Monday, 27 April 2026

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) ::
              महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान.श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.आमदार, शिवसेना सचिव, प्रवक्ते आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा. श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार मानण्यासाठी दिनांक २६/०४/२०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांचे मनापासून आपल्या भाषणात आभार व्यक्त केले.
          श्री.किरण पावसकर यांनी आपल्या भाषणात सांगितले मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  विनाअनुदानित शाळांना अनुदान सुरू करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याच वाचवल्या तसेच मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या त्या मराठी शाळांना मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे आणि अनुदान मंजूर करून देण्याचे काम फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळेच झाले. तसेच जे शिक्षक ७००० आणि ८००० रुपये महिना इतक्या कमी वेतनात काम करत होते आज त्या शिक्षकांना ५०,००० ते ६०,००० महिना पगार सुरू झाला याचे श्रेय शिंदे साहेबांनाच दिले पाहिजे. तसेच शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे साहेब, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीम. राजश्री शिरवाडकर, शिक्षण समिती सदस्य श्रीम.अंजली नाईक मुंबई महानगरपालिका शिवसेना गटनेते श्री.अमेय Spam, माजी शिक्षण समिती सदस्य श्री.मंगेश सातमकर यांच्या सहकार्यामुळे या निर्णयास जलदगती मिळाली असे सांगितले.
            याप्रसंगी सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. दिलीप नाईक श्री. संदीप जाधव चिटणीस श्री. तातू नाईक श्री. सचिन लिमन श्री.सचिन साळुंखे श्री. सुहास गायकवाड तसेच संस्थाचालक श्री. सुरेश लाखन श्री. विवेक थोरात श्री. विशाल बंडगर, राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाचे उपाध्यक्ष श्री. अमर पाचांगणे, सरचिटणीस संतोष रावताळे, जयदीप पाटील रमेश पवार, अरुण पवार, विनोद यादव, कार्यालय प्रमुख श्री. कार्तिक पवार व मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!

रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!

*जत / प्रतिनिधी :*
  जत येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांना "राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्कार - २०२६" ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे 'राष्ट्रभक्ती परिवार' आणि 'शौर्य करिअर अकॅडमी' पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र दिनानिमित्त हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
    अजित पाटील हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून गेल्या अनेक वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करत आले आहेत. एक आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व भाषणावरती प्रभुत्व असणारे युवकांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यभर युवकांचे संघटन जाळे त्यांच्या माध्यमातून निर्माण केले जात आहे. राज्यभर दौरा करत युवकांच्या प्रश्नांवरती भूमिका घेणे अशा या नेतृत्वास क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   अध्यक्षस्थानी एमआयटी संस्थेचे संचालक महेश थोरवे होते. अध्यक्ष भाषणात ते म्हणाले, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात तरुणांनी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कष्टाला कोणताही पर्याय नसून, सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच व्यक्तिमत्व घडते आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीला बळ मिळते. समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
  प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज कॉलेज ग्रुपचे चेअरमन गोपाल खंडारे उपस्थित होते. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी तरुणांना देशसेवा व समाजकार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
  सत्काराला उत्तर देताना अजित पाटील म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नसून, राष्ट्रीय समाज पक्षातील त्या सर्व युवा रत्नांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आहे, ज्यांच्या खंबीर साथीमुळे मला राज्यभर कार्य करण्याची संधी मिळाली. हा पुरस्कार मी माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांना समर्पित करतो आणि त्यांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून हा सन्मान मी स्वीकारला. संयोजकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास मला जनसेवेच्या कार्यात अधिक ऊर्जा देईल.
  यावेळी आनंदकुमार दुबे, सौ. भारती तुपे, हरिदास भिसे, सुनील गोरे, राजेंद्र पवार यांच्यासहित अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Sunday, 26 April 2026

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवास मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते श्री. राहूल सोलापूरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. मिलेटचा वापर करून तयार केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीच त्यांनी विषेश कौतुक केले. 

 मिलेट व फळ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी डॉ. अहिल्या वाघमोडे, फुड सायन्स विभाग प्रमुख, एसजीएम कॉलेज कराड यांचे मिलेटची ओळख व त्यांचा मानवी शरीरास होणारे फायदे या विषयावर व्याख्यान पार पडले. तिसर्या दिवशी डॉ. प्रतिभा ठोंबरे, कृषी विद्यान केंद्र कोल्हापूर याचे मिलेट उपयुक्तता व मिलेट व्हॅाल्यु एडिशन या विषयावर व्याख्यान पार पडले.

महोत्सवात मिलेट पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिक्षकरूपी डॉ. अहिल्या वाघमोडे, डॅा. प्रतिभा ठोंबरे, पुजा सावंत, तृप्ती कोळेकर, जयश्री करे उपस्थित होते. या मिलेट पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोनल भोसले, द्वितीय मयुरी रानमाळे, तृतीय श्रीया पोफळे, उत्तेजनार्थ दिपाली देसाई क्रमांक मिळाल्याने त्यांचे प्रशस्तीपत्रक व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

सदर महोत्सवात चार दिवसांमध्ये तब्बल २९ लाख रूपयांची उलाढाल झालेली आहे. कोल्हापूर वासीयांचा अत्यंत चांगला प्रतिसाद महोत्सवास मिळताना दिसून येत आहे. कृषी पणन मंडळा चे उपसरव्यवस्थापक श्री विनायक कोकरे यांनी महोत्सवास भेट देऊन सर्व स्टॉल पाहणी केली शेतकर्‍यां समवेत चर्चा केली. आयोजना साठी छान काम केले बद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. उद्याचा महोत्सवाचा उद्या शेवटचा दिवस असून डॉ. संदीप पाटील यांचे मिलेटपर व्याख्यान सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केलेले आहे. त्यामूळे कोल्हापूर वासीयांनी मिलेट व फळ महोत्सवास भेट देऊन मिलेट व फळांचा अस्वाद घ्यावा व सदर व्याखानास उपस्थित राहावे असे पणन मंडळांचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी अवाहन केले.

सौजन्य/ वृत्त - विलासराव कोळेकर सर 

सिडकोची साडेबारा टक्के योजना अंतिम टप्प्यात ; १.८६ टक्के क्षेत्राचे वाटप लवकरच होणार !!

सिडकोची साडेबारा टक्के योजना अंतिम टप्प्यात ; १.८६ टक्के क्षेत्राचे वाटप लवकरच होणार !!

उरण, पनवेल, नवी मुंबई मधील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दिलासा.

उरण दि २६,स(विठ्ठल ममताबादे) :

रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरांतील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाशी निगडित सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेने अखेर अंतिम टप्प्यात प्रवेश केला असून, एकूण भूखंड वाटपापैकी तब्बल ९८.१४ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सुमारे तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित राहिलेल्या या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित १.८६ टक्के वाटप पुढील काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्य सरकारनेही अधिवेशनात शेतकऱ्यांना लाभ लवकर देण्याच्या सूचना सिडकोला केल्याने प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे. दोन वर्षांच्या काळात चार संगणकीय सोडती काढणारे विजय सिंघल हे पहिले सिडको एमडी ठरले आहेत.

नवी मुंबई शहर उभारणीसाठी ठाणे जिल्ह्यातील २८, पनवेल तालुक्यातील ३८ आणि उरणमधील २९ अशा एकूण ९५ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेत १२ हजार २६९ भूधारकांना ९०४.४२ हेक्टर क्षेत्र साडेबारा टक्के योजनेतून देणे अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत ८८७.६० हेक्टर क्षेत्राचे वाटप पूर्ण झाले आहे.

सिडकोने नऊ एप्रिल रोजी नऊ विविध नोडमधील एक लाख ११ हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी संगणकीय सोडत जाहीर केली. उर्वरित १६.८२ हेक्टर क्षेत्राच्या वाटपासाठी लवकरच अंतिम सोडत काढण्यात येणार असून, त्यानंतर शिल्लक लाभार्थीना शेवटचे आवाहन करण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

दरम्यान, या योजनेच्या संथ गतीवरून विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांनंतर आणि प्रशासनाच्या सक्रिय भूमिकेमुळे आता वाटप प्रक्रियेला गती मिळाली आहे.लवकरच या सर्व प्रकियेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.साडेबारा टक्केचे लाभार्थी हे पनवेल उरण व नवी मुंबई मधील असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात फायदा होणार आहे.


कोट (चौकट ):- 

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला विषय संचालक मंडळाच्या मान्यतेने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता जे काही लाभार्थी लाभापासून अजूनही वंचित असतील, त्यांनाही लवकरात लवकर योजनेचा लाभ देऊन, १२.५ टक्के योजना संपल्याचे जाहीर करून तसा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.          - गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

उरण तालुक्यातील पाणथळीचे अस्तित्व धोक्यात ; निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली चिंता व्यक्त !!

उरण तालुक्यातील पाणथळीचे अस्तित्व धोक्यात ; निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली चिंता व्यक्त !!

उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुका निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे. तिसऱ्या मुंबईचा महत्वाचा परिसर असल्यामुळे येथे विविध औद्योगिकीकरण, शहरीकरण मोठया प्रमाणात सुरु आहे. अनेक ठिकाणी वृक्षतोड, मातीचा भराव करणे, झाडे वृक्ष वेली लावण्याकडे दुर्लक्ष करणे आदी विविध कारणांनी उरण तालुक्यातील पाणथळीची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या विविध प्रजातींच्या हजारो पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याची खंत उरण मधील निसर्गप्रेमी,पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

उरणचे खाडी किनारे व पाणथळीवर फ्लेमिंगो उतरत होते. मात्र, येथील पाणथळीवर होणारा मातीच्या भरावामुळे पाणथळी जवळपास नष्ट झाल्या आहेत. या कारणांमुळे पक्षी अन्नाच्या शोधात परिसरातील छोट्या पाणथळीवर येऊ लागले आहेत. उरण परिसरात साधारणपणे ऑक्टोबरअखेरपर्यंत अनेक जातींचे पक्षी येथील पाणथळीवर उतरतात. त्यात जेएनपीए बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई व करळ आदी भागांतील पाणथळीवर दरवर्षी पक्षी उतरतातं. पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी असते. स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे ठिकाण असलेल्या प्रमुख पाणथळ जागा भराव टाकून गाडल्या जात आहेत. आंतरभरतीचे प्रवाह पद्धतशीरपणे नष्ट केले जात आहेत.त्यामुळे विविध सजीव सृष्टी पशु पक्षी यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

'बीएनएचएस'ने सूचीबद्ध केलेल्या सहा प्रमुख पाणथळ जागांपैकी बेलपाडा येथील एक जेएनपीएला भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती व भेंडखळ आणि पाणथळ जागा 'एनएमआयआयए' विकण्यात आल्या आहेत.उरण मधील विविध ठिकाणी असलेल्या पाण थळ चे वेळीच संरक्षण व संवर्धन करण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरण वाद्यांनी केली आहे. अन्यथा याचा विपरीत परिणाम निसर्ग चक्रावर, पर्यावरणावर होणार असल्याची चिंता निसर्गप्रेमी, पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केली आहे.


कोट ( चौकट) :- 

पाणथळी जागा मातीचा भराव करून बुजवण्यात आल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. जैवविविधता राखणारा महत्त्वाचा दुवा त्यामुळे दुरावला गेला आहे.पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.निसर्गाचे, पाणथळ जागेचे, जंगलांचे संरक्षण संवर्धन झाले पाहिजे.अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्यास वेळ लागणार नाही.
  - निकेतन ठाकूर, फ्रेंड्स ऑफ नेचर संघटना सदस्य तथा पर्यावरणवादि कार्यकर्ता उरण

उरणमधील लॉजिस्टिक पार्कवर सिडकोचा हातोडा !!

उरणमधील लॉजिस्टिक पार्कवर सिडकोचा हातोडा !!

अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले.

उरण मधील इतर ठिकाणी असलेल्या अनधिकृत कंटेनर यार्ड वर कारवाई करण्याची मागणी.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
 बेकायदा बांधकामांविरोधात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाईचा धडाकाच लावला आहे. उरण परिसरातील जांभूळपाडा येथील १ लाख २० हजार ४३७ चौ.मी. जागेवर बेकायदेशीर उभारलेल्या कंटेनर यार्डवर सिडकोने हातोडा चालवला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.

बेलोंडाखार लॉजिस्टिक पार्क येथे बेकायदेशीरपणे कंटेनर यार्ड उभारल्याची माहिती सिडकोला मिळाली. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित राजपूत, स्थानिक पोलीस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र - सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे मात्र उरण मध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे, अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरण मधील नागरिकांनी केली आहे

उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर ; पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर

उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर ; पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर 

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
 पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उरण महावितरणतर्फे मान्सूनपूर्व देखभाल मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १० विभागांतील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सध्याही अनेक कामे महावितरण विभागाने हाती घेतले आहेत.पावसाळा पूर्वी सर्व कामे करणे हे त्यांचे लक्ष आहे.

उपअभियंता विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. तसेच जीटीपीएस सब-स्टेशन ब्रेकर दुरुस्ती, मुख्य वीजवाहिन्यांतील सैल कनेक्शनची तपासणी व दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर देखभाल आदी कामे करण्यात आली.

धोकादायक वीज खांब बदलण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले. करंजा, मोरा आणि चिरनेर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली असून उर्वरित भागांत . टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहेत.

नागरिकांना पूर्वसूचना देऊन वारंवार माहिती दिली जात आहे.ज्या भागांत कामे होणार आहेत, तेथील नागरिकांना मोबाइल ऍपद्वारे पूर्वसूचना दिली जात आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर असून उरणची वीज यंत्रणा आता ऍक्शन मोडवर दिसत आहे.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...