांचे बंधू) सत्कार करताना.

*उपस्थित मान्यवरांची नावे:*
- *राज्यस्तर*: सोन्याशेठ पाटील – सल्लागार, मधुकर वाल्हेकर – सल्लागार, अविनाश पाटील – कार्याध्यक्ष औद्योगिक कामगार विभाग, सारीका जोशी – अध्यक्षा महिला आघाडी, करूणा अहिरे – महासचिव, संध्या वराळ – उपाध्यक्षा, रविंद्र गायकवाड – सल्लागार
- *ठाणे जिल्हा*: दयानंद सकट – अध्यक्ष, अनिल गदेवार – कार्याध्यक्ष, राम बनसोडे – उपाध्यक्ष, मल्लिकनाथ जाधव – सल्लागार, रघुनाथ सुरडकर – सल्लागार
- *कल्याण तालुका*: राजू रोकडे – अध्यक्ष, सुरेखा जगताप – अध्यक्षा, स्वाती नलवडे – उपाध्यक्षा कल्याण शहर, लक्ष्मी चव्हाण – उपाध्यक्षा कडोंमपा युनिट
- *पनवेल व रायगड*: नरेश नरसिंगे – अध्यक्ष पनवेल तालुका, विध्नेश पाटील – उपाध्यक्ष पनवेल, सुरेश कुंभार – सचिव रायगड जिल्हा
- *विशेष उपस्थिती*: अविनाश गायकवाड (महेश गायकवाड यांचे बंधू)

याप्रसंगी समाजातील सफाई कर्मचारी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत गायकवाड यांनी जतिनचे कौतुक करताना सांगितले की, “जतिनसारखी मुले समाजाचा खरा आधारस्तंभ आहेत. कष्टकरी पालकांच्या मुलांनी शिक्षणाच्या जोरावर मोठी झेप घ्यावी, यासाठी संघ नेहमी पाठीशी उभा राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता झाली.

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई, (केतन भोज) ::रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील तळघर,पोस्ट तळेगाव येथे तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वे वर्ष-श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा सोहळा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन तसेच श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. हा सोहळा गुरुवार दि.१४ मे २०२६ आणि शुक्रवार दि.१५ मे २०२६ रोजी संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ मे रोजी सकाळी कलशपूजन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. दुपारी मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प.सोनालीताई सूरज अडखळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी १५ मे शुक्रवार रोजी पहाटे काकड आरती (श्री.सुभाष मुंडे व ग्रामस्थ मंडळ मुंड्याची वाडी,तळा) होणार आहे. त्या नंतर अभिषेक आणि सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे .दुपारी १ ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक निघेल.त्या नंतर सर्व उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. रात्री तळघर महिला/पुरूष सामूहिक भजन होणार आहे.आणि तद्नंतर रात्री उशिरापर्यंत स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि मा.विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, सभापती, शासकीय सेवेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तळघर ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ व युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.सर्व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी !!

स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी !!

मुंबई - पुणे मिसिंग लिंक मार्गास “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी संतोष पटकारे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे.

महोदय,
सविनय विनंती की, मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा - खंडाळा घाट परिसरातील “मिसिंग लिंक मार्ग” हा महाराष्ट्राच्या विकासातील ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार असल्याचे सोशल मीडियातून समजले. सदर मार्गाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्यात यावे, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे.

लोकपरंपरा, जनश्रुती आणि सामाजिक स्मरणात जपल्या गेलेल्या कथेनुसार, सह्याद्रीतील कठीण बोरीघाट परिसरात मार्ग दाखवून ब्रिटिशांना मदत करणारे आणि त्याबदल्यात स्वातंत्र्याची मागणी करून हौतात्म्य पत्करणारे स्वाभिमानी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या ऐतिहासिक मार्गाला / प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून सामाजिक न्याय, ऐतिहासिक सन्मान आणि धनगर समाजाच्या अस्मितेचा गौरव ठरेल.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध समाजघटकांचे योगदान आहे. अशा दुर्लक्षित पण प्रेरणादायी क्रांतीवीरांच्या नावाने हा मार्ग / प्रकल्प ओळखला गेला, तर येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळेल. विशेषतः महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा झाल्यास ती संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.

तरी आपण सकारात्मक विचार करून १ मे २०२६ पूर्वी “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करावे, ही नम्र विनंती.आपल्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करतो आपणं हा निर्णय घेतल्यास समस्त धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

वृत्तांकन - विलासराव कोळेकर सर 


Monday, 27 April 2026

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!


महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के संदर्भ में दिए गए वक्तव्य का कड़ा निषेध किया है। *छत्रपति शिवाजी महाराज केवल महाराष्ट्र ही नहीं, बल्कि पूरे देश के गौरव, स्वाभिमान और आदर्श शासन के प्रतीक हैं।* उनके बारे में किसी भी प्रकार की अनुचित, अपमानजनक या भ्रामक टिप्पणी समाज की भावनाओं को आहत करने वाली है।

महाराष्ट्र कुर्मी समाज का मानना है कि ऐसे बयान समाज में अनावश्यक विवाद और असंतोष पैदा करते हैं, जो सामाजिक एकता और सद्भाव के लिए हानिकारक है। हम सभी से अपेक्षा करते हैं कि देश के महान इतिहासपुरुषों के प्रति सम्मानजनक भाषा और जिम्मेदार आचरण अपनाया जाए।

हम प्रशासन से मांग करते हैं कि इस प्रकरण का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की जाए, ताकि भविष्य में इस प्रकार की घटनाओं की पुनरावृत्ति न हो।

महाराष्ट्र कुर्मी समाज
*(अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा – महाराष्ट्र प्रदेश)*

सौजन्य/वृत्त - मा. संजय पाटील 
अध्यक्ष - महाराष्ट्र कृर्मी समाज 
+91 77450 48505

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने आज उरणचे  तहसीलदार रविंद्र सानप यांना ‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईचे असलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता सदर निवेदन देण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून, देशभरातील ५०० हून अधिक तहसीलदारांना विविध ठिकाणी गौप्रेमी व गौभक्तांच्या वतीने अशाच प्रकारची निवेदने सादर करण्यात आली आहेत, ज्यातून या विषयाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेला व्यापक पाठिंबा अधोरेखित होतो.

यावेळी प्रतिनिधी मंडळाने उरण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील सविस्तर चर्चा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात आली.हा उपक्रम शांततेत, कायद्याचे पालन करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येईल, याची माहिती प्रशासनाला देण्यात आले.सदर निवेदनात गाईला भारतीय परंपरेत “माता” म्हणून दिलेले स्थान, तिचे पोषणात्मक आणि कृषी अर्थव्यवस्थेतील योगदान यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरावर पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. भविष्यातही जनजागृती आणि शांततापूर्ण मार्गाने हा अभियान पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी उरण मधील गौ भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥ माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालु...