Saturday, 28 February 2026

उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात मराठी भाषा दिन साजरा !!

उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात  मराठी भाषा दिन साजरा !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात  जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर  यांच्या संकल्पनेतून एमपीएससी यूपीएससी सीए परीक्षा पोलीस भरती यांची  अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मराठी भाषा गौरव दिन प्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व एडवोकेट निरंतर सावंत  यांनी मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. निरंतर सावंत यांनी मराठी भाषा जास्तीत जास्त बोलणे व ती भाषा जिवंत ठेवणे हे आपल्या सर्व मराठी लोकांचे कर्तव्य आहे तर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी सर्वांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठविणे जरुरीचे आहे याचे कारण सेमी इंग्रजी माध्यमाद्वारे गणित , विज्ञान, इंग्रजीमध्ये शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तसेच मराठी माध्यम असल्यामुळे मराठी विषय, मराठी व्याकरण समल्यामुळे वाचनाची गोडी त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांचे अजरामर असलेले वाड्मय समजून घेता येईल आणि ते समजल्यामुळे विचारांची प्रगल्भता आणि त्यामुळे चौफेर व्यक्तीमत्व विकसित होण्यास मदत होते. याउलट आपण दुर्लक्ष केल्यामुळे मोडी लिपी व संस्कृत भाषा कशी लोक पावली याची त्यांनी उदाहरणे दिली. जी ८० व ९० वर्षांपूर्वीची जुने मोडी लिपीतले जुने सरकारी दस्ताऐवज वाचण्यासाठी आता माणसं उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ते काय लिहिले आहे त्या लिखाणाच्या अर्थाचे आकलन होत नाही त्यामुळे भाषा बोलणे ती टिकवणे व आपल्या मातृभाषेतील संवाद आपण आपल्या स्वतः पासूनच वाढवणे हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या विषयावर चर्चा करून, विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. अशा प्रकारे उरण नगरपरिषदेचे माॅंसाहेब  मिनाताई ठाकरे वाचनालयात, मराठी भाषा दिन यशस्वी साजरा करण्यात आला.त्याबद्दल उपस्थितांचे वाचनालयचे कर्मचारी जयेश वत्सराज यांनी आभार मानले.

लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन !!

लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : लोकनेते दि. बा . पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या माध्यमातून जो लढा गेली ४ वर्षांपासून लढा चालू आहे तो म्हणजे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला हवे.महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला  नावाच्या पाठवलेल्या प्रस्तावाबाबत अजून कुठलीच सकारात्मक चर्चा नाही म्हणुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इथल्या स्थानिक नेत्यांना व मंत्रिमंडळाला सांगण्यासाठी  धरणे आंदोलन हे आझाद मैदान याठिकाणी घेण्यात आले. लवकरच मोठया आंदोलनाची तयारी चालू आहे व पुढील नियोजन लवकरच घेण्यात येईल. असे यावेळी ठरविण्यात आले. 

या वेळी आझाद मैदान मध्ये कृती समिती अद्यक्ष दशरथ दादा पाटील, भूमिपुत्र नेते व लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे , कृती समिती सद्यस्य व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, पनवेल चे माजी उपमहापौर जगदीश भाई गायकवाड, कृती समितीमधील अन्य सदस्य व मुंबई  रायगड मधून आलेले सर्व आगरी कोळी बांधव व सर्व समाजबांधव उपस्थित होते. रायगड जिल्हा व मुंबईला जोडणाऱ्या महत्वाचा सागरी मार्ग असलेल्या अटल सेतूचा मार्ग अडवून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

मराठी भाषेने मराठी माणसाला स्वाभिमानाचा ताठ कणा दिला आहे.- साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

मराठी भाषेने मराठी माणसाला स्वाभिमानाचा ताठ कणा दिला आहे.- साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण एसटी डेपोमध्ये मराठी भाषा दिन साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पासून कुसुमाग्रज आणि आजच्या लहान मोठ्या लेखकांनी मराठीला समृद्ध केले आहे.मराठी भाषेचा स्वाभिमानाचा ताठ " कणा " जगण्यासाठी दिला आहे.तसेच पाटील यांनी "माय बोली "" "सारेबाराचा पलाट " आगरीबोलीत कविता सादर केल्या.

