Monday, 9 March 2026

सामाजिक कार्यासाठी सरला राजेश्वराव शेष यांना ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ !!

सामाजिक कार्यासाठी सरला राजेश्वराव शेष यांना ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ !!

नाशिक, प्रतिनिधी, ता.९– सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्रच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच महिला प्रदेश संघटक सरला राजेश्वराव शेष यांना माऊली हेल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे नुकताच ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सरला शेष यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, आध्यात्मिक व बालसंस्कार वर्ग तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना समाजकार्यात सहभागी करून घेण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी रोजगार व उद्योग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून अनेक महिलांना व्यवसाय मार्गदर्शन दिले आहे. महिलांना संघटित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व उद्योजकतेची भावना निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

सामाजिक चळवळीत ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सरला शेष यांनी सामाजिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत मोलाचे योगदान दिले आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला संघटन मजबूत करण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करत आहेत. यापुढे महाराष्ट्रभर विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर महिला मेळावे, उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सभांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी मोठे कार्य उभारण्याचा संकल्प असल्याचे सरला राजेश्वराव शेष यांनी सांगितले.

त्यांच्या या अष्टपैलू कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Sunday, 8 March 2026

ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न !!

ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न !!

** ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार  वितरण

ईगल फौंडेशनच्या नावाप्रमाणेच अनेक स्त्रिया गरुडझेप घेत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत. बचत गटासारख्या माध्यमातून सक्षम होत आहेत. सकारात्मक वृत्ती आणि विधायक दृष्टी ठेवून महिलांनी वाटचाल केली तर त्या यशाला गवसणी घालू शकतात असे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे म्हणाल्या. डी. वाय एस. पी. राधिका फडके म्हणाल्या महिलांनी प्रभावीपणे आणि सक्षमपणे काम केले पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो स्त्रीयानी आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे. कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष श्री गजानन पाटील यांनी महिला दिनाची कधी आणि कुठे सुरवात झाली याबद्दल सविस्तर सांगितले. महाराष्ट्रात, देशात आणि जगात महिला दिन साजरा होत असताना प्रत्येक पुरुषाने आपल्या घरापासुन महिलांचा आदर आणि त्यांच्या चांगल्या कामाची कदर करावी. स्त्रिया सक्षम झाल्या तरच प्रत्येक घर आणि पर्यायाने देश सक्षम होईल असे स्पष्ट केले. याबरोबरच जि. प. सदस्या सौ.नेत्रा नवनीत ठाकुर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीमती कीर ,विलासराव कोळेकर, श्री सागर पाटील, श्री बाबासाहेब राशिनकर, श्री प्रकाश वंजोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.सर्व पाहुण्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुछ देवून फौंडेशन च्या पदाधिका-यांनी  सर्वांचा सत्कार केला. ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना रणरागिणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड  जि. रत्नागिरी येथे करण्यात आले होते. त्यामध्ये सौ. वैदही रानडे (रत्नागिरी),श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई), प्रा. सौ. सुमेधा सावळ (सिंधुदुर्ग), सौ. रुपाली विक्रम यादव ( शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने ( देवराष्ट्रे), प्रा. अश्विनी संजय पाटील ( कराड), ॲड.स्नेहल भिमराव गुरव ( कोल्हापूर ), सौ. व श्री सुलक्षणा आनंदा कांदळकर( राधानगरी ) ,सौ. सौनल संजोग खातू ( रत्नागिरी ), सौ. शुभांगी दामोदर कोंडे, डॉ. सुमिता संजय शिर्के, श्रीमती प्रमोदिनी विठ्ठलराव किनाके (यवतमाळ ), सौ. वर्षा परशुराम ढेकणे, डॉ. किर्ती ऋषिकेश कुलकर्णी यांचा समावेश होता.

सर्व पुरस्कार प्राप्त महिलांना मानपत्र, सन्मानचिन्ह व कोल्हापूरी फेटा बांधून गौरव करण्यात आला. तुतारीच्या निनादाने कार्यक्रमात उत्साह संचारला. यावेळी पत्रकार वैभव पवार, पत्रकार उदय महाकाळ, श्री संकेत ढवळे, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय शितप, पत्रकार संतोष बांधिवडेकरआदी मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन केलेल्या श्री हनुमंत कदम सरांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. या सोहोळ्यास फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, पदाधिकारी सर्वश्री श्री प्रकाश वंजोळे , श्री बाबासाहेब राशिनकर,श्री दिपक पोतदार, पत्रकार श्री दिनेश कांबळे, पत्रकार श्री विजय जगताप, पत्रकार श्री वैभव पवार, मुख्याध्यापक पांडूरंग नाईक, ईगल न्यूज च्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे, सौ. सुलक्षणा राशिनकर आदीनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

प्रतिनिधी, (विशल कुरकुटे)

आज दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने Railway Protection Force (RPF) अंबरनाथ चौकीच्या प्रभारी सोनाली नंदेश्वर यांच्या पुढाकाराने Ambarnath Railway Station येथे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

या वेळी महिला प्रवाशांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत गुलाब पुष्प व मिठाई वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF सदैव तत्पर आहे, याची माहिती देत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात आली.

या वेळी विशेष उपस्थिती म्हणून जगदीश देसले साहेब व रमेश पाटील साहेब यांनी चौकी प्रभारी सोनाली नंदेश्वर मॅडम यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

तसेच कार्यक्रमाला दिनेश बुचडे, दिपक तेली, संजय गुप्ता सौ रेखा उत्तरदे  आशा डिसोझा कांचन कुलकर्णी  तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष प्रवासी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

विकास आणि एकतेची नवी ओळख : नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार !

विकास आणि एकतेची नवी ओळख : नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर) :
                 रायगड किल्ल्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले नळेफोडी गाव आपल्या एकजुटीमुळे आणि विकासकामांमुळे विशेष ओळख निर्माण करत आहे. गावातील श्री विघ्नहर्ता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मंदिर म्हणून त्याची ख्याती आहे.
                गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांमधील दृढ एकता. कोणत्याही राजकीय मतभेदांना दूर ठेवत सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे गावाच्या प्रगतीसाठी कार्य करत आहेत. सर्वानुमते निर्णय घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
                गावातील ज्येष्ठ मंडळी श्री वामन महादे श्री.चंद्रकांत महादे, श्री.लक्ष्मण महादे तसेच गावचे उपसरपंच श्री. नथुराम चाचले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने विविध विकासकामे करण्यात आली आहेत. बसथांब्यापासून शाळेपर्यंत रस्त्यालगत प्रकाश व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प, गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाईन सुविधांसाठी मोफत वाय-फाय, तसेच पाण्यासाठी विहीर आणि धरण बांधकाम अशी अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.
                 गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना ग्रामस्थांनी स्वकष्टाने अनेक उपक्रम राबवून विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यातही गावाच्या प्रगतीसाठी अशाच उपक्रमांना गती देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ती... (एक समर्पित काव्य)

ती... (एक समर्पित काव्य)

स्त्री- अपेक्षविना घडविते विश्व,
प्रेमांकुराने समर्पिते सर्वस्व ।
अनुभवाची शिदोरी वाहते अखंड,
निंदा नालस्तीनेही त्रस्त असे *ती*

जगण्याची आणि जगविण्याची आशा प्रचंड,
आयुष्याशी ही करते बंड।
माया आणि ममतेचा त्रिखंड
मृत्यूला ही शाश्वत नमविते *ती*

नातेसंबंधांची राखणदार,
स्त्रीत्वाचे प्रेम असते अपरंपार।
काबाडकष्ट अनेक करता
स्वतःला सावरणे विसरते *ती*

कधी रामाची वैदेही, कधी गणेशाची रिद्धी सिद्धी, कधी शंकराची पार्वती, तर कृष्णाची राधा राणी,
त्रैलोकांत आपले दायित्व अखंड साकारते ती।

*त्रैलोकांत आपले दायित्व अखंड साकारते *ती*।

 - सौ.शिल्पा चंद्रकांत निमकर 
घाटकोपर मुंबई.

Saturday, 7 March 2026

एक निरागस काव्य ....

एक निरागस काव्य ....
---------------------------

     सायली माझी लाडाची
           आईच्या प्रेमाची 
           पप्पांच्या चेहे~याची
           निरागस मनाची 
     सायली माझी लाडाची
           बोलक्या डोळ्यांची 
            गुलाबी ओठांची
           लांबसडक केसांची
     सायली माझी लाडाची
            शांत स्वाभावाची
            गोड हृदयाची
           स्वाभिमानी बाण्याची 
       सायली माझी लाडाची
           आवड स्वयंपाकाची
           निरनिराळ्या पदार्थांची 
           घरच्यांच्या मायेची
         सायली माझी लाडाची

   सौ. शिल्पा चंद्रकांत निमकर 
         घाटकोपर मुबंई.

