Friday, 6 February 2026

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

** पदभार स्वीकारून दोनच दिवसातत रस्त्याचे काम सुरू झाले.

संदीप शेंडगे....
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ०३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.

दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. 

महापौर पद मिळताच अप्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे.

या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे.

महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे.

महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ०३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

** पदभार स्वीकारून दोनच दिवसातत रस्त्याचे काम सुरू झाले.

संदीप शेंडगे....
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ०३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.

दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. 

महापौर पद मिळताच अप्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे.

या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे.

महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे.

महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ०३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

भूमिपुत्राला वाचवायचं असेल, जगवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. ::- शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे

भूमिपुत्राला वाचवायचं असेल, जगवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही.  ::-  शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे 

नऊ तारखेचा गुलाल  हा महाविकास आघाडीचाच असेल.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे ज्योतीताई ठाकरे यांचे आवाहन.

उरण दि ६,, (विठ्ठल ममताबादे) : भूमिपुत्र जगला पाहिजे. भूमिपुत्र वाचला पाहिजे. तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही.भाजप हा भूमिपुत्रांचा, स्थानिकांचा अपमान करणारा पक्ष आहे.त्यांच्या बुडाला आग लावायची असेल तर मशाली शिवाय पर्याय नाही. असे रोखठोक विचार शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले. नवघर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील, भेंडखळ पंचायत गणाचे उमेदवार दीपक भोईर, नवघर गणाचे उमेदवार परेश ठाकूर यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता  भेंडखळ येथील विठ्ठल रखुमाईच्या  पटांगणात आयोजित केले होते. त्यावेळी ज्योतीताई ठाकरे बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगराध्यक्षा भावना घाणेकर, सेनेचे नरेश राहळकर, शेकापचे चिटणीस रवी घरत, नरेश म्हात्रे, दीपक भोईर, बळीराम ठाकूर, यशवंत ठाकूर, मधुकर ठाकूर ,मनोहर पाटील, विजय ठाकूर, कुणाल पाटील, शितल ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, सूर्यकांत ठाकूर, मधुकर भोईर, अमितदादा, अजित ठाकूर, सोनालीताई, शितलताई ,राकेश भोईर, सोनाली ठाकूर, सुरेश भोईर ,मच्छिंद्र घरत तसेच अन्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे बोलताना ज्योती ठाकरे यांनी भारताचे जनता संविधान प्रमाणे चालण्याचा आग्रह करते. माझ्या माहितीप्रमाणे राजिपची निवडणूक सात वर्ष रखडली होती. राज्यामध्ये अशा प्रकारच्या निवडणुकांची आणीबाणी कधीच आली नव्हती. भामटा जगला पाहिजे पार्टी आली. माहिती आहे ना तुम्हाला? असा खोचक प्रश्नही ठाकरे यांनी  केला. कारण पूर्वीची भाजपा राहिली नाही. ज्यावेळी अटलजी होते. सुषमा स्वराज होत्या. प्रमोदजी महाजन, मुंडे साहेब होते. त्यावेळची आम्हाला भाजप दिसत नाही. आम्हाला दिसते भामटा जगला पाहिजे पार्टी. जिकडे  कुठे काळे बेर आहे. ते शोधायचे त्याला आपल्याकडे आणायचे. आणल्यानंतर धुवायचे. मग त्याला पुन्हा सुशोभित करून मढवायचे एवढे काम करणारी ही पार्टी. बरं झालं सुप्रीम कोर्टाने आमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला दणका दिला. म्हणून जनसामान्यांचा आवाज अनेक वर्ष दबला होता. आम्हाला चिड होती. आम्हाला राग होता. आम्हाला संताप होता. आणि तोच आम्हाला बाहेर काढता येत नव्हता. कारण आम्हाला मत टाकण्याचा अधिकार सात वर्ष दिला नव्हता. तो आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिला. म्हणून ही निवडणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. खरंतर मी इथे येण्याची दोन कारणे आहेत.

 एकतर हा प्रचार या सगळ्या मंडळींचा. त्यांना निवडून द्या हे आवाहन तुम्हाला करण्यासाठी मी आलो आहे.  यावेळी भावनाताई घाणेकर यांच्याबद्दल बोलताना ज्योती ठाकरे यांनी भावनाताई या उरण नगर परिषदेमध्ये एक महिला प्रचंड तेजाने तळपत निवडून आली आहे. त्याबद्दल त्यांचे मला अभिनंदन करायचं आहे. कारण असे की भावनाताईंचा विजय हा भावनाताईंबरोबरच भावनाताईसह महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या आणि बालदीवरती नाखुश असणाऱ्या प्रत्येकाचा विजय होता. त्याला वाकवलं, झोपवलं याच्यात मी पडणार नाही. पण  त्याचे दिवस मात्र कमी राहिलेत. याची मात्र शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देऊन जाते. मुळात आमचे भूमिपुत्र. आगरी ,कोळी, कराडी समाजाचे या ठिकाणी एकत्र बसणारे. त्यांनी कधीच जातिभेद केला नाही. ही उरण माझी कर्मभूमी याचा मला अभिमान आहे. की हुतात्मांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी या ज्योती ठाकरेला काही वर्ष मिळाली आहे. इथे कोणीही कधी कोणाविषयी जातीभेद केला नाही. तो आम्हाला करायला लागला. त्याचे कारण असे की, ज्याला मते देऊन मोठा केला. तोच आमच्या डोक्यावरच्या टाळूवरचं लोणी खातोय. टाळूही शिल्लक ठेवत नाही. आणि असे जर कोणी करत असेल तर त्याला हद्दपार केल्याशिवाय उरणची जनता स्वस्थ बसणार नाही. कारण ही हुतात्म्यांची भूमी आहे. ही संपूर्ण समाजाला न्याय मिळवून देणारी ऐतिहासिक भूमी आहे. पहिल्या वेळेला चमत्कार केला. तो काय केला. कसा केला. हे आपल्याला माहिती आहे. तो निवडून आला लोकांना वाटलं कामे होतील
 पण कामे झाली नाहीत. कोविडमध्ये आमदार मदत करील .परंतु आमदार पळून गेला.तो कुठे दिसलाच नाही. दिसला तो आमचा हा आमदार सातत्याने लोकांपर्यंत पोहोचणारा, लोकांपर्यंत भिडणारा, त्यांच्या न्यायाला मागणीला यश देणारा मनोहर शेठ भोईर. हे असे दुष्टचक्र मोडायचे असेल तर आपल्याला घटनेने जो एका मताचा बहुमूल्य अधिकार दिला आहे. तो बजावल्याशिवाय आता जनता स्वस्त बसणार नाही कारण जर हा अधिकार आपण प्रामाणिकपणे, निष्ठेने, न्यायाने योग्य माणसासाठी बजावला नाही. तर या वेळेला फक्त निवडणुका लांबवल्यात. भविष्यात त्या होतील की नाही याची पण आम्हाला खात्री राहणार नाही. म्हणून आम्हाला महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे. माणसा माणसा मध्ये द्वेषभाव करायला सुरुवात सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्यांची चाल ओळखून त्यांना वेळीच ठेचता आले पाहिजे. म्हणून ही आजची प्रचार सभा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शुद्ध चरित्राचे आहेत. मी जबाबदारीने बोलते. कधीही विकली न जाणारी सत्याच्या व सच्चाईच्या बरोबर राहणारी आणि तुमच्या लोकांचा विश्वास प्राप्त करून घेऊन, तुम्हाला त्यांचे फळद्रूप व्हावे असे हे आपले तीनही उमेदवार निवडून आले पाहिजेत. हिंदू टर्मिनल बरोबर अनेक कंपनीतील कामगारांचे काम काढून त्यांना कमी केले आहे. हे कितपत बरोबर आहे. ज्या भूमीत या कंपनी उभ्या राहिल्यात. त्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यानी भूमिपुत्रांचा कडेलोट करण्याचे काम सुरू केलेले आहे. भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. म्हणून ही चिड आहे. या सर्व मंचाला. असेही  त्या म्हणाल्या. तुम्हाला माहिती आहे केंद्रात सत्ता त्यांचीच. राज्यात सत्ता त्यांची. आत्ता जिल्हा परिषद मधील सत्ता गेली तर भूमिपुत्रांच्या विषयी बोलणारी, नेतृत्व कमी करण्याची, खालसा करण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्याला आपण बळी पडू. आणि ते बळी पडायचे नसेल तर आपला आवाज असा भूमिपुत्रांचा. ही नगरी आमची आहे. हा आवाज आमचा आहे. आणि न्याय व हक्क हे भूमिपुत्रांना मिळायलाच पाहिजे. हे जर करायचं असेल तर या वेळेला मशालीचाच विचार करावा लागेल. महाविकास आघाडीवर शंभर टक्के प्रेम करणारे आपले नातेवाईक, आप्त स्वकीय आहेत. त्यांच्यापर्यंत महाविकास आघाडीचे विचार पोहोचवा. विजय खेचून आणत असताना, बालदी खोपवून पालथी केली. अशा पद्धतीने पलटी केली. की ती परत उभी राहू शकणार नाही. आणि परत जर तिने उभी राहण्याचा प्रयत्न केला. तर मात्र आगरी कोळ्यांची आमच्या भूमिपुत्रांची जात काय आहे. हे  दाखवून देऊ. धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही. ही  निवडणूक २०२९ ची नांदी आहे. सात तारखेला निवडणूक होईल. नऊ ‌ तारखेला मतमोजणी आहे. नऊ तारखेचा गुलाल हा फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचाच राहील. याची मला खात्री आहे.


आपल्या भाषणात शेवटी ज्योतीताई ठाकरे यांनी उरण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीला उभे असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभे असलेल्या प्रेरणा कुणाल पाटील, भेंडखळ पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक सुरेश भोईर, नवघर पंचायत समिती गणाचे उमेदवार परेश धनाजी ठाकूर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असेही आवाहन ज्योतीताई ठाकरे यांनी केले. या जाहीर सभेला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री शरदचंद्र पवार गट ),शिवसेना(श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ),शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र निर्माण सेना या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाणजे पंचायत समिती गणातून अक्षय म्हात्रे विजयी होणार ; नागरिकांमध्ये चर्चा !

चाणजे पंचायत समिती गणातून अक्षय म्हात्रे विजयी होणार ; नागरिकांमध्ये चर्चा !

** स्वच्छ, चारित्र्य संपन्न व उत्तम नेतृत्वामूळे निवडणुकीत मारणार बाजी.

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात चाणजे पंचायत समिती शिवसेना उमेदवार अक्षय म्हात्रे (निशाणी धनुष्यबाण )हे निवडणूक लढवीत आहेत. अक्षय म्हात्रे हे स्वच्छ, चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत व उत्तम नेतृत्वामूळे  ते निवडणुकीत बाजी मारणार असल्याची चर्चा सर्वत्र सूरू आहे. चाणजे पंचायत समिती गणाचे उमेदवार अक्षय म्हात्रे हे उच्चशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार आहेत शिवसेना (निशाणी - धनुष्यबाण) पक्षाच्या वतीने ते चाणजे पंचायत समितीची उमेदवारी लढवत आहेत. अक्षय म्हात्रे यांचे आई-वडिलांनी समाजात अनेक चांगले काम केले आहेत. कोणताही स्वार्थ न बाळगता गोर गरीब,वृद्ध,विधवा,अपंग, अविवाहित अनाथांना मदत केली आहे. विविध शासकीय सेवा योजनाचा लाभ मिळवून दिला आहे, धोबीघाट बांधले, अक्षय म्हात्रे हे निवडून आल्यानंतर प्रकल्पबाधीत शेतकरी व मच्छिमार बांधवांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार,पाणी वीज रस्ते या मूलभूत सुविधा जनतेला मिळवून देणार.रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणार. २४ तास जनतेसाठी कार्यरत राहणार असे अक्षय म्हात्रे यांनी सांगितले. कोणतेही मोठे पद नसतानाही अनेक विकास कामे अक्षय म्हात्रे यांनी केली आहेत.कोंढरीपाडा डिपी ते कासवले रस्त्याला विजेची व्यवस्था केली आहे. हनुमान मंदिर कोंढरी पाडा ते  कोंढरी पाडा डिपी या ठिकाणी स्ट्रीट लाईट तसेच बापदेवपाडा ते कासवलेपाडा बंदर किनारी रस्त्याला लाईट बसण्यासाठी पाठपुरावा, प्रयत्न केले.आणि लवकरच ते काम पूर्णत्वास नेणार. अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली. असे अनेक विकासकामे करून अक्षय म्हात्रे यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावली आहेत.उत्तम कार्य केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे . अशा उमेदवाराला जनता नक्कीच निवडून देईल अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.नाक्या नाक्यावर सर्वत्र अक्षय म्हात्रे यांच्याच विजयाची चर्चा सुरु आहे

वरद गावंडचे 'शांततेच्या प्रवासात' हे जलरंगामधील चित्र बेळगाव प्रदर्शनात !

वरद गावंडचे 'शांततेच्या प्रवासात' हे जलरंगामधील चित्र बेळगाव प्रदर्शनात !

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : बेळगाव कर्नाटक येथील के. बी. कुलकर्णी स्मृती दिना निमित्ताने २०२६ चित्रकला प्रदर्शनामध्ये देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्टचा विद्यार्थी तथा उरण तालुक्याचे सुपुत्र वरद विलास गावंड याने काढलेले 'शांततेच्या प्रवासात' हे जलरंग चित्र निवडण्यात आले आहे. हे चित्र संधिप्रकाशातील समुद्राची संथ आणि शांत अवस्था अचूकपणे टिपते. निळ्या रंगाचे शीड असलेले एक छोटे जहाज संथ लाटांवर विसावले असून, ते समुद्राच्या शीतल छटांशी एकरूप झाले आहे. आकाशात रंगांची जणू एक मैफलच भरली आहे—गर्द निळा रंग हळूहळू गडद केशरी आणि कोमल पिवळ्या रंगात मिसळत मावळत्या सूर्याचे सात्विक सौंदर्य प्रतिबिंबित करत आहे. क्षितिजावर पक्ष्यांचे थवे मुक्तपणे विहार करत असून ते स्वातंत्र्याची जाणीव करून देतात. ही कलाकृती एकांत आणि निसर्ग अन् मानवाच्या चिरंतन नात्याचे दर्शन घडवते. हे चित्र १५ बाय २१ इंच आकाराच्या कागदावर जलरंग माध्यमात साकारले आहे. 

    हे प्रदर्शन बेळगाव येथील वररेकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पहावयास मिळेल. वरदच्या या यशामागे कॉलेजच्या प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाचे लाभलेले बहुमोल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. कॉलेजचे संस्थापक अजय पित्रे, कला कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

उरण पोलीस ठाणे ने घेतला रूट मार्च !!

उरण पोलीस ठाणे ने घेतला रूट मार्च !!

** नागरिकांनी शांततेने मतदान करावे,  पोलीस प्रशासनातर्फे आवाहन

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उरण पोलीस ठाणे ने जासई, चिरनेर, कोप्रोली व चांणजे गावात रूट मार्च घेतला. या रूट मार्चचा उद्देश शांतता राखणे आणि मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करणे हा होता.

रूट मार्च जासई पोलीस चौकी येथून सुरू होऊन, जासई, चिरनेर, कोप्रोली व चांणजे गावातून फिरून उरण एस.टी.स्टँड चारफाटा येथे समाप्त झाला. या रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहूल काटवाणी, ०७ सपोनि/ पोउपनिरी, १५ पोलीस अंमलदार, तसेच RCP चे ०१ अधिकारी व १९ अंमलदार व QRT चे १० अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.

तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे, तर मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.तर उरण पोलीस ठाणे ने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ठाणे ने शांतता राखण्याचे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भाजपच्या उमेदवारांना जनतेची सर्वाधिक पसंती !!

भाजपच्या उमेदवारांना जनतेची सर्वाधिक पसंती !!

** भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून येणार 

उरण दि ५(, विठ्ठल ममताबादे) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ उमेदवार निवडण्याची नसून परिसराच्या विकासाची, मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे.

भारतीय जनता पार्टीकडून नवघर जिल्हा परिषद  श्रीमती प्रभावती भोईर, भेंडखळ पंचायत समिती मधून मिलिंद पाटील तर नवघर पंचायत समिती साठी उभे असलेले उमेदवार हरेश शेठ भोईर, हे तिन्ही कर्तव्यदक्ष उमेदवार आमदार महेश शेठ बालदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहेत.विजय विकास सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. गोरगरिबांना मदत, युवकांना प्रोत्साहन, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे.संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक विजय भोईर यांनी बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून केलेली प्रामाणिक सेवा सर्वांना परिचित आहे. आज गरज आहे ती अनुभव, काम आणि विश्वास असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे.“जिथे विश्वास तिथे विकास” “आजचा योग्य मतदान, उद्याचा उज्ज्वल भविष्य” म्हणूनच,या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा वाढला असून हे उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी चर्चा जनतेतून सुरु आहे.

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !!

महापौर हर्षाली चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने पॅनल क्रमांक ३ मध्ये डांबरीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात !! ** पदभार स्वीकारून दोनच दिवसातत रस...