    दुसरे वक्ते कवी संजीव पाटील यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनावर विचार मांडून आपल्या कविता सादर केल्या. विशेष म्हणजे प्रवासाची निघालेल्या प्रवाशांनी ही मनसोक्त ऐकून भरपूर दाद दिली.

        कार्यक्रमाला अधिक्षिका दीपा कोंढारकर,विभागिय नियंत्रक तुषार शिंदे, तानाजी भोईर,रोहन खलिपे, चंद्रकांत देसले, संतोष दळवी,संदिप चौहान, प्रभाकर म्हात्रे,पंकज म्हात्रे इत्यादी प्रमुखांची लक्षणीय उपस्थिती होती

जवाहरलाल नेहरू विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा !!

जवाहरलाल नेहरू विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा !!

** सुलेखनकार मनोहर जामकर यांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष. 

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अगदी शाही थाटात झाली मनोहर टेमकर  आणि विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यालयाच्या लेझीम पथकाच्या सादरीकरणाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सुप्रसिद्ध सुलेखनकार मनोहर जामकर  यांच्या शुभहस्ते लाल फीत कापून सुलेखन प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या स्वागताचा फलक किशोर म्हात्रे यांनी अत्यंत सुंदर आणि मोहक अक्षरात रेखाटला होता जो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. 

   या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सुलेखनकार मनोहर जामकर यांचे सुलेखन (कॅलिग्राफी)प्रदर्शन ठरले. जामकर यांनी विद्यार्थ्यांना अक्षरांचे सौंदर्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवले ज्यामध्ये विद्यार्थी पूर्णपणे रमून गेले होते. 

    याप्रसंगी शालेय प्रशासकीय अधिकारी मोनिका रतनपर्ज,पालक संघाचे उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, अविनाश म्हात्रे सहसचिव योगेश तांडेल आणि पत्रकार तृप्ती भोईर उपस्थित होत्या .विद्यालयाचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील ,इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव, अंकुश जोगळे आणि बालोद्यान विभागाच्या  मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे , पर्यवेक्षक जगदीश मढवी  ,चंदा टेमकर  व सहकारी शिक्षकांच्या अचूक नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला. 

     नववी इयत्तेतील स्वराने गोड आवाजात ईशस्तवन सादर केले. तर सातवीच्या विद्यार्थ्यांनी सतीश गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली 'माऊली' या मराठमोळ्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले . सुलेखनकार मनोहर जामकर यांनी सुलेखनावर आधारित चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी मयूर सरांनी तांत्रिक मदत केली. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या शिक्षिका सरोज भामरे यांनी केले. तर राजेंद्र ठाकूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्रजी व मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक समस्त शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वसंत कडू, शिवाजी गुरव ,शितल दर्णे आणि दिलीप घरत  या सर्वांच्या सुंदर समन्वयातून 'मराठी राजभाषा' दिन सोहळा सुवर्ण अक्षराने कोरला गेला. प्रत्येकाने दिलेल्या योगदानामुळेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली,आणि कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा !!

यु. ई. एस. स्कूल,  ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कवी, जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस सर्वत्र मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये मराठी दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम सुरु होण्याआधी, मराठी दिवसानिमित्त विदयार्थ्यांनी रोजची प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत व दिवसाच्या ठळक बातम्या मराठीत म्हटल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उदयोजक  गणेश भगवान नाखवा, यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका यांचे विदयार्थ्यांनी लेझिम नृत्य करुन ढोलताश्यांच्या गजरात स्वागत केले तसेच प्रमुख पाहुण्यांचे व सर्व मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन गणपती, सरस्वती, ज्ञानेश्वरीचे व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

  त्यानंतर शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठांवरील सर्व मान्यवरांसोबतच पीटीए मेंबर, पालक, शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांनी स्वागतगीत गायले व माध्यमिक विभागातील शिक्षिकेने मराठी दिवसाचे महत्व सांगितले. त्यानंतर स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या  सिमरन दहिया ह्यांनी सर्वांना मराठी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर ह्यांनीही मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले तर प्रमुख पाहुणे गणेश भगवान नाखवा ह्यांनी आपल्या मनोगतातून मराठी दिवसाची महती व उदयोजक क्षेत्रातील अनुभव विदयार्थ्यांना सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले.  माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांनी शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिके तसेच कोळीनृत्य सादर केले.  तर उच्च महाविदयालयातील विदयार्थ्यांनीही सोशल मिडीया ह्या विषयावर आधारीत पथनाट्य सादर केले. त्यानंतर उपस्थित सर्व विदयार्थ्यांनी कृतीगीत सादर करुन सर्वांची मने जिंकली.मराठी दिवसानिमित्त सर्वांसाठी मराठी पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते व मराठी महिने रांगोळीद्वारे साकारले होते, तसेच कोळी समाजातील पारंपारिक सण व प्रथांचे दर्शन सुंदर अशा देखाव्यातून सादर केले होते. उपस्थित सर्वांनी ह्या प्रदर्शनाचा मनापासून लाभ घेतला.कार्यक्रमाची सर्व तयारी, उपस्थितांचं स्वागत व सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांनी व शिक्षकांनी सूत्रबद्ध पद्ध्तीने केले.कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला. अशा रितीने यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये मराठी राजभाषा दिवस आनंदात व उत्साहात साजरा झाला

क्रिकेट खेळामुळे तरुणांचे भवितव्य अंधारात ; क्रिकेट मुळे तरुणाई मूळ मुद्द्यापासून भरकटली !!

क्रिकेट खेळामुळे तरुणांचे भवितव्य अंधारात ; क्रिकेट मुळे तरुणाई मूळ मुद्द्यापासून भरकटली !!

** अभ्यास व करिअर कडे क्रिकेट मुळे दुर्लक्ष - आई वडिलांना लागली मुलांची चिंता.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. याचा प्रत्यय आता रायगड जिल्ह्यात सर्वत्र येत आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते मात्र रायगड मधील क्रिकेट खेळाडूना कोणतेही मर्यादा नसल्याचे दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यातील तरुण क्रिकेटच्या नादी लागून भरकटल्याने त्याची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे.मानवी जीवनात सर्वच खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ खेळत खेळीडू वृत्ती जपली पाहिजे. विविध खेळांतून तरुण राज्य, देश विदेशात प्रतिष्ठा, पैसा कमावतात हे अभिमानास्पद आहे. याच खेळ प्रकारांतील क्रिकेटने आता मैदानांसोबत शेत, माळरान, गल्लीबोळाची जागा घेतली आणि अगदी  लहानग्यांपासून वयस्कर लोकही क्रिकेट खेळत गुंतून गेलेत हे आनंदाचे आहे. दुसरीकडे गाव, वाडीपाड्यांतील अनेक तरुणांवर क्रिकेटच्या अतिवेडाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वत्र क्रिकेटच्या जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्या. पूर्वी सुट्टीच्या शनिवारी, रविवारी होणारा क्रिकेट सामना आता आठवड्यातील एकही वार सोडत नाही. त्यातून क्रिकेटच्या मायाजाळात तरुण कधी गुरफटला गेला कळलेच नाही हेच वास्तव जिल्हा, सर्व तालुक्यातून दिसून येत आहे. शहर, ग्रामीणातील तरुणाईला क्रिकेटने अक्षरशः विळखा घातला. अतिवेडाने अनेक  तरुणाईतल्या प्रखर ईच्छाशक्ती, महत्त्वकांक्षेचा बळी घेतला, स्वप्नांवर मुरड आली. जणूकाही क्रिकेटचा अतिवेड तरुणांच्या  करिअरवर घाला घाततो की काय ? असेच धाडसाने बोलावे लागेल. कंपन्यांत नोकरी, पगाराबाबत मर्यादीत महत्त्वकांक्षा, लहानशा कमाईवर समाधान मानणारा तरुण क्रिकेटच्या अतिवेडातून बाहेर येण्याचे नाव घेत नाही. क्रिकेट मुळे तरुण वर्ग बेभान झाला आहे. तरुणांसोबत शालेय विद्यार्थीही परिपाठ गिरवत आहेत. मग ऐकतोय  कोण ?  असेच अवघड जागी दुखणं झाले आहे. दरम्यान, आपापली कार्यकर्ता फॅक्टरी टिकवण्यासाठी क्रिकेट टीम, नविन फॅड आलेली लीग स्पर्धेला बक्षीस रूपातून खतपाणी घालण्याच्या पुढारी, नेत्यांच्या परंपरेत आता काही मराठी उद्योजकांनीही क्रिकेट लीगसाठी स्पॉन्सरची खैरात सुरू केल्याने तरुणांची करिअर की अधोगती असाच सवाल उपस्थित झाला आहे, तर नेते, पुढारी राजकारण, नको तो व्यवसाय उभारून मालामाल होत आहेत . उद्योजक शहरात उद्योग उभारून कुटुंबाचे राहणीमान उच्चप्रतीचे करतात, मग ग्रामीण तरुण क्रिकेटमध्ये कितपत गुंतून ठेवावीत ? याचा जरूर विचार करावा लागेल हे अधोरेखित करणे महत्वाचे आहे.

कोकण मुख्यतः रायगडातील तरुण क्रिकेट खेळात अधिक गुंतल्याचे नवीन नाही. जणूकाही  व्यसन लागले आहे. रत्नागिरी पट्टयातील तरुण शहरात वेठबिगर म्हणून वावरत आहे आणि रायगड जिल्हा मधील विविध तालुक्यातील,गाव वाडीपाड्यातील तरुण क्रिकेटच्या अधीन गेलाय हे कोणाला सांगण्याची गरज नाही. मूळात आज स्थानिक तरुण प्रशासन सेवेत उच्च पदस्थ नोकरीत नाहीत. गटविकास, प्रांत, तहसील, पोलीस क्लास वन अधिकारी नाहीत हे सत्य आहे. तरुणांत मोठी स्वप्नच नाहीत. नोकर भरती, स्पर्धा परीक्षांत टक्का नाही. वनविभाग अन्य नोकर भरतीत रायगडातील एकही तरुण नव्हता, ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे . आता खुद्द विविध ठिकाणी सुरू होणाऱ्या स्पर्धा अकादमीत किती मुले सहभाग घेतात ? याच वास्तवात स्थानिक तरुण क्रिकेटच्या दुनियेत  कमालीचा अडकून पडला आहे. नेते, पुढारी, काही उद्योजक अडकवून ठेवत असल्याचे दिसत आहे.  क्रिकेटचा वेड आता आदिवासी, ठाकूर तरुणांनाही भुरळ घालत आहे. दुचाकीवर वेगवान तीनचार तरुण जाताना दिसतात, अपघातही होतात. तरुणांत व्यसनही वाढत असल्याचे लपून राहिले नाही. याच चर्चेत क्रिकेटचे अतिवेड आजच्या तरुणांच्या करिअरवर घाला घालत आहे. गाव वाडीपाड्यातील लीग स्पर्धेसाठी आता चक्क मराठी उद्योजकही उतरलेत, बक्षीसांची खैरात करत असल्याचे समोर आल्याने चाललेय काय ? स्वतः यशस्वी उद्योजक क्रिकेट तरुणांत नेमके काय पाहतात, भविष्य काय उज्ज्वल करू पाहतात ? हे अद्याप कळले नाही. तरीही जिल्हा, तालुक्यातील काही तरुणांना क्रिकेट अँकॅडमीत प्रवेश द्यावा, देश, राज्य क्रिकेट संघात जाण्यासाठी घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.क्रिकेटच्या अतिवेडाने इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा गिळून टाकली, व्यसनाची मात्रा वाढली, आता क्रिकेट खेळातून उद्यातरी काय साध्य होते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, नेते, पुढारी सारेजण शिक्षण, रोजगारावर बोलणार नाहीत. किमान यशस्वी उद्योजकाने जाणीवा ठेवून शिक्षण, रोजगार याचे जास्तीचे भान ठेवावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिकेट खेळामुळे अनेक जणांचे भविष्य घडले तरी अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. क्रिकेट मुळे तरुण वर्ग महत्वाच्या मूळ मुद्द्यापासून भरकटला असून  क्रिकेट मुळे विद्यार्थी व तरुणांनी अभ्यास व करिअर कडे दुर्लक्ष केले आहे.मुले सतत क्रिकेट खेळत असल्याने आता आई वडिलांची चिंता वाढली आहे. त्यामुळे  जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), चिरनेर यांच्यातर्फे पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री होळी साजरी करण्याचे आवाहन !

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), चिरनेर यांच्यातर्फे पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री होळी साजरी करण्याचे आवाहन !

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था,चिरनेर-उरण संस्थेच्या वतीने नागरिकांना यावर्षी होळी सण पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री ने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नमूद करण्यात आले आहे की, होळी हा आनंद, एकात्मता आणि निसर्गाशी नाते दृढ करणारा सण असला तरी सण साजरा करताना झाडांची तोड, रासायनिक रंगांचा वापर आणि पाण्याची उधळपट्टी यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरण, झाडे व पक्ष्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.


 होळी संदर्भातील मार्गदर्शक सूचना :
संस्थेने जिवंत झाडांची तोड न करण्याचे आवाहन केले आहे. होळी पेटवताना वाळलेल्या काटक्या, शेणकांड्या व नैसर्गिक वस्तूंचाच वापर करावा. तसेच "एक गाव – एक होळी" या संकल्पनेतून सामूहिक होळी साजरी करून लाकडांची नासाडी टाळावी, पूर्वीचे व आताचे पप्रदूषणाची भीषणता पाहता वृक्षतोड थांबवून प्रतिकात्मक होळी त्याच उत्साहाने साजरी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

 रंगपंचमीबाबत जागृती :
रासायनिक रंग टाळून फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरावेत, पाण्याची उधळपट्टी टाळून कोरडी होळी खेळावी, तसेच पक्षी, प्राणी व वृक्षांवर रंग टाकू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 ‘वृक्षमैत्री होळी’ उपक्रम :
होळीनंतर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. होळीची राख सेंद्रिय खत म्हणून वापरावी. परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्यावरही भर देण्यात आला आहे.फ्रेंड्स ऑफ नेचरच्या या उपक्रमातून “झाडे वाचवा, पाणी जपा आणि सण साजरा करा जबाबदारीने” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक होळीच खरी सकारात्मक ऊर्जा देणारी होळी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.या उपक्रमामुळे उरण परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सणांचे पावित्र्य राखून जर अश्या पद्धतीने होळी व धुलीवंदन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नमूद करण्यात आले आहे की, होळी हा आनंद, एकात्मता आणि निसर्गाशी नाते दृढ करणारा सण असला तरी सण साजरा करताना झाडांची तोड, रासायनिक रंगांचा वापर आणि पाण्याची नाहक उधळपट्टी यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

संस्थेने जिवंत झाडांची तोड न करण्याचे आवाहन केले आहे. होळी पेटवताना वाळलेल्या काटक्या, शेणकांड्या व नैसर्गिक वस्तूंचाच वापर करावा. तसेच "एक गाव – एक होळी" या संकल्पनेतून सामूहिक होळी साजरी करून लाकडांची नासाडी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे

उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात मराठी भाषा दिन साजरा !!

उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात  मराठी भाषा दिन साजरा !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगर परिषदेच्या ...