Tuesday, 1 September 2026

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात, तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात विशेष:ता मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, यासाठी प्रशासनासह नागरिक व गणेश भक्तांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास ढगे यांनी केले आहे.

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांसाठी आठवडाभर मोफत रेबीज लसीकरण मोहीम !!

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांसाठी आठवडाभर मोफत रेबीज लसीकरण मोहीम !!

डोंबिवली, राजू नलावडे : रेबीजचा धोका कमी करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी मोफत अँटी-रेबीज लसीकरण मोहीम डोंबिवलीत ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनतर्फे या आठवडाभराच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्व व पश्चिमेसह रीजन्सी अनंतम/इस्टेट, पलावा आणि रुणवाल परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे.

या उपक्रमात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन, शाळा-महाविद्यालये, NSS पथके, पशुवैद्यकीय विद्यार्थी आणि प्राणीप्रेमी सहभागी होणार आहेत.

मोहिमेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींनी आपल्या परिसरातील लसीकरण आवश्यक असलेल्या भटक्या कुत्र्यांची अंदाजे संख्या आयोजकांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे आठवडाभराचे दिवसनिहाय नियोजन करून जास्तीत जास्त कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

मोहिमेचे समन्वयक डॉ. मनोहर अकोले यांच्याशी ९८२१०४०३३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. किशोर अढळकर आणि प्रकल्प प्रमुख श्री कल्पेश पाटील यांनी असे आवाहन केले आहे की, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे.

Monday, 31 August 2026

पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया आक्रमक; अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट !

पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया आक्रमक; अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट !

*संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन*

*ठाणे, दि. ३१ ऑगस्ट २०२६*

डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगाराच्या मृत्यूशी संबंधित गंभीर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारासोबत कथितरित्या अरेरावी, शिवीगाळ तसेच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून व्हॉईस ऑफ मीडियाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणी आज सोमवारी दुपारी व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची स्पष्ट भूमिका मांडली. पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकारी संजय जाधव यांनी दिल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

*काय आहे प्रकरण?*

कामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि तपासातील महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य तथा ‘राष्ट्रभूमी भरारी’चे संपादक गौतम गवई हे रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते.

तपासाबाबत माहिती घेण्यासाठी व काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधित तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांनी कथितरित्या अरेरावी व दादागिरीची भाषा वापरून शिवीगाळ केली, तसेच पत्रकाराविरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पत्रकारांशी अशा प्रकारे गैरवर्तन होणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी गंभीर बाब असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाने केली आहे.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रिमो गौतम वाघ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुरेश जगताप, जगन्नाथ जावळे, संतोष क्षेत्रे, रजनीकांत गायकवाड, ताराचंद तायडे, प्रशांत ढोणे, राजू दोंदे, देवानंद पाढेन, राजदीप जगताप यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.

या प्रकरणी संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा देत उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांचे व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन !

*दुःखद निधन*

*अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन*

*अमरावती, दि. 30 ऑगस्ट 2026*

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे वयाच्या 92 व्या वर्षी रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने गिरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व गिरी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

*शोकाकुल - गिरी परिवार, अमरावती*

Sunday, 30 August 2026

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!

*डोंबिवली, प्रतिनिधी :* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 10/ई प्रभागातील अनधिकृत बांधकामे आणि विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करत नसल्याने आज दिनांक ३१ ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

*प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?*
मनोज गिरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10/ई प्रभागात सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथावर अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका विभागाकडे लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करूनही पारदर्शक कारवाई झालेली नाही.

*मनोज गिरी यांच्या प्रमुख मागण्या :*
1. तक्रारीत नमूद केलेल्या सर्व ठिकाणांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करावा.
2. अनधिकृत बांधकामांच्या मंजूर नकाशे आणि परवानग्यांची तपासणी करावी.
3. विनापरवाना फेरीवाल्यांवर नियमानुसार कारवाई करून सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवावे.
4. गेल्या सहा महिन्यात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल (Action Taken Report) द्यावा.
5. वेळेत कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी.

*वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची नोंदही घेतली नाही - आरोप*
उपोषणाचा अर्ज केल्यानंतर 10/ई प्रभागातून तीन वेळा "उपोषण थांबवून सहकार्य करावे" असे पत्र आले. मात्र, चौथ्यांदा विनंती केली असता वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची साधी नोंदही घेतली नसल्याचा आरोप गिरी यांनी केला आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयात थांबूनही सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे हे सकाळी 11.30 वाजता येऊन गाडीतून न उतरताच निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने कठोर व निष्पक्ष कारवाई करून लेखी अहवाल द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे गिरी यांनी म्हटले आहे. 

*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !

*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !

*मेहकर (बुलडाणा) प्रतिनिधी :* शासनमान्य रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला अडवून 6 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील एका गावगुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*काय घडले?*
फिर्यादी दुर्गेश दिलीप अवचार (वय 25, रा. कळमेश्वर, ता. मेहकर) हे देवी तुळजाई रियल इस्टेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीने खापरखेड लाड शिवारात पुर्णा नदी पात्रातील शासकीय रेती घाट घेतला असून, तेथे नियमानुसार रॉयल्टीने रेती विक्री सुरू आहे. दुर्गेश हे रॉयल्टी पावती देण्याचे काम करतात.

दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रेती वाहतूक सुरू होती. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चालक अक्षय म्हस्के (रा. भुमराळा) हा MH 28 BB 9789 या टिप्परमधून दोन ब्रास रेती घेऊन मेहकरकडे जात असताना, किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदी पुलाजवळ आरोपी अमोल प्रभाकर पालकर (रा. किनगाव जट्टू) याने टिप्पर अडवला.

*धमकी आणि शिवीगाळ*
आरोपीने फिर्यादीला घटनास्थळी बोलावून, "तुमचे रेती स्टॉक उचलणे चालू आहे, त्यासाठी मला तुमच्या मालकाकडून सहा लाख रुपये पाहिजे, तरच मी येथून वाहने जाऊ देणार" अशी धमकी दिली. फिर्यादीने वाहने अडवू नको, मालकाशी बोल असे सांगताच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारे वाहने अडवून पैशाची मागणी करत असून त्याच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे फिर्यादीने सांगितले.

या प्रकरणी आरोपी अमोल पालकर विरुद्ध कायमी अपराध क्रमांक / 2026 अंतर्गत कलम 126(2), 308(2), 352, 351(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वृत्त - समाधान मुळे

जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !

जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव) 

इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी यांच्या वतीने जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथे विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर समुपदेशक करुणा भवर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही तपासणीचे महत्त्व, उपचाराच्या उपलब्ध सुविधा तसेच एचआयव्हीविषयी असलेले गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका लोकरे  यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडले, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी तसेच समुपदेशक करुणा भवर यांचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ? क...