Monday, 7 September 2026

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

*कल्याण, महेंद्र (अण्णा) पंडित 

कल्याण रेल्वे पोलिसांनी ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करत ५ आरोपींना अटक केली आहे.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ६८२/२०२६, कलम ८(c), २०(b)(ii)(C) व २९, NDPS Act, १९८५ अन्वये दिनांक ०१/०६/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपी निक्कीकुमार हरदेव शाह (वय १९ वर्षे, रा. बेगुसराई, बिहार) व कुलदीप राजू महतो मंडल (वय २६ वर्षे, रा. बेगुसराई, बिहार) यांच्याकडून कोणार्क एक्स्प्रेसच्या डब्यातून एकूण २१.९५ किलो गांजा (Commercial Quantity) विक्रीसाठी वाहतूक करीत असताना जप्त करण्यात आला होता.

सदर आरोपींकडे कसून चौकशी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त केली असता, सदर गांजा हा ओडिशा राज्यातून आणून गोवा राज्यात पुरवठा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वपोनी अर्चना दुसाने, कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विठ्ठल वाणी यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठीत करण्यात आले.

*गोवा राज्यात तपास व आरोपीस अटक :*

तपासादरम्यान आरोपींचे जबाब, मोबाईल CDR, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, बँकेचे आर्थिक व्यवहार तसेच इतर उपलब्ध पुराव्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले.

दिनांक १८/०७/२०२६ ते २२/०७/२०२६ या कालावधीत विशेष पथकाने गोवा राज्यात जाऊन तपास केला. Maina Curtorim Police Station, South Goa येथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तपासाची पुढील कार्यवाही करण्यात आली.

तपासात अटक आरोपींकडून सदर गांजा हा गोवा राज्यातील आशरोफ सुनार खान (वय २१ वर्षे, रा. दक्षिण गोवा) याला पुरवठा करण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्यास मडगाव, गोवा येथून अटक करण्यात आली. आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून सदर आरोपीस कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून PCR घेण्यात आला.

*ओडिशा राज्यातील गांजा पुरवठादारांचा शोध :*

गोवा येथील आरोपीकडून प्राप्त माहिती व तांत्रिक तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गांजाचा मूळ पुरवठादार शोधण्यासाठी विशेष पथकाने दिनांक २४/०७/२०२६ ते ३१/०७/२०२६ या कालावधीत कंधमाल जिल्हा, ओडिशा येथे जाऊन तपास केला.

Daringbadi Police Station, Odisha येथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तपासाची कार्यवाही करण्यात आली. तपासात अटक आरोपींनी सदर गांजा हा विद्याधर लक्ष्मीधर नायक (वय ४३ वर्षे, रा. दंडीमहा, पो. सरनिकेता, जि. कंधमाल, ओडिशा) यांच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

पुढील तपासात विद्याधर लक्ष्मीधर नायक याने सदर गांजा हा जंगल परिसरात गांजाची शेती करणारा श्रीकांत मंदार प्रधान (वय ३८ वर्षे, रा. सुजामाजु, ता. डांरींगबाडी, जि. कंधमाल, ओडिशा) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

श्रीकांत मंदार प्रधान हा अतिदुर्गम जंगल परिसरात राहत असून सदर भाग नक्षलप्रभावित क्षेत्रात येत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. तथापि, स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून त्याचा शोध घेतला व त्यास अटक करण्यात यश मिळविले.

दोन्ही आरोपींना JMFC Court, Daringbadi, Odisha येथे हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ०५ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) घेण्यात आला आहे.

*आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा उलगडा :*

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एकूण ०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींचे जबाब, मोबाईल CDR, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, आर्थिक व्यवहार व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ओडिशा → गोवा → महाराष्ट्र या मार्गावरील आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा महत्त्वपूर्ण उलगडा करण्यात आला आहे. गांजाचा स्रोत, पुरवठादार, मध्यस्थ व प्राप्तकर्ता यांच्यातील परस्पर संबंध उघडकीस आणण्यात यश आले असून, या गुन्ह्याशी संबंधित इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार व तस्करीच्या नेटवर्कबाबत पुढील तपास सुरू आहे.

सदर तपासादरम्यान महाराष्ट्र, गोवा व ओडिशा या तीन राज्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत तपास करण्यात आला. विशेषतः ओडिशा राज्यातील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जंगल परिसरात प्रतिकूल परिस्थितीत नियोजनबद्ध व धाडसी पद्धतीने कारवाई करून गांजा पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या आरोपींपर्यंत पोहोचण्यात विशेष पथकास यश आले.

सदर संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, श्री. राकेश कलासागर, मा. पोलीस उपायुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे व मा. पोलीस उपायुक्त श्रीमती निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*विशेष पथक -*
१. वपोनी अर्चना दुसाने 
२. पोनी कैलास रामदास वानखडे 
३. सपोनी विठ्ठल किसन वाणी 
४. पोहेवा/३२७३ अमित अशोक बडेकर 
५. पोहेवा/२२०६ हेमंत राजेंद्र पाटील 
६. पोशि/६३३ अमोल मोठाभाऊ सूर्यवंशी 
७. पोशि/१७३७ अंकुश व्यंकट धायगोडे

या अधिकारी व अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परस्पर समन्वयाने तसेच महाराष्ट्र, गोवा व ओडिशा राज्यातील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

कल्याण लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशा-गोवा-महाराष्ट्र आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश, 05 जणांना अटक !!

कल्याण लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशा-गोवा-महाराष्ट्र आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश, 05 जणांना अटक !!

*प्रतिनिधी/पत्रकार (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)*
*कल्याण. -* कल्याण रेल्वे पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ओडिशा राज्यातून गांजा आणून गोवा आणि महाराष्ट्रात पुरवठा करणाऱ्या टोळीतील 05 आरोपींना पोलिसांनी महाराष्ट्र, गोवा आणि ओडिशाच्या नक्षलप्रभावित जंगलातून शोधमोहीम राबवून अटक केली आहे.

*कोणार्क एक्सप्रेसमध्ये 21.95 किलो गांजा जप्त*

कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 682/2026, कलम 8(c), 20(b)(ii)(C) व 29 NDPS Act 1985 अन्वये दिनांक 01/06/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यात कोणार्क एक्सप्रेसच्या डब्यातून प्रवास करणारे दोन आरोपी - *निक्कीकुमार हरदेव शाह (वय 19, रा. बेगुसराई, बिहार)* आणि *कुलदीप राजू महतो मंडल (वय 26, रा. बेगुसराई, बिहार)* यांच्याकडून पोलिसांनी *21.95 किलो गांजा (Commercial Quantity)* जप्त केला होता. हा गांजा ते विक्रीसाठी घेऊन जात होते.

*तांत्रिक तपासातून ओडिशा ते गोवा कनेक्शन उघड*

अटक आरोपींकडे कसून चौकशी आणि मोबाईल CDR, लोकेशन, बँक व्यवहारांच्या तांत्रिक विश्लेषणातून हा गांजा ओडिशा राज्यातून आणून गोवा राज्यात पुरवठा करण्यासाठी नेला जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करण्यात आले.

*पहिली कारवाई - गोव्यातून मुख्य खरेदीदाराला अटक*

दि. 18/07/2026 ते 22/07/2026 या कालावधीत विशेष पथकाने गोवा राज्यात जाऊन तपास केला. Maina Curtorim Police Station, South Goa येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा गांजा गोव्यातील *आशरोफ सुनार खान (वय 21, रा. दक्षिण गोवा)* याला पुरवठा केला जाणार असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला मडगाव, गोवा येथून अटक करण्यात आली आणि कल्याणला आणून त्याची पोलीस कोठडी (PCR) घेण्यात आली.

*दुसरी कारवाई - ओडिशाच्या नक्षलग्रस्त जंगलातून पुरवठादार जेरबंद*

गोवा येथील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून गांजाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी विशेष पथकाने दि. 24/07/2026 ते 31/07/2026 दरम्यान ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यात तपास मोहीम राबवली. Daringbadi Police Station च्या सहकार्याने तपास करताना अटक आरोपींनी हा गांजा *विद्याधर लक्ष्मीधर नायक (वय 43, रा. दंडीमहा, पो. सरनिकेता, जि. कंधमाल, ओडिशा)* याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गांजा जंगल परिसरात गांजाची शेती करणाऱ्या *श्रीकांत मंदार प्रधान (वय 38, रा. सुजामाजु, ता. दारिंगबाली, जि. कंधमाल, ओडिशा)* याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

श्रीकांत प्रधान हा अतिदुर्गम जंगल परिसरात राहत असून सदर भाग नक्षलप्रभावित क्षेत्रात येत असल्याने त्याचा शोध घेणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने कारवाई करून पथकाने त्यालाही अटक करण्यात यश मिळवले.

दोन्ही आरोपींना JMFC Court, Daringbadi, Odisha येथे हजर केले असता न्यायालयाने 05 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर दोघांनाही कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

*साखळीचा उलगडा*

या तपासात आतापर्यंत एकूण 05 आरोपींना अटक करण्यात आली असून *ओडिशा → गोवा → महाराष्ट्र* या मार्गावरील आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा महत्त्वपूर्ण उलगडा झाला आहे. गांजाचा स्रोत, पुरवठादार, मध्यस्थ आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध उघड झाले असून या नेटवर्कमधील इतर व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांबाबत पुढील तपास सुरू आहे.

*वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विशेष पथक*

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई श्री. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे आणि पोलीस उपायुक्त श्रीमती निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक कैलास रामदास वानखडे, सपोनि विठ्ठल किसन वाणी, पोहेवा/3273 अमित अशोक बडेकर, पोहेवा/2206 हेमंत राजेंद्र पाटील, पोशि/633 अमोल मोठाभाऊ सूर्यवंशी, पोशि/1737 अंकुश व्यंकट धायगोडे यांनी सहभाग घेतला.

तीन राज्यांमध्ये जाऊन, स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत आणि विशेषतः नक्षलप्रभावित दुर्गम जंगलात प्रतिकूल परिस्थितीतही या पथकाने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार !!

*भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार !!

*शिक्षण अन् पाककलेतील १३ गुणवंतांचा मुंबईत दिमाखदार गौरव*

मुंबई, पी. डी. पाटील 
गेल्या २४ वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान टिकवून असणाऱ्या ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई’ या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी एक भव्य व दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दादर (पश्चिम) येथील ‘गुरुकुल सभागृह’ येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिक्षण आणि पाककला या क्षेत्रांत अद्वितीय व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १३ गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये पाककलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ विविध प्रयोग करून या कलेला नवी उंची मिळवून देणाऱ्या गृहिणींचा ‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला, तर शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष ‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त गुणवंतांची यादी -

अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ (१२ विजेत्या) :
 * सौ. स्वाती सतीश श्रीवर्धनकर
 * सौ. स्वाती ऐलेश जोशी
 * सौ. भावना खंडारे
 * सौ. मनीषा सचिन पाळेकर
 * सौ. तृप्ती सगुण माणगावकर
 * सौ. नीता जितेंद्र पाठारे
 * अरुणा गोपाळ चरपे
 * सौ. वंदना सुनील भुजाडे
 * सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप
 * सौ. मोहिनी मोहित घरत
 * सौ. भाविका भरत गोंधळी
 * वैशाली संतोष सुतार

ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६ - * सौ. रंजना राजेंद्र शिंदे (शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल)

संस्थेची २४ वर्षांची उज्ज्वल परंपरा
२००३ सालापासून मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था ही स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली निरंतर सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, कृषी, देशी गो-संवर्धन, वृक्ष संवर्धन व साहित्य या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करते. तसेच संस्थेमार्फत वैदिक वास्तू, डाऊझिंग आणि विविध वैकल्पिक शास्त्रांचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते.

शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि पाककलेच्या माध्यमातून जपलेली पारंपरिक व आधुनिक संस्कृती या दोन्ही क्षेत्रांतील गुणवंतांच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्यासह श्री शिवपद्म वडाळकर, डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे, मा. सौ. सुनीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नंदाताई शिंगरे, हिलर प्रा. भाऊ म्हात्रे, श्री मनोज वैद्य, हिलर सचिन तावरे, श्री संदेश कदम आणि शिक्षिका सौ. भावना खंडारे, श्री. आर. विजयसिंह यांचे विशेष सहकार्य व योगदान लाभले. उपस्थितांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले.

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओंवर बंदी घाला; शिवसेना (UBT) नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओंवर बंदी घाला; शिवसेना (UBT) नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

*मुंबई, प्रतिनिधी :* गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय संघटक अरुण तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काही सार्वजनिक मंडळांमध्ये तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवले जात आहेत. याचा लहान मुले आणि युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अशा प्रकारच्या गतिविधींमुळे महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाण्यांच्या प्रसारणावर प्रतिबंध घालावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी अरुण तिवारी यांनी केली आहे.

युथ फॉर एज्युकेशन आणि सीजेपीकडून मनपा शाळांच्या सर्वेक्षण अहवालाचे महापौरांकडे सादरीकरण !!

युथ फॉर एज्युकेशन आणि सीजेपीकडून मनपा शाळांच्या सर्वेक्षण अहवालाचे महापौरांकडे सादरीकरण !!

*कल्याण-डोंबिवली, ७ सप्टेंबर २०२६ :*

युथ फॉर एज्युकेशन या संस्थेच्या शिष्टमंडळाने आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर सौ. हर्षाली थाविल-चौधरी यांची भेट घेऊन महानगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षणातील निष्कर्ष सादर केले.

या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिका हद्दीतील पाच प्राथमिक शाळांचा समावेश करण्यात आला होता :

१. क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालय
२. आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालय
३. उस्ताद बंदे अली खान उर्दू माध्यम शाळा
४. महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय
५. सोनुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालय

शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच जुन्या इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता याबाबत सर्वेक्षणात आढळलेल्या बाबी महापौरांसमोर मांडण्यात आल्या.

विशेषतः आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविणे व सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करणे, शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता व गाळ काढणे, शाळांसाठी नियमित व स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देणे तसेच जुन्या व जीर्ण इमारतींची संरचनात्मक तपासणी करून घेणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्याची माहिती ॲड. अक्षय पाठक यांनी दिली.

या विषयावर महापौरांसोबत सविस्तर चर्चा झाली. महापौर सौ. हर्षाली चौधरी यांनी सर्वेक्षणातील निष्कर्षांची गांभीर्याने दखल घेत संबंधित महानगरपालिका विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये शाळांजवळील वाहतूक सुरक्षितता, पाण्याच्या टाक्यांची पाहणी व स्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेत सुधारणा यांचा समावेश आहे.

या सर्व मागण्यांबाबत महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडेही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले असून, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲड. आकाश वेदक यांनी दिली.

आजच्या या भेटीदरम्यान युथ फॉर एज्युकेशन तर्फे शुभम शिंदे, ओंकार जाधव, गायत्री गावंडे, मिली साहो, विपुल इंगोले, प्रज्वल वरडकर आणि सिद्धेश बाविसकर हे सदस्य उपस्थित होते.

महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी युथ फॉर एज्युकेशन सातत्याने सकारात्मक व रचनात्मक पद्धतीने कार्यरत राहणार आहे, असे युथ फॉर एज्युकेशनच्या पूजा मीठ भावकार यांनी सांगितले.


अधिक माहितीसाठी -
ॲड. आकाश वेदक 
९९३००१३९२६ 

ॲड. अक्षय पाठक 
८९७६२३५४९८

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना !!

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उरण तालुक्यातील विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न वि. का. सहकारी संस्था मर्यादित विंधणे कोळीवाडा या सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठे उत्साहात कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात पार पाडला.

कोळीवाड्यातील स्थानिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व गोरगरीब मच्छीमारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दिघोडे कांदळवन समितीचे अध्यक्ष व पारंपारिक मच्छीमार संस्थेचे सेक्रेटरी प्रितेश काशिनाथ कोळी यांच्या प्रास्ताविक पर भाषणाने झाले त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या स्थापनेच्या उद्देश आणि रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.

या भव्य कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पारंपरिक मच्छिमार बचाव व सामाजिक कृती समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभ्यासक  रमेश भास्कर कोळी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित मच्छीमार बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले व संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गव्हाण सहकारी संस्थेचे चेअरमन हितेश कोळी हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मच्छीमारांच्या सहकार्याबद्दल महत्त्वाचे विचार मांडले व कोळी बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले तसेच दिघोडे पारंपारिक मच्छीमार संस्थेचे चेअरमन अशोक कोळी, कुंडेगाव सहकारी संस्थेचे पदाधिकारी भानुदास कोळी, तानाजी कोळी,गव्हाण मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी भरत कोळी, प्रकाश कोळी, वैभव कोळी या सोहळ्याला उपस्थित राहून संस्थेला मार्गदर्शन करून पाठबळ दिले.