🪷 कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळा (रजि.) यांचा स्नेहमेळावा डि. जि. वन येथे उत्साहात संपन्न !!

🪷 कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळा (रजि.) यांचा स्नेहमेळावा डि. जि. वन येथे उत्साहात संपन्न !!

रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा रजि. मंडळाचा स्नेहमेळावा कार्यक्रम सायंकाळी ३ ते ७ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराज मठ,  डि जि वन, येथे थाटामाटात पार पडला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत सदाशिव परब बुवा, उपाध्यक्ष श्री शंकर पेंडुरकर, कार्याध्यक्ष श्री प्रवीण टोले, सचिव श्री निलेश राणे, खजिनदार श्री गुणाजी नंदकुमार गावडे, सहखजिनदार श्री योगेश टोले, कमिटी सदस्य श्री नामदेव पिचुर्ले, श्री प्रकाश चौगुले, सौ सीमा पिंपुटकर, सल्लागार श्री संतोष राणे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. 

श्री गणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजाचे कृपाशीर्वादाने दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंडळाचे जेष्ठ सभासद श्री दिलिप चिपकर काका, श्री भिवाजी धुरे काका, श्री नितीन कदम काका, श्री दळवी काका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे सभासद श्री मनोहरजी टेमकर यांनी सुत्रसंचलन जबाबदारी स्वीकारून कार्यक्रमाची रंगत वाढली श्री राजन गावडे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने श्री मनोहर टेंमकर यांना सुत्रसंचलना मध्ये साथ दिली. होळी सणासाठी गावी जाण्याची लगबग सुरू असताना हि मेळाव्याला चांगली उपस्थिती होती.

मंडळाच्या वतीने उपस्थित जेष्ठ नागरिकांना पदाधिकारी व सभासदांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उपस्थित पहिली वर्ग ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने वह्या व पेन भेट देऊन पुढील शैक्षणिक प्रवासा साठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्नेहमेळाव्याला विशेष अतिथी म्हणून १) कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे टिटवाळ्यातिल नवनिर्वाचित नगरसेवक सन्मानिय श्री बंदेशजी जाधव साहेब तसेच प्रमुख अतिथी १) कुणबी समाज मंडळ टिटवाळा चे अध्यक्ष सन्मानिय श्री मोहन कणेरी साहेब २ ) कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सन्मानिय श्री सुनील उतेकर साहेब ३ ) ज्ञान साधना कोचिंग क्लासेस सर्वेसर्वा सन्मानिय श्री विशाल पातेरे सर ४ ) शिवसेना महिला संघटक टिटवाळाच्या सन्मानिय सौ श्रेया जाधव ताई यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करुन कोकण रहिवाशी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करुन आभार मानले 🙏🏼 उपस्थित महिलांना मंडळातील महिला पदाधिकारी व सभासदांनी हळदीकुंकू चा मान देऊन सन्मानित करण्यात आले. स्नेहमेळावा कार्यक्रम ला देणगी स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात मदत केलेल्या सर्वांचे कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळाच्या वतीने आभार माणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

श्री. संतोष भोसले, श्री गोपीचंद घाटीये, श्री रंजीत पुसाळकर, श्री सुरेश वारंग, श्री संदेश सावंत, श्री अमित पांचाळ, सौ. शितल पेंडुरकर, सौ. करुणा परब ,सौ. पूर्वा टोले, सौ. प्रियांका चौगुले, सौ. रूपा पुसाळकर, सौ. समिक्षा गवस, सौ. सुप्रिया पवार, सौ. सुष्मिता तावडे, सौ. वर्षा मेस्त्री, सौ. सई वारंग, सौ. दिपाली नाईक, सौ. प्रिया बने,या सर्व सभासदांनचे कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

सौजन्य/वृत्त -
✍🏻 श्री गुणाजी नंदकुमार गावडे (मिलिंद)
कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा

सामाजिक कार्यासाठी सरला राजेश्वराव शेष यांना ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ !!

सामाजिक कार्यासाठी सरला राजेश्वराव शेष यांना ‘आदर्श महिला नारी पुरस्कार’ !! नाशिक, प्रतिनिधी, ता.९– सामाजिक, अध्यात्मिक व सांस्क...