उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव !
** भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिव्य संगम
जळगाव, प्रतिनिधी, राहुल बैसाणे :
अमळनेर तालुक्यातील उदयनगर (डांगर बु.) येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह यंदा रौप्य महोत्सवाच्या मंगलमय पर्वात प्रवेश करत आहे. दि. ९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी नटलेला हा सप्ताह संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा अद्वितीय संगम घडवणार आहे.
या पवित्र सप्ताहाचे प्रेरणास्थान स्वर्गीय उदयबापू असून त्यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित केला जातो. गेल्या पंचवीस वर्षांत या कार्यक्रमाने गावाच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा दिली असून उदयनगर हे परिसरातील एक महत्त्वाचे अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे.
भव्य उद्घाटन सोहळा व मान्यवरांची उपस्थिती...
रौप्य महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पार पडणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी खासदार सौ. स्मिताताई उदयजी वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन,
श्री. दुशन्त वाघ यांच्या हस्ते कलशपूजन,
तर सरपंच श्री. प्रकाश रंगराव वाघ यांच्या हस्ते विना पूजन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यापासूनच संपूर्ण सप्ताहात भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे.
दैनंदिन धार्मिक कार्यक्रम – भक्तीचा अखंड प्रवाह
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण गावात सतत नामस्मरणाचा गजर ऐकू येणार आहे.
काकडा आरती: पहाटे ५.०० ते ६.००
भागवत कथा: सकाळी ८.०० ते ११.००
हरिपाठ: सायंकाळी ५.०० ते ६.००
हरिकीर्तन: रात्री ९.०० ते ११.००
या माध्यमातून गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच भाविक अध्यात्मिक अनुभूती घेत आहेत.
नामवंत कीर्तनकारांची पर्वणी
या रौप्य महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यातील नामवंत व अनुभवी कीर्तनकारांची कीर्तन सेवा. या कीर्तनांमुळे भक्तीबरोबरच प्रबोधन, समाजजागृती आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळणार आहे.
दि. ९/२/२०२६: ह.भ.प. चेतन महाराज, मालेगाव
दि. १०/२/२०२६: ह.भ.प. भगवान महाराज
(मानकरी – प्रकाश वसंतराव पाटील)
दि. ११/२/२०२६: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज
(मानकरी – प्रकाश महादू पाटील)
दि. १२/२/२०२६: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज
(मानकरी – रोहिदास तुकाराम पाटील)
दि. १३/२/२०२६: ह.भ.प. रविकिरण महाराज
(मानकरी – आई तुळजाभवानी मित्रमंडळ, बाप्पा गल्ली)
दि. १४/२/२०२६: ह.भ.प. गजानन महाराज
(मानकरी – सुभाष नामू पाटील)
दि. १५/२/२०२६: ह.भ.प. विश्वनाथ महाराज
(मानकरी – परशुराम आत्मराम पाटील)
दि. १६/२/२०२६: काल्याचे कीर्तन – ह.भ.प. आदिनाथ महाराज
(मानकरी – किशोर भिकनराव वाघ)
पालखी सोहळा – भक्तीचा जनसागर
रौप्य महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे दि. १५ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत आयोजित भव्य पालखी सोहळा. या सोहळ्यात गावातील व परिसरातील हजारो भाविक सहभागी होणार असून टाळ-मृदंगांच्या गजरात, हरिनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तीमय होणार आहे.
महाप्रसाद व भंडारा – सेवा आणि समतेचे दर्शन
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी भोजन खुले राहणार आहे. या उपक्रमातून सेवा, समता, बंधुता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाणार आहे.
ग्रामस्थांचे अतुलनीय योगदान
या रौप्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण वर्ग, महिला मंडळ तसेच असंख्य स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत. नियोजन, सजावट, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, निवास व्यवस्था, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, आरोग्य सेवा आदी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संपूर्ण गाव एकजुटीने हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत असून त्यामुळे सामूहिक सहभाग, सामाजिक बांधिलकी व संघटनेचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.
त्याचप्रमाणे भागवत कथा मानकरी हनुमंत महारु कापडणे त्याचप्रमाणे दहीहंडी काल्याचे कीर्तन मानकरी गोकुळ महारु पाटील त्याचप्रमाणे महाप्रसाद मानकरी सुभाष अभिमन पाटील त्याचप्रमाणे साउंड सिस्टम मानकरी दीपक बारकू सोनवणे त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती पहाटे 5ते 6 त्याचप्रमाणे भागवत कथा सकाळी 8 ते 11 हरिपाठ सायंकाळी 5ते 6 त्याचप्रमाणे हरिकीर्तन रात्रीं 9ते 11 त्याचप्रमाणे भागवत कथाकार ह.भ. प चेतन महाराज मालेगाव गावातील जेष्ठ मार्गदर्शक व तरुण वर्ग व गावातील समस्त गावकरी मंडळी त्याचप्रमाणे धुडकू अभिमन पाटील, शांताराम सिताराम, प्रकाश दगडू पाटील, संजय दगडू पाटील, रविंद्र माधवराव पाटील, वासुदेव रामभाऊ पाटील विजय तोताराम खैरनार, देविदास खैरनार, राजेंद्र भबुता वाघ, सुक्राम सोनवणे तलाठी, आप्पा बन्सीलाल बुधा, सोनवणे महेश, श्रीराम किशोर सोनवणे, परशुराम आनंदा व चुडामन हरी पाटील, भटू कौतिक किरण महाराज, सतिश भाईदास, श्याम वाघ, राजेंद्र खैरनार जितेंद्र पाटील एकनाथ बाबूलाल पाटील, अशोक धुडकू भिल, उदय कापडणे, नरेंद्र कापडणे, गणेश बुधा पाटील, गोरख महादू, राकेश दामू वसंत सुतार, हिरामण परभत पाटील, बापू लॅक्समन पाटील, प्रकाश वंजारी रोहिदास वंजारी, धनराज वंजारी, प्रवीण माधवराव पाटील, नरेंद्र शांताराम पाटील, कैलास पोपट पाटील, पुंजू दयाराम पाटील, धर्म राज भिका वाघ, अशोक गोपीचंद मोरे, संभाजी बैसाने, संतोष बैसाने, मधुकर दशरथ भिल, दगडू खैरनार, मांचीनद्र भिल, सुपडू दगडू भिल, चंद्रकांत कापडणे, तुषार कापडणे लोटन निबा, आनंदा गोरख कापडणे, भालेराव चैत्राम, राजेंद्र चिंधा, भटू सोनार, बन्सीलाल बोरसे कैलास खैरनार, अनिल गंगाराम पाटील, विलास नेरकर, बापू राजाराम बाविस्कर, विनायक सोनवणे, सुदाम शिवा सोनवणे, संपत बोरसे, सुधाकर बोरसे, रघुनाथ ना मु पाटील, शांताराम सोनवणे, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिवाजी पाटील, गुलाब दिगंबर, विनायक नामदेव, सुभाष वाणी, राजेंद्र वाणी, बाबाजी वाणी, भटू शिवाजी, रामदास बापू, योगेश कापडणे, गोकुळ येवले अश्या प्रकारे असंख्य कार्यकर्ते ह्या रौप्य मोहस्तव कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी चिकाटीने मेहनत घेत आहे सर्व गावकरी मंडळ व महिला मंडळ रौप्य अखंड हरिनाम कीर्तन सेवा आनंदाचे वातावरण पसरले आहे
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या पवित्र रौप्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.