Friday, 19 June 2026

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : दि.१६/०६/२०२६ रोजी सिडको द्रोणागिरी आ‌ॅफीस बोकडविरा येथे उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील नवघर,नवघरपाडा,आणि कुंडेगाव गावांमध्ये तसेच येथील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको द्रोणागिरी नोड कार्यालयात या तिन्ही गावच्या ग्रामस्थांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असता येथील सिडको कार्यालयात जमलेल्या नवघर,नवघरपाडा आणि कुंडेगावच्या ग्रामस्थांनी आपल्या गावच्या आणि परिसरातील समस्यांचा पाढाच सदर सिडको अधिका-या समोर वाचून दाखवला. येथील नागरिकांनी अनेक मुलभूत सुविधा आणि आता पावसाळ्यात नव्याने उद्भवू शकणा-या समस्या सदर सिडको अधिकारी संजय पाटील यांच्या समोर मांडल्या.या मध्ये श्री.आसरा देवीच्या तलावाच्या सुशोभीकरणाचा तसेच पावसाळ्यात उद्भवणा-या आपत्कालीन समस्येवर सिडकोच्या अधिका-यां सोबत सकारात्मक चर्चा होऊन श्री आसरा देवी तलावाचे सुशोभीकरणासाठी ६ ते ७ लाखाचा निधी देण्याचे कबूल केले आहे. तसेच समाज मंदिर आणि व्यायामशाळा बांधण्यासही सिडको कडून निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून नवघर गावातील इतर कामे जशी नवघर गावच्या आतील रोडचे काम तसेच घनकचरा उचलणे व त्या कच-याचे विल्हेवाट लावणे, इत्यादी कामे तसेच नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये आणि परिसरातील आवश्यक असणारी जनहिताची तसेच पावसाळ्यात अचानक उद्भवणारी कामेही करून देणार आसल्याचे सदर सिडकोचे अधिकारी संजय पाटील यांनी सदर बैठकीला उपस्थीत असणा-या नवघर, नवघरपाडा आणि कुंडेगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या समोर कबूल केले असता येथील  जमलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीम !!

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीम !!

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधील ७४१ गावांची केंद्र शासनाने निवड केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीमध्ये या गावांमध्ये विशेष ग्रामसभा व आदर्श गावांची संयुक्त पडताळणी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविली आहे.

या मोहिमेद्वारे ‘प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेची’ (पीएम- अजय) जनजागृती करावयाची असून, गावाच्या विकासात्मक गरजांची ओळख, गावांचे ग्राम विकास आराखडे तयार करणे, त्यास ग्रामसभेमध्ये मंजुरी देणे, ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे तयार केलेले आहेत, त्या आराखड्यांना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता देणे, आदी कामकाज करण्यात येणार आहे. त्याशिवाय गावांचे ७० किंवा त्यापेक्षा जास्त गुणांकन असलेल्या गावांना आदर्श ग्राम घोषित करणे, 'आदर्श ग्राम' म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांशी समन्वय साधण्यावर भर देण्याच्या अनुषंगाने उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या गावांमध्ये ५० सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे आणि १५ ग्रामीण पायाभूत सुविधांचे निकष परिपूर्णतेबाबत माहिती घेऊन त्याबाबत ग्रामसभेमध्ये सल्लामसलत करुन त्या गावासाठी आवश्यक असणाऱ्या विकास कामकाजासाठी १० लाख रुपयांच्या पुढील मागणी प्रस्तावित करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, आदर्श गावांची संयुक्त पडताळणी करुन तपासणी अहवाल ‘पीएम- अजय' मोबाईल अॅपद्वारे व्हिलेज इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये भरावयाचा आहे.

याकामी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने या मोहिमेचे नियोजन केलेले आहे. या मोहिमेमध्ये, सर्व ग्रामस्थ, अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, बचत गट प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. विशेष ग्रामसभा मोहिम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील क प्रभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रमुख संतोष माहिडा व त्यांच्या पथकाने स्टेशन रोड परिसरासह क प्रभाग हद्दीतील अनधिकृत फेरीवाले हटवून परिसर फेरीवाला मुक्त केला.

*जबर वचक बसवली*  
महापालिका पथकाने स्टेशन रोड परिसरात ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कायद्याची जबर वचक बसवली. कारवाईदरम्यान अनेक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरातील अतिक्रमण दूर होऊन वाहतूक व पादचाऱ्यांना मोकळी जागा मिळाली.

*पथकाचे योगदान*  
या कारवाईत पथक प्रमुख संतोष माहिडा यांच्यासह त्यांचे सहकारी पवार, परमार व शेवाळे यांनी मोलाचे योगदान दिले. प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे सुरू राहतील. नियमबाह्यपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात प्रारंभ !!

मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात प्रारंभ !!

मुंबई, सचिन ननगरे : मुंबई फेन्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यसम्राट आमदार मा. कालिदास कोळंबकर, माजी नगरसेवक सुनील मोरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निरीक्षक चंद्रकांत घोडेराव, राज्य संघटनेचे रेफ्री बोर्ड चेअरमन केदार ढवळे, रायगड फेन्सिंग असोसिएशनचे सचिव मिलिंद ठाकूर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दुर्गेश जागीरदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर निलेश मस्करे, विनोद जगताप आणि आनंद वाघमारे हे देखील उपस्थित होते. स्पर्धेची प्रस्तावना मुंबई फेन्सिंग असोसिएशनचे सचिव राहुल वाघमारे यांनी केली. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश, खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच फेन्सिंग खेळाच्या विकासासाठी संघटनेच्या प्रयत्नांची माहिती दिली.

उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत फेन्सिंगसारख्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेत मुंबईसह विविध जिल्ह्यांतील स्पर्धक उपस्थित होते..

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा पदी शमीमदीदी शहा यांची निवड !!

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा पदी शमीमदीदी शहा यांची निवड !!

मुंबई, (सचिन ननगरे) : संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने वाटचाल करीत आहे. मुंबई प्रदेशात सक्रीय असणाऱ्या महिला आघाडीच्या नेत्या 'शमीमदीदी शहा' यांची महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी बांद्रा मुंबई येथे जाहीर केली. 

संपूर्ण मुंबईत शमीमदीदी यांचा दांडगा जनसंपर्क असून, लवकरच मोठ्या प्रमाणात महिलांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात भव्य प्रवेश सोहळा मुंबईत होणार असून त्या अनुषंगाने त्या जोमाने कामाला लागल्या आहेत. शाखा उदघाटन, विभाग निहाय बैठका,सभांच्या माध्यमातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मजबुती साठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी जोमाने काम करेल असे आश्वासन निवडी प्रसंगी शमीम दीदी शहा यांनी दिले. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिनभाऊ नांगरे, मुंबई अध्यक्ष नाका सेल सागर भाई पिल्ले, मुंबई रिक्षा युनियन अध्यक्ष मेहमूद भाई शेख, युवा नेतृत्व बिपीन कटारे, प्रशांत कटारे, अभिनव निकम, मुंबई नेते विश्वास कांबळे, शिवाजी पिंपळे, दस्तगीर मिर्जा, महिला आघाडी शमीम शहा, निर्मला चिमणापुरे, नूरजहाँ खान, रिंका देवी जैस्वाल, सलमा कुरेशी, रिजवान खान, रसूल खान, रईशा शेख, सूफिया शेख,मदिना शेख, गुडिया खान, सना अन्सारी, कविता राठोड,नजमा शेख, आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकरच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेश मेळावा घेणार असल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितले.

Thursday, 18 June 2026

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....
नालासोपारा ता १४ :- नालासोपारा पश्चिम छेडा नगर येथे रात्री ९  वाजता पायी चालणार्‍या वृद्ध व्यक्तीस बाईक स्वाराने जोरात धडक दिल्याने वृद्ध व्यक्ती खाली पडल्याने हात व पाय मोडला या अपघात व्यक्तीस तसेच टाकून बाईक स्वार फरार झाले. 
या संदर्भात बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांना कळताच त्वरित मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत अपघात ग्रस्त व्यक्तीस सोपारा हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केले.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व नातेवाईकांना संपर्क करून त्यांना हॉस्पिटल मध्ये बोलवले यावेळी देवदूत म्हणून बहुजन विकास आघाडीचे मंदार राऊत हे धावून येत रुग्णवाहिका चालवून अपघात ग्रस्त व्यक्तीस रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यास मदत केली यावेळी नातेवाईकांनी आभार मानले. 
वाहन चालवताना आपण सर्वानी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अपघातग्रस्तांना वेळेत मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारीचा भाग आहे.

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन -शेखर मुंदडा

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन -शेखर मुंदडा

पशुसंवर्धन आयुक्तालय येथून होणार शुभारंभ

१५ दिवसांत ६ हजार किमीचा प्रवास; ३५ जिल्ह्यांतील १ हजार गोशाळांचा सहभाग

महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' आयोजन करण्यात आली आहे. ही यात्रा २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार असून यात्रेचा शुभारंभ २२ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व यात्रा आयोजन समितीचे प्रमुख शेखर मुंदडा यांनी दिली.

श्री. मुंदडा म्हणाले, संवाद यात्रा सलग १५ दिवस सुरू राहणार असून या दरम्यान सुमारे ६ हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे संचालन होणार असून, यामध्ये राज्यातील १ हजाराहून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात १५ हजारापेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली जाईल.

'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा'ची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्देश:
रासायनिक शेतीला पर्याय म्हणून देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, याचे मार्गदर्शन करणे. गोबर (शेण) आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खते, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तू आदी विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी जनजागृती करणे, पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन व संसाधने विषयक योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, आदी कार्य या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

गोशाळा संचालकांच्या आढावा बैठका घेणे, तसेच पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमध्ये उत्तम समन्वय राहील यासाठी प्रयत्न करणे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोख्याचा समन्वय साधणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याचा प्रचार करून कायदेशीर बाबींविषयी समाजाला अवगत करणे. स्थानिक देशी गोवंशाच्या पालन-पोषणा संदर्भात वैज्ञानिक व पारंपरिक पद्धतींची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'चा समारोप ५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे होणार असून सांगता समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, देशभरातील गोसेवक व गोशाळा संचालक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेची यशस्वी सांगता करणार आहेत. या व्यापक मोहिमेत राज्यातील सर्व गोपालक, शेतकरी, सामाजिक संस्था व गोप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मुंदडा यांनी केले आहे.

'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ लोगोचे अनावरण 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'च्या अधिकृत लोगोचे अनावरण महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शामकांत पाटील उपस्थित होते.

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !! उरण दि १८ (विठ्ठल म...