Tuesday, 14 July 2026

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी 

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
 महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उरण पोलीस ठाणे हद्दीतील द्रोणागिरी येथील देवकृपा बिल्डिंगमध्ये असलेल्या "युनिक युनिसेक्स सलून" या दुकानात हेअर वॉशसाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १२/०७/२०२६ रोजी सकाळी ११ ते ११:३० वा.च्या दरम्यान सदर महिला सलूनमध्ये हेअर वॉश करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे काम करणाऱ्या सोहेल शमशाद शेख, वय २१ वर्ष, राहणार द्रोणागिरी या इसमाने महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

या घटनेमुळे द्रोणागिरी आणि परिसरातील महिला वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. "युनिसेक्स" च्या नावाखाली महिला आणि पुरुष दोघांसाठी एकाच ठिकाणी सेवा देणे हेच मुळात धोकादायक आहे. अशा ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या अब्रूला धोका आहे. 

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, महिलांसाठी स्वतंत्र केबिन, महिला कर्मचारी किंवा किमान सी सी टी व्ही सारख्या मूलभूत सुरक्षा व्यवस्था नसताना अशा सलूनना परवानगी कशी मिळते ? पैशासाठी महिलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.

या प्रकरणानंतर उरण आणि द्रोणागिरीतील नागरिकांनी मागणी केली आहे की, "युनिक युनिसेक्स सलून" सारखी सर्व अनधिकृत आणि असुरक्षित सलून तात्काळ बंद करावीत. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व सलूनची तपासणी करून कठोर नियम लागू करावेत.सध्या तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामविकास अधिकारी वैभव पाटलांवर फौजदारी दाखल करा, अन्यथा बीडीओंवर कारवाई !!

ग्रामविकास अधिकारी वैभव पाटलांवर फौजदारी दाखल करा, अन्यथा बीडीओंवर कारवाई !!

** सीईओ नेहा भोसलेंचा खालापूर पंचायत समितीला दणका

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
खालापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केगांव येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांच्यावर शासकीय निधीचा अपहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले आहेत. यासोबतच, आदेश देऊनही त्यांना अद्याप कार्यमुक्त न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून सुधागड येथील नवघर ग्रामपंचायतीत हजर करण्याचे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचे निर्देश खालापूरच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

​ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांनी केगांव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामनिधीतून वसूल केलेली रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता स्वतः परस्पर खर्च केली तसेच ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजांमध्ये बनावट कागदपत्रांचा समावेश करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत १ जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत संतप्त पडसाद उमटले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी गट विकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आदेशात स्पष्ट बजावले आहे की, वैभव पाटील यांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि तसा अहवाल तात्काळ जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावा. जर या आदेशाचे विहित मुदतीत पालन झाले नाही, तर गट विकास अधिकाऱ्यांवरही 'महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९' मधील नियम १० अन्वये शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, असा सज्जड दमही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टोळीप्रमुखासह 8 जणांवर मोक्का !!

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टोळीप्रमुखासह 8 जणांवर मोक्का !!

*20 पीडित महिलांची सुटका*  

*कल्याण, प्रतिनिधी 

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे अनैतिक वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टोळीप्रमुखासह 8 आरोपींना मोक्का कायद्यान्वये अटक करण्यात आली असून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

*काय आहे प्रकरण?*  
21 फेब्रुवारी 2026 रोजी कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याचा आरोप होता. तपासात आरोपींनी संगनमत करून 20 महिलांचा अनैतिक व्यापार केल्याचे समोर आले.

आरोपींकडे कोणताही कायदेशीर आर्थिक स्रोत नसल्याने आर्थिक फायद्यासाठी त्यांनी संघटित टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

*अटकेची कार्यवाही*  
30 जून रोजी 5 महिला आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली. 8 जुलै रोजी फरार टोळी सदस्य प्रशांत उर्फ कवा गायकवाड याला अटक करण्यात आली. 

टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि मिता बारीक हे पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथे लपले होते. पोउनि विकास मडके यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने 11 जुलै रोजी दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांनाही ट्रान्झिट वॉरंटवर कल्याणला आणून 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

*अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन*  
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर बव्हाण आणि अपर आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पुढील तपास सपोनि अशोक होनमाने करत आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टोळीप्रमुखासह 8 जणांवर मोक्का, 20 महिलांची सुटका !!

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टोळीप्रमुखासह 8 जणांवर मोक्का, 20 महिलांची सुटका !!

*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे अनैतिक वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टोळीप्रमुखासह एकूण 8 आरोपींना मोक्का कायद्यान्वये अटक करण्यात आली असून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

*काय आहे प्रकरण?*  
दिनांक 21/02/2026 रोजी कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि. नं. 107/2026 मध्ये बी.एन.एस. कलम 143(3), 3(5) सह स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल होता. 

तपासात असे निष्पन्न झाले की, अटक केलेल्या महिला व पुरुष आरोपींनी संगनमत करून एकूण 20 बळी महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले. पैशाचे आमिष दाखवून त्यांचा वापर शरीरसंबंधासाठी ग्राहकांसोबत पाठवून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वतःची उपजीविका करीत होते.

*आर्थिक फायदाासाठी संघटित गुन्हेगारी*  
अटक केलेल्या महिला आरोपी व पुरुष आरोपींकडे कोणताही कायदेशीर आर्थिक स्रोत नसून, त्यांनी संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने महिलांचा अनैतिक व्यापार केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या टोळीचा बिमोड करण्यासाठी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण यांची मंजुरी घेऊन गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) समाविष्ट करण्यात आले.

*अटकेची कार्यवाही*  
1.  दिनांक 30/06/2026 रोजी गुन्ह्यातील 5 महिला आरोपींना कल्याण जिल्हा कारागृहातून ताब्यात घेऊन 06/07/2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला.
2.  मोक्का गुन्ह्यात फरार असलेला टोळी सदस्य प्रशांत उर्फ कवा विरकुमार गायकवाड याला 08/07/2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. त्याला 14/07/2026 पर्यंत पोलीस कोठडी झाली.
3.  टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद व फरार आरोपी मिता नारायण बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपल्याची माहिती मिळाली. पोउनि विकास मडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डायमंड हार्बर पोलिसांच्या मदतीने 11/07/2026 रोजी दोघांनाही ताब्यात घेतले. ट्रान्झिट वॉरंटवरून त्यांना कल्याणला आणून 18/07/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

*अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन*  
सदरची कारवाई मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. ज्ञानेश्वर बव्हाण, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. अतुल शेंडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कल्याण यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अशोक होनमाने, कल्याण विभाग करीत आहेत.

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

*डोंबिवली, राजू नलावडे 

डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. 15 दिवस आधी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसून, ग्राहकांना न कळवता बुकिंग रद्दही केले जात असल्याचा आरोप आहे.

*घरपोच सेवा बंद, नागरिकांना हाल*  
अनेक भागात घरपोच डिलिव्हरी बंद असल्याने नागरिकांना स्वतः एजन्सीच्या गोडाऊनवर जावे लागत आहे. डोंबिवली आजदे, सागर्ली येथील रहिवासी एमआयडीसीतील उस्मा पेट्रोल पंपाजवळील चैतन्य गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर गर्दी करत आहेत. येथे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गॅससाठी 4-4 तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

पावतीसाठी आधी नेहरू मैदानजवळील ऑफिसमध्ये जावे लागते. त्यासाठी आणि सिलेंडर वाहतुकीसाठी किमान 100 रुपये रिक्षा खर्च येत आहे. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांवर हा अतिरिक्त भुर्दंड पडत आहे.

*काळाबाजाराचा संशय*  
आजदे गावातील योगिता थोटांगे यांचे बुकिंग असूनही गॅस मिळाला नाही. एजन्सीला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवकही रजा घेऊन सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. काही नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. गॅसचा काळाबाजार होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

*मागणी*  
महागाई आणि दरवाढीने त्रस्त नागरिकांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि आजदे, सागर्ली सारख्या ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा ! रहिवासी भयंकर त्रस्त !!

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा ! रहिवासी भयंकर त्रस्त !!

               डोंबिवली आणि विशेष करून ग्रामीण परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून १५ दिवस आधी बुकिंग करून सुद्धा गॅस येत नाही. शिवाय हे बुकिंग ग्राहकांना न कळविता किंवा मेसेज न पाठविता कॅन्सल करीत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी घरपोच डिलिव्हरी बंद केल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. घरपोच डिलिव्हरी बंद होण्याचे कारण की सद्या कर्मचारी उपलब्ध नसल्याचे समजले आहे. तएकंदर गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीची यंत्रणा , व्यवस्था बरोबर नसल्याने हा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे असे समजले आहे.

               डोंबिवली आजदे, सागर्ली इत्यादी गावातील रहिवाशी हे भारत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एमआयडीसी मधील उस्मा पेट्रोल पंप जवळील चैतन्य गॅस एजन्सीचा गोडाऊनवर लोक गर्दी करीत आहेत. येथे महिला, ज्येष्ठ नागरिकांना येथे गॅस मिळण्यासाठी चार चार तास थांबावे लागत आहे. शिवाय पावती बनविण्यासाठी प्रथम त्यांना चैतन्य गॅस एजन्सीचा डोंबिवली मधील नेहरू मैदान जवळील ऑफिस मध्ये जावे लागते. तेथे जाण्यासाठी आणि सिलेंडर वाहतुकीसाठी रिक्षा करावी लागत आहे. त्यात त्यांचे कमीतकमी रुपये १००/- जात आहेत. हे सर्व ग्राहक अल्प उत्पन्नातील मध्यमवर्गीय लोक आहेत. आजदे गावात राहणाऱ्या सौ योगिता थोटांगे या आपला घरातील गॅस सिलेंडर संपल्यावर नोंदणी करून सुद्धा गॅस न आल्याने त्या सकाळी गॅस गोडाऊन वर गेल्या होत्या तेव्हा त्याना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला असून त्यानी गॅस एजन्सीला याचा जाब विचारला. परंतु गॅस एजन्सी कडून कुठलेही समर्पक उत्तर मिळाले नाही आहे. आशिष नेवाळकर हा युवक शिक्षण चालू ठेवून नोकरी करीत आहे पण तोही दांडी मारून गॅस सिलेंडर मिळण्यासाठी आला होता. काहींनी या त्रासाबद्दल नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. सदर गॅस सिलेंडर मिळण्यासाठी मोठा काळाबाजार होत असल्याचे समजले असून संबंधित सरकारी प्रशासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई केली पाहिजे. 
         आधीच महागाईने आणि गॅस सिलेंडर भाववाढीने जनता त्रस्त झाली आहे. त्यात रहिवाशी गॅस सिलेंडर ग्राहकांना चार चार तास थांबून वाहतुक खर्चाचा भुर्दंड बसत आहे. त्यात जास्त करून महिलांना (लाडक्या बहिणींना) याचा फटका बसत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा तसेच शक्यतो आजदे, सागर्ली अशा ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा चालू करण्यासाठी प्रयत्न करावा.

वृत्त - राजू नलावडे, डोंबिवली 

Monday, 13 July 2026

"संविधानाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र यावे" - अण्णासाहेब कटारे

"संविधानाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र यावे" - अण्णासाहेब कटारे

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा*  

*छत्रपती संभाजीनगर, सचिन ननगरे 

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले. मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोष मोकळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

*संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन*  
यावेळी मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे म्हणाले की, देशात संविधानविरोधी धोरणे राबवली जात आहेत. परिणामी मागास, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे जीवनमान खालावत आहे. अशा परिस्थितीत संविधानाचे समतेचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांवर आहे. 

देशात धर्मनिरपेक्ष शक्ती कमकुवत होत असताना धर्मांध शक्ती सत्तेच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. हे थोपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतील संघटित शक्ती उभी करणे गरजेचे आहे. नेत्यांमधील हेवेदाव्यांमुळे आंबेडकरी चळवळीला खीळ बसू नये, असेही त्यांनी सांगितले.

संघटित रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला असल्याचे कटारे यांनी स्पष्ट केले.

*पदाधिकारी उपस्थित*  
या बैठकीत विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला बिपीन कटारे, सचिन नांगरे, आर.बी. जगताप, संदीप गायकवाड, अंबादास बावस्कर, राजू राक्षे, दर्शन कुमार इंगळे, अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी  उरण दि १४, ...