विंधणे खालचा पाडा गावचे अध्यक्ष कृष्णा माळी,  माजी ग्रामपंचायत सदस्य मनीषा कोळी, संस्थेचे सचिव आशिष कोळी, संस्थेचे खजिनदार शैलेश कोळी, संस्थेतील पदाधिकारी कृष्णा कोळी, सतीश कोळी, पंकज कोळी,आर्यन कोळी,संतोष कोळी, विनोद कोळी,राजेश कोळी, विनायक कोळी,अर्चना कोळी, धनश्री  कोळी, शर्मिला कोळी,अस्मिता कोळी, उज्वला कोळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य यासोबतच गावचे ग्रामस्थ पदाधिकारी व परिसरातील मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व नेटके सूत्रसंचालन रुपेश पाटील सर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून  संपूर्ण सोहळ्यात रंगत आणली. विंधणे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक चेअरमन सुनील बाळाराम कोळी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व जमलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. विंधणे कोळीवाडा येथे पार पडलेल्या या यशस्वी सोहळ्यामुळे परिसरातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न !!

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न !!

सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, गुणवंतांचा सन्मान अन् खानदेशी मनोरंजनाची मेजवानी.

खान्देश विकास मंडळ तर्फे आयोजित विविध उपक्रमांना उत्तम प्रतिसाद.

उरण, दि. ७  (विठ्ठल ममताबादे) — “नाते मातीशी” या भावनेला केंद्रस्थानी ठेवत खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खान्देश महोत्सव २०२६’ हा विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उरण येथील भारती बँक्वेट हॉल, करंजा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला खानदेशी समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा, खान्देशी डॉक्टरांचा तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार  महेशशेठ बालदी, जेएनपीटीच्या जनरल मॅनेजर (एडमिन) मनीषा जाधव, लहास ग्रीन इंडिया प्रा. लि.चे डायरेक्टर गुलाबराव जाधव, माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या पत्नी कल्पना संजीवजी नाईक, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जगदीश शेलकर, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती  मधु दौलतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या (उरण)  प्रेरणा जितेंद्र घरत, मोरा-उरणचे पोलीस निरीक्षक (क्राईम) राहुल काटवानी, कोपरखैरणे (नवी मुंबई) नगरसेविका मिनाक्षी किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य (उरण)  कैलास मोरेश्वर भोईर, नवजीवन लोक विकास संस्थेचे (कल्याण) अध्यक्ष किशोर तुमडू पाटील, तसेच गाडी लोहार समाज उन्नती मंडळ (कल्याण)चे अध्यक्ष ऍड.युवराज मुरार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विशेष उपस्थिती म्हणून ‘महाराष्ट्र ट्रीपल केसरी’ तथा महाराष्ट्राचे ‘सिंघम’ म्हणून सुपरिचित असलेले पैलवान तथा न्हावा शेवा पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य (भाजप) तथा उरण नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान खान्देशी हास्यकलाकार, नकलाकार व निवेदक-अभिनेते  विलासकुमार शिरसाठ यांच्या विशेष खान्देशी मनोरंजन कार्यक्रमाने उपस्थितांची चांगलीच करमणूक केली.

या महोत्सवाच्या आयोजनामध्ये खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष  प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी, सचिव सचिन खैरनार, उपाध्यक्ष आनंद कुमावत, खजिनदार  वामनराव राठोड, सदस्य  भरत पाटील, महिला सदस्य जयश्री महाजन, सभासद  डॉ. रविंद्र पाटील,  दुर्गेश महाले, रविंद्र सूर्यवंशी,  ईश्वर माळी, विजय नगराळे, उपाध्यक्ष  कैलास भामरे, सल्लागार  संजय पाटील, सदस्य संदीप पाटील, महिला सदस्य राजश्री मोरे, सभासद सुनील झोपे, दिनेश पाटील,  भगवान राठोड,  गोकुळ धाडी आणि मनोज चव्हाण यांचा सहभाग राहिला. दुपारनंतर उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून खान्देशी समाजबांधवांनी आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश दिला.खान्देश विकास मंडळ, उरण हे नोंदणीकृत मंडळ असून या मंडळातर्फे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात आला.

एकूणच ‘नाते मातीशी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा खानदेश महोत्सव २०२६ सामाजिक एकोपा, संस्कृती आणि स्नेहाचा सुंदर संगम ठरला. मान्यवरांची उपस्थिती, गुणवंत व ज्येष्ठांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजन आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाले.

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !! *...