Sunday, 3 May 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

 ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध कामगिरीचे मान्यवरांकडून विशेष कौतुक

ठाणे प्रतिनिधी: ता. ३, महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे २०२६ रोजी साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला परेड संचलनाचा भव्य आणि दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.           

     या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणेचे पालकमंञी मा.श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी सरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यक्षेञरक्षक आमदार श्री.संजय केळकर, ठाणे महापौर सौ. शर्मिला पिंपळकर, उपमहापौर अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

     या सोहळ्यात पोलीस दल, वाहतूक नियंत्रण विभाग, अग्निशमन दल, केडीएमसी मालमत्ता विभाग, होमगार्ड, नागरी संरक्षण दल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त सहभाग घेत उत्कृष्ट संचलन सादर केले.

     नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका तालात संचलन करून महाराष्ट्राच्या एकतेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडविले. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाला हीच खरी मानवंदना ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

     नागरी संरक्षण दलाच्या परेडचे नेतृत्व महिलांकडे सोपविण्यात आले होते. परेड कमांडर म्हणून सौ.भारती सतीश देशमुख, उपविभागीय क्षेञरक्षक, वागळे ईस्टेट, ठाणे यांनी अत्यंत रुबाबदार नेतृत्व केले, तर सुपरनंबरी म्हणून सौ.रोहिणी आदेश गोलतकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पथकाने उत्कृष्ट संचलन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

     सदर परेडसाठी गेले पंधरा दिवस स्वयंसेवकांनी कडक उन्हाची पर्वा न करता अत्यंत मेहनत, शिस्त आणि समर्पणाने सराव पूर्ण केला होता. या अथक परिश्रमांची दखल घेत नागरी संरक्षण दलाचे मा.उपनियंत्रक श्री.विजय जाधव, सहाय्यक उपनियंत्रक सौ.दीपा घरत मॅडम, उप मुख्य क्षेत्ररक्षक, ठाणे विभाग १, २, ३ व ४ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी स्वयंसेवकांना सत्काररूपी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

     यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त प्रमाणपत्रांवर त्यांचे प्रेरणादायी छायाचित्र व विचार समाविष्ट करून प्रमाणपत्रांना विशेष स्वरूप देण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवानी यांचे विशेष योगदान लाभले. स्वयंसेवकांसाठी आवश्यक जॅकेट्स व कॅप्स उपलब्ध करून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे तसेच संपूर्ण पथकाचा उत्साह कायम ठेवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. याशिवाय श्री.संजय मगर श्री.हनुमान चौधरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक सुब्रमन्यम मुरुगन तसेच अरुण सातपुते यांनीही सातत्याने सहकार्य व प्रेरणा दिली.

   ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ सर यांनी नागरी संरक्षण दलाच्या शिस्तबद्ध संचलनाचे विशेष कौतुक करत स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच मुख्य क्षेत्ररक्षक श्री.संजयजी केळकर यांनीही स्वयंसेवकांच्या समर्पित कार्याचे अभिनंदन केले.

     याच अनुषंगाने नागरी संरक्षण अंबरनाथ कार्यालय येथेही मा. उपनियंत्रक, नागरी संयक्षण श्री.विजय जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कार्यालयीन कर्मचारी, विभागीय क्षेत्ररक्षक, उपविभागीय क्षेत्ररक्षक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     “आजचा हा गौरवशाली सोहळा म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाचे मोत्यात रूपांतर झाल्याचा क्षण आहे. संघटनेशी एकनिष्ठ राहून भविष्यातही अशाच उत्साहाने कार्यरत राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.” अशी भावना व्यक्त करत आगामी २६ जानेवारीच्या परेडसाठी नव्या जोशाने तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या शेवटी “जय हिंद! जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी संपूर्ण साकेत मैदान देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेले. 🇮🇳🚩

https://www.youtube.com/live/tAls--eTT5I?si=9D9FeFA88iK8sWhF


वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)

Saturday, 2 May 2026

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे :

मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा पटांगणात आयोजित हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. हिंदू समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा  वाढवली.

या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून यशोदाताई पाटील आणि हर्षदाताई केणे यांनी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीवर सखोल भाष्य केले. आपल्या हिंदू परंपरेचा आणि महापुरुषांचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर  मांडला त्यांनी विशेषतः मुलींना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. "लव्ह जिहाद" आणि "लँड जिहाद" सारख्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुलींनी सावध राहावे, कोणत्याही आंधळ्या प्रेमाला बळी पडू नये, तसेच पालकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन केले. 

वक्त्यांनी हिंदू धर्माची महानता पटवून देताना इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांची उत्तम छान मांडणी करत उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांनी हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुलजी मिश्रा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदू समाजातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकमेकांना मदत करून सुखदुःखात एकत्र राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील ऐक्य आणि परस्पर सहकार्य यामुळेच समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन देवसर यांनी उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व  भावनिक वातावरणात संपन्न !!

जुचंद्र (प्रतिनिधी) –ता. २, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एम. पी. ज्युनिअर कॉलेज, जुचंद्र येथील वरिष्ठ लिपिक मा. श्री. सुरेश तुकाराम राऊत सर (एम.ए. स्टेनो) यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ दि. ३० एप्रिल २०२६ रोजी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

सुमारे ३४ वर्षे ६ दिवस प्रदीर्घ, प्रामाणिक, समर्पित आणि आदर्श सेवेनंतर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्या श्री.सुरेश राऊत यांनी आपल्या जिद्द, कर्तृत्व आणि सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिव्यांग असूनही त्यांनी यांच्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत अनेक पदके, पुरस्कार व सन्मान प्राप्त केले असून विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आज त्यांचे नॅशनल  ट्रष्टच्या माध्यमातून दिव्यांग अर्थात मतिमंद मुलांसाठीचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. 

तसेच ते २० वर्षापासुन दिव्यांग कर्मचारी किंवा ईतर दिव्यांग व्यक्तिच्या समस्या, कोणत्याही अडचणी असोत त्या सोडविण्याचे प्रेरणादायी कार्य ते  करत आहेत. आज पर्यन्त ते जिल्हा व राज्यस्तरीय दिव्यांग व्यक्तिचे नेतृत्व करीत आहेत. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती, जुचंद्रचे अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम पाटील साहेब हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोज रानडे साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. पालघर मा. श्री. अशोक पाटील साहेब, अध्यक्ष, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर चे  श्री बाळाशेठ पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. विनयजी पाटील साहेब,  स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब तसेच वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. कन्हैया भोईर साहेब व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.  जनार्दन म्हात्रे, मा.श्री. हरिहर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

सत्कारमूर्ती श्री सुरेश राऊत सर यांचे कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामध्ये त्यांचे मोठे बंधू श्री. शांताराम तुकाराम राऊत, पुतणे श्री. विश्वनाथ राऊत, श्री. प्रकाश राऊत, जावई पंढरीनाथ ठाकरे, संकेत तारमळे, नातवंडे तसेच सायली तारमळे (राऊत), सुरज राऊत, शुभम राऊत यांच्यासह मित्रपरिवार, सासरकडील मेव्हणे, साडू व अन्य आप्तेष्ट उपस्थित होते. 

यावेळी श्री. सुरेश राऊत यांच्या धर्मपत्नी सौ. सुप्रिया सुरेश राऊत यांनी आपल्या मनोगतातून विवाहापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा जीवनप्रवास अत्यंत भावुकतेने उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या संघर्षमय आयुष्याच्या अनेक आठवणी सांगताना सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले. 

.            धर्मपत्नी सौ. सुप्रिया सुरेश राऊत                 

तसेच त्यांची कन्या सायली राऊत उर्फ सायली तारमळे हिने आपल्या मनोगतातून “माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत आणि ते कायम हिरोच राहतील,” अशा भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री भोईर सर व उप शिक्षक श्री म्हात्रे सर यांनी श्री. सुरेश राऊत सर हे जिद्दी व कर्तुत्ववान कसे आहेत हे त्यांच्या मनोगतात सांगितले. 

.       कन्या सायली राऊत उर्फ सायली तारमळे

विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, श्री. नाडेकर सर,  पर्यवेक्षिका सौ.कविता पाटील मॅडम, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. अनेक मान्यवरांनी तसेच आप्तेष्टांनी श्री. सुरेश राऊत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कष्टाळूपणा व सेवाभावी वृत्तीचा विशेष उल्लेख केला. 

यावेळी त्यांचे पुतणे श्री. विश्वनाथ राऊत यांनी स्वतः शब्दबद्ध केलेल्या मानपत्राचे प्रभावी वाचन करून श्री. सुरेश राऊत (नाना) यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा, जीवनप्रवासाचा व सामाजिक कार्याचा भावनिक आढावा घेतला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

समारोपाच्या मनोगतात श्री. सुरेश तुकाराम राऊत यांनी आपल्या जन्मापासूनचा खडतर जीवनप्रवास अत्यंत भावुक शब्दांत उपस्थितांसमोर मांडला. लहानपणी दिव्यांग असल्यामुळे आई-वडिलांना आपल्या भवितव्याची मोठी चिंता वाटत होती. “माझ्या मुलाला नोकरी कशी लागेल, शिक्षण कसे पूर्ण होईल,” अशी काळजी त्यांना सतावत असे, असे सांगताना ते भावुक झाले.

गावापासून दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी पायाने दिव्यांग असूनही दररोज पडत-उठत तीन किलोमीटरचा प्रवास करून रेल्वे स्टेशन गाठत शिक्षण पूर्ण केले आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार केले, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि सभागृहही भावनांनी भारावून गेले.

तसेच त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच सर्वांचे भले कसे होईल, याचाच विचार केला. सुख-दुःखात राऊत कुटुंबासोबत राहून योग्य मार्गदर्शन केले, मित्रपरिवार जपला, चांगली माणसे जोडली आणि ज्या-ज्या ठिकाणी नोकरी केली तेथील लोकांना आपण “हवेहवेसे” वाटलो, अशा भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.  

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सौ.  जान्हवी भोसले मॅडम यांनी उत्कृष्ट केले. शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले व विद्यालयाच्या उप शिक्षिका सौ स्मिता पाटील मॅडम यांच्या पसायदानाने समारंभाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.

सौजन्य / वृत्तांकन - विश्वनाथ राऊत (सर)

निकालाच्या तोंडावर शासकीय दाखला पोर्टल बंद !!

निकालाच्या तोंडावर शासकीय दाखला पोर्टल बंद !!

** पालक विद्यार्थ्यांना नाहक त्रास.; विद्यार्थी पालकांना शैक्षणिक नुकसानीची भीती.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
बारावीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दाखल्यासाठीचे शासकीय पोर्टल गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने उरणमधील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मात्र, पोर्टल बंद असल्याने हे दाखले मिळविणे अशक्य झाले आहे.पुढील शिक्षणासाठी जात, उत्पन्न, रहिवासी आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते मात्र ते वेळेत मिळत नसल्याने  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या परिस्थितीचा परिणाम सेतू केंद्रांवरही झाला असून, पोर्टल बंद असल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. नागरिकांची गर्दी वाढत असताना सेवा देणे शक्य नसल्याने सेतू चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी निकालाच्या काळात पोर्टल बंद पडण्याचा अनुभव येत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

उरणच्या कस्टम बॉण्डेड वेअरहाऊसमधून लाखोंच्या मालाची चोरी !!

उरणच्या कस्टम बॉण्डेड वेअरहाऊसमधून लाखोंच्या मालाची चोरी !!

