Tuesday, 7 July 2026

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

** उरणचा विनाशकारी पाऊसः ३५ वर्षांची जुनी 'पाणी वाट' आणि प्रशासकीय ढिसाळपणाचा बळी  ; विविध उपाय योजना करण्याची  मागणी.


उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) :
रात्रीच्या वेळी डोळ्यासमोर आपल्या हक्काचे घर, संसार आणि आयुष्यभराची पुंजी पाण्याखाली जात असताना, एका बापाची होणारी घालमेल तुम्ही कधी अनुभवली आहे का ? पावसाच्या पाण्याचा आवाज आता शांततेचा संदेश देत नाही, तर तो उद्याच्या विनाशाची चाहूल देतोय. कालपर्यंत ज्या मातीत आपली मुले खेळली, तिथे आज साचलेल्या घाण पाण्यामुळे आजारांचे सावट आहे. उरणमध्ये अवघ्या काही तासांच्या पावसाने शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आणि सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. हे फक्त साचलेले पाणी नाही, तर ही प्रशासनाच्या अनास्थेची आणि मानवनिर्मित चुकांची 'तीव्र प्रतिक्रिया' आहे.असे परखड आक्रमक व स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी अलंकार कडू यांनी व्यक्त केले आहे.

३५ वर्षापूर्वीचे नियोजन आणि आजची भीषण वास्तवता यात खूपच फरक आहे.गेल्या चार दशकांपूर्वी उरणची भौगोलिक स्थिती आणि लोकवस्ती लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक ओढे आणि नाले निश्चित करण्यात आले होते. पाऊस पडला की तो ओक्रयातून खाडीत आणि खाडीतून समुद्रात जाणे हे निसर्गाचे चक्र होते. मात्र, आज ३५-४० वर्षांनंतरही आपण त्याच जुन्या नियोजनावर अवलंबून आहोत.

शहराचा विस्तार झाला, पण पाण्याचा मार्ग मात्र अरुंद झाला. उरणमध्ये मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची निर्मिती करताना त्यांच्या अंतर्गत रस्त्यांनी, भिंतींनी आणि बांधकामांनी पावसाच्या पाण्याचे हे नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाचित वेन्ले आहेत. पाणी वाहून जाण्याच्या वाटा आपण मोकळ्या ठेवल्याच नाहीत, मग पूर येणार नाही तर काय होईल ? असा सवाल अलंकार कडू यांनी उपस्थित केला आहे.

विकासाचा हव्यास की विनाशाचा मार्ग यावर बोलताना अलंकार ठाकूर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.उरणमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, ज्यांनी उरणच्या अर्थव्यवस्थेला गती दिली असेल, पण त्या बदल्यात येथील स्थानिक ग्रामस्थांना काय मिळाले ? दरवर्षी पावसाळ्यात आपल्याच घरात गुडघाभर पाणी साचलेले पाहणे, हेच नशिबी आले आहे का ? आपण प्रगतीच्या नावाखाली 'स्मार्ट सिटी आणि 'औद्योगिक हब'ची स्वप्ने पाहतोय, पण ज्या शहरात पावसाचे पाणी सुरक्षितपणे समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, तिथे आपण 'प्रगती' केली आहे की 'विनाश' ओढवून घेतलाय ? जर निसर्गाचा कोप वाढला आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले, तर मग आपल्या या सिमेंटच्या इमारती आणि कंपन्यांचा नफा आपल्याला वाचवाचला येतील का ? आता तरी जागे व्हा!

पाण्याचे नैसर्गिक मार्ग अडवून किंवा बुजवून केलेले हे बांधकाम आजच्या पूरस्थितीला जबाबदार आहे. जर आपण आताच आपल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला जाब विचारला नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.नैसर्गिक प्रवाहांचे सर्वेक्षण केले पाहिजे.उरणमधील सर्व बंद झालेले ओढे आणि नाले तातडीने मौकळे करणे.कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.ज्या प्रकल्पांमुळे पाण्याचे मार्ग बंद झाले आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून पर्यायी जलवाहिन्यांची युद्धपातळीवर निर्मिती करणे.भविष्यातील नियोजन केले पाहिजे केवळ काँक्रीटवर भर न देता, पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी आधुनिक ड्रेनेज सिस्टिम विकसित करणे आदी उपाय या समस्यावर करता येतील.

उरणचा विकास होत असताना तो इथल्या सामान्य नागरिकांच्या जीवावर उठणारा नसावा. आज उरणचे गावकरी जो फटका सहन करत आहेत, तो पुन्हा होऊ नये, यासाठी आता केवळ चर्चा नको, तर ठोस कारवाई हवी.विकास लोकांचा व्हावा, केवळ कागदावरचा नको! असे परखड व स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून डॉक्टर व नर्सना मारहाण; डॉक्टरांचा कामबंद आंदोलन !!

कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून डॉक्टर व नर्सना मारहाण; डॉक्टरांचा कामबंद आंदोलन !!

*डोंबिवली, विनोद गीरी* : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोपरा परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी सायंकाळी लज्जास्पद प्रकार घडला. शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन दोन डॉक्टर व दोन परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

*प्रसंग काय घडला?*  
सोमवारी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचे सीझर करण्यात आले होते. नवजात बाळाच्या नाळेला दोन फेऱ्या असल्याने त्याला विशेष उपचारांची गरज होती. मात्र रुग्णालयातील अति दक्षता विभाग पूर्ण भरलेला असल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

या वेळी नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त असल्याने त्यांनी फोनवर प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर नगरसेवक रुग्णालयात पोहोचून शिवीगाळ करत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.

*प्रशासनाकडे तक्रार, गुन्हा दाखल नाही*  
घटनेची माहिती तातडीने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, जखमी डॉक्टर व कर्मचारी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

*डॉक्टरांचा कामबंद आंदोलन*  
या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांतील डॉक्टर व परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामुळे ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून केवळ इमर्जन्सी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी बीएसएनएलकडून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण !!

अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी बीएसएनएलकडून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण !!

भारत सरकारच्या पीएम विकास योजनेअंतर्गत भारत संचार निगम लिमिटेड यांच्या झोनल टेलिकॉम प्रशिक्षण केंद्र, शाहूनगर, चिंचवड येथे अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क तंत्रज्ञ व वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण तसेच एक महिन्याचे कार्यस्थळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पात्र प्रशिक्षणार्थींना दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारशी समाजातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील बारावी उत्तीर्ण युवक-युवती तसेच पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, डिप्लोमा व पॉलिटेक्निकचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व दिव्यांग उमेदवारांसाठीही मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४०३१२८३८८, ९४२५८००९७८ किंवा ९४२५८००७९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

बारावी जलशुद्धीकरण केंद्रातील उल्हास नदीपात्रातील मुख्य जलवाहिनी फुटली !!

बारावी जलशुद्धीकरण केंद्रातील उल्हास नदीपात्रातील मुख्य जलवाहिनी फुटली !!

** कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या उल्हास नदीपात्रातून जाणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे ४८ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे खडकपाडा उंबर्डे, सापर्डे, कल्याण पश्चिम तसेच काही प्रमाणात डोंबिवली येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुख्य जलवाहिनीला तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर काही भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जलवाहिनी नदीपात्रात असल्याने दुरुस्तीचे काम आव्हानात्मक ठरत असून संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंते आणि कर्मचारी अखंडपणे कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय होणार असून आवश्यकतेनुसार पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याबाबतही प्रशासन विचार करत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदय सूर्यवंशी यांनी केले आहे.

आंबिवली–टिटवाळा मुख्य रस्त्यावर पडले भलेमोठे भगदाड !!

आंबिवली–टिटवाळा मुख्य रस्त्यावर पडले भलेमोठे भगदाड !!

** ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाईची मागणी

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आंबिवली ते टिटवाळा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर तब्बल सहा फूट खोल व मोठे भगदाड पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत खड्डा भरून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, हा केवळ तात्पुरता उपाय असून रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेसाठी निकृष्ट दर्जाचे काम आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने रस्त्यात भले मोठे भगदाड पडले याला ठेकेदार आणि पालिका अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पावसाचे पाणी दीर्घकाळ रस्त्यावर साचल्यामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला तर पाणी साठल्याने भले मोठे रस्त्यावर भगदाड पडले. या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमत करून मोठा आर्थिक लाभ घेतला आहे असा आरोप नागरिकांनी केला

या रस्त्याच्या बांधकामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तब्बल ९ कोटी ४१ लाख रुपये खर्च केले आहेत मात्र, एवढ्या मोठ्या निधीनंतरही रस्ता अल्पावधीतच खचल्याने कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत, सहा फूट खोल भगदाड पडणे ही अत्यंत निष्काळजीपणाची बाब असल्याचे सांगितले. "९ कोटी ४१ लाख रुपयांचा रस्ता काही काळातच खड्ड्यात गेला असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली.

या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्ते बांधकामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Monday, 6 July 2026

बारवी धरणाची पाणीसाठा स्थिती अद्याप चिंताजनक !!

बारवी धरणाची पाणीसाठा स्थिती अद्याप चिंताजनक !!

धरणात केवळ ३०.०६ टक्के जलसाठा

कल्याण संदीप शेंडगे, दि. ६ जुलै : कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा अद्याप समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. ६ जुलै २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार धरणात केवळ ३०.०६ टक्के पाणीसाठा असून उपलब्ध पाणीसाठा १०९.८८ दशलक्ष घनमीटर इतका आहे.
सध्या धरणाची पाणीपातळी ६०.१८ मीटर असून धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. आजपर्यंत धरण क्षेत्रात १४७.८० मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण सरासरी पाऊस ६२८.०० मिमी इतका झाला आहे.

मागील वर्षी याच दिवशी (६ जुलै २०२५) बारवी धरणात ६३.४३ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी धरणाची पाणीपातळी ६७.८० मीटर तर उपलब्ध पाणीसाठा २१४.२८ एम सी एम इतका होता. तसेच त्या कालावधीत धरण क्षेत्रात ९८१७.०० मिमी पावसाची नोंद झाली होती.
यंदा मागील वर्षाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची आवश्यकता असून बारवी धरणातील जलसाठ्यावर नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

स्व. वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त मोहने येथे 'विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा 2026' !!

स्व. वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त मोहने येथे 'विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा 2026' !!

*आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार*  

*मोहने, (संदीप शेंडगे) :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त मोहने येथे संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 'विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा 2026' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.

*गुणवंतांचा सत्कार*  
यावेळी बंजारा समाजातील इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवीधर गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजाला नवी दिशा मिळते, असे आमदार पवार म्हणाले.

*मान्यवरांची उपस्थिती*  
कार्यक्रमाला राष्ट्रीय बंजारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकनजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रीय बंजारा टायगर्स प्रदेशाध्यक्ष सतीश राठोड उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष अंबादास पंडित राठोड, उपाध्यक्ष पोपट राठोड, सचिव सुनील जाधव, खजिनदार ईश्वर राठोड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गोर बंजारा समाजबांधव, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आयोजित केला होता.

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !! ** उरणचा विनाशकारी पाऊसः ३५...