Monday, 27 April 2026

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के संदर्भ में दिए गए वक्तव्य का कड़ा निषेध किया है। *छत्रपति शिवाजी महाराज केवल महाराष्ट्र ही नहीं, बल्कि पूरे देश के गौरव, स्वाभिमान और आदर्श शासन के प्रतीक हैं।* उनके बारे में किसी भी प्रकार की अनुचित, अपमानजनक या भ्रामक टिप्पणी समाज की भावनाओं को आहत करने वाली है।

महाराष्ट्र कुर्मी समाज का मानना है कि ऐसे बयान समाज में अनावश्यक विवाद और असंतोष पैदा करते हैं, जो सामाजिक एकता और सद्भाव के लिए हानिकारक है। हम सभी से अपेक्षा करते हैं कि देश के महान इतिहासपुरुषों के प्रति सम्मानजनक भाषा और जिम्मेदार आचरण अपनाया जाए।

हम प्रशासन से मांग करते हैं कि इस प्रकरण का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की जाए, ताकि भविष्य में इस प्रकार की घटनाओं की पुनरावृत्ति न हो।

महाराष्ट्र कुर्मी समाज
*(अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा – महाराष्ट्र प्रदेश)*

सौजन्य/वृत्त - मा. संजय पाटील 
अध्यक्ष - महाराष्ट्र कृर्मी समाज 
+91 77450 48505

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्यासाठी उरण गौ भक्तांचे तहसीलदारांना निवेदन !

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण येथील उरण गौ भक्त यांच्या वतीने आज उरणचे  तहसीलदार रविंद्र सानप यांना ‘गौ माता’ला ‘राष्ट्र माता’ घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईचे असलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता सदर निवेदन देण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून, देशभरातील ५०० हून अधिक तहसीलदारांना विविध ठिकाणी गौप्रेमी व गौभक्तांच्या वतीने अशाच प्रकारची निवेदने सादर करण्यात आली आहेत, ज्यातून या विषयाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेला व्यापक पाठिंबा अधोरेखित होतो.

यावेळी प्रतिनिधी मंडळाने उरण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील सविस्तर चर्चा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात आली.हा उपक्रम शांततेत, कायद्याचे पालन करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येईल, याची माहिती प्रशासनाला देण्यात आले.सदर निवेदनात गाईला भारतीय परंपरेत “माता” म्हणून दिलेले स्थान, तिचे पोषणात्मक आणि कृषी अर्थव्यवस्थेतील योगदान यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरावर पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. भविष्यातही जनजागृती आणि शांततापूर्ण मार्गाने हा अभियान पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी उरण मधील गौ भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र द्वारे रक्तदान शिबीर संपन्न !!

सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना  केंद्र द्वारे रक्तदान शिबीर संपन्न !!

** रक्तदान शिबिराला मिळाला उत्तम प्रतिसाद.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
रक्ता अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना  केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण द्यानपीठ वाणिज्य व कला महाविद्यालय उरण, पोलीस स्टेशन समोर उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १९२ रक्तदात्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १८२ रक्तदाते  स्वीकारण्यात आले.

रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला उरण तालुक्यातील नागरिकांचा, उत्तम प्रतिसाद लाभला आहे. उरण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला सद्गुरु ब्लड बँक कोपरखैरणे महत्वाचे सहकार्य लाभले. सदर रक्तदान शिबीर  उरण तालुक्यातील  सर्व बापू भक्तांनी विशेष मेहनत घेतली.

पनवेलमध्ये ब्रह्माकुमारीज तर्फे ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात संपन्न !!

पनवेलमध्ये ब्रह्माकुमारीज तर्फे ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात संपन्न !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :

पनवेल येथील ब्रह्मा कुमारीस केंद्रात २४, २५ व २६ एप्रिल २०२६ दरम्यान सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ३ दिवसीय किड्स समर कॅम्प उत्साहात पार पडला. या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी शिबिराची सुरुवात झाली. बीके दिशा देवकर बहन यांनी मुलांकडून व्यायाम करून घेत केली. त्यानंतर बीके डॉ. अंजली सुंकले बहन यांनी “डिजिटल डिटॉक्स” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांकडून एक खेळ करून घेतला, ज्यातून मोबाईल गेम्सपेक्षा शारीरिक हालचालींचे महत्त्व पटवून दिले. तसेच मुलांकडून डिजिटल डिटॉक्सची प्रतिज्ञा करून घेतली व पालकांनाही मार्गदर्शन केले. पुढे बीके सुलक्षणा बहन यांनी “मी कोण?” या विषयावर आत्म्याचे स्वरूप समजावून सांगितले.

दुसऱ्या दिवशी बीके तारा दिदी व सेवाधारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिवसाची सुरुवात झाली. बीके पल्लवी बहन यांनी मुलांकडून झुंबा डान्स करून घेतला. 
त्यानंतर बीके सुनंदा दिदींनी परमात्म्याचा परिचय करून दिला. बीके अनिता दिदींनी राजयोग मेडिटेशनची माहिती देत त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. पुढे बीके दिशा तिवारी बहन यांनी मुलांना विविध विषयांवर चित्रकला करण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलांकडून व्हॅल्यू-बेस्ड गेम्स खेळवण्यात आले आणि शेवटी सर्वांना प्रसाद देण्यात आला.

तिसरा दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी व्यायामाने सुरुवात झाली. 
बीके सुनंदा दिदींनी चार युगांची माहिती गाणे व नृत्याच्या माध्यमातून दिली. 
बीके डॉ. विजय भाई यांनी हेल्दी लाईफस्टाइलवर मार्गदर्शन करत दिवसाची योग्य दिनचर्या कशी असावी हे सांगितले. 

मुलांसाठी भावनांवर आधारित एक खेळ आयोजित करण्यात आला. त्यानंतर आत्म्याच्या सात गुणांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी पनवेल ब्रह्माकुमारीज सेंटरच्या इंचार्ज बीके तारा दिदी यांच्या हस्ते दररोज काढलेल्या लकी ड्रॉमधून तीन मुलांना बक्षिसे देण्यात आली. तसेच “शिवबाबा” कडून सकाळी उठल्यापासून शक्ती कशी घ्यावी, दिवसभराचा दिनचर्या चार्ट कसा सादर करावा आणि दिवसभर परमात्म्याची आठवण कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेतही तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली,  तसेच सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी मुलांकडून “लेटर टू गॉड” लिहून घेण्यात आले आणि सर्वांना ब्रह्माकुमारीजचे आशीर्वाद देण्यात आले. बीके सुलक्षणा बहन यांनी मुलांकडून राजयोग मेडिटेशन करून घेतले, तर संजय भाई यांनी प्रेरणादायी कविता सादर केली. अशा प्रकारे पनवेल ब्रह्माकुमारीज केंद्राचा किड्स समर कॅम्प आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) ::
              महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान.श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.आमदार, शिवसेना सचिव, प्रवक्ते आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा. श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार मानण्यासाठी दिनांक २६/०४/२०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांचे मनापासून आपल्या भाषणात आभार व्यक्त केले.
          श्री.किरण पावसकर यांनी आपल्या भाषणात सांगितले मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  विनाअनुदानित शाळांना अनुदान सुरू करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याच वाचवल्या तसेच मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या त्या मराठी शाळांना मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे आणि अनुदान मंजूर करून देण्याचे काम फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळेच झाले. तसेच जे शिक्षक ७००० आणि ८००० रुपये महिना इतक्या कमी वेतनात काम करत होते आज त्या शिक्षकांना ५०,००० ते ६०,००० महिना पगार सुरू झाला याचे श्रेय शिंदे साहेबांनाच दिले पाहिजे. तसेच शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे साहेब, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीम. राजश्री शिरवाडकर, शिक्षण समिती सदस्य श्रीम.अंजली नाईक मुंबई महानगरपालिका शिवसेना गटनेते श्री.अमेय Spam, माजी शिक्षण समिती सदस्य श्री.मंगेश सातमकर यांच्या सहकार्यामुळे या निर्णयास जलदगती मिळाली असे सांगितले.
            याप्रसंगी सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. दिलीप नाईक श्री. संदीप जाधव चिटणीस श्री. तातू नाईक श्री. सचिन लिमन श्री.सचिन साळुंखे श्री. सुहास गायकवाड तसेच संस्थाचालक श्री. सुरेश लाखन श्री. विवेक थोरात श्री. विशाल बंडगर, राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाचे उपाध्यक्ष श्री. अमर पाचांगणे, सरचिटणीस संतोष रावताळे, जयदीप पाटील रमेश पवार, अरुण पवार, विनोद यादव, कार्यालय प्रमुख श्री. कार्तिक पवार व मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!

रासपचे युवा नेते अजित पाटील राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानित !!

*जत / प्रतिनिधी :*
  जत येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांना "राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्कार - २०२६" ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे 'राष्ट्रभक्ती परिवार' आणि 'शौर्य करिअर अकॅडमी' पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र दिनानिमित्त हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
    अजित पाटील हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून गेल्या अनेक वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करत आले आहेत. एक आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व भाषणावरती प्रभुत्व असणारे युवकांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यभर युवकांचे संघटन जाळे त्यांच्या माध्यमातून निर्माण केले जात आहे. राज्यभर दौरा करत युवकांच्या प्रश्नांवरती भूमिका घेणे अशा या नेतृत्वास क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   अध्यक्षस्थानी एमआयटी संस्थेचे संचालक महेश थोरवे होते. अध्यक्ष भाषणात ते म्हणाले, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात तरुणांनी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कष्टाला कोणताही पर्याय नसून, सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच व्यक्तिमत्व घडते आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीला बळ मिळते. समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
  प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज कॉलेज ग्रुपचे चेअरमन गोपाल खंडारे उपस्थित होते. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी तरुणांना देशसेवा व समाजकार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
  सत्काराला उत्तर देताना अजित पाटील म्हणाले, हा सन्मान केवळ माझा नसून, राष्ट्रीय समाज पक्षातील त्या सर्व युवा रत्नांचा आणि माझ्या सहकाऱ्यांचा आहे, ज्यांच्या खंबीर साथीमुळे मला राज्यभर कार्य करण्याची संधी मिळाली. हा पुरस्कार मी माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांना समर्पित करतो आणि त्यांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून हा सन्मान मी स्वीकारला. संयोजकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास मला जनसेवेच्या कार्यात अधिक ऊर्जा देईल.
  यावेळी आनंदकुमार दुबे, सौ. भारती तुपे, हरिदास भिसे, सुनील गोरे, राजेंद्र पवार यांच्यासहित अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Sunday, 26 April 2026

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सवास मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते श्री. राहूल सोलापूरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली व त्यांना प्रोत्साहन दिले. मिलेटचा वापर करून तयार केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीच त्यांनी विषेश कौतुक केले. 

 मिलेट व फळ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी डॉ. अहिल्या वाघमोडे, फुड सायन्स विभाग प्रमुख, एसजीएम कॉलेज कराड यांचे मिलेटची ओळख व त्यांचा मानवी शरीरास होणारे फायदे या विषयावर व्याख्यान पार पडले. तिसर्या दिवशी डॉ. प्रतिभा ठोंबरे, कृषी विद्यान केंद्र कोल्हापूर याचे मिलेट उपयुक्तता व मिलेट व्हॅाल्यु एडिशन या विषयावर व्याख्यान पार पडले.

महोत्सवात मिलेट पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिक्षकरूपी डॉ. अहिल्या वाघमोडे, डॅा. प्रतिभा ठोंबरे, पुजा सावंत, तृप्ती कोळेकर, जयश्री करे उपस्थित होते. या मिलेट पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोनल भोसले, द्वितीय मयुरी रानमाळे, तृतीय श्रीया पोफळे, उत्तेजनार्थ दिपाली देसाई क्रमांक मिळाल्याने त्यांचे प्रशस्तीपत्रक व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

सदर महोत्सवात चार दिवसांमध्ये तब्बल २९ लाख रूपयांची उलाढाल झालेली आहे. कोल्हापूर वासीयांचा अत्यंत चांगला प्रतिसाद महोत्सवास मिळताना दिसून येत आहे. कृषी पणन मंडळा चे उपसरव्यवस्थापक श्री विनायक कोकरे यांनी महोत्सवास भेट देऊन सर्व स्टॉल पाहणी केली शेतकर्‍यां समवेत चर्चा केली. आयोजना साठी छान काम केले बद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. उद्याचा महोत्सवाचा उद्या शेवटचा दिवस असून डॉ. संदीप पाटील यांचे मिलेटपर व्याख्यान सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केलेले आहे. त्यामूळे कोल्हापूर वासीयांनी मिलेट व फळ महोत्सवास भेट देऊन मिलेट व फळांचा अस्वाद घ्यावा व सदर व्याखानास उपस्थित राहावे असे पणन मंडळांचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी अवाहन केले.

सौजन्य/ वृत्त - विलासराव कोळेकर सर 

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !! महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्...