Wednesday, 8 July 2026

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ साली स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिवस आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब अध्यक्षस्थानी होते. तसेच संस्थेचे विश्वस्त-सचिव डॉ. वासुदेव गाडे, पद्मश्री उज्वल निकम, ऍड. बि. के. बर्वे, श्री. अरविंद सोनटक्के, डॉ. वेंकटस्वामी, विपश्यनाचार्य भदंत्त राहुल बोधी व कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे यांनी केले.

मागिल ४ वर्षांपासून या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिग्गजांना, महामहीम राज्यपाल व पीईएसचे अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेबांच्या हस्ते *'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार'* देऊन सन्मानित करण्यात येते. ती परंपरा कायम ठेवत आजदेखील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कला- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांचा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -२०२६' देऊन त्यांना राज्यपाल व आठवले साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यामध्ये राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या माजी उपसभापती श्रीमती निलमताई गोऱ्हे, पद्मश्री अशोक (आबा) खाडे साहेब, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ विनय राऊत, सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश खानविलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाडी, कोल्हापूरचे संचालक श्री. नंदकुमार गोंधळी, के. जे. सोमय्या विद्याविहार कॉलेजचे प्राचार्य डॉ. किसन पवार, सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विजय मोहिते, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सचिव श्री. नागसेन कांबळे, तसेच सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे व प्राध्यापक डॉ. विजय मोरे इत्यादीना, प्रमुख पाहुणे महामहीम राज्यपाल व संस्थेचे अध्यक्ष आठवले साहेबांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी त्यांच्या भाषणात, आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली, सर्व विश्र्वस्तांच्या सहकार्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या देशभरातील विविध शाळा,महाविद्यालये व वसतीगृहांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले जात असल्याबद्दल त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. तसेच आठवले साहेबांनीदेखिल त्यांच्या भाषणातून संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा थोडक्यात सादर केला. पीईएसच्या सर्व शाळा महाविद्यालयाचा कार्यभार संस्थेचे सचिव व सर्व विश्र्वस्तांच्या देखरेखीखाली मुख्याध्यापक / प्राचार्य चांगल्या प्रकारे चालवत आहेत त्याबद्दल आठवले साहेबांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पीईएसच्या शाळा व महाविद्यालये सुरू करून बहूजन समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारीत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल असेही आठवले साहेबांनी जाहीर केले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासुदेव गाडे साहेबांनी केल, स्वागतपर भाषण ऍड. उज्वल निकम साहेबांनी केले व ऍड. बि. के. बर्वे साहेबांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानले. महामहीम राज्यपालांचे स्वागत‌ आठवले साहेबांनी शाल‌, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले व‌ आठवले साहेबांचे स्वागत पद्मश्री उज्वल निकम साहेबांनी केले. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व विश्वस्तांचे स्वागत पीईएसच्या कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे यांनी केले.
 
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्री चंद्रशेखर कांबळे सोबत त्यांचे सहकारी  प्रशांत मोरे, धर्मराज ब्राम्हणे व अश्विन वाघ हे प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या सर्व शिक्षक कर्मचारी व काही विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी विनंती /आव्हान करत होते. त्याला सिबीडी बेलापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक, महाड कॉलेजचे प्राचार्य व सिद्धार्थ वाणिज्य व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चांगला प्रतिसाद देऊन त्यांचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती नोंदवली आणि  पीईएसचा ८१वा वर्धापनदिन यशस्वी करण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केले, त्यांच्याप्रती बर्वे साहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली.

वृत्तांकन - अश्विनी निवाते 

४० वर्षे पुनर्वसन रखडवून शेवा गावठाणावर कोट्यवधींचे उद्यान ?

४० वर्षे पुनर्वसन रखडवून शेवा गावठाणावर कोट्यवधींचे उद्यान ? 

**  जेएनपीए व प्रशासनाविरोधात SIT चौकशीची विस्थापितांची संतप्त मागणी.


उरण  दि ७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवा व कोळीवाडा येथील ६२० विस्थापित कुटुंबांनी जेएनपीए आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुनर्वसन न करता मूळ गावठाणावर कोट्यवधी रुपयांची उद्याने व विकासकामे सुरू करून विस्थापितांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. विस्थापितांच्या म्हणण्यानुसार, शेवा बेटावर सुमारे ८०० हेक्टर सुपीक शेती आणि सुमारे २३,५४२ हेक्टर पारंपरिक मासेमारी क्षेत्र होते. या परिसरावर शेकडो कुटुंबांची शेती, मासेमारी, फळबागा, पशुपालन आणि इतर पारंपरिक व्यवसायांवर आधारित उपजीविका होती.

२१ जून १९८४ रोजी शासनाने शेवा व कोळीवाडा गावठाणातील ७.२१ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी अधिसूचना काढली होती. मात्र, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उरण कार्यालयाने २४ जून २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरात ही जमीन आजपर्यंत संपादित झालेली नसल्याची लेखी माहिती दिल्याचा दावा विस्थापितांनी केला आहे.

याउलट, १७ फेब्रुवारी १९९० आणि १७ मार्च १९९० रोजी काढण्यात आलेल्या दोन आज्ञापत्रांमध्ये शेवा व कोळीवाडा गावठाण विनामूल्य संपादित करून त्याबदल्यात बोरीपाखाडी व बोकडविरा येथे पर्यायी जमीन दिल्याचा उल्लेख आहे. ही दोन्ही आज्ञापत्रे बनावट असल्याचा गंभीर आरोप विस्थापितांनी केला असून, त्याच आधारे गेली ४० वर्षे ६२० प्रकल्पग्रस्त कुटुंबांची दिशाभूल, फसवणूक आणि पुनर्वसनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

विस्थापितांनी असा आरोप केला आहे की, संबंधित बनावट आज्ञापत्रांचा आधार घेत जेएनपीए आणि पुनर्वसन प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. त्यामुळे शेकडो कुटुंबांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क बाधित झाले.

दरम्यान, ८ डिसेंबर २०२५ रोजी शासनाला सादर करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात बोरीपाखाडी येथील उपलब्ध करून दिलेली जमीन अपुरी असल्याची नोंद असून, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाल्याचे नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विस्थापितांच्या आरोपानुसार, पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न काढता जेएनपीए प्रशासनाने  शेवा मूळ गावठाण परिसरात मंदिरांचा जीर्णोद्धार, उद्यान व सुशोभीकरणासाठी सुमारे ₹१३.१४ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. संबंधित ठेकेदारांकडून प्रत्यक्ष कामेही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विस्थापितांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची एस आय टी (SIT) मार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी व विभागीय कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

डोंबिवलीहून पंढरपूरला सायकलने दिंडी रवाना; 20 ते 72 वयोगटातील 16 जणांचा सहभाग !!

डोंबिवलीहून पंढरपूरला सायकलने दिंडी रवाना; 20 ते 72 वयोगटातील 16 जणांचा सहभाग !!

*डोंबिवली, दि. 8 जुलै 2026*

डोंबिवली एमआयडीसी येथील गणपती मंदिरातून आज सकाळी पंढरपूर येथील सायकल रिंगण संमेलनासाठी 16 जणांची सायकल दिंडी रवाना झाली. सायकल सखी ग्रुप आणि सायकल डोंबिवली क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.

*शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित*  
दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यासाचे डॉ. सुनील पुणतांबेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे तसेच डोंबिवलीतील अनेक नागरिक उपस्थित होते.

*वारीचा उद्देश*  
या दिंडीत 20 वर्षांपासून 72 वर्षांपर्यंतच्या महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, देवदर्शन आणि 'बेटी पढाव बेटी बचाव' हा या सायकल वारीचा उद्देश आहे. पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता हे सायकलस्वार 385 किलोमीटरचा तीन दिवसांचा प्रवास करून 10 जुलै रोजी रात्री पंढरपूरला पोहोचणार आहेत.

12 जुलै रोजी पंढरपूर परिक्रमा, रिंगण आणि संमेलनात सहभागी झाल्यानंतर हे वारकरी बसने परतणार आहेत.

*सहभागी सायकलस्वार*  
मुकुंद कुलकर्णी 72, शंभू नारायण सिंग 72, नयना आगरकर 64, प्रशांत विसपुते 63, वर्षा महाडिक 58, सारंग मुळे 54, अश्विनी कारंडे 53, भीमाशंकर बिराजदार 51, विलास वैद्य 50, मेघेश कुलकर्णी 50, शोभा चौगुले 47, तेजल थोरवे 46, योगिता थोटांगे 43, विजय लहाने 38, रविना जाधव 36 आणि मेघ छेडा 20 या दिंडीत सहभागी झाले आहेत.

वारीसोबत अँब्युलन्स, आवश्यक सामानासाठी टेम्पोची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय 11 जुलै रोजी अंदाजे 40 महिला-पुरुष बसने पंढरपूरला जाणार आहेत.

*दुसरी तुकडी उद्या रवाना*  
गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपतर्फे अध्यक्षा हर्षल सरोदे यांच्या नेतृत्वाखाली 33 जणांची दुसरी तुकडीही एमआयडीसी गणपती मंदिरातून पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. 

एकूण डोंबिवलीतून सुमारे 50 जण सायकलने पंढरपूर वारीसाठी जात आहेत. दरवर्षी या संख्येत वाढ होत असून डोंबिवलीकरांचा उत्साह लक्षणीय आहे.

डोंबिवलीहून पंढरपूरला निघाली सायकलने दिंडी !!

डोंबिवलीहून पंढरपूरला निघाली सायकलने दिंडी !!

डोंबिवली, प्रतिनिधी :
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील गणपती मंदिर येथून आज 8 जुलै बुधवारी सकाळी पंढरपूर येथील सायकल रिंगण संमेलन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी 16 जणांची एक महिला पुरुषांची टीम रवाना झाली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री नंदू परब, नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यासाचे डॉ. सुनील पुणतांबेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे तसेच डोंबिवलीतील अनेक नागरिक उपस्थित होते. सायकल सखी ग्रुप (संस्थापिका अध्यक्षा सौ सुवर्णा राणे) आणि सायकल डोंबिवली क्लब (संस्थापक डॉ सुनील पुणतांबेकर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. या पंढरपूर जाणाऱ्या सायकल दिंडीत 20 वर्षाच्या तरुणांपासून 72 वर्षे वृद्धापर्यंत सर्वजण सामील झाले होते. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, देवदर्शन, बेटी पढाव बेटी बचाव असा हा सायकल वारीचा उद्देश होता. पाऊस, वारा याची तमा न बाळगता हे सर्वजण 12 जुलै रोजी पंढरपूर येथील येथील सायकल वारी आणि संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून हजारो सायकलस्वार या रिंगण संमेलन सोहळ्यासाठी पंढरपुरात दरवर्षी येत असतात. या पंढरपूर वारीसाठी स्वतः सायकलस्वारांनी आणि बसने जाणाऱ्यांनी खर्चासाठी वर्गणी काढली असून काही दानशूर लोकांनी पण यासाठी मदत केली आहे. सदर वारी सोबत अँब्युलन्स आणि इतर आवश्यक वस्तू व सायकल वारकऱ्यांचे सामान ठेवण्यासाठी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सदर हे सायकलस्वार तीन दिवस व 385 किलोमीटरचा खडतर प्रवास करून 10 जुलै रोजी सायंकाळी/रात्री पंढरपूर येथे पोहचणार आहेत. 11/12 जुलै रोजी पंढरपूर परिक्रमा, रिंगण, संमेलन इत्यादी कार्यक्रम झाल्यावर बसने परत येणार आहेत. अंदाजे 40 महिला, पुरुष हे बसने 11 जुलै रोजी डोंबिवलीहून निघून या सायकल रिंगण संमेलनात सहभागी होणार आहेत. 

सायकल वारी दिंडी साठी सहभाग घेतलेल्यांची नावे :-
१) मुकुंद कुलकर्णी  ७२ वर्षे
२) शंभू नारायण सिंग ७२ वर्षे 
३) नयना आगरकर ६४ वर्षे 
४) प्रशांत विसपुते ६३ वर्षे 
५) वर्षा महाडिक ५८ वर्षे 
६) सारंग मुळे ५४ वर्षे 
७) अश्विनी कारंडे ५३ वर्षे 
८) भीमाशंकर बिराजदार ५१ वर्षे 
९) विलास वैद्य ५० वर्षे 
१०) मेघेश कुलकर्णी ५०वर्षे 
११) शोभा चौगुले ४७ वर्षे
१२) तेजल थोरवे ४६ वर्षे 
१३) योगिता थोटांगे ४३ वर्षे 
१४) विजय लहाने ३८ वर्षे
१५) रविना जाधव ३६ वर्षे 
१६) मेघ छेडा २० वर्षे 

शिवाय गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी याच पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे दुसरी 33 जणांची तुकडी एमआयडीसी गणपती मंदिर येथून रवाना होणार आहे. यातही तरुण, वृद्ध महिला, पुरुष सहभागी होणार आहेत. याचे नेतृत्व एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या अध्यक्षा सौ हर्षल सरोदे करणार आहेत. संपूर्ण डोंबिवलीतून या पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी एकूण अंदाजे 50 जण जात आहेत. दरवर्षी यात वाढ होताना दिसत आहे. शिवाय या सायकल रिंगण संमेलन सोहळ्यासाठी खास बसने पण डोंबिवलीकर जात आहेत. एकंदर पंढरपूर सायकल वारीसाठी डोंबिवलीकरांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. 

या सर्वांना पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी उपस्थित सर्वांनी खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या 🌹

दि.बा पाटील नामकरणासाठीचे आंदोलन चिघळले ; भर पावसात हजारोंचा एल्गार !!

दि.बा पाटील नामकरणासाठीचे आंदोलन चिघळले ;  भर पावसात हजारोंचा एल्गार !!

** आंदोलन करण्यासाठी आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक - पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने सरकार हुकूमशाही व दडपशाही करत असल्याचा आंदोलकांचा आरोप.

** जमावबंदी व विविध कारणे सांगत पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली ; आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा.

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) पनवेल तालुक्यात वहाळ गावा नजदीक असलेले स्थानिक भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी समाजाच्या जमीन शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी मोठ्या प्रमाणात भूसंपादित केले. येथे सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत असून सुरुवातीपासूनच म्हणजे भूसंपादन प्रक्रियेपासूनच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव देण्याची आग्रही मागणी स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी समाजाने केली होती. आजपर्यंत अनेक आंदोलने निदर्शने झाले परंतु आजतागायत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला स्थानिक प्रकल्पग्रस्त,शेतकऱ्यांचे, कामगारांचे नेते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागले नाही किंवा शासनाकडून हे नाव विमानतळात देण्यात आलेले नाही. सरकार या मागणीला कोणतेही दाद देत नसल्याने शेवटी सर्व पक्षीय मोर्चा काढण्याचे ठरले. पनवेल शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुंबईतील मंत्रालय येथे मोर्चा काढण्याचे ठरले. बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सर्व पक्षीय मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले असता पोलीस प्रशासनाने जमाव बंदीचे आदेश दाखवत तसेच अति वृष्टी चालू असल्याने तसेच आमदाराचे अधिवेशन चालू असल्याचे सांगत त्यांना अटक केली. या सर्व पक्षीय आंदोलनामध्ये / मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टी,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले नव्हते. या आंदोलन पासून ते सुरुवातीपासूनच दूर होते. 

महाराष्ट्र राज्यात व केंद्र सरकारमध्ये भाजप व भाजपच्या मित्र पक्षाचे सत्ता असताना मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यास टाळाटाळ करीत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी  केला आहे. यावेळी पोलीस प्रशासनावर सुद्धा दडपशाहीचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे.आंदोलन स्थळी उपस्थित असलेले माजी आमदार बाळाराम पाटील, उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, २७ गाव समितीचे सचिन केणी,२७  गाव संघटनेचे पदाधिकारी, बैलगाडा संघटना, आगरी कोळी कराडी समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक करून कळंबोली येथील पोलीस प्रशासनाच्या मुख्यालयात नेण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लाडके नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या विधिमंडळावरील पायी मोर्चा पोलिसांनी सुरुवातीलाच पनवेल मध्येच रोकल्याने स्थानिक भूमीपुत्र, दिबा पाटील प्रेमी नामकरण समिती, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, स्थानिक भूमीपुत्रांचे विविध संस्था संघटना, आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध सामाजिक संस्था संघटना यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. राज्य शासन व केंद्रशासन नेहमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ व जाणून बुजून दुर्लक्ष,विलंब करीत असल्याने आंदोलन कर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. भर मुसळधार पावसातही जनजीवन विस्कळीत झाले असतानाही या मोर्चात हजारो आंदोलक सहभागी झाले होते.या प्रसंगी आंदोलन याहून अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

आंबिवली बल्याणी रस्त्यावरील खचलेल्या रस्त्याची महापौरांकडून पाहणी !!

आंबिवली बल्याणी रस्त्यावरील खचलेल्या रस्त्याची महापौरांकडून पाहणी  !!

** कायमस्वरूपी स्लॅब कलव्हर्ट उभारण्याची मागणी

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत बल्याणी गावात मुसळधार पावसामुळे खचलेल्या पाईप कलव्हर्ट व रस्त्याची आज महापौर सौ. हर्षाली चौधरी, महानगरपालिकेचे शहर अभियंता, संबंधित अभियंते उप अभियंते महापालिका अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (NHAI) प्रतिनिधी आणि स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष खचलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. कल्याण डोंबिवली आंबिवली कल्याणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने महानगरपालिकेने आतडीने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली.

या पाहणीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता, त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्लॅब कलव्हर्ट उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी नगरसेवक कु. राहुल मुकुंद कोट आणि नगरसेविका सौ. तेजश्री हेमंत गायकवाड यांनी केली. यावर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHI आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करून कलवर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

याशिवाय मुंबई–वडोदरा महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या डी.पी. रस्त्याच्या प्रश्नावरही लवकरच महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन आवश्यक निर्णय व कार्यवाही केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बल्याणी, ऊंभर्णी आणि मोहिली परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी व्यक्त केला.

कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील नगरसेवक रमेश म्हात्रें यांचे मारहाण प्रकरण ; 4 जणांना अटक !!

कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील नगरसेवक रमेश म्हात्रें यांचे मारहाण प्रकरण ; 4 जणांना अटक !!

*डोंबिवली, दि. ०८ जुलै २०२६, विनोद गीरी 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घालत शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली आहे.

*रुग्णालयात काय घडले?*  
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात दोन डॉक्टर, दोन नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

*पोलिसांची कारवाई*  
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली होती. मात्र विरोधकांनी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक केली.

घटनेचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "* महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ ज...