** विनायक नायडूसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकताच एक चोरीची घटना समोर आली आहे.उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी भोम गाव येथील 'सुयश लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'सुयश कमोडिटीज'च्या वेअरहाऊसमध्ये पुढील कारवाईसाठी ठेवलेल्या कंटेनरमधील तब्बल ७० लाख ३१ हजार रुपये किमतीच्या - मालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या विनायक नायडू आणि त्याच्या इतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पियुष अग्रवाल (५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 'द प्रेमिसो', 'ध्रुवा इंटरनॅशनल' आणि 'एन. एम. शाह कॉर्पोरेशन' या तीन कंपन्यांनी आयात केलेला माल कस्टम विभागाने तपासणीसाठी जप्त केला होता. हा माल 'सुयश लॉजिस्टिक्स'च्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, १४ मे २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विनायक नायडू आणि त्याच्या इतर साथीदारांनी या वेअरहाऊसमध्ये प्रवेश करून या मालाची चोरी केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या 'बिल ऑफ एण्ट्री' नुसार या मालावर डल्ला मारला आहे, ज्यात प्रामुख्याने ट्रॉली, ब्रेसलेट, पोर्टेबल शिलाई मशीन, शूज व सॉक्स (५३,३५,००० रुपये), चिकटपट्टी, वेस्ट बॅग, सफाई संच, कॉफी कप, ब्रँडेड शूज (नायके, ऍडिडास, ऍसिक्स), अंडरगारमेंट आणि लहान मुलांच्या बॅगा (१०,२९,८९१ रुपये) व प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, मुलांच्या स्कूल बॅग, चुंबक, पेन्सिल पाऊच (६,६६,४८६ रुपये) असा एकूण ७० लाख ३१ हजार रुपये किमतीचा माल चोरला आहे. उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. अभिजीत देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत. उरण मध्ये चोरीच्या घटना वारंवार होत असून याला वेळीच लगाम बसविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

उरणकरांना अतिरिक्त पाणी कपातीपासून मिळाला दिलासा !!

उरणकरांना अतिरिक्त पाणी कपातीपासून मिळाला दिलासा !!

** पाणी नियोजनासाठी एमआयडीसी चाचपणी

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पाणीकपातीचे सत्र सुरू झाले असताना उरणकरांना मात्र अतिरिक्त पाणी कपातीपासून दिलासा मिळाला आहे. उरण तालुक्यातील रानसई धरणातून केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात आधीपासूनच दोन दिवसांची कपात होत आहे. पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने यंदा टंचाई काळात अतिरिक्त कपातीपासून उरणकरांचा बचाव झाला आहे. सध्याच्या पाणीसाठ्याबाबत एमआयडीसी चाचपणी करत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील २३ ग्रामपंचायतीना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात नोव्हेंबर पासूनच कपात केली आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवारी ही कपात केली जाते. उरणच्या रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पावसाळ्यातील कालावधीत लाखो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे येथील नागरिकांना नोव्हेंबर पासूनच पाणीकपातीचा सामना करावा लागतो.उरणकरांना दररोज ४१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना एमआयडीसीकडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणी असल्याने तूट भरून काढण्यासाठी कपात केली जाते.तसेच दुसरी महत्वाची समस्या म्हणजे धरण क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात पडला आहे. ही समस्या निकाली लागल्यास उरणच्या नागरिकांना मुबलक व मोठया प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होईल.

कोट (चौकट ):- 


उरण तालुक्यातील रानसई धरणातील पाणीसाठ्याच्या वापराचे नियोजन नोव्हेंबरपासून सुरू आहे. सध्याच्या पाणीसाठ्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त पाणी बचतीकडे लक्ष दिले जात आहे.                                      - जी. एन. सोनवणे, उपअभियंता, एमआयडीसी, उरण.

संगीता ढेरें राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित !!

संगीता ढेरें राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र दिनाचे तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील उरण येथील जेष्ठ समाजसेविका संगीता सचिन ढेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ढेरे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. संगीता ढेरे यांनी उरण परिसरात महिला सक्षमीकरण, बालकल्याण, शिक्षण आणि समाजजागृती या क्षेत्रांत सातत्याने काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग सापडला असून सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.महिला बचत गटांना एकत्रित करून त्यांच्यात समन्वय घडून आणून विविध उत्पादने वस्तू निर्मितीला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. वेगवेगळे मेळावे, स्टॉल लावून तसेच महिलांच्या सर्वांगीण प्रगती साठी विविध कार्यक्रम त्यांनी राबविले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले.संगीता ढेरे यांना मिळालेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पावती असून समाजसेवेचा आदर्श ठरतो.उरण मधील जेष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...