पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!
** सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थे विषयी अक्षय म्हात्रे यांनी केली खंत व्यक्त.
उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
अक्षय म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते असून सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. यंदाच्या चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडून येण्यासाठी त्यांनी दिवसाची रात्र करून अथक मेहनत घेऊन जनतेशी संवाद साधला. मात्र या चाणजे गणातून भाजपचे कैलास भोईर हे विजयी झाले. मात्र अक्षय म्हात्रे हे पराभवाने खचले नाहीत. उलट नव्या ताकदीने, नव्या उत्साहाने परत ते पुढील कामाला लागले आहेत. त्यांच्या मतदार संघात त्यांना १६२० मते मिळाली हे त्यांच्या उत्तम कार्याचे फलित आहे असे जनतेचे म्हणणे आहे.पक्षातील एकही माणसाचे पाठबळ नसताना आणि निवडणुकीत एकही पैसा न खर्च करता, केवळ कामाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात १६२० मतं मिळवणाऱ्या अक्षय म्हात्रे यांनी भ्रष्ट व्यवस्थे विषयी खंत व्यक्त केली आहे.अक्षय म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि एवढ्या मोठ्या व्यवस्थेविरुद्ध एकटा लढलो, समोर पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य व आजी माजी आमदार यांची ताकद पणाला लागली आणि करोडो रुपयांचा चुराडा झाला.निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या पक्षाचे नेते आठवडाभर माझ्याच गावात ठाण मांडून होते, विरोधकांनी इथेच रात्री जागवल्या, अमाप पैसा वाटला. तरीही हरवता येत नाही म्हणून अफवा पसरवल्या , बदनामी केली आणि या सर्वांच्या विरुद्ध एकटा लढलो, ना पक्षाचे पाठबळ, ना मनुष्यबळ होते.उमेदवारी शेवटच्या क्षणी भरली आणि पॅम्प्लेट (प्रचार पत्रके) उशिरा आल्याने वेळ पण कमी मिळाला.तरीही एकही पैसा न वाटता १६२० मते पडली.हे जनतेने मला भरभरून दिलेले आशीर्वाद आहे. त्यांचे मी कायमचा ऋणी आहे. त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यंग तरुण असलेल्या अक्षय म्हात्रे यांनी १६२० घेऊन विरोधकांना आपल्या कामातून चांगलेच चोख प्रत्यूत्तर दिले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.हार न मानता, निराश न होता अक्षय म्हात्रे हे पुन्हा नव्या जोमाने, उत्साहाने पुढील कामाला लागल्याने जनतेने त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.