Monday, 20 April 2026

भांडुप येथे भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन !!

भांडुप येथे  भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन !!

मुंबई (पंकजकुमार पाटील) - सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. घरोघरी पालक, नातेवाईक आपल्या मुलांसाठी सुयोग्य वधु वा वर शोधण्याच्या तयारीला लागलेले दिसतात. पालकांचा हा लग्नाचा  ताण हलका करून त्यासाठी सहकार्य  करायला  मुंबईतील आगरी समाज विकास संघ दरवर्षी वधु वर मेळावे भरवून समाजकार्य करण्याचे काम करीत असतो .
   हाच हेतू समोर ठेऊन आगरी समाज विकास संघ, मुंबई व स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा रविवार दि. २६ एप्रिल  २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान, भांडुप स्टेशन रोड, भांडुप (पश्चिम ), मुंबई  याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

     या कार्यक्रमासाठी वधू वर यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. सोबत नवीन उमेदवार असेल तर ३ बाय ४ चे दोन फोटो, तसेच उमेदवाराची जुनी नोंद असल्यास संस्थेने दिलेली नोंदवही आणण्याची सूचना करण्यात आली आहे.
      तेव्हा या मेळाव्यासाठी आगरी समाजातील इच्छुक वधु - वर उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी धनाजी म्हात्रे- 98690 07754, सागर पाटील- 97735 29747, संजय म्हात्रे- 99679 72206, श्याम नाकटे- 99696 20057 यांच्याशी  संपर्क साधावा. 


(बातमीदार मो. 9833127069)

सावंतवाडी संस्थान चा ९८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

सावंतवाडी संस्थान चा ९८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !!

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांचा ९८ वा वर्धापन सोहळा नुकताच, मराठा वैभव समाजगृह, नानासाहेब सभागृह, स्टार मॉल, न चिं. केळकर मार्ग, दादर (पश्चिम ) येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
     'राजमाता जिजाऊ ' एकपात्री २५ वा प्रयोग - आरती मुनीश्वर यांनी सादर केला. एकपात्री भूमिकेची संकल्पना, संहिता लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, त्यांनी स्वतः केली होती. कोणत्याही नेपथ्या शिवाय सादरीकरण करणारी, महाराष्ट्रातील एकमेव स्त्री कलाकार म्हणून आरती मुनीश्वर यांची ख्याती आहे. त्यांनी सर्व प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले.

     या सोहळ्यास प्रमुख पाहुणे - मुख्य आयकर आयुक्त ( सेवा निवृत्त ) व मराठा बिझनेस फोरम चे अध्यक्ष - अरुण पवार, व उपाध्यक्ष - राजेंद्र घाग, आमदार महेश सावंत, सानेगुरुजी पुरस्कार विजेते - विजय सावंत, शिवसेना ( उबाठा ) शाखा प्रमुख (बोरिवली )- विजय पवार, मराठा फेडरेशनचे अध्यक्ष - जी एस परब, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार, संस्थेच्या महिला अध्यक्षा - सुचेता सावंत, उपस्थित होते.
     उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष - इंद्रजित सावंत, व्यवस्थापकीय विश्वस्त - सतीश सावंत, कार्याध्यक्ष - शशिकांत गावडे, विश्वस्त - दिवाकर दळवी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आला.
      या सोहळ्यास सर्व पदाधिकारी, मुंबई व मुंबई बाहेरील संस्थेचे सभासद उपस्थित होते, सत्यनारायण पूजेचे यजमान सौ / श्री लक्ष्मण सावंत यांनी सांभाळले होते. 
      संस्थेचे अध्यक्ष - इंद्रजित सावंत यांनी, सर्वांनी संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असून, सहकार्य करण्याचे आवाहन करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - प्रा. निता खानविलकर यांनी केले होते.

Sunday, 19 April 2026

कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न !!

कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न !!

प्रतिनिधी :- निलेश कोकमकर 

 कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न ‘कुणबी युवा मुंबई’ सलग्न शिक्षण विभाग यांच्या वतीने रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी परळ येथील कुणबी ज्ञातीगृह (वाघे हॉल) मध्ये ‘भविष्यवेध: करिअर मार्गदर्शन शिबिराचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांनी आताच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात योग्य दिशा निवडून यशाचे शिखर गाठावे, या उद्देशाने आयोजित या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  या शिबिरात ठाणे येथील संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक सन्माननीय मंगेश बोरकर सर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ पारंपरिक पदवी शिक्षणावर मर्यादित न राहता UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षा, आधुनिक क्षेत्रांतील करिअर संधी आणि व्होकेशनल कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. "मुलांच्या आवडीनुसार करिअर निवडताना पालकांनी त्यांना दडपण न देता पाठबळ द्यावे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले.

   विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपणाला काय करावे हे १० वी आणि १२वी नंतरच विचार न करता त्याची तयारी ५वी ते ७वी पासूनच व्हायला हवी असे कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपिका आग्रे मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुणबी युवा मुंबईचे युवाध्यक्ष श्री. युवराज कांबळे सर यांनी आपल्या मनोगतातून तरुणांना संघटित होऊन प्रगती करण्याचे आवाहन केले.

    या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. निलेश कुळये  यांनी केले. प्रास्ताविकात युवासचिव श्री. सचिन रामाणे यांनी शिबिराची भूमिका स्पष्ट करून  युवकांनी शिबिरात सहभाग घेतला पाहिजे त्यातून येणाऱ्या काळातील दशा आणि दिशा समजते असे मत व्यक्त केलं. तर *शिक्षण विभागाचे सदस्य श्री. शशांक रांगळे सर आणि प्रचारक - निळकंठ शां. तांबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

     यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, युवा पदाधिकारी, तालुका शाखा आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी पद्धतीने संपन्न झाला. शिक्षणातून क्रांती आणि करिअरमधून प्रगती, हाच मंत्र घेऊन 'भविष्यवेध' शिबिराने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे.

वाघाटी ( Rusty spotted cat ) जातीच्या दुर्मिळ रानमांजराला त्याच्या अधिवासात केलं मुक्त !!

वाघाटी ( Rusty spotted cat ) जातीच्या दुर्मिळ रानमांजराला त्याच्या अधिवासात केलं मुक्त !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : जंगलतोड, वाढते शहरीकरण, आणि पशु पक्षांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण,बेकायदेशीरपणे केली जाणारी पशुपक्ष्यांची शिकार या सारख्यां बाबींमुळे निसर्गातील अनेक पशुपक्ष्यांच्या व वन्यजीवांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत त्यातलीच एक घटना उरण तालुक्यातील धुतूम गावाच्या हद्दीत पाहायला मिळाली. धुतूम गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद धावजी ठाकूर हे सकाळी वाॅकिंगसाठी जात असतानां त्यांना रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल होतांना दिसली. धुतूम हद्दीत कुण्या अज्ञात इसमाने लावलेल्या फासकित ( फासात ) वाघाटी ( Rusty spotted cat) जातीची रानमांजर अडकलेल्या अवस्थेत शरद ठाकूर यांना पाहायला मिळाली लागलीच त्यांनी सामाजिक कार्यात आणि  खास वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात अग्रेसर असणारी ज्या संस्थेच्या  माध्यमातून आज पर्यंत अनेक प्राणी-पक्षांना, वन्यजीवांना वाचविण्याचं काम करून त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त करण्याचं काम केलं अशी प्राणीमित्र संघटनां अर्थात केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि प्राणीमित्र महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर  व प्रविण कडू  यांना ह्या गोष्टीची माहिती देऊन कळविण्यात आले. ही माहिती मिळताच लागलीच राजू मुंबईकर यांच्या सोबत केअर ऑफ नेचर संस्थेची टीम घटनास्थळी जावून जागेची पाहणी करून लागलीच त्या  फासकी ( फासा) मधून त्या  वाघाटी जातीच्या  ( Rusty spotted cat) रानमांजराची अगदी सुखरूपपणे सुटका करून तिला एका लोखंडी पिंजर्‍यात आणून लागलीच राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र वनविभाग उरण वनपरिक्षेत्राचे वनपाल सुनिल महाडिक  यांना कळविण्यात आले व त्या वाघाटी जातीच्या रानमांजराला कुठलीच इजा झाली नसल्या कारणामुळे तिला  मौजे वेश्वी -  उरण येथील जंगलात वनगार्ड राजेंद्र करांडे यांच्या समक्ष त्यांच्या अधिवासात मुक्त संचार कारणासाठी सुखरूपपणे मुक्त करण्यात आली.अत्यंत लाजाळू आणि निशाचर असणारी प्रजाती ( Rusty spotted cat )मराठीत हीला  वाघाटी म्हणतात. जगातील आकाराने सर्वात लहान असणारी मांजर (रानमांजर) इंग्रजी नावाप्रमाणेच तीचं शरीर एखाद्या गंज लागलेल्या धातूच्या रंगाप्रमाणे असते ह्या रंगामुळेच ती आपल्या अधिवासात बेमालूमपणे मिसळून जाते. निशाचर आणि त्यात अत्यंत लाजाळू असल्यामुळे वाघाटीचे दर्शन सहजपणे होत नाही त्यामुळेच ही मांजर दुर्मिळ प्रजातीची मानली जातोय.

    वाघाटी जातीच्या रानमांजराला वाचण्यासाठी  उरण -धुतूम गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकूर , निकेश मढवी, कपिल घरत, प्रतिक ठाकूर, देवेंद्र ठाकूर आणि  धुतूम गावातील ग्रामस्थ सोबतच केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर,प्रविण कडू आणि काॅन संस्थेचे टीम यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्वांच्या प्रयत्नातून वाघाटी जातीच्या ह्या दुर्मिळ रानमांजराची सुखरूपपणे सुटका करून तीला तीच्या मुक्त अधिवासात ( जंगलात ) मुक्त संचार करण्यासाठी मुक्त केल्याने ह्या सर्वांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे

संविधान जागरण परिषदेत विशाल कुरकुटे यांचा गौरव !!

संविधान जागरण परिषदेत विशाल कुरकुटे यांचा गौरव !!


मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई मराठी युवा पत्रकार संघ, मुंबई आदर्श फाउंडेशन व ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान जागरण परिषद – २०२६ या राज्यस्तरीय सोहळ्यात समाजसेवक व पत्रकार विशाल कुरकुटे यांना “भारतरत्न गौरव श्री” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार शिवश्री काझी सोहेल यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. काझी सोहेल हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वरिष्ठ वकील घराण्यातील शिवश्री काझी हैदर यांचे १३ वे वंशज असल्याचे सांगण्यात आले.

समाजकार्य व पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विशाल कुरकुटे यांना हा सन्मान देण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवचैतन्य मिळणार असून समाजात प्रेरणादायी संदेश पोहोचणार आहे. कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 18 April 2026

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ ने सन्मानित !!

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ ने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर)
            मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आणि आदर्श मुंबई फाउंडेशन तसेच ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स, संविधान जागरण परिषद -२०२६ च्यावतीने भारत रत्न गौरव श्री पुरस्कार   -२०२६  वितरण सोहळा नुकताच विक्रोळी पूर्व येथील विकास कॉलेज सभागृह, कन्नवार नगर येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला. पुरस्कार सोहळ्यात घाटकोपर येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक, मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील कामगिरीसाठी "भारत रत्न गौरव श्री  पुरस्कार-२०२६ मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारला. त्यांच्या सोबत राजेंद्र पेडणेकर, प्रकाश कुष्टे हे सहकारी उपस्थित होते.
              यावेळी व्यासपीठावर संजय भोईर आयोजक, शिवश्री काजी सोहेल शेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव वकील पारसनीस शिवश्री काजी हैदर यांचे तेरावे वैशज, सुभेदा महेंद्र गवई भारतीय लष्कर, सानिका मोजर अभिनेत्री, ज्योतीताई दुराफे उपाध्यक्ष महिला मोर्चा मुंबई,आदी सामाजिक क्षेत्राबरोबरच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम व नेटनेटके आयोजन मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आणि आदर्श मुंबई फाउंडेशन तसेच ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स, संविधान जागरण परिषद यांच्यातर्फे करण्यात आले होते.
                 दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो.यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या घाटकोपर येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार यशवंत खोपकर याना विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.
              सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना " भारत रत्न गौरव श्री पुरस्कार- २०२६ देण्यात आला.गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या याच कार्याचे  कौतुक म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, दौलत बेल्हेकर, वसंत घडशी, गंधाली मयेकर, निर्मला आवटे, राजेंद्र पेडणेकर, संतोष चादे, वैभव डोके, महेश कुलकर्णी, विश्वास तेली, राजेंद्र चिखलकर, संतोष होलब यांच्या सहकार्यने यशवंत खोपकर सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

दैनिक बातमीदार प्रतिनिधी: ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा.श्री.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. एप्रिल १७ ते २१ २०२६ या कालावधीत दु. १२.०० ते सायं. १६.३० या वेळेत पोलिस वाहतूक नियंत्रण हॉल, पोलिस उपायुक्त, कार्यालय, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०९/२०२६ सुरू करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षणामध्ये एकूण ५६ RSP शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

     प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी श्री. अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक व मानसेवी निदेशक श्री. बिमल नथवानी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर केलीत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांना नागरी संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांची सखोल माहिती मिळाली.

     यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या कार्याबद्दल प्रोत्साहन दिले. सदर प्रशिक्षणाचे प्रभारी म्हणून सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित कार्यरत आहेत.

    हा प्रशिक्षण वर्ग आगामी दिवसांत विविध उपयुक्त विषयांवर आधारित असून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

     सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, नागरी संरक्षण दलाचे उपमुख्य क्षेञरक्षक, १, २, ४ व डाॅ.किशोर आढळकर, RSP चे श्री.स्वामी सर, शिंपीसर, अनेक प्रशिक्षक व ठाणे मनपा विभागीय आपत्ती व्यवस्थापन (RDMC) विभाग व TDRF चे प्रभारी श्री.यासिन तडवीजी उपस्थित होते.

     काही छायाचित्रे वरिष्ठांना माहितीसाठी सविनय सादर करण्यात आली आहेत.

– DCCD, NMC, ठाणे.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

भांडुप येथे भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन !!

भांडुप येथे  भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन !! मुंबई (पंकजकुमार पाटील) - सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. घरोघरी पालक, नाते...