Friday 26 July 2024
रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!
देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे
आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून आक्षेपार्ह बॅनर प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !!
Thursday 25 July 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा !!
राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!
महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!
महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!
वाडा, प्रतिनिधी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना महाराष्ट्रात नवीन नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी वसईतील भास्कर आळी नजीक नऊ वर्षाच्या मुलाचा खेळताना डीपी बॉक्सला हात लागून जागीच मृत्यू झाला. तर अशीच घटना खरिवली येथील शेतकरी शिवाजी अधिकारी यांच्या स्वतःच्या शेतात चिखल करत असताना अचानपणे लाईट चा पोल ट्रॅक्टर चालू असताना पोल ट्रॅक्टर वर पडून नुकसान झाले.
पावसाळ्यापूर्वी तब्बल अनेक तासांचे शट डाऊन करून वीज दुरुस्त्या केल्या जातात. विज व्यवस्था निर्धोक, सुरळीत राहील असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तक्रारी देऊनही योग्य कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. अशा पद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने शहरात उघड्यावर असलेल्या वीजतारा, सैल झालेले पोल, डीपी बॉक्स यांची काळजी घ्यावी, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सामान्य नागरिक यांच्याकडून सातत्याने होते. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, किंबहुना त्यात हलगर्जीपणा दाखविला जातो.
अपघात झालेल्या घटनांची चौकशी करून अपघातास जबाबदार महावितरणचे अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे, अशी कारवाई झाली तर पुढील घडणाऱ्या अनर्थ घटनांना आळा बसेल.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम देण्याचे आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांचे श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन !
रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!
रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !! चोपडा,...
-
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !! मुख्यम...
-
भटक्या प्राण्याकरीता कल्याण डोंबिवलीतील पहिले ट्रिटमेंट सेंटर डोंबिवली (पश्चिम) येथे सुरू !! डोंबिवली, प्रतिनिधी : फॅक्ट्स फॉरेव...
-
मोहने यादव नगर येथील न्यू रिलॅक्स गॅस एजन्सी कडून ग्राहकांची फसवणूक !! *मोदी सरकारने घोषणा केलेली रक्षाबंधनची भेट न मिळाल्याने शेकडो गृहणी स...