Sunday, 15 February 2026

पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन

पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन 

** पाणी सत्याग्रह आणि समतानगरमधील भेटीच्या आठवणींची साक्षीदार काळाच्या पडद्याआड; परिसरात शोककळा

भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

भिवंडी तालुक्यातील  समतानगर , पडघे परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी जपणाऱ्या आणि त्या घटनेच्या एकमेव साक्षीदार असलेल्या हिराबाई दुंदांजी सोनावणे (वय ९६) यांचे शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे समतानगर व परिसरात शोककळा पसरली असून सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिराबाई सोनावणे या पडघ्यातील सतीच्या विहिरीवर झालेल्या ऐतिहासिक पाणी सत्याग्रहाच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीच्या जिवंत साक्षीदार होत्या. त्यांनी अनेक वेळा आपल्या आठवणी सांगताना नमूद केले होते की, त्या लहान असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघ्यात आले होते. सतीच्या विहिरीवर त्यांनी पाणी सत्याग्रह केला होता आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या सत्याग्रहामुळे सामाजिक समतेचाआणि हक्कांच्या लढ्याचा संदेश परिसरात पोहोचला होता. त्यावेळी पडघा येथील एका शिसवीच्या झाडाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे आवाहन केले होते. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्यांच्या विचारांचा प्रभाव त्या काळात पडघा परिसरातील नागरिकांवर झाला होता. पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. समतानगर येथील काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चहापाण्यासाठी थांबले होते. ही बातमी त्या काळात संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी समतानगर येथिल पत्रकार मिलिंद जाधव यांना हिराबाई दुंदाजी सोनावणे यांनी अनेकदा सांगितल्या होत्या. त्यांच्या या आठवणींवर आधारित अनेक बातम्या आणि लेखही मिलिंद जाधव यांनी प्रसिद्ध केले होते. हिराबाई सोनावणे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर समतानगर येथील बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या स्मरणार्थ रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता समतानगर, पडघा येथील त्यांच्या राहत्या घरी पुण्यानुमोदन कार्यक्रम आणि आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

हिराबाई सोनावणे यांच्या निधनामुळे पडघा परिसराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी सांगणारा एक महत्त्वाचा साक्षीदार गमावला असून, त्यांच्या आठवणी इतिहासाचा अमूल्य ठेवा म्हणून कायम स्मरणात राहतील.

ठाणे नगरीतील नामवंत कलाकार अक्षय जाधव ह्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा ने गौरवण्यात आले !!

ठाणे नगरीतील नामवंत कलाकार अक्षय जाधव ह्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा ने गौरवण्यात आले !!

ठाणे, प्रतिनिधी : Talent कट्टा आणि नालंदा विद्यापिठ (महाराष्ट्र राज्य ) च्या वतीने ७ फेब्रुवारी २०२६ पुणे पत्रकार भवन येथे आद. अक्षय जाधव ह्यांना नृत्य संगीत क्षेत्रतील अभूतपूर्व कामगिरी बदल राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले.अगदी लहान पणा पासून नृत्याची आवड असणाऱ्या अक्षय ह्याना हा प्रवास फार खडतर होता. तब्बल १५ वर्ष त्यांनी नृत्य सादर करत असून शिकवत सुद्धा आहेत. परस्थिती ला हरता त्यांनी जिद्द कायम ठेवली त्या मुळे लोकसंगीत लोक कला ह्यात त्याना असंख्य पुरस्कार सुद्धा मिळाली. आपली महाराष्ट्रीय कलानृत्य अंतराष्ट्रीय पातळी वर पोहचवण्या साठी ते मेहनत करीत आहे. संपूर्ण कुटुंबा सोबत त्यांनी हा सन्मान स्वीकारला.माध्यमा समोर बोलत असताना त्यांनी सांगितले आजचा हा सन्मान माझ्या परिश्रमांना मिळालेली मानाची पावती आहे."

"हा सन्मान माझा एकट्याचा नसून, ज्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथवर पोहोचलो, त्या प्रत्येक हाताचा हा गौरव आहे. 

सन्मानार्थ कार्यक्रमात माजी सैनिक डॉ. रंजेंद्र वालीया, अभिनेत्री आर्या घारे,लेखिका अर्चना देसाई, शास्त्रज्ञ डॉ नीता जोशी, प्रा. संदीप सांगळे व अध्यक्ष मा. नितीन धवने- पाटील हे देखील उपस्थित होते.

सौजन्य - साईनाथ खरात 

जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात संपन्न !!

जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          ईशान्य मुंबईत प्रसिद्ध असलेले घाटकोपर पश्चिम येथील जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. जंगलेश्वर मंडळाचे भक्त मंडळाचे अध्यक्ष कैलास पप्पू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसीय महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक विधी, जपसह मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. महाशिवरात्री निमित्त पूर्ण परिसर मंदिर सुंदर हार फुलांनी आणि आकर्षक विधुत रोषणाईने सजले होते. घाटकोपर पूर्व उपनगरातील जंगलेश्वर महादेव मंदिर हे भक्त पावणारे असे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. जंगलेश्वर भक्त गणेशोत्सव ५८ वे वर्ष साजरे करण्यात आले या महोत्सवाचे प्रमुख कैलाश सदाशिव सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक व षोडोषोपचार पूजा विधी, होम हवन, अखंड जप असा विविध कार्यक्रम झाले. शनिवारी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून याचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतील.

महाशिवरात्रीच्या उत्सवानिमीत्त सिनेकलाकार, विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते जंग्लेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. यावेळी स्थानिक आमदार दिलीप लांडे मामा, भाजप नगरसेवक प्रकाश मोरे, धर्मेश गिरी, मनसे नेते दशरथ शिर्के, सनी शिर्के, भाजपा नगरसेविका अश्विनी मते, आरपीआय चे दादू भोसले, शाखाप्रमुख शांताराम ठुकरूल आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान उपस्थिती मान्यवरांचा मंडळाचे अध्यक्ष कैलाश उर्फ पप्पू सुर्वे आणि संचालक कमलेश सुर्वे यांनी सन्मान केला. मंडळाचे कार्यकर्ते शेखर सावंत, भरत शिंदे, संजय सावंत, किशोर सुतार, व्यावसायिक रमेश तारी, भाऊ शिंपी, सुनील सावंत,  बापू गायकवाड, भरत देसाई, संतोष लाड आदीसह अनेक कार्यकर्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत होते.

सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार, २०२६’ ने रेखाताई हिरेमठ यांचा गौरव !!

सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार, २०२६’ ने रेखाताई हिरेमठ यांचा गौरव !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स अंतर्गत प्रदान करण्यात येणारा ‘सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार-२०२६’ हा मानाचा पुरस्कार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा बसवेश्वर हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला.सिंधुताई सपकाळ उर्फ ‘माई’ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली तब्बल २५ वर्षे समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या रेखाताईंना हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिपक जोशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. समाजासाठी असलेली आपुलकी, जिव्हाळा व माणुसकी ही मूल्ये केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सामाजिक कार्यातून व्यापक जनसंपर्क निर्माण केला. महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य, तसेच अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जीवनात आशेचे व आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.

विक्रोळी पार्कसाईट वार्ड क्र.१२३ येथील श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम थाटामाटात संपन्न !!

विक्रोळी पार्कसाईट वार्ड क्र.१२३ येथील श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम थाटामाटात संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          विक्रोळी पार्कसाईट वार्ड क्र.१२३ येथील श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम थाटामाटात पार पडला.या पावन प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य श्री सुभाष खोडदे महाराज, ह.भ.प. झगडे बुवा तसेच रुद्रांगमनी कु. प्रथमेश पवार यांनी आपल्या कीर्तन व प्रवचनातून उपस्थि भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाला  ग्राहक संरक्षण कक्ष चे पदाधिकारी कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,वार्ड संघटक १२३ श्री. संतोष चादे, राजू जाधव, नितेश उतेकर, विजय पांडेय, उमेश गाडगे, नरेश हातिशकर, दत्तगुरु पेडणेकर व संजय कदम आदी मान्यवरांनी  उपस्थित राहून मंदिराचे दर्शन घेऊन कीर्तनाचा लाभ घेतला.यावेळी मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत सावर्डेकर, सचिव रामचंद्र मयेकर, खजिनदार प्रकाश सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
         श्री.किरण जानवलकर, श्री.संजय जानवलकर, श्री. जनार्दन नाक्ती ,चंद्रकात साटम, श्री. नारायण गावडे,श्री.आप्पासाहेब दाणे,श्री. अनिल अधिकारी, ह.भ.प.श्री. भार्गव झगडे, श्री. सुनिल सावर्डेकर, श्री. रमेश आंबे, श्री. रविंद्र आंबेकर, श्री. सुनिल जाडे, श्री.संदिप साटम,श्री. कृष्णा थोरे, श्रीमती ज्योती भोसले, सौ.अनिता राणे, सौ. अस्मिता अधिकरी, श्रीमती माया साटम, सौ. क्रांती साटम सर्व सदस्य आणि सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Saturday, 14 February 2026

३५ वर्षांची गौरवशाली शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या आर. के.एफ. (आय. इ. एस) शाळेच्या विद्यार्थी , पालक, आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू - विश्वस्त दिनेश पाटील.

३५ वर्षांची गौरवशाली शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या आर. के.एफ. (आय. इ. एस) शाळेच्या विद्यार्थी , पालक, आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू 
   -  विश्वस्त दिनेश पाटील.

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
आर. के. एफ. ज. ने. पोर्ट विद्यालय, शेवा. प्राथमिक विभाग मराठी व इंग्रजी माध्यमाचा बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे. एन. पी. ए. चे कामगार प्रिय व शाळेचे हितचिंतक असणारे विश्वस्त  दिनेश पाटील,रविंद्र पाटील,पंचायत समिती उरण च्या गटशिक्षणाधिकारी  निर्मला घरत उपस्थित होत्या.त्यावेळी शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, केवल गावंड, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील,  भुषण जाधव, अंकुश जोगळे, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे , आर. के. एफ. संस्थेचे पदाधिकारी  श्रीम. सना खान,प्रितेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांनी भेटवस्तू, शाल आणि तुळशीचे रोप देऊन केले. प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते नटराज पुजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या नंतर शाळेच्या वर्षभरातील सहशालेय उपक्रम, विशेष स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसे आणि शाळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या कार्य अहवालाचे प्रकाशन  मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले. आम्ही भविष्यात शाळेच्या आणि कर्मचारी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून शाळेला गतवैभव प्राप्त करून देऊ असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आर. के. एफ. व्यवस्थापन पदाधिकारी, शालेय सफाई महिला कर्मचारी आणि जे. एन. पी. ए. मेंटेनन्स सर्व विभागातील कