Sunday, 3 May 2026

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
१ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस कडून राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर तथा इंटकचे राष्ट्रीय सविक राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा कडाडून विरोध केला व आम्ही सर्व नेते कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहू असे कामगारांना आश्वाशित केले.

या परिषदेसाठी आय टी एफ लंडनचे जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, एसीया पॅसिफिक रिजनल सेक्रेटरी अब्दुल गनी सारंग, नेपाल कॉंग्रेस अध्यक्ष गगन थापा, कॉंग्रेस जेष्ठ नेते शेखरजी कोईराला, नेपाळ ट्रेड युनियनचे अध्यक्ष योगेंद्र कुमार, नेपाळ ट्रेड युनियन तथा आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर अजयकुमार राय आदी उपस्थित होते, या परीषदेनंतर महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेलजी यांची भेट घेतली. नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस तर्फे परीषदेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते

प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!


प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि ३(, विठ्ठल ममताबादे) :
 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस तसा कौतुकाचा आणि आनंदाचा होता सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत असताना अकोला जिल्ह्यातील अनकवाडी या छोट्याशा गावातील कुमारी प्रियांशी आशाराम जामनेरकर या विद्यार्थिनीने मुंबईत विभागातील उरण या तालुक्यात आपली बाजी मारली आहे. उरण येथील सिटीजन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ८७.५०% गुण घेत घवघवीत यश प्राप्त करून सायन्स शाखेतून उरण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपेक्षित गुणवंत विद्यार्थिनीचे नाव कुमारी प्रियांशी आसाराम जामनेरकर असून सिटीजन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज उरण येथे शिक्षण घेऊन शिक्षक सादिक सर, शैलेंद्र प्रजापती, नरेंद्र पाटील ,प्रमोद पाटील , व साजिया मामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विवेकानंद येथील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दत्तात्रय शेळके , मयूर पाटील,आदित्य सर यांचे मार्गदर्शन घेऊन उत्तम अभ्यास करून तालुक्यातील पहिला क्रमांक पटकावला आहे. 

प्रियांशी चे वडील शेतकरी असून उरण येथे एसटी बस चालक आहेत व आईचे वडापावचे दुकान आहे.तिने दहावीपर्यंत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतले. स्नितिल पडते  यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरा क्रमांक दहावीत पटकावला होता. पुढे प्रियांशीला इंजीनियरिंग करायची आहे असे तिथे ठरविले आहे. कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्स या ब्रांच मध्ये  पुढचे करिअर तिला करायचे आहे. सायन्स शाखेतून प्रियांशी आशाराम जामनेरकर ही उरण तालुक्यातून प्रथम आल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

मुंबई : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने “कुर्मी जोडो अभियान” (6 जून 2026 ते 15 ऑगस्ट 2027) राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय इतिहासातील दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या स्मरणार्थ हे अभियान आयोजित करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून 1674) आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी उपपंतप्रधान पदाची घेतलेली शपथ (15 ऑगस्ट 1947) या दोन ऐतिहासिक घटनांमधून समाज एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश मिळतो. याच प्रेरणेने हे अभियान सुरू करण्यात येत आहे.

अभियानाचा शुभारंभ 6 जून 2026 रोजी रायगड किल्ल्यावर होणार असून सांगता समारंभ 15 ऑगस्ट 2027 रोजी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणार आहे. सुमारे 14 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट कुर्मी समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, समाजात एकता व बंधुभाव वाढवणे, विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या समाजघटकांमध्ये एकात्मतेची जाणीव निर्माण करणे तसेच समाजातील महापुरुषांचे विचार पुढे नेणे आणि युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे आहे.

“कुर्मी” या प्रातिनिधिक संज्ञेत मराठा, रोड मराठा,कुणबी,कुडुंबर, कलबी, कुडुमी, वेलमा,  गुर्जर, पटेल, पाटीदार, रेड्डी,  कापा. कम्मा, कुलमी, नायक,नायडू,कापूनाडू, खंडायत, ओक्का लिंगा,देवेंद्र कुल वेल्लालार,कंबोज, अंजना समाज आदी विविध समाजघटकांचा समावेश मानला जातो. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा समाज मुळात एकच असल्याची जाणीव दृढ करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

अभियानांतर्गत समाज एकता रॅली, मेळावे, गाव व पार बैठका, युवक व महिला सक्षमीकरण कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, नाटिका व पथनाट्य, सामाजिक संवाद उपक्रम तसेच डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.

