विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!
अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील विश्वजीत ग्रीन सोसायटीच्या एफ विंगमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.
संपूर्ण विश्वजीत ग्रीन परिसरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ एफ विंगमधील रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच दैनंदिन गरजांसाठी रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर समस्येची तात्काळ चौकशी करून पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारण शोधावे तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने लक्ष देऊन एफ विंगमधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.