Sunday, 13 July 2025

नालासोपारा शहरातील लोकहिताची विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.....

नालासोपारा शहरातील लोकहिताची विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.....

*** 'शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक व अल्पना सोनावणे' यांचा यशस्वी पाठपुरावा.

नालासोपारा ता, 14 :- नालासोपारा शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत. यासाठी शिवसेना महिला शहरप्रमुख रुचिता नाईक अल्पना सोनावणे व नालासोपारातील पदाधिकारी यांनी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन निवेदन देत दिले.

वाहतुक कोंडीतून नागरिकांची कायम सुटका व्हावी यासाठी रखडलेले उड्डाणपूल तातडीने मार्गी लावावी. भुमिगत विद्युत वाहिनीचे काम तातडीने सुरू करून नालासोपारातील नागरिकांचा कायमस्वरूपी समस्या सोडविणे, नालासोपारा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणे, महानगरापालिकेतील स्थानिक कर्मचारीना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. जिल्हापरिषद चा शाळा, हॉस्पिटल व भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करावेत, जेणे करून गरीब गरजू रुग्णांना मुंबई येथील हॉस्पिटल येथे जाण्याची वेळ न येता नालासोपारा येथे भव्य सर्व प्रकाराचे मोफत शस्त्रक्रिया व मोफत तपासणी करता यावी असे हॉस्पिटल उभारावे. जिल्हापरिषद चा सर्व शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करुन मोफत सीबीएसई शाळा सुरू करावी.

अधिकृत बांधकामांनी बकाल  होत असलेले शहर वाचवावे यासाठी भुमाफीयांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांना देण्यात यावे. महापालिकेने अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून फेरीवाला धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. तसेच अशा प्रकारचे धोरण महापालिकास्तरावर मंजूर करण्याबाबत विचार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना केली.

कामगार हेच माझे दैवत आहे - भूषण पाटील

कामगार हेच माझे दैवत आहे 
    - भूषण पाटील 

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली ३६  वर्षे मी जेएनपीटी मध्ये काम केले, २२ वर्षे मी विश्वस्त म्हणून काम पाहिले. कामगारांमुळेच मला हा बहुमान मिळाला आहे.कामगारांचे माझ्यावर जीवापाड प्रेम व संघटने बद्दलची कामगारांची निष्ठा यामुळेच मी येथे उभा आहे. कॉम्रेड हीच माझी ओळख आहे.मला शेठ म्हणू नका.मला साहेब म्हणू नका. मला कॉम्रेड म्हणा. माझ्यासाठी सर्वात मोठे पद कॉम्रेड आहे. मी अनेक देश विदेशात गेलो तिथल्या अनुभवाच्या, ज्ञानाचा फायदा कामगारांच्या हितासाठी केला. देशभरात फिरून आलो मला प्रवाशासाठी फोरविलर वाहन सुद्धा कामगारांनी घेऊन दिला. त्यामुळे माझ्या जीवणामध्ये व प्रत्येक यशामध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या कामगारांचा आहे. त्यामुळे कामगार हेच माझे दैवत आहेत. कामगारांना मी कधीच विसरणार नाही. निवृत्तीनंतर सुद्धा शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी प्रत्येक कार्यक्रमात, संप, आंदोलनात सक्रिय राहीन. गोर गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन कॉम्रेड भूषण पाटील यांनी उरण येथे केले.

जेएनपीटीचे माजी विश्वस्त, जेएनपीटीचे कर्मचारी कॉम्रेड भूषण पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसाचे तसेच जेएनपीए सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन बहुउद्देशीय सभागृह जेएनपीए उरण येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉ. भूषण पाटील, कुंदा भूषण पाटील, कामगार नेते मनोज यादव, माजी अध्यक्ष किशोर घरत, डेप्युटी जनरल सेक्रेटरी एम एस कोळी, विद्यमान अध्यक्ष  दिनेश घरत, कार्याध्यक्ष गणेश घरत,उपाध्यक्ष जगजीवन भोईर, उपाध्यक्ष नंदू म्हात्रे, राजेश घरत, नामदेव चिमणे, माजी अध्यक्ष एच यु म्हात्रे, माजी अध्यक्ष प्रशांत भगत, माजी उपाध्यक्ष मदन पाटील, युनियन पदाधिकारी संदीप पाटील, हिरामण पाटील, किसन म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना कॉम्रेड भूषण पाटील यांनी जनशक्ती हीच मोठी शक्ती आहे. युनियनला विसरू नका. जनसेवा सेवा हीच ईश्वर सेवा आहे. साधू संतांनी मानवतेची सेवा केली. तशीच सेवा तुम्ही करा. जो समाजासाठी काम करतो समाज त्याला कधीच विसरत नाही. सर्वांनी एकत्र येऊन अन्याया विरुद्ध लढा उभारा. बाळ रडल्याशिवाय आई दूध देत नाही तसेच जोपर्यंत आपण लढत नाही, संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही असे सांगत संघटनेशी एकनिष्ठ राहत कामगारांना संघटनेला साथ देण्याची विनंती केली. यावेळी विविध कामगार नेत्यांची, मान्यवरांची भाषणे झाली. भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेक जण या प्रसंगी भावुक झाले होते. असा नेता पुन्हा होणार नसल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून भावना व्यक्त झाल्या.जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर, भाजपचे नेते पंडित घरत, कामगार नेते रवि घरत, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, रायगड भूषण यशवंत ठाकूर, महिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती भोईर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कॉ. भूषण पाटील यांना भेटून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेचे युनियन उपाध्यक्ष जगजीवन भोईर यांनी जेएनपीए परिसरात विविध फळांची ६० झाडे व विविध फुलांची २५ झाडे असे एकूण ७५ हुन अधिक झाडे लावली व ती झाडे जगविण्याचा, वाढविण्याचा संकल्प केला. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचा संदेश सर्वांना दिला आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत)च्या सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले. याप्रसंगी आर आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना अंतर्गत यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. जेएनपीटी चेकर बंधू यांच्या कडुन आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले होते. स्नेह भोजनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

कुटुंबिनी उरण महिला संघ तर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन !!

कुटुंबिनी उरण महिला संघ तर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन !!

** मोठया संख्येने सहभागी होण्याचे महिलांना आवाहन 

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) :
समस्त महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने तसेच महिलांच्या विविध कला गुणांना, कला कौशल्यांना वाव देण्याच्या दृष्टीकोणातून, भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जपला जावा या हेतूने कुटुंबिनी उरण महिला संघ या सामाजिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता शेप्स जिमखाना टेरेस उरण येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमधून सर्वोत्कृष्ट रंगभूषा,सर्वोत्कृष्ट उखाणा, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा, सर्वोत्कृष्ट नृत्य, सर्वोत्कृष्ट  वेशभूषा, सर्वोत्कृष्ट शृंगार, सर्वोत्कृष्ट शृंगार व वेशभूषा (कुमारिका) महिला निवडण्यात येणार आहेत. त्यांना  विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विजयी स्पर्धेकांना रोख रक्कम व आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. दरवर्षी या मंगळागौर कार्यक्रमात महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग असतो. दरवर्षी या कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यंदाचे मंगळागौर कार्यक्रमाचे हे ३ रे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला भगिनींनी मंगळागौर कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, नाव नोंदणी साठी श्लोक पाटील - ९००४११३८५८, आरती ढोले -९९६७९५५९३३ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !!

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !!

** मा. उच्च न्यायालयाने भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांच्या बाजूने दिला निकाल ; ऍड. प्रियांका ठाकूर यांनी मांडली उच्च न्यायालयात प्रभावी भूमिका.

** १९७१ पूर्वीचे रहिवाशी पुरावा ग्राह्य धरण्याचे न्यायालयाचे आदेश - भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना ४० मिटरच्या भूखंडाचा मार्ग झाला मोकळा

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : भूमीहिन प्रकल्पग्रस्तांना ४० चौरस मीटर भूखंड मिळावे यासाठी पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील प्रकल्पग्रस्त तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज जनार्दन कोळी, मयूर जनार्दन कोळी यांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग, सिडको महामंडळ कडे वारंवार सतत पाठपुरावा केला होता. मात्र सिडको प्रशासन दाद देत नव्हती. त्यामुळे भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील प्रकल्पग्रस्त तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज कोळी, मयूर कोळी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या विषयाची बाजू उच्च न्यायालयात वकील प्रियांका सुरेश ठाकूर यांनी उत्तमपणे मांडली होती. शांततेच्या व कायदेशीर मार्गाने लढा लढल्या नंतर अनेक वर्षानंतर मनोज कोळी, मयूर कोळी व ऍड. प्रियांका सुरेश ठाकूर यांच्या लढ्याला यश आले असून मा. उच्च न्यायालय मुंबईने भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांच्या बाजूने न्याय दिला आहे. भूमिहीन प्रकल्पग्रस्त यांना ४० चौरस मीटर भूखंड न्यायालयाच्या आदेशाने भूमिहीन प्रकल्पग्रस्त यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे व रायगड जिल्हा व नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार, प्रकल्प ग्रस्त संघटना संस्था मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उशीर का होईना पण अनेक वर्षानंतर ठाणे जिल्ह्यातील व पनवेल उरण तालुक्यातील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांना न्याय मिळाल्याने मा. उच्च न्यायालयाच्या या निकालाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. हा निर्णय आता ठाणे जिल्हा, उरण पनवेल तालुक्यात सर्वत्र लागू होणार असल्याने भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.

नवी मुंबई प्रकल्पाकरिता ९५ गावांच्या जमिनीचे संपादन झाले.हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात १२. ५ टक्के भूखंड मिळाले. मात्र या प्रकल्पात भूमिहीन बारा बलुतेदार असलेले अनेक प्रकल्पग्रस्त या शेती व्यवसायापासून वंचित झाले. अनेक शेतकरी जमीन तर कसत होते मात्र त्यांच्या नावावर जमिनीची नोंद नसल्याने असे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झाले.या शेतकऱ्यांसाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढत या भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना ४० चौरस मीटर भूखंड देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक वेळा अर्ज करून देखील सिडको प्रशासन हे भूखंड देण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येताच याबाबत ऍडव्होकेट प्रियांका सुरेश ठाकूर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.‌ 

२०२२ साली हि याचिका पनवेल तालुक्यातील गव्हाण गावातील शेतकरी मनोज जनार्धन कोळी आणि मयूर जनार्धन कोळी यांच्या माध्यमातून ऍडव्होकेट प्रियांका ठाकुर यांनी दाखल केली होती. २००९ साली कोळी बंधूनी ४० चौरस मीटर भूखंडाकरिता सिडकोकडे अर्ज केला होता. मात्र सिडकोने या अर्जाला दाद दिली नाही. त्यानंतर पुन्हा २०२१ साली पुन्हा अर्ज केल्यानंतर सिडकोने अर्जदारांना १९७१ सालच्या मतदान यादीची पूर्तता करण्यास सांगितले. प्रत्येक वेळेला विविध कारणे देऊन सिडको प्रशासन याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या वकील ऍडव्होकेट प्रियांका सुरेश ठाकूर यांच्या माध्यमातून कोळी बंधूनी रिट याचिका दाखल केली. या याचिकेत कोळी बंधूनी सिडको प्रशासन कशाप्रकारे भूखंड देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे खंडपीटासमोर मांडले. यावेळी कोळी यांचे गव्हाण येथील १९६७ चे घर नंबर ६६ ब रहिवासी पुरावा देखील त्यांनी सोबत जोडला होता.याबाबत उच्च न्यायालयातील खंडपीठाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि निला गोखले यांच्या खंडपीठाने सिडकोला याचिकाकर्त्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरण्यास सांगत. ४० चौरस मीटरचे भूखंड वाटपाबाबतच्या निर्णयाचे अवलोकन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.याकरिता तत्कालीन मतदार यादीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोणताही शासकीय पुरावा या योजनेसाठी पात्र असल्याचे खंडपीठाने म्हटल्याने अनेक भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना या याचिकेच्या आधारे आपल्या हक्काचे भूखंड मिळणार आहेत.



कोट (प्रतिक्रिया):--



नवी मुंबई प्रकल्पात ९५ गावातील शेतकऱ्यांना १२. ५ टक्के भूखंड तर वितरित करण्यात आले.मात्र जे बारा बलुतेदार भूमिहीन शेतकरी आहेत.त्यांना ४० चौरस मीटरच्या भूखंडासाठी आजही  झगडावे लागत आहे.आम्ही दाखल केलेली रिट याचिकेचा निर्णय  ऐतिहासिक आहे.या निकालाच्या आधार जे भूमिहीन प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत.त्यांना सिडकोच्या माध्यमातुन ४० चौरस मीटरचा भूखंड मिळण्यास मदत होणार आहे.
   - मनोज कोळी, शेतकरी, गव्हाण पनवेल

शिवस्फूर्ती प्रगती मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप !!

शिवस्फूर्ती प्रगती मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप !!

घाटकोपर, (केतन भोज) : सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या घाटकोपर पश्चिम येथील शिवस्फूर्ती प्रगती मंडळ यांच्या वतीने रामनगर नगर (अ ) येथे मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष हरेश आण्णा धांद्रुत यांच्या पुढाकाराने तसेच घाटकोपर इन्स्ट्रियल मधील उद्योजक प्रविण तोतरे व प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने विभागातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर घाटकोपर इन्स्ट्रियल येथील उद्योजक प्रविण तोतरे व प्रकाश पाटील यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित सर्व विद्यार्थांनी ही आपल्यातील कला यावेळी सादर केली.यावेळी या कार्यक्रमाला शिवस्फूर्ती प्रगती मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Saturday, 12 July 2025

कर्तृत्वाचा गौरव : डॉ. किशोर पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार !!

कर्तृत्वाचा गौरव : डॉ. किशोर पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार !!

*** निर्भीड लेखन, सामाजिक भान आणि ग्रामीण पत्रकारितेतील योगदानाची राज्यस्तरीय पातळीवर दखल

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             मराठी पत्रकारितेतील वैचारिक स्पष्टता, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालवणारे दैनिक ‘स्वराज्य तोरण’ चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणगौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. ठाण्यात शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी टाऊन हॉल, कोर्ट नाका येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळा व पत्रकार मेळाव्याच्या निमित्ताने हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
             हा पुरस्कार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, सरचिटणीस जगदीश सोनवणे, राज्य उपाध्यक्ष डॉ. दिलीप कोठावदे, कोकण विभाग संघटक अरुण बिराजदार, राज्य सल्लागार प्रमोद इंगळे, ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर करडे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडके, आणि कार्यक्रमाचे आयोजक व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
             डॉ. पाटील यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, दुर्लक्षित समाजघटक, तसेच सामान्यांच्या प्रश्नांना आपल्या परखड लेखणीद्वारे वाचा फोडली आहे. सामाजिक अंलबजावणी, शासकीय योजनांची कार्यवाही, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि राजकीय धोरणांवरील अभ्यासपूर्ण भाष्य ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.
            दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक म्हणून त्यांनी केवळ वृत्तसंपादनच नाही, तर समाजप्रबोधनाचे कार्यही सातत्याने केले आहे. त्यांची लेखनशैली ठाम, समतोल आणि सुस्पष्ट असून, वाचकांमध्ये विचारप्रवृत्त करणारी आहे. या गुणवत्तेचीच दखल घेत ‘गुणगौरव पुरस्कार 2025’ देण्यात आला.
            या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, शिक्षक, वकील, पत्रकार आणि विद्यार्थ्यांसारख्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरावर गौरविणे हा होता. त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्दात हेतू होता.
             या राज्यस्तरीय मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन पत्रकार संघाचे राज्य संघटक व ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमने केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. ठाणे जिल्ह्यातील विविध माध्यमातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. डॉ. किशोर पाटील यांचा ‘गुणगौरव पुरस्कार 2025’ हा त्यांच्या मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा गौरव असून, हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण ग्रामीण पत्रकारितेच्या सचोटीचा अभिमान असल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.

चौकट 
हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर ग्रामीण पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे. सत्य व निष्पक्षतेच्या मार्गावर चालणाऱ्या पत्रकारितेची ही थोडीशी पावती आहे. यामुळे अधिक जबाबदारीची जाणीव झाली आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. किशोर पाटील यांनी पुरस्कार स्वीकृतीवेळी दिली.

विलासराव कोळेकर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसाटीच्या वतीने सत्कार संपन्न !!

विलासराव कोळेकर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसाटीच्या वतीने सत्कार संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ.ऐ. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सैतवडे ( गुम्बद ) सरपंच सौ. उषा सावंत, सैतवडेचे (बोरसई ) साजीद शेकासन, जांभारीचे सरपंच आदेश पावरी, इरा इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक इमरान अंतुले, व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रहीम माद्रे यांनी बुके, शाल, भेटवस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
              यावेळी इमरान अंतुले, आदेश पावरी, सौ.उषा सावंत, रहीम माहे, राजेंद्र कदम व काही विद्यार्थ्यानीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्री कोळेकर सर यांनी मॉडेल स्कुल नावाप्रमांणेच मॉडेल शाळा केली आहे, सतत नव नवे उपक्रम,शाळेची वाढलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सर्वच ठिकाणी सुरु असलेली गरुडभरारी ही कौतुकास्पद आहे असे सर्वच मान्यवरांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना श्री कोळेकर म्हणाले हे यश माझे नसुन उत्तम सहकार्य करणा-या संस्थेचे, सर्वोत्तम अध्यापन करणा-या सर्व शिक्षकांचे, प्रयत्नवादी विद्यार्थ्यांचे, आणि प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभाग घेणा-या पालक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आहे असे नमूद केले.
             तसेच पालकांप्रमाणेच परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे व नागरिकांचाही नेहमीच सहकार्याचा हात असतो, त्यामुळेच आज शाळेची चौफेर प्रगती झाली. या समारंभास मकबुल पारेख, संस्थेचे सदस्य हशमत निवेकर, रज्जाक फकीर तसेच राजू सावंत आदी ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुमान पारेख यांनी केले. सुत्रसंचालन विनोद पेढे यांनी केले तर आभार अविनाश केदारी यांनी मानले.

नालासोपारा शहरातील लोकहिताची विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.....

नालासोपारा शहरातील लोकहिताची विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..... *** 'शिवसेना महिला श...