हे अभियान केवळ एक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याचा, त्याची ओळख मजबूत करण्याचा आणि भविष्याची दिशा ठरवण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश महासचिव जयेश शेलार पाटील आणि प्रदेश कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.आहे

सौजन्य/वृत्त - मा. संजय पाटील 
अध्यक्ष - महाराष्ट्र कृर्मी समाज 
+91 77450 48505

६८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; मंगला ठोके यांची प्रेरणादायी यशोगाथा !!

६८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; मंगला ठोके यांची प्रेरणादायी यशोगाथा !!

मुंबई, प्रतिनिधी : ता. ३,
“शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते,” हा संदेश आपल्या कृतीतून देत श्रीम .मंगला पोपट ठोके यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इ 12वी परीक्षा फेब्रुवारी २०२६ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

बहुतेक वेळा एका विशिष्ट वयानंतर शिक्षण घेणे कठीण मानले जाते. मात्र शिक्षणाची प्रबळ आवड, काहीतरी नवीन साध्य करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मंगला ताईंनी पुन्हा पुस्तक हातात घेतले. त्यांनी शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी येथे प्रवेश घेऊन शिक्षणाचा प्रवास नव्याने सुरू केला.

घरकाम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वयानुसार येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले आणि परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यशाचे शिखर गाठले.

या यशामागे त्यांच्या पाच मुलींचा मोलाचा वाटा आहे. मुलींनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले, शिक्षकांनी अभ्यासात मार्गदर्शन केले आणि आत्मविश्वास वाढवला. कुटुंबीय व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मंगला ताईंना आपले स्वप्न पूर्ण करता आले.

मंगला ठोके यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्यांच्या यशामुळे रात्रशाळांची गरज अधोरेखित झाले आहे. शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सारख्या संस्थांमुळे शिक्षणात खंड पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळत आहे.

“नोकरी, संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व अधोरेखित होते,” अशी भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.

मंगला ठोके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विक्रोळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्मा. श्री बी. डी. काळे, मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“आता थांबायचं नाय,” असा जिद्दीचा संदेश देणाऱ्या मंगला ठोके आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

 ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध कामगिरीचे मान्यवरांकडून विशेष कौतुक

ठाणे प्रतिनिधी: ता. ३, महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे २०२६ रोजी साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला परेड संचलनाचा भव्य आणि दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.           

     या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणेचे पालकमंञी मा.श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी सरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यक्षेञरक्षक आमदार श्री.संजय केळकर, ठाणे महापौर सौ. शर्मिला पिंपळकर, उपमहापौर अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

     या सोहळ्यात पोलीस दल, वाहतूक नियंत्रण विभाग, अग्निशमन दल, केडीएमसी मालमत्ता विभाग, होमगार्ड, नागरी संरक्षण दल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त सहभाग घेत उत्कृष्ट संचलन सादर केले.

     नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका तालात संचलन करून महाराष्ट्राच्या एकतेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडविले. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाला हीच खरी मानवंदना ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

     नागरी संरक्षण दलाच्या परेडचे नेतृत्व महिलांकडे सोपविण्यात आले होते. परेड कमांडर म्हणून सौ.भारती सतीश देशमुख, उपविभागीय क्षेञरक्षक, वागळे ईस्टेट, ठाणे यांनी अत्यंत रुबाबदार नेतृत्व केले, तर सुपरनंबरी म्हणून सौ.रोहिणी आदेश गोलतकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पथकाने उत्कृष्ट संचलन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

     सदर परेडसाठी गेले पंधरा दिवस स्वयंसेवकांनी कडक उन्हाची पर्वा न करता अत्यंत मेहनत, शिस्त आणि समर्पणाने सराव पूर्ण केला होता. या अथक परिश्रमांची दखल घेत नागरी संरक्षण दलाचे मा.उपनियंत्रक श्री.विजय जाधव, सहाय्यक उपनियंत्रक सौ.दीपा घरत मॅडम, उप मुख्य क्षेत्ररक्षक, ठाणे विभाग १, २, ३ व ४ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी स्वयंसेवकांना सत्काररूपी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

     यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त प्रमाणपत्रांवर त्यांचे प्रेरणादायी छायाचित्र व विचार समाविष्ट करून प्रमाणपत्रांना विशेष स्वरूप देण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवानी यांचे विशेष योगदान लाभले. स्वयंसेवकांसाठी आवश्यक जॅकेट्स व कॅप्स उपलब्ध करून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे तसेच संपूर्ण पथकाचा उत्साह कायम ठेवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. याशिवाय श्री.संजय मगर श्री.हनुमान चौधरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक सुब्रमन्यम मुरुगन तसेच अरुण सातपुते यांनीही सातत्याने सहकार्य व प्रेरणा दिली.

   ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ सर यांनी नागरी संरक्षण दलाच्या शिस्तबद्ध संचलनाचे विशेष कौतुक करत स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच मुख्य क्षेत्ररक्षक श्री.संजयजी केळकर यांनीही स्वयंसेवकांच्या समर्पित कार्याचे अभिनंदन केले.

     याच अनुषंगाने नागरी संरक्षण अंबरनाथ कार्यालय येथेही मा. उपनियंत्रक, नागरी संयक्षण श्री.विजय जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कार्यालयीन कर्मचारी, विभागीय क्षेत्ररक्षक, उपविभागीय क्षेत्ररक्षक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     “आजचा हा गौरवशाली सोहळा म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाचे मोत्यात रूपांतर झाल्याचा क्षण आहे. संघटनेशी एकनिष्ठ राहून भविष्यातही अशाच उत्साहाने कार्यरत राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.” अशी भावना व्यक्त करत आगामी २६ जानेवारीच्या परेडसाठी नव्या जोशाने तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या शेवटी “जय हिंद! जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी संपूर्ण साकेत मैदान देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेले. 🇮🇳🚩

https://www.youtube.com/live/tAls--eTT5I?si=9D9FeFA88iK8sWhF


वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)

Saturday, 2 May 2026

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे :

मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा पटांगणात आयोजित हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. हिंदू समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा  वाढवली.

या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून यशोदाताई पाटील आणि हर्षदाताई केणे यांनी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीवर सखोल भाष्य केले. आपल्या हिंदू परंपरेचा आणि महापुरुषांचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर  मांडला त्यांनी विशेषतः मुलींना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. "लव्ह जिहाद" आणि "लँड जिहाद" सारख्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुलींनी सावध राहावे, कोणत्याही आंधळ्या प्रेमाला बळी पडू नये, तसेच पालकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन केले. 

वक्त्यांनी हिंदू धर्माची महानता पटवून देताना इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांची उत्तम छान मांडणी करत उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांनी हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुलजी मिश्रा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदू समाजातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकमेकांना मदत करून सुखदुःखात एकत्र राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील ऐक्य आणि परस्पर सहकार्य यामुळेच समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन देवसर यांनी उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व  भावनिक वातावरणात संपन्न !!

जुचंद्र (प्रतिनिधी) –ता. २, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एम. पी. ज्युनिअर कॉलेज, जुचंद्र येथील वरिष्ठ लिपिक मा. श्री. सुरेश तुकाराम राऊत सर (एम.ए. स्टेनो) यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ दि. ३० एप्रिल २०२६ रोजी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

सुमारे ३४ वर्षे ६ दिवस प्रदीर्घ, प्रामाणिक, समर्पित आणि आदर्श सेवेनंतर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्या श्री.सुरेश राऊत यांनी आपल्या जिद्द, कर्तृत्व आणि सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिव्यांग असूनही त्यांनी यांच्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत अनेक पदके, पुरस्कार व सन्मान प्राप्त केले असून विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आज त्यांचे नॅशनल  ट्रष्टच्या माध्यमातून दिव्यांग अर्थात मतिमंद मुलांसाठीचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. 

तसेच ते २० वर्षापासुन दिव्यांग कर्मचारी किंवा ईतर दिव्यांग व्यक्तिच्या समस्या, कोणत्याही अडचणी असोत त्या सोडविण्याचे प्रेरणादायी कार्य ते  करत आहेत. आज पर्यन्त ते जिल्हा व राज्यस्तरीय दिव्यांग व्यक्तिचे नेतृत्व करीत आहेत. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती, जुचंद्रचे अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम पाटील साहेब हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोज रानडे साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. पालघर मा. श्री. अशोक पाटील साहेब, अध्यक्ष, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर चे  श्री बाळाशेठ पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. विनयजी पाटील साहेब,  स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब तसेच वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. कन्हैया भोईर साहेब व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.  जनार्दन म्हात्रे, मा.श्री. हरिहर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

सत्कारमूर्ती श्री सुरेश राऊत सर यांचे कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामध्ये त्यांचे मोठे बंधू श्री. शांताराम तुकाराम राऊत, पुतणे श्री. विश्वनाथ राऊत, श्री. प्रकाश राऊत, जावई पंढरीनाथ ठाकरे, संकेत तारमळे, नातवंडे तसेच सायली तारमळे (राऊत), सुरज राऊत, शुभम राऊत यांच्यासह मित्रपरिवार, सासरकडील मेव्हणे, साडू व अन्य आप्तेष्ट उपस्थित होते. 

यावेळी श्री. सुरेश राऊत यांच्या धर्मपत्नी सौ. सुप्रिया सुरेश राऊत यांनी आपल्या मनोगतातून विवाहापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा जीवनप्रवास अत्यंत भावुकतेने उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या संघर्षमय आयुष्याच्या अनेक आठवणी सांगताना सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले. 

.            धर्मपत्नी सौ. सुप्रिया सुरेश राऊत                 

तसेच त्यांची कन्या सायली राऊत उर्फ सायली तारमळे हिने आपल्या मनोगतातून “माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत आणि ते कायम हिरोच राहतील,” अशा भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री भोईर सर व उप शिक्षक श्री म्हात्रे सर यांनी श्री. सुरेश राऊत सर हे जिद्दी व कर्तुत्ववान कसे आहेत हे त्यांच्या मनोगतात सांगितले. 

.       कन्या सायली राऊत उर्फ सायली तारमळे

विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, श्री. नाडेकर सर,  पर्यवेक्षिका सौ.कविता पाटील मॅडम, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. अनेक मान्यवरांनी तसेच आप्तेष्टांनी श्री. सुरेश राऊत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कष्टाळूपणा व सेवाभावी वृत्तीचा विशेष उल्लेख केला. 

यावेळी त्यांचे पुतणे श्री. विश्वनाथ राऊत यांनी स्वतः शब्दबद्ध केलेल्या मानपत्राचे प्रभावी वाचन करून श्री. सुरेश राऊत (नाना) यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा, जीवनप्रवासाचा व सामाजिक कार्याचा भावनिक आढावा घेतला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

समारोपाच्या मनोगतात श्री. सुरेश तुकाराम राऊत यांनी आपल्या जन्मापासूनचा खडतर जीवनप्रवास अत्यंत भावुक शब्दांत उपस्थितांसमोर मांडला. लहानपणी दिव्यांग असल्यामुळे आई-वडिलांना आपल्या भवितव्याची मोठी चिंता वाटत होती. “माझ्या मुलाला नोकरी कशी लागेल, शिक्षण कसे पूर्ण होईल,” अशी काळजी त्यांना सतावत असे, असे सांगताना ते भावुक झाले.

गावापासून दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी पायाने दिव्यांग असूनही दररोज पडत-उठत तीन किलोमीटरचा प्रवास करून रेल्वे स्टेशन गाठत शिक्षण पूर्ण केले आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार केले, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि सभागृहही भावनांनी भारावून गेले.

तसेच त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच सर्वांचे भले कसे होईल, याचाच विचार केला. सुख-दुःखात राऊत कुटुंबासोबत राहून योग्य मार्गदर्शन केले, मित्रपरिवार जपला, चांगली माणसे जोडली आणि ज्या-ज्या ठिकाणी नोकरी केली तेथील लोकांना आपण “हवेहवेसे” वाटलो, अशा भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.  

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सौ.  जान्हवी भोसले मॅडम यांनी उत्कृष्ट केले. शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले व विद्यालयाच्या उप शिक्षिका सौ स्मिता पाटील मॅडम यांच्या पसायदानाने समारंभाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.

सौजन्य / वृत्तांकन - विश्वनाथ राऊत (सर)

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...