Friday, 13 March 2026

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

** उचल वजा करून मिळणार रक्कम, मागणी अखेर मान्य

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांना २०२०-२१ ते २५- २६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू होणारा बोनस करार झाला त्यानुसार उचल वजा करून उर्वरित रक्कम संबंधितांना मिळणार आहे .

    केंद्रीय श्रम आयुक्त यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या करारावर भारतीय मजदूर पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील, डी पी सोनवणे, ऑल इंडिया पोर्ट अँड डॉग वर्कर्स फेडरेशन, इंडिया फोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, पोर्ट डॉक अँड वॉटर फ्रंट फेडरेशन ऑफ इंडिया , इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन सुशील कुमार सिंग, एम.डी.विकास नरवाल तसेच सर्व बंदरांचे चेअरमन, सर्व पदाधिकारी,नंदकुमार राणा, कृष्णमूर्ती, सत्यनारायण, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, अबुलकर, सर्वनंद, प्रकाश या सर्वांच्या वतीने व सहा मान्यता प्राप्त महासंघांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

     या करारामुळे पी एल आर (बोनस)ची प्रलंबित मागणी मान्य झाली आहे. गेली चार वर्षे सर्व गोदी कामगारांना बोनस म्हणून उचल (ऍडव्हान्स) रक्कम दिली जात होती. आता करार झाल्यामुळे प्रत्येक पोर्ट प्रमाणे बोनसची टक्केवारी जाहीर होणार आहे हा बोनस करार इंडस्ट्रियल करार कोड प्रमाणे व्हावा ,अशी आयपीए व लेबर कमिशनर यांची सूचना होती. परंतु गोदी कामगार महासंघाचा त्यास विरोध असल्यामुळे अखेर मान्यता प्राप्त अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाच्या मागणीनुसार औद्योगिक कलह कायद्यानुसार करार मान्य करण्यात आला.

'साप्ताहिक आम्ही मुंबईकर' व्दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला !!

'साप्ताहिक आम्ही मुंबईकर' व्दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला !!

मुंबई, कांदिवली, (भारत कवितके) :
साप्ताहिक आम्ही मुंबईकर व्दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजलेपासून दुपारी २ वाजेपर्यंत पुणे येथील काकडे देशमुख यांच्या उत्कर्ष शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही मुंबईकर वर्तमानपत्र व्दारा महाराष्ट्र राज्यातील साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी साहित्य सांस्कृतिक पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले, सुरुवातीला सरस्वती पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले, आम्ही मुंबईकर व्दारा अध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे सत्कार करण्यात आले, या प्रसंगी उद्घाटक सौ.वसुधा नाईक यांनी सांगितले की, ' आम्ही मुंबईकर मार्फत सकारात्मक पत्रकारिता जपू या, १ पानांचा अंक १० पानावर पोहचला, 'तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले 'ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके' यांनी सांगितले की, 'महाराष्ट्र राज्यातील अनेक पत्रकार व साहित्यिक यांना आम्ही मुंबईकर व्दारा संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी संधी प्राप्त करून दिली असल्याने प्रमोद सूर्यवंशी यांचे आभार " प्रमुख पाहुणे निलेश दातार यांनी गंगाधर टिपरे यांच्या अभिनयाची नक्कल करून दाखवली, प्रिया दामले यांनी आम्ही मुंबईकर वर्तमानपत्राचे कौतुक करुन शब्द ही कविता सादर केली, अध्यक्ष शरदचंद्र काकडे देशमुख यांनी शाळा काढल्या तेव्हा आलेल्या अडचणी सांगितल्या, प्रास्ताविकात संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले की," हा पेपर काढला तेव्हा मला जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके आणि ग्राफिक डिझायनर अंगद दराडे यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले, तसेच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी आम्ही मुंबईकर वर्तमानपत्र चालू ठेवले आहे, किती ही संकटे आली तरी मुंबईकर मागे हटत नाही, म्हणून हे नाव ही सार्थ आहे."या वेळी योगिता कोठेकर यांच्या संस्कार शिदोरी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, सूत्रसंचालन गौरव पुंडे यांनी केले, या प्रसंगी श्रीराम घडे, विजय सातपुते, अशोक मोहिते, नंदा सावंत, अनुपमा जाधव, दुर्गा पवार, सूत्र संचालन युवराज्ञी सोनवणे,गौरव पुंडे यांनी केले.

योगिता कोठेकर, भारत कवितके, स्वाती ताई तोंडे पाटील,तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे, सुनील इंगळे, यांनी मनोगत व्यक्त करुन कविता सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते साहित्य सांस्कृतिक पुरस्कार तसेच युवा खेळाडू पुरस्कार २०२६ चे वितरण

प्रज्ञा सिद्धार्थ घोरपडे, श्री .अरुण बुंदेले, प्रदीप पंढरीनाथ जोशी, श्री सुनिल इंगळे, श्री दुर्गाप्रसाद मिताराव हटवार, श्री अशोक मोहिते, सुभाष बोराडे, सौ.अनुपमा जाधव, डॉ सुरेश भिवाजी पाटील,  कु.श्रुती चौधरी, दुर्गा पवार, निवघेकर,  श्री .राकेश साहेबराव वाघ, कवयित्री सौ.स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील, रफीक इमानदार  मधुकर पुर्णाजी तराळे, गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई बबन विठोबा आराख, प्रा.डॉ. सत्येंद्र संगाप्पा राऊत  मंगेश मुरलीधर दौंडकर, राहूल शिवाजी हांडगर, डॉ. सौ.अलका नाईक, सौ.नंदा विजय सावंत, ओंकार शरदचंद्र काकडे देशमुख यांना करण्यात आले.


आयोजक मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.शेवटी योगेश हरणे यांनी सर्वांचे आभार मानले.

कल्याण पूर्वेतील डावखर एलिगन्स मधील 200 रहिवाशांना कोर्टाचा मोठा दिलासा !!

कल्याण पूर्वेतील डावखर एलिगन्स मधील 200 रहिवाशांना कोर्टाचा मोठा दिलासा !!

जमिनीच्या मालकीहक्कावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, डावखर यांनी सादर केले पुरावे

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण मध्ये इमारतींची निर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात संयुक्तपणे दाखल केलेली जनहित याचिका 73/2023, पहिल्या सुनावणीतच फोल ठरली. याचिकाकर्त्यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस सबूत आणि दस्तावेज माननीय उच्च न्यायालयासमोर पेश केला नाही. उच्च न्यायालयाने डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडचा दावा सत्य मानला. यासह हेही स्पष्ट झाले की डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडने बनवलेल्या इमारती सरकारी जमिनीवर नाहीत. डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडने आपल्या स्वामित्वाच्या जमिनीवरच निर्माण केले आहे, अशी माहिती डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडचे संतोष डावखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ज्ञात होऊ दे, मुंबई उच्च न्यायालयात राजेंद्र नाथ पारसनाथ पांडे आणि सुजीत अनंत कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका (73/2023) दाखल केली होती, ज्यामध्ये डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडने नौदलाच्या जमिनीवर निर्माण केल्याचा आरोप होता. पत्रकार परिषदेत संतोष डावखर यांनी सांगितले की, आमचे निर्माण आमच्या जमिनीवर आहे. नियमानुसार प्रत्येक दस्तावेज प्रमाणित आहे, प्रत्येक कर, शुल्काची अदायगी केली आहे. डावखर यांनी दावा केला की संबंधित जमीनीचा 98 वर्षांचा कागद आहे. यासह संतोष डावखर यांनी पत्रकारांसमोर आपल्या ग्राहकांबद्दलची प्रतिबद्धता जाहीर करताना सांगितले की, पुढील पन्नास वर्षे त्यांची कंपनी उपभोक्त्यांसाठी कोणत्याही समस्येच्या वेळी सदैव साथ देईल. डावखर इंफ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडचे संतोष डावखर पत्रकार परिषदेत आपल्या कंपनीच्या साथीदारांसह उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सत्याच्या विजयावर संतोष डावखर यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय, ठाणे जिल्ह्याचे पूर्व जिलाधिकारी आणि वर्तमान जिलाधिकारी श्रीकृष्ण पांचाल यांचे आभार मानले.

Thursday, 12 March 2026

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण शहरातील वालधुनी नदी पुनर्जीवित व प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक १२ मार्च २०२६ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपायुक्त श्री. रामदास कोकरे व कार्यकारी अभियंता यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील उतेकर व प्रमुख मार्गदर्शक श्री. शशिकांत दायमा उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने उपायुक्त श्री. रामदास कोकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व महानगरपालिकेकडून नदी स्वच्छतेसाठी सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

*बैठकीदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या*

वालधुनी नदीतील साचलेला गाळ तातडीने काढण्यात यावा

नदीची रुंदी वाढविण्यात यावी

नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात

नदीच्या काठावर झाडे लावून हरित पट्टा निर्माण करावा

नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सूचना फलक लावावेत

काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

संपदा रोड परिसरापासून सुमारे २०० फूट परिसरातील नदीकाठावर साचलेला कचरा व रॅबिट तातडीने हटविण्यात यावा

या बैठकीस श्री. अनिल सरदार, श्री. विशाल उर्फ बबली कांबळे, श्री.सुरेश आयरे, श्री. दिलीप आत्माराम गायकवाड, सौ. सुरेखा दिविलकर, सौ. प्रेरणा शिरसाट, श्रीमती सुनीता खेताडे, श्री. राजा भोसले तसेच संबंधित विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी अध्यक्ष श्री. सुनील उतेकर यांनी सर्व अधिकारी व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात लावण्याची व त्यांची जयंती साजरी करण्याची वंचित तर्फे मागणी !!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात लावण्याची व त्यांची जयंती साजरी करण्याची वंचित तर्फे मागणी !!

** पत्रव्यवहार करून प्रशासनाकडे केली मागणी.
उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुका मध्ये शासकीय निमशासकीय कार्यालये,उरण तालुका मधील ग्रामपंचायत मध्ये शाळा कॉलेज शासकीय आरोग्य रूग्णालयात भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा  काही कार्यालयात लावलेली नसलेले निर्देशनास आल्याने उरण तालुक्यातील प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात यावी या दृष्टी कोणातून वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका उपाध्यक्ष तुषार गायकवाड आणि उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे यांनी  पुढाकार घेतला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यलयात लागावी या अनुषंगाने त्यांनी शासकीय स्तरावर विविध कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून, निवेदन, अर्ज देऊन प्रत्येक शासकीय निम शासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याची मागणी केली आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकनुसार उरण तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, गटविकास अधिकारी,उरण नगरपरिषद , उरण इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालय आदी ठिकाणी  वंचित बहुजन आघाडी उरण तालुका तर्फे पत्रव्यवहार करून १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आधी त्यांच्या प्रतिमा प्रत्येक शासकीय निम शासकीय कार्यलयात लावण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली.तसेच जीवन चरित्र फलक व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी यासाठी सुद्धा दि. १० मार्च २०२६ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी उरण तालुका पदाधिकारी तुकाराम खंडागळे तालुका अध्यक्ष,तुषार गायकवाड तालुका उपाध्यक्ष, ईश्वर शंकर ढोले सदस्य,अमोल इंगोले सदस्य, परशूराम शरण,लखण गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी उरण तहसीलदार डॉ उध्दव कदम यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली

"पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालय"च्या नुतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी मंजूर - मा. संजय शिरसाठ

"पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालय"च्या नुतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी मंजूर - मा. संजय शिरसाठ 

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय श्री संजयजी शिरसाठ साहेबांनी आज दि. ११/३/२०२६ रोजी सायंकाळी ३.०० वाजता भेट दिली. मागिल वर्षी दि. ८ जूलै,२०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या ८०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले साहेब, महामहीम‌ राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन तसेच उच्च‌ व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री. संजयजी शिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी सन्माननीय शिरसाठ साहेबांनी संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालये व वसतिगृहाच्या नुतनीकरण, पुनर्बांधणी व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सेवा मिळाव्यात या हेतूने शासनाकडून ५०० कोटी मिळवून देण्याचे  जाहीर केले होते, त्याचा त्यांनी प्रामाणिकपणे पाठपूरावा करून  अलिकडेच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सदर ५०० कोटी पिईएस सोसायटीच्या १२ महाविद्यालये व वससतीगृहासाठी मंजूर करून घेतले. यामध्ये आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयासाठी ४२ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. लवकरच प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकांनी समाजकल्याण सचिव व PWD चे अभियंतासोबत मिटींग करून कशा प्रकारे नुतनीकरण करावे व कोणकोणत्या मुलभूत शैक्षणिक सुविधा असाव्यात त्याचा आराखडा तयार करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.

सन्माननीय शिरसाठ साहेबांच्या स्वागतासाठी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॉलेजच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी कॉलेजच्या गेटवर त्यांचे आगमन होताच फटाके फोडण्यात आले व वाजत गाजत त्यांचे जंगी स्वागत आजी- माजी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. त्यांनतर दुसऱ्या मजल्यावरील सभागृहातील नियोजित कार्यक्रमात सर्वप्रथम त्यांचा सत्कार माजी प्राचार्य डॉ. उमाजी मस्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन केला. 

त्यांनतर कार्यक्रमाच्या प्रस्तावनेद्वारे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णू भंडारे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची थोडक्यात माहिती सादर दिली. तळागाळातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी सहज मिळावी या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ साली या महाविद्यालयासह इतरही महाविद्यालयांची स्थापना केली होती. या ठिकाणी ३५००-४००० विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिक्षण घेत असतात, यामध्ये कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित ६ प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणानुसार या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारीत शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा व त्यासाठीचे पायाभूत सुविधा  उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उदा. स्मार्ट क्लासरूमस, संगणक व कम्युनिकेशन प्रयोगशाळा, सेमिनार हॉल इत्यादी. यामुळे विद्यार्थ्यांना पदवी सोबत कमी फी मध्ये अल्प कालावधीचे जॉब ओरिएंटेड कौशल्य विकास आधारीत कोर्सेस देता येतील, परिणामी आमचे विद्यार्थी भविष्यात सुशिक्षित बेरोजगार राहणार नाहीत. प्राप्त परिस्थितीत अशा शैक्षणिक आव्हानांना आम्ही सामोरे जात असताना शासनाकडून मिळत असलेली मदत आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार मोलाची ठरणार आहे, असा प्रामाणिक आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

माननीय शिरसाठ साहेबांनी त्यांच्या भाषणातून ते पिईएसच्या मिलिंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा आवर्जून उल्लेख केला व त्यामुळे त्यांनी कर्तव्य भावनेने ५०० कोटी शासनाकडून देण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात कृतीत उतरवली. तसेच सदर रक्कम मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सर्व सहमतीने मंजूर होऊन शासनाकडून तसा जी आर देखील निघालेला आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात पिईएसच्या महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालये आधुनिक तंत्रज्ञान व सेवा सुविधांनी अद्ययावत व्हावीत यासाठी शासनाकडून नियमीतपणे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले. मात्र, पिईएसच्या  व्यवस्थापनाचा वाद लवकरच संपुष्टात यावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आटोपशीर व सुंदर सुत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा. संजयकुमार बोरसे सरांनी केले. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ समीर ठाकूर सरांनी शिरसाठ साहेबांसह उपस्थित सर्वांचे आभार मानले. या छोटेखानी कार्यक्रमासाठी परिक्षा चालू  असतानादेखील  बऱ्यापैकी विद्यार्थी देखिल उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय होऊन व शेवटपर्यंत उपस्थित राहून सदर कार्यक्रम यशस्वी केला.

वृत्त - अश्विनी निवाते 

सौजन्य -
-डॉ. विष्णू ज.भंडारे
*(प्रभारी प्राचार्य)*

Wednesday, 11 March 2026

नागपुरात मुलींसाठी 'गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त' अभियान; १४-१५ वयोगटातील मुलींना मिळणार 'HPV' लस !!

🔴नागपुरात मुलींसाठी 'गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त' अभियान; १४-१५ वयोगटातील मुलींना मिळणार 'HPV' लस !!

नागपूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद नागपूरच्या शिक्षण विभागाने (माध्यमिक) जिल्ह्यात 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' (Cervical Cancer) मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींचे लसीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता शाळांमध्ये विशेष 'पालक-शिक्षक' सभांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनांनुसार, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

अशी असेल मोहिमेची प्रक्रिया :

माहिती संकलन: ज्या मुलींचे वय १४ वर्षे पूर्ण आहे मात्र १५ पूर्ण नाही, अशा लाभार्थी मुलींचे नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती शाळांमार्फत गोळा केली जाणार आहे.

पालक-शिक्षक सभा: ज्या शाळांमध्ये या वयोगटातील मुली शिक्षण घेत आहेत, तिथे विशेष सभा आयोजित केल्या जातील. या सभांची तारीख आगाऊ कळवणे अनिवार्य आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन: आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या सभांमध्ये उपस्थित राहून पालकांना व मुलींना गर्भाशयाचा कर्करोग आणि 'HPV' लसीचे महत्त्व समजावून सांगणार आहेत.

मुख्यध्यापकांना सूचना ..

जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर तातडीने जनजागृती करावी आणि लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवण्यासाठी पालकांशी समन्वय साधावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या मोहिमेमुळे भविष्यातील गंभीर आरोग्य धोके टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !!

बंदर, गोदी कामगारांसाठी पाच वर्षांचा बोनस करार !! ** उचल वजा करून मिळणार रक्कम, मागणी अखेर मान्य उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : ...