Thursday, 23 April 2026

"तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे" पासून "कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं" पर्यंतचा सिने-गीतकार सागर पवार यांचा प्रेरणादायी प्रवास" !!

"तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे" पासून "कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं" पर्यंतचा सिने-गीतकार सागर पवार यांचा प्रेरणादायी प्रवास" !!

अनेक गाणी आपल्या नेहमीच ओठांवर असतात. आपण ती ऐकतो, गुणगुणतो; मात्र त्या गाण्यांच्या मागे असलेल्या गीतकारांचा शोध फार कमी वेळा घेतला जातो. अशाच असंख्य लोकप्रिय गीतांचे प्रतिभावान कवी-गीतकार म्हणजे सागर पवार.

फुले, शाहू आणि आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी तसेच सांस्कृतिक चळवळ बळकट करण्यासाठी कवींनी मोठे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे कार्य अनेक कलाकारांनी केले. त्यामध्ये ज्येष्ठ कवी सागर पवार यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सागर पवार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची विशेष आवड होती. त्यांनी ही आवड जपली आणि लेखणीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आय.टी.आय.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९८७ साली सेंट्रल रेल्वेमध्ये त्यांना नोकरी मिळाली. १९९० मध्ये त्यांनी भोपाळ येथे सेवा बजावली, तर १९९४ मध्ये त्यांची बदली कल्याण येथे झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून लेखनाची प्रेरणा अधिक दृढ झाली. १९८८ मध्ये गायक कृष्णा शिंदे यांच्या कॅसेटसाठी त्यांनी पहिले गीत लिहिले. १९९० मध्ये "भीमा तुझी पुण्याई" हा त्यांचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला आणि आंबेडकरी चळवळीत त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर "कोहिनूर दलितांचा" हा अल्बम विशेष गाजला.

१९९३-९४ दरम्यान टी-सीरीजसारख्या नामांकित कंपनीसाठी त्यांनी विविध विषयांवर अनेक गीते लिहिली. २००१ मध्ये त्यांनी लिहिलेले "भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात" हे गीत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून अनेक अजरामर गीते दिली. त्यांपैकी काही गाजलेली गीते म्हणजे: "तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे", "भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात", "तुझ्या पाळण्याने साऱ्या जगाला हलविलं". सध्या भीम जयंती उत्सवात सर्वत्र गाजणारे गीत म्हणजे "कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं… दिल्लीचं दालन खुलं व माय, भीमानं केलं…". हे गीत महागायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात महाराष्ट्रासह  राज्याबाहेरही लोकप्रिय झाले आहे. तसेच बाहेरच्या देशातसुद्धा त्यांची गाणी लाेकप्रिय ठरली आहेत. ही जादू सागर पवार यांच्या प्रभावी लेखणीचीच आहे.

विशेष म्हणजे, सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून ११ हजारांहून अधिक गीते लिहिली आहेत. त्यापैकी ४ हजार गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहेत. तसेच लोकगीते, भीमगीते, प्रबोधनपर गीते आणि विविध सामाजिक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी ३२ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांच्या गीतांना सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, रवींद्र साठे, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, सुदेश भोसले, अवधूत गुप्ते, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, वैशाली सामंत, बेला शेंडे यांसारख्या अनेक दिग्गज गायक-गायिकांनी स्वर दिले आहेत.

संगीतकार अशोक पत्की, कमलेश जाधव, मधू रेडकर, श्रीरंग आरस, अशोक वायंगणकर यांच्यासह अनेक मान्यवर संगीतकारांचा त्यांना सहवास लाभला. टी-सीरीज, व्हिनस, सम्राट म्युझिक, अल्ट्रा, शेमारू, नोकिया म्युझिक, कुणाल म्युझिक अशा विविध कंपन्यांनी त्यांची गीते प्रकाशित केली.

फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आणि सामाजिक प्रबोधन घराघरात पोहोचविण्यासाठी सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून मोलाचे योगदान दिले आहे. "समाजप्रबोधनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लेखणी चालवत राहीन", अशी भावना मुलाखत देताना माझ्याकडे व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला सलाम.

लेखक : कवी, पत्रकार – मिलिंद सुरेश जाधव
पडघा, भिवंडी मो. ८६५५५६९४३६

Wednesday, 22 April 2026

भिवंडीतील श्री क्षेत्र कोपर गावात सदानंद महाराज यांच्या हस्ते नव्या मंदिरात होणार नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा !!

भिवंडीतील श्री क्षेत्र कोपर गावात सदानंद महाराज यांच्या हस्ते नव्या मंदिरात होणार नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा !!

** सरपंच श्री.हेमंत चंद्रकांत घरत पंच यांची भाविकांना येण्याची विनंती

भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील, (कोपर)

भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र कोपर गाव येथे दर वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन गावचे सरपंच श्री.हेमंत चंद्रकांत घरत यांच्या माध्यमातून होत असते. यंदा नव्याने बांधलेल्या मंदिरात नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी पंच क्रोशीतल भाविकांना सरपंच व ग्रामस्थान तर्फे येण्याची विनंती करण्यात आली आहे. 

या आयोजित कार्यक्रमाचे आयोजन हे वैशाख शु.५, वार मंगळवार, दिं,  २१/४/२०२६ ते वैशाख शु १४,वार गुरुवार  दिं,३०/४/२०२६ पर्यंत होणार आहेत व ते पुढील प्रमाणे आहेत.   ---------------------------------------------------
(१) वार मंगळवार दिं ,२१/४/२०२६ रोजी सकाळी ६ ते ७ दरम्यान सरपंच श्री.हेमंत घरत व सौ.सुषमा घरत यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला. तर सायंकाळी ५ ते ७ दरम्यान श्री हरी भजनाचा कार्यक्रम पार पडला.तर रात्री ९.३० ते १० दरम्यान सरपंच हेमंत घरत यांनी फराळ व अन्न दानाची सेवा पार पाडली.

(२) दिवस दुसरा, वार बुधवार, दीं, २२/४/२०२६ सकाळी ५ ते ७ दरम्यान काकडा आरती व नंतर सकाळी अभिषेक, व ९ ते ११ दरम्यान हरी भजन,फराळ,हरी पाठ,रात्री ७ ते ९.३०वा.दरम्यान श्रीराम कथा वाचन व सांगता कथा प्रवक्ते ह.भ.प.श्री शंकर महाराज देशमुख (लातूर).यांच्या हस्ते पार पडला.रात्री ९ ते १० दरम्यान श्री.गणेश प्रसाद वराई कामगार संघटना, कोपर यांच्या तर्फे भोजन ठेवण्यात आले होते.

(३) दिवस तिसरा,वार गुरूवार,दिं,२३/४/२०२६
सकाळी काकडा आरती, अभिषेक,हरी भजन, फराळ, सायं.हरीपाठ, व रात्री ७ ते ९.३० वा.श्री कृष्ण कथा,कथा प्रवक्ते ह.भ.प.कृष्ण महाराज शास्त्री (श्री क्षेत्र वृंदावन)यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.व रात्री भोजन समारंभ.

(४) दिवस चौथा, वार शुक्रवार,दिं‌,२४/४/२०२६
सकाळी काकडा, अभिषेक,हरी भजन, फराळ,हरी पाठ, रात्री श्री.कृष्ण कथा व सांगता सोहळा कथा प्रवक्ते ह. भ. प.कृष्ण महाराज शास्त्री (श्री क्षेत्र वृंदावन) यांच्या तर्फे होणार आहे. व रात्री भोजन समारंभ.

(५) दिवस पाचवा, वार शनिवार‌  दीं,२५/४/२०२६, व (६) दिवस सहावा, वार रविवार ,दि,२६/४/२०२६ रोजी वरील प्रमाणे नित्य कार्यक्रम होणार असून रात्री श्री हरी कथा, कथा प्रवक्ते ह.भ.प. रामदास महाराज शास्त्री (नाशिक) हे करणार असून भोजन व्यवस्था सरपंच तथा प्रो. में.रोशनी इंटरप्रायजेसचे मालक श्री.हेमंत सूर्यकांत घरत, विलास अमृत घरत, दौलत घरत यांच्या तर्फे होणार आहे.

(७) दिवस सातवा, वार सोमवार, दि,२७/४/२०२६ (८) व दिवस आठवा, वार मंगळवार,दि,२८/४/२०२६ रोजी रात्री कथा प्रवक्ते ह.भ. प.श्री.हनुमान महाराज पाटील (कोळेगाव - कल्याण)यांच्या तर्फे श्रीमद,भागवत कथा वाचन होणार आहे. 

तर या  दिवसा दरम्यान नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून तो पुढील प्रमाणे असेल.
------------------------------------------------------
(१) वैशाख शु.११(मोहिनी एकादशी) वार सोमवार दि,२७/४/२०२६ सकाळी ९ ते १० श्री.गणेश पूजन,सकाळी १० ते १२ मंडळ पूजन, सायं.४ ते ६ जल दि वास होणार आहे.

(२) वैशाख शु.१२, वार मंगळवार दि,२८/४/२०२६ सकाळी ८ते १०प्रत:मंडळ पूजन,सकाळी १०ते १२ पुष्पा दि वास,दुपारी१२ ते २ फळा दि वास, सायं.२ ते ४ हवन पूजा, सायं ४ ते ५धान्य दि वास हा कार्यक्रम होणार आहे.

(३) वैशाख शु.१३वार बुधवार दि,२९/४/२०२६ रोजी सकाळी प्रत:पूजन , दुपारी १२ ते २पूर्णाहुती व महाआरती,,दुपारीं १ते२ नूतन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व कलश स्थापना,दुपारी १ ते ३ श्री कोपरेश्वर प्रासादिक भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्या कडून सेवा असे कार्यक्रम होणार आहेत.

(९) दिवस, नववा ,वार बुधवार, दिं,२९/४/२०२६, या दिवशी सकाळी १०.१०वा.श्री.गणेश,शरीर.विठ्ठल रुक्मिणी माता (श्री राम,जय हनुमान, श्री दत्त) या नव्या मंदिरात बालयोगी गुरुवर्य सदानंद (बाबा) महाराज (आगमन दुपारी २. वा ) यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. 

या वेळी प्रमुख उपस्थिती, श्री श्री १००८ जगद्गुरु परमहंस आचार्य (जुनी तपस्वी जी की छावणी, पीठाधिश्वर् अविध्यानगरी, श्री क्षेत्र अयोध्या),चिदानंद स्वामी चिंतामण महाराज (दिंडीगड होणारे गाव),बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज ओवळी गाव भिवंडी)
यांची असणार आहे. 

तर प्रमुख अतिथी म्हणून कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब (मा. केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री, भारत सरकार) हे उपस्थित राहणार आहेत. तर सायं.६ ते ८ वा.दरम्यान ह.भ.प.गुरुवर्य कबीर महाराज म्हात्रे (गुंदवली-भिवंडी) यांचे होणार आहे.

(१०)दिवस दहावा, वार गुरूवार, दि,३०/४/२०१६) भाषाप्रभू, ह. भ.प.श्री.जगन्नाथ महाराज पाटील(खांडवळ भिवंडी) यांच्या तर्फे हरी कीर्तन होणार आहे. व दुपारी महाप्रसाद सरपंच तथा (भोजन दाते श्री हेमंत सूर्यकांत घरत,सरपंच ग्रुप व ग्राम पंचायत कमिटी कोपर व ग्रामस्थ मंडळ कोपर )  यांच्या तर्फे होणार आहे.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.
(१) मा. श्री. कपिल मोरेश्वर पाटील साहेब (मा.खासदार तथा मा. केंद्रीय "पंचायत राज" राज्य मंत्री 
(२) मा. आमदार (ग्रामीण) श्री.शांताराम तुकाराम मोरे साहेब,
(३) मा. श्री. देवेशजी पुरुषोत्तम पाटील साहेब, (उपाध्यक्ष भा ज पा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, मा. ठाणे जिल्हा परिषद सदस्य, ठाणे)
(४) मा. श्री.सुमित पुरुषोत्त पाटील साहेब (नगर सेवक -भिवंडी) 
(५) मा. श्री. डी. के. म्हात्रे साहेब (उपाध्यक्ष महाराष्ट्र, मनसे)
(७) मा. श्री.दीप रवींद्र बने (पोलिस निरीक्षक, ATS ठाणे युनिट)
(८) मा. श्री.विजय कादभाने साहेब, (वरिष्ट पोलिस निरीक्षक, नारपोली भिवंडी) व इतर मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

पनवेल तालुक्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !!

पनवेल तालुक्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !!

** नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव.

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
महाराष्ट्र  नवनिर्माण  सेनेचे  अध्यक्ष  श्री राज  साहेब  ठाकरे यांच्या आदेशानुसार  तसेच  रायगड  जिल्हा संपर्क  अध्यक्ष संदिप  देशपांडे व योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शना नुसार संदेश भाई ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष व सुजित सोनवणे पनवेल तालुका अध्यक्ष, अल्पेश  कडु तसेच राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल तालुक्यात नविन  पदनियुक्त्या करण्यात आल्या. निर्दोष केशव गोंधळी पनवेल तालुका सचिव, आकाश  श्रीकांत देशमुख उलवे शहर अध्यक्ष, तुषार सुनील म्हात्रे गव्हाण विभाग अध्यक्ष, अमित  विनायक पाटील उलवे शहर उपाध्यक्ष, राजेश शंकर परमेश्वर उलवे शहर सचिव, नितिन  कीसन तळेकर उलवे शहर सचिव, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील गव्हाण विभाग उपाध्यक्ष तसेच प्रितम पंढरीनाथ तांडेल गव्हाण विभाग उपाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजण्याची घाई !!

भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजण्याची घाई !!

** कॉंग्रेसच्या सोनललक्ष्मी घाग यांचे मत

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : "केंद्र सरकारने २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर केलेले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्याऐवजी २०२६ मध्ये पुन्हा महिला आरक्षणाच्या आडून (डेलिमिटेशन) परिसीमन विधेयक संसदेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ही संविधान विरोधी कृती आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला स्वतःची पोळी भाजण्याची घाई झाली आहे. वास्तविक पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे; परंतु केंद्र सरकार तसे करत नाही. त्यामुळे भाजप सरकारची जनतेला दिशाभूल करण्याची ही खेळी आहे. हे केवळ महिला आरक्षण विधेयक नाही, तर देशाच्या लोकशाही ढाच्यात बदल करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय संविधानावर आक्रमण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या विधेयकाला काँग्रेस पक्ष कधीही साथ देणार नाही, ते कायम हाणून पाडेल," असे रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी बुधवारी (ता. २२) उलवे येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.
"काँग्रेसने नेहमीच महिलांना सत्तेत आणि पक्षातही प्राधान्य दिले आहे. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी अशा असंख्य महिलांना काँग्रेसने संधी दिलेली आहे. थोडक्यात काँग्रेसने नेहमीच महिलांना सत्तेत आणि पक्षातही प्राधान्य दिले आहे," असेही सोनललक्ष्मी घाग यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले. 

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर उपस्थित होते. महिला आरक्षण विधेयकाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे. केंद्र सरकार कशा पद्धतीने जनतेची फसवणूक करीत आहे. हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, अखलाख शिलोत्री, महिला जिल्हाध्यक्षा रेखा घरत, निर्मलाताई पाटील, विनया पाटील, सारिका पाटील, योगिता नाईक आदी महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

साफोर्ड कंपनीतील कामगारांना ११००० रुपयांची पगारवाढ !!

साफोर्ड कंपनीतील कामगारांना ११००० रुपयांची पगारवाढ !!

** कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा करार.
 
उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले राष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असतांना स्थानिक भूमिपुत्र कामगारांना सन्मान पूर्वक जगण्यासाठी त्यांना न्याय देण्याचे काम सातत्याने करत असतात संघटनेतर्फे. सन २०२६ मधील हा पाचवा पगारवाढीचा करार २१ एप्रिल रोजी करण्यात आला. तळोजा एम. आय.डी.सी मधील साफोर्ड ली या कंपनीतील कामगारांनी अगोदरच्या दोन संघटनांना राजीनामा देवून कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेवर विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा न जाता संघटनेने कामगारांना तीन वर्षासाठी तब्बल ११००० रुपयांची पगारवाढ करण्याचा करार केला. या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅलरी पगार, मेडिक्लेम पॉलीसी व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तब्बल ११००० रुपये पगारवाढ मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कामगारांनी संघटनेचे आभार मानले.

लाल मैदानाची स्वच्छता मोहीम ; पण ‘सावरकर’ नावाचा फलकच गायब… प्रशासनावर सवाल!”

लाल मैदानाची स्वच्छता मोहीम ; पण ‘सावरकर’ नावाचा फलकच गायब… प्रशासनावर सवाल!”

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
उरण नगरपरिषद हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर (लाल) मैदानावर गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली आहे. मात्र, या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर बाब समोर आली आहे. मैदानाला सावरकरांचे नाव असले तरी प्रत्यक्षात नामफलकच नाही.
    नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत नियमित सफाई कामगारांसोबत अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात येणार आहे. मैदानाची दयनीय अवस्था लक्षात घेता ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, नगराध्यक्षा स्वतः या मोहिमेत उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

     यावेळी नागरिकांना, समाजातील नेत्यांना, व्यापारी-व्यावसायिकांना तसेच विशेषतः खेळाडूंना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “मैदान आपले आहे, त्याची स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
     दरम्यान, या मैदानाला अधिकृतरित्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान असे नाव देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात येथे सावरकरांच्या नावाचा नामफलकच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे मैदान आजही “लाल मैदान” या नावानेच ओळखले जात आहे.
यावर उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपालिकेकडे तातडीने नामफलक लावण्याची मागणी केली आहे. “नाव दिलंय, पण फलक नाही… मग हे नाव कागदापुरतंच का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

    नागरिकांमधूनही याबाबत संताप व्यक्त होत असून, स्वच्छता मोहिमेसोबतच मैदानाच्या ओळखीचा प्रश्नही सोडवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेसोबतच ओळखही स्पष्ट झाली पाहिजे, अशी भूमिका स्थानिकांकडून मांडली जात आहे.
     स्वच्छता मोहीम होईल, पण ‘सावरकर’ नावाला न्याय कधी मिळणार अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

Tuesday, 21 April 2026

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

बातमीदार, ठाणे प्रतिनिधी : ता. २२,  नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत  उपनियंत्रक मा. श्री विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. १७ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत पोलिस वाहतूक नियंत्रण हॉल, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन  प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. ०९/२०२६ आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गात एकूण ५६ RSP शिक्षक वृंद प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.

      दररोज दुपारी १.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विविध विषयांवर मानसेवी निदेशक अनुक्रमे श्री.बिमल नथवाणी, डाॅ.राहुल घाटवळ, हनुमान चौधरी व कमलेशजी श्रीवास्तव यांचेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विभागीय क्षेञरक्षक भारती देशमुख, डाॅ.किशोर आढळकर व रोहिणी गोलतकर यांचे सहकार्य लाभले. अंतिम दिवशी सहाय्यक उपनियंञक श्री. अनिल गावित व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. डाॅ.किशोर आढळकर, विभा, क्षेञरक्षक, ठाणे व उपमुख्य क्षेञरक्षक, क्षेञ-४, नवीमुंबई यांचे सहकार्याने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

     यावेळी मा. श्री विजय जाधव साहेब,  उपनियंत्रक यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सभासदत्वाची शपथ देऊन त्यांना मोलाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच श्री.संजय केळकर, मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण दल यांनीही उपस्थित राहून प्रशिक्षणार्थ्यांना  मार्गदर्शन करुन सर्व मानसेवी निदेशकांचे अभिनंदन केले.

     हा प्रशिक्षण वर्ग आयोजनासाठी डाॅ.किशोर आढळकर यांनी समन्वय साधला. याप्रसंगी डाॅ.शिंपी, स्वामी सर व समाजसेवक माणिक पाटील सुद्धा उपस्थित होते. श्री.पाटील सरांनी खणखणीत सुञसंचालन करुन आनंदी व खेळीमेळीचे वातावरण ठेवले.  प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याने सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
     राष्ट्रगीताने  प्रशिक्षण वर्गाची सांगता करण्यांत आली.

Regards – DCCD, NMC, Thane.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

"तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे" पासून "कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं" पर्यंतचा सिने-गीतकार सागर पवार यांचा प्रेरणादायी प्रवास" !!

"तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे" पासून "कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं" पर्यंतचा सिने-गीतकार सागर पवार यांचा प्रेर...