Monday, 23 February 2026

भुसंपादनाच्या कायदेशिर तरतुदिचा अवलंब न करता बेकायदेशिरित्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या सरकारी यंत्रणेला उच्च न्यायालयाचा दणका !!

भुसंपादनाच्या कायदेशिर तरतुदिचा अवलंब न करता बेकायदेशिरित्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या सरकारी यंत्रणेला उच्च न्यायालयाचा दणका !!

** ऍड. प्रियांका सुरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामूळे उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील शेतकऱ्यांना मिळाला न्याय.

** उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमूळे मिळाला न्याय - २० वर्षानंतर मिळाला शेतकऱ्यांना न्याय.


शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्या प्रमाणे नुकसान भरपाई सह मोबदला देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश.

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील मौजे कळंबुसरे येथील शेतकरी  प्रभुश्वर पांडुरंग म्हात्रे व त्यांचे भाऊ रमेश म्हात्रे, प्रमेश म्हात्रे, प्रतिक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे यांची जमिन सार्वजनिक बांधकाम खात्याने कळंबुसरे मोठी जुई बाय पास रोड (रोड नं.६) साठी बळजबरीने ताब्यात घेऊन त्यावर सन २००६-२००७ मध्ये रस्ता बांधला, परंतु या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने / महाराष्ट्र शासनाने भूसंपादनाचा निवाडा जाहिर केला नाही तसेच भूसंपादनाची नुकसानभरपाई दिली नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याने वारंवार अर्ज विनंत्या करूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम खाते, महाराष्ट्र शासन यांजकडे पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी दाद घेतली गेली नाही. त्यामुळे प्रभुश्वर म्हात्रे, रमेश म्हात्रे प्रमेश म्हात्रे, प्रतिक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे ऍड.प्रियांका सुरेश ठाकूर यांचे मार्फत दाखल केलेल्या याचिकेचा निकाल दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती  मनिष पितळे आणि न्यायमुर्ती श्रीराम शिरसाट यांनी शेतकऱ्यांच्या बाजुने दिला आहे. उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची जमिन सार्वजनिक बांधकाम खात्याने बेकायदेशिररित्या हडप करून त्यांना कायदेशिर नुकसान भरपाई दिली नाही याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते, महाराष्ट्र शासन यांना जबाबदार ठरवले आहे व शेतकऱ्यांना त्यांच्या कळंबुसरे मोठी जुई वाडा बाय पास रोड (रोड नं.६) साठी ताब्यात घेऊन त्यावर रस्ता बांधलेल्या जमिनीच्या बाबतीत भूसंपादनाच्या कायदेशिर तरतुदीचा अवलंब करून ६ महिन्याच्या आत निवाडा जाहिर करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

 या संदर्भातील हकिकत अशी की, कळंबूसरे मोठीजूई बायपास रोड (रोड क्र. ६) या रस्त्यासाठी प्रभुश्वर म्हात्रे व त्यांचे भाऊ रमेश म्हात्रे, प्रमेश म्हात्रे, प्रतिक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे यांची जमिन सार्वजनीक बांधकाम खात्याने त्यांची परवानगी न घेता तसेच जमिन भूसंपादनाबाबत प्रभुश्वर म्हात्रे, रमेश म्हात्रे, प्रमेश म्हात्रे, प्रतिक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे यांना कसलीही नोटीस न देता जमिनीवर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून सन २००६ मध्ये रस्त्याचे काम सुरू केले. याबाबत  प्रभुश्वर म्हात्रे व त्यांच्या भावांनी  हरकत घेतल्यावर सरकारी कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करू असा दम सुद्धा त्यांना दिला आणि जमिनीवर भराव टाकून रस्त्याचे काम सुरू केले. हे काम सदर शेतकऱ्याच्या शेतामधून करताना कसलीही खबरदारी न घेता पाणी जाण्यायेण्या साठी मार्ग न ठेवता रस्ता बांधला त्यातुन पाणी तूंबून सदर शेतकऱ्याची इतर जमिन सुद्धा नापिकी झाली. या सर्व प्रकारामुळे सदर शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे एकमेव साधन नष्ट झाले.सन २००६-२००७ पासून चा जमिनीचे मालक प्रभूश्वर म्हात्रे व त्यांच्या भावांनी सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल खाते जिल्हाधिकारी यांसकडे अनेक वर्षे अर्ज विनंत्या करून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे सन २०२३ मध्ये प्रभूश्वर म्हात्रे, रमेश म्हात्रे, प्रमेश म्हात्रे, प्रतिक म्हात्रे, ऋतिक म्हात्रे यांनी  उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले. त्यामुळे शेतकऱ्यांची जमिन बेकायदेशीर हडप करून त्यावर रस्ता बाधंणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन नष्ट करणे याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे शेतकऱ्यांना सुधारित भूसंपादन कायदा २०१३ च्या तरतूदीप्रमाणे आजच्या बाजार भावाप्रमाणे जमिन संपादनाच्या मोबदल्याची रक्कम सन २००६-२००७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचा तसेच २००६-२००७ पासून जमिनीच्या वापरा बाबतचे भाडे मिळवण्याचा रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या सरकारी यंत्रणेवर वचक निर्माण होणार आहे. त्याच प्रमाणे सदर जमिनीच्या भुसंपादनाचा निवाडा जाहिर करताना सन २०१३ च्या भुसंपादन कायद्याच्या कलम २८ मधिल तरतुदीचे पालन करण्यात यावे,


सदर जमिनीवर रस्ता बांधल्यामुळे वरील शेतकऱ्यांच्या मालकिच्या इतर जमिनीमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे त्याबाबतची वेगळी नुकसान भरपाई तसेच २००६-२००७ पासून आजपर्यंत जमिन वापराबद्दल जमिनीचे भाडे व इतर सर्वप्रकारची नुकसान भरपाई देण्याबाबतचा निवाडा देण्याचे आदेश  उच्च न्यायालयाने दिले असुन सन २०१३ चा भूसंपादन कायदा व सदर कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालाप्रमाणे सदर भुसंपादना बाबत निवाडा देण्यात यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे भुसंपादनाच्या कायदेशिर तरतुदिचा अवलंब न करता बेकायदेशिरित्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या सरकारी यंत्रणेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.तब्ब्ल २० वर्षानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.



कोट (चौकट ):- 
आमची कोणतेही चूक नसताना जमीन आमच्या मालकी हक्काची असून सुद्धा आम्हाला शासनाने विश्वासात न घेता कोणतेही नुकसान भरपाई न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिनीवर भराव करून रस्ता बनविला.याबाबतीत आम्हाला कोणतेही नोटीस दिले नाही. आम्हाला कळविले नाही. आम्हाला कोणतेही नुकसान भरपाई मिळाले नसल्याने मी व माझे भाऊ हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायालयाने शेवटी आम्हाला न्याय दिला आहे.सन २०१३ च्या भुसंपादन कायद्यानुसार व्याजासकट सर्व मोबदला आजच्या बाजार भावानुसार २००६ पासूनचे (२०  वर्षाचे ) आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे. सदर जमिनीवर रस्ता बांधल्यामुळे वरील शेतकऱ्यांच्या मालकिच्या इतर जमिनीमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे त्याबाबतची वेगळी नुकसान भरपाई तसेच २००६-२००७ पासून आजपर्यंत जमिन वापराबद्दल जमिनीचे भाडे व इतर सर्वप्रकारची नुकसान भरपाई व्याजा सकट देण्याबाबतचा निवाडा देण्याचे आदेश  उच्च न्यायालयाने दिले असुन सन २०१३ चा भूसंपादन कायदा व सदर कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालाप्रमाणे सदर भुसंपादना बाबत निवाडा देण्यात यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
   - प्रभुश्वर म्हात्रे, शेतकरी, कळंबूसरे, उरण

====================================================

 उच्च न्यायालय यांनी दिलेले आदेश:- 

१. सार्वजनिक बांधकाम विभागाने  प्रभुश्वर म्हात्रे ह्यांच्या जमिनीच्या निवाड्याची प्रक्रिया २०१३ च्या कायद्या अंतर्गत निकालाच्या दिवसापासून ६ महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे.

२. ⁠निवाडा जाहिर करताना २०१३ चा कायदा अंतर्गत सर्व तरतूदी चा उबलंबन करुन कलम २८ अनुसार याचिकाकर्ते चा जमिन व शेती मध्ये झालेले सदर रस्त्याच्या बांधकामा मुळे झालेले नुकसान व शेती चा नुकसान ची नुकसान भरपाई देण्यात यावी.

३. ⁠२००६ साला पासून याचिकाकर्तेचा जमिनीचा ताबा घेऊन रस्ता बांधल्या मुळे त्या दिवसापासून निवाडा जाहिर करिपर्यंत जमिनी चे भाडे देण्यात यावे.

यु. ई. एस. स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व संस्थेतर्फे‌१० वीच्या विदयार्थ्यांना शुभेच्छा !!

यु. ई. एस. स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व संस्थेतर्फे‌१० वीच्या विदयार्थ्यांना शुभेच्छा !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : अभ्यासाच्या, परीक्षेच्या ओझ्याने दबलेल्या विदयार्थ्यांच्या मनावरील भार कमी करण्यासाठी व परिक्षेची भिती दूर करुन मनात आत्मविश्वासाचं सुगंध भरुन, हसतमुख चेहऱ्याने मुक्तपणे परिक्षेला सामोरे जाण्याच्या हेतुने यु. ई. एस. संस्थेचे उपाध्यक्ष  मिलिंद पाडगांवकर, खजिनदार ॲड. अपूर्वा ठाकूर, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, समन्वयक, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका व शिक्षकांच्या हस्ते प्रत्येक विदयार्थ्याला गुलाबाचं फूल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यु. ई. एस. स्कूल व संस्थेतर्फे १० वीच्या परिक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विदयार्थ्यांला देण्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलामुळे, विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण कमी होऊन टवटवीतपणा दिसत होता. ज्यामुळे सर्व शिक्षक, विदयार्थी व पालकांचे चेहरे प्रफुल्लीत झाले होते व सर्वत्र सकारात्मक उर्जेचा प्रवाह सळसळत होता. 

यंदा यु. ई. एस. स्कूल ॲण्ड कॉलेजमध्ये दिनांक २० फेब्रुवारी २०२६  रोजी झालेल्या परिक्षेसाठी एकूण ०६ ब्लॉकमध्ये मराठी मिडीयम शाळेतील १०० तर उर्दू मिडीयम शाळेतील ३० असे एकूण १३० विदयार्थी परिक्षा देण्यासाठी आले होते. 

दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण १५ ब्लॉकमध्ये उरण मधील यु. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, जी. ई. आय इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, सेंटमेरी हायस्कूल उरण, द्रोणागिरी  इंग्लिश व मराठी मिडीयम हायस्कूल करंजा, सिटीझन हायस्कूल उरण, सेंटमेरी स्कूल जेएनपी, न्यु. इंग्लिश स्कूल मोरा, इक्रा इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, असे इंग्लिश मिडीयम शाळेतील ३२३ तर उर्दू मिडीयम शाळेतील ३० असे एकूण ३५३ विदयार्थी परिक्षा देत आहेत.

वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे कामालाही थांबवू नका – महेंद्रशेठ घरत

वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे कामालाही थांबवू नका – महेंद्रशेठ घरत.

** कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अनुपस्थितीत संघटनेचा पगारवाढीचा करार.


उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेकडून सातत्याने विविध कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार केले जात असतात. तळोजा एम आय डी सी मधील मे. हुहातामाकी इं. प्रा. ली या कंपनीतील कामगारांचा पगारवाढीचा करार मागील २२ महिन्यांपासून प्रलंबित होता. व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात समेट होवून करार करण्याचे ठरले. परंतु न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत पूर्वनियोजित अंटार्टिका दौऱ्यासाठी गेले असल्यामुळे करारास वेळ लागू शकत होता त्यामुळे कामगरांना फेब्रुवारी महिन्याचा पगार वाढवून मिळण्यास   अडचण येत होती. हि बाब कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना दुरध्वनी वरून कळविली असता त्यांनी थांबू नका, वेळ कोणालाही थांबत नाही कामही थांबवू नका असे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मे. हुहातामाकी इं. प्रा. ली तळोजा या कंपनीतील कामगारांसाठी ८३००/- रुपये पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्या मुळे प्रत्येक कामगाराला सव्वा लाख रुपये थकबाकी मिळणार आहे.

या करारनाम्या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस श्री वैभव पाटील तर व्यवस्थापनातर्फे सिनियर क्लस्टर एच आर मॅनेजर श्री. विक्रम शिंदे, सिनियर प्लॅन्ट मॅनेजर सचिन चव्हाण, एच आर मॅनेजर सपना घोरपडे तसेच कामगार प्रतिनिधी बाळाराम दारावकर, विजय अल्हट, तुकाराम निघुकर, निवृत्ती निघुकर उपस्थित होते. दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या निर्णयामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले व त्यांचे आभार मानले.

अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी उरण कोप्रोली येथील तरुणावर गुन्हा दाखल !!

अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी उरण कोप्रोली येथील तरुणावर गुन्हा दाखल !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यात कोप्रोली येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.उरण तालुक्यात कोप्रोली येथे राहणाऱ्या शिवम जाधव (२१) असे या तरुणाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

आरोपी शिवम हा उरणच्या कोप्रोली भागात राहण्यास आहे. तर, २१ वर्षीय पीडित तरुणी पनवेल येथे राहण्यास आहे. दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे या दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर शिवम याने पीडित तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी शिवमने पीडित तरुणीच्या नकळत स्वतःच्या मोबाइलमध्ये या खासगी क्षणांचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. दरम्यानच्या काळात काही कारणामुळे वर्षभरापूर्वी या दोघांमधील प्रेमसंबंध तुटले. त्यानंतर पीडित तरुणीने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. ही बाब शिवम याला समजल्यानंतर त्याने पीडितेची बदनामी करण्याच्या हेतूने दोघांमधील शरीरसंबंधाचे खासगी व्हिडिओ १६ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच, पीडित तरुणीच्या परिचयातील तरुणाला व्हॉट्सऍप वर पाठवून दिले. त्यानंतर शिवम याने खासगी व्हिडिओ व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.सदर व्हिडीओ उरण तालुक्यात सर्वत्र मोठया प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली !!

रमजाननिमित्त फळांना मागणी वाढली !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
सद्या सुरू असलेल्या रमजाननिमित्त उरण बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. रमजान महिन्यात मुस्लिम धर्मीय (रोजा) उपवास पकडतात आणि सायंकाळी फळांचे सेवन करून इफ्तारी करतात. त्यामुळे या दिवसात फळांची मागणी वाढत असते. यंदा गुरुवारपासून रमजान मासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरण शहरातील बाजारपेठेत फळांची मागणी वाढल्याने आवक देखील वाढली आहे.

रमजान महिन्यात उपवास करताना मुस्लिम धर्मिय दिवसभर पाण्याचा एकही थेंब न पिता उपवास करतात आणि सायंकाळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. उपवास सोडताना यात रसाळ फळे अधिक असतात. त्यामुळे या दिवसात कलिंगड, आंबा, पपई, खरबूज, अननस, चिकू, द्राक्षे, संत्र अशा रसाळ फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे रमजान सणानिमित्त उरण बाजारपेठेत उलाढालही वाढते. उरण बाजारपेठेतील सध्या रसाळ फळांचे दर कलिंगड ४० रु. प्रतिकिलो, चिकू १२० रु. किलो, द्राक्षे १२० रु. किलो, अननस १४० रु. किलो, पपई ७० रु. किलो,' खरबूज ५० रु. किलो, संत्र १४० रु. किलो, आंबा ३०० रु. किलो याप्रमाणे असून रमजाननिमित्त या फळांना नागरिकांकडून मोठी मागणी आहे.उरण मध्ये मुस्लिम धर्मीय बांधव मोठया प्रमाणात उपवास पकडतात त्यामुळे रमजान मध्ये फळाना मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे.

उरण बाझारात कलिंगडची विक्री तेजीत‌ - ग्राहकांकडून कलिंगड खरेदीला पसंती

उरण बाझारात कलिंगडची विक्री तेजीत‌ - ग्राहकांकडून कलिंगड खरेदीला पसंती

** उन्हाचा पारा वाढल्याने कलिंगडाला अच्छे दिन.

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : सध्या सर्वत्र कडक उन्हाळा आहे.उन्हाचा पारा दिवसेन दिवस वाढत असल्याने शीत पेयांबरोबरच थंड असलेल्या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून उरण बाझारपेठेत कलिंगडची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे .

अलिकडच्या काळात विविध संकरीत जातींचे वाण विकसित झाल्यामुळे पावसाळयात लावलेले विविध जातीचे कलिंगड आँक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यत उरण मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येते. मात्र हा मोसम हिवाळयात असल्यामुळे कलिंगडाची फारशी विक्री होतेच असे नाही, परंतू महाशिवरात्रीनंतर खऱ्या अर्थाने न उन्हाळा जाणवायला लागतो. आणि त्याचदरम्यान कलिंगडे बाजारात येतात. यावेळी उन्हाच्या वेदना उशीरा जाणवू लागल्या आहेत. होळी नंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते. गेल्या आठवड्यापासून उरण मधील विविध स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास येऊ लागली. काळे आणि पट्टे असलेले कलिंगड विक्रीकरीता उरण मध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे.८० रू पासून दोनशे रूपयांपर्यंत नग विकले जात असल्याचे उरण मधील विक्रेत्यांनी सांगितले. दिवसभरात २०० ते ३०० नगाची विक्री होत असून सट्टीच्या दिवशी हा आकडा ४०० पर्यंत जातो अशी माहितीही त्यांनी दिली. एप्रिल आणि मे महिन्यात पारा आनखी चढणार आहे.त्यामुळे कलिंगड फळाळा ग्राहकांची पसंती वाढली असून कलिंगडला सध्या अच्छे दिन आले आहेत

सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांकडे जि. प. चे दुर्लक्ष - शिक्षक नेते दा. चां. कडू यांची खंत

सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांकडे जि. प. चे दुर्लक्ष - शिक्षक नेते दा. चां. कडू यांची खंत


उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
 रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार ढिम्म व वेळकाढू झाला असून या अनागोदी कारभारामुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे विविध अनिर्णित प्रश्न चार दशकाच्या कालावधीत दुर्लक्षित राहिल्याची खंत निवृत्त शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते दा. चां. कडू यांनी व्यक्त केली.

उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न ४० वर्षांत सुटू शकले नाहीत. निवृत्त शिक्षकांना न्याय देण्याऐवजी त्यांचे प्रलंबित प्रश्न कसे सुटणार नाहीत, याचीच व्युहरचना रायगड जिल्हा परिषदेच्या आणि उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग करीत असल्याने हा जिल्ह्यातील वयोवृद्ध निवृत्त शिक्षकांचा घोर अपमान असल्याचे शिक्षक नेते दा. चां. कडू यांनी स्पष्ट केले आहे.

सेवानिवृत्त शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे, ३१ मार्च १९९५ रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या पेन्शनची परिगणना करताना मूळ वेतनात २० टक्के ऐवजी ९७ टक्के महागाई भत्ता अधिक करून पेन्शन निश्चित करणे, निवृत्त शिक्षकांची गहाळ झालेली सेवापुस्तके उपलब्ध करणे, दिनांक १/१/१९९६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पदोन्नती मुख्याध्यापकांना ३२५० रुपये सुधारीत पेन्शन मंजूर करणे, निवडश्रेणी मंजूर केलेल्या शिक्षकांना सुधारीत पेन्शन मंजूर करणे, अनुभवी ट्रेण्ड शिक्षकांना प्रशिक्षित समजून त्यांना वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतन मंजूर करणे, बढतीच्या पदाला मानीव वेतन वाढ मंजूर करणे, १९३२ पात्र निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करणे आदी निवृत्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न असून, ते अनिर्णित ठेवून वयोवृद्ध निवृत्त शिक्षकांना आर्थिक लाभापासून उपेक्षित ठेवण्याचे धोरण जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांचे शिक्षण विभाग राबवित असल्याने शिक्षक नेते दा. चां. कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खोपटे, तालुका उरण येथे झालेल्या निवृत्त शिक्षक संघाच्या सभेच्या निमित्ताने दा.चां. कडू यांनी आपल्या जळजळीत भावना व्यक्त करून संघटनेनी आंदोलन केल्याशिवाय शिक्षण विभागाला जाग येणार नाही, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष अंकुश पाटील, उपाध्यक्ष नामदेव म्हात्रे, सरचिटणीस महादेव ठाकूर, खजिनदार बाळाराम तांडेल, जिल्हा संघाचे सदस्य सदानंद कोळी, नारायण पाटील, गो.सि.पाटील, वर्षा म्हात्रे, राजेश्री भगत इत्यादी उपस्थित होते

भुसंपादनाच्या कायदेशिर तरतुदिचा अवलंब न करता बेकायदेशिरित्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या सरकारी यंत्रणेला उच्च न्यायालयाचा दणका !!

भुसंपादनाच्या कायदेशिर तरतुदिचा अवलंब न करता बेकायदेशिरित्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या सरकारी यंत्रणेला उच्च न्यायालयाचा दणका !! **...