Thursday, 9 April 2026

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय !

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय ! 

'देरे हरी खाटल्यावरी' हे चालणार नाही : महेंद्रशेठ घरत

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसच्या कविता संतोष पाटील यांची बहुमताने निवड झाली. भाजपच्या प्राची पाटील विरुद्ध महाविकास आघाडीच्या कविता पाटील यांच्यात थेट लढत झाली. त्यात काँग्रेसच्या कविता पाटील या दणदणीत मतांनी विजयी झाल्या. यावेळी सरपंच सविता मढवी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने विजयाचा जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नवनियुक्त उपसरपंच कविता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "गावातील विकासकामे व्हायला हवीत. रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला मिळायलाच हव्यात. त्यासाठी सिडकोसोबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करायला हवा. मी आपल्यासाठीच आहे, पण 'देरे हरी खाटल्यावरी' हे चालणार नाही. आपण लढलो पाहिजे. दिबांनी आपल्याला १९८४ च्या शेतकऱ्यांच्या गौरवशाली व शौरशाली लढ्याने न्याय हक्क दिला आहे. सिडकोने ५ टक्के निधी प्रत्येक गावाला द्यायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. लढल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही, हा भूमिपुत्रांचा इतिहास आहे. त्यामुळे दि. बा. पाटील साहेबांची हक्कांसाठी लढण्याची भूमिका आपल्याला विसरून चालणार नाही. सिडकोसोबत लढताना परिस्थितीनुसार रस्त्यावर उतरावे लागेल. आजचा विजय हा महाविकास आघाडीचा असून उरणमध्ये आगामी काळात परिवर्तनाची ही नांदी आहे." 

यावेळी काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा रेखा घरत, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, संतोष पाटील, उरण शिवसेना तालुका प्रमुख बी. एन. डाकी, अविनाश म्हात्रे, विश्वास तांडेल, रवी पाटील, महादेव बंडा, मुरलीधर ठाकूर, नितीन मढवी,  आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कविता पाटील यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

समता बुद्ध विहार यांच्यावतीने संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन !!

समता बुद्ध विहार यांच्यावतीने संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम इंदिरा नगर येथील समता बुद्ध विहार यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही दि.१३ ते १६ एप्रिल या चार दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध,क्रांतीज्योती महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

यावेळी दि.१३ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आगमन होणार असून दुसऱ्या दिवशी दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी.५.०० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत अर्जुन ओव्हाळ आणि पार्टी यांचा भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० ते १०.३० वाजेपर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच समता बुद्ध विहार, समता महाउपासिका संघ बहुउद्देशीय महिला मंडळ, पंचशील बुद्ध विहार, समता प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड !!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड !!

श्री अजित पाटील यांच्या निवडीनंतर श्री महादेव जानकर साहेब सत्कार करताना

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी तर रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी वर्णी लागली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी दशेपासून अजित पाटील हे सक्रिय राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करत आहेत. वडिलांच्या जागेवरती पोलीस दलामध्ये अनुकंप तत्वावरील नोकरी सोडून त्यांनी जानकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला. त्या दिवसापासून त्यांनी एक पक्ष, एक झेंडा व एक नेता आयुष्यामध्ये आजपर्यंत समर्पित जीवनशैली अवलंबली आहे. गेल्या वीस वर्षापासून काम करत असणाऱ्या अजित पाटील यांच्यासारख्या जत तालुक्यातील दुष्काळी भागातील युवकांला महादेव जानकर यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. अजित पाटील यांची ओळख एक आक्रमक अभ्यासू युवक नेतृत्व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते. निश्चित जत तालुक्याला त्यांच्या माध्यमातून एखाद्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हे प्रथमच मिळाले आहे. तसेच जत तालुक्यातील कंठी गावचे सुपुत्र सर्वोदय पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र मदने व अकिल नगरजी यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारणीत सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनात्मक बांधणी वरती जोर दिला असून, जत तालुक्यामध्ये संघटन मजबूत होण्याकरिता येणाऱ्या काळात बांधणी जोमाने करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

निवडीनंतर अजित पाटील म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर, राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धाप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव बाळाकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे.त्यांनी दिलेली जबाबदारी मी नक्कीच सार्थ ठरवेन. पक्षात युवकांचे संघटन अधिक मजबूत करून, नवीन युवकांना सर्व घटकांसह जोडत एक सक्षम आणि एकजूट युवकांची फळी उभी करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

Wednesday, 8 April 2026

जिजाऊंचे विचार महिलांनी अंगिकारून स्वाभिमानी परिवार व समाज घडवावा - केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

जिजाऊंचे विचार महिलांनी अंगिकारून स्वाभिमानी परिवार व समाज घडवावा - केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

* कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन जबलपूर येथे उत्साहात संपन्न
* विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान

जिजाऊंचे विचार महिलांनी अंगिकारून स्वाभिमानी परिवार व समाज घडवावा तसेच शिवाजी महाराजांचा व सरदार पटेल यांचे बुलंद विचार कुर्मी समाजाला सक्षम बनवतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन व महिला राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच मध्यप्रदेशातील जबलपूरमधील दाऊ मॅरेज गार्डन, महाराजपूर येथे पार पडले. यावेळी बोलताना अनुप्रिया पटेल यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा यांसह व्यसनाधिनता दूर झाली पाहिजे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. तर समाजातील महिला सक्षम व स्वयंपूर्ण झाली तरच समाज सक्षम व स्वाभिमानी बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी देशभरातून प्रत्येक राज्यातील समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अधिवेशनासाठी मंत्री आशिष पटेल, दशरथ पटेल, रामखिलावन पटेल, खासदार लता वानखेडे, ज्ञानेश्वर पाटील, राकेश सिंह यांसह कुर्मी महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल.पी.पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निरंजन प्रसाद, महासचिव उमेशकुमार पटेल, महिला अध्यक्षा लताऋषी चंद्राकर, युवा अध्यक्ष धीरज पाटीदार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशातील विविध राज्यांतील प्रांतीय पदाधिकारी आपल्या जिल्हाध्यक्षांसह सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, महासचिव जयेश शेलार पाटील, कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील, युवा अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. शोभाताई गायकवाड,  उद्योग प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष समीर पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रातील पुरोहित प्रशिक्षक व पुरोहित प्रकोष्ठ कोकण प्रांताध्यक्ष विजय दलवी, कुर्मी पुरोहित डॉ. संदीप वरकुटे, संतोष भुसारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.‌ तर या अधिवेशनात महाराष्ट्र कुर्मी समाजाचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. बाबूलाल सिंह यांच्या स्मरणार्थ समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे अजित राऊत (बोईसर) यांना जीवनगौरव,  तुकाराम पष्टे (विरार) यांना वैद्यकीय सेवा रत्न, हरिदास आखरे (बुलढाणा) यांना विश्वभूषण संत तुकाराम महाराज पुरस्कार, प्रमोद ठोंबे (पुणे) यांना छ.संभाजी महाराज युवा रत्न, ॲड.गोपाल शेळके (रायगड) यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार, निवृत्ती न्याहारकर (नाशिक) यांना कृषी रत्न, संजय गायकवाड (नाशिक) यांना शिक्षण रत्न, दिनेश दळवी (रत्नागिरी) यांना कृषी रत्न, विजय राव (टिटवाळा) यांना उद्योग रत्न, शाहीर उत्तम गायकर (इगतपुरी) यांना सांस्कृतिक कला रत्न तर संदीप काळे (नाशिक) यांना प्रशासकीय रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या महाअधिवेशनात देशभरातील कुर्मितील  विविध समाजांचा सहभाग होता. यामध्ये पटेल, पाटीदार, मराठा, कुनबी, कलबी, कुडुंबर, कूर्मि, देवेंद्र कुल वेल्लालर, महतो, गुर्जर, खंडायत, नायक, नायडू, कापू, चंद्राकार, अंजना समाज, कम्मा, ओक्का लिंगा, कुलमी आदी विविध समाजांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत "राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा" आयोजन !!

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत "राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा" आयोजन !!

मुंबई (पंकजकुमार पाटील) : मुंबईतील भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत 'राज्यस्तरीय मोदक स्पर्धा विशेष' आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हि स्पर्धा पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणार असून, राज्यातील कोणत्याही कोपऱ्यातून गृहिणी, आचारी आणि पाककला प्रेमींना यात सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये मोदक बनवण्याची पद्धत (Traditional & Innovative). आकर्षक सजावट (Modak Presentation). पाककृतीची माहिती (Ingredients & Recipe). स्वच्छता आणि सात्विकता (Purity and Divinity)या प्रमुख निकषांवर गुण दिले जातील.

हि स्पर्धा पूर्णतः मोफत असून यात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मोदकाचा एक सुंदर फोटो काढावा. त्यासोबत मोदकाची सविस्तर कृती (Recipe) आणि स्वतःची माहिती लिहावी. हि सर्व माहिती संस्थेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. स्पर्धेसाठी अंतिम तारीखः १५ एप्रिल असून निकाल १८ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता जाहीर होईल. 

यशस्वी स्पर्धकांना संस्थेमार्फत अधिकृत डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच, काही विशेष निवडक सदस्यांना दादर येथील संस्थेच्या प्रशालेत आयोजित मुख्य कार्यक्रमात विशेष अतिथींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :  ९९६८५1३६०९/ ९३२३०६८८७३ संकेतस्थळ: bharatiyavedic.org

उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड !!

उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड !!

उरण दि ८,'(विठ्ठल ममताबादे) : बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची विशेष सभा पी.एन.पी. माध्यमिक शाळा मोठी जुई येथे संघाचे मावळते अध्यक्ष सुधीर मुंबईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी संघाचे संस्थापक अध्यक्ष नाथा नाईक,अरुण घाग, सूरदास राऊत,किशोर भोईर, संतोष म्हात्रे, प्रवीण पाटील, मिलिंद पट्टेबहादूर, मनोज म्हात्रे, सोनाली कोळी  इत्यादी सदस्य उपस्थित होते. या सभेत संघाची नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. अध्यक्ष म्हणून  मिलिंद पट्टेबहादूर, उपाध्यक्ष  सोनाली कोळी, सचिव पदी संतोष म्हात्रे आणि खजिनदार  म्हणून प्रवीण पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पी.एन.पी .शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात संघाची स्थापनेपासूनची वाटचाल विशद केली .याप्रसंगी नाथा नाईक,अरुण घाग,सुभाष ठाकूर, संतोष म्हात्रे,कोळी मॅडम,सुधीर मुंबईकर या सर्वांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. सुधीर मुंबईकर यांनी सर्वांसाठी भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती. मोठया उत्साहात सदर सभा संपन्न झाली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली

बाळू कृष्णा पार्टे यांचे दुःखद निधन. !

बाळू कृष्णा पार्टे यांचे दुःखद निधन. !

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते बाळू कृष्णा पार्टे यांचे शनिवार दिनांक ४/४/२०२६ रोजी वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा उत्तरक्रिया विधी बुधवार १५/४/२०२६ रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी बोरी, पानसरे आळी, उरण येथे होणार आहे. मनमिळाऊ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बाळू पार्टे हे गोर गरिबांच्या अडी अडचणीत गोरगरिबांना ते मदत करत असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.एक कर्तव्य दक्ष व प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. सेवानिवृत्त झाल्या नंतरही त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मार्गदर्शन, मदत केली आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली ,बारा नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. २ मुले महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत आहेत , एक आर्मी मध्ये तर एक नात पीएसआय आहे. देश सेवेला वाहून घेतलेले हे कुटुंब आहे. बाळू पार्टे यांच्या निधनाने पार्टे कुटूंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यू झाल्याने सर्वत्र मोठया प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद प्रसंगी व विधी प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय !

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय !  'देरे हरी खाटल्यावरी' हे चालणार नाही : महेंद्रशेठ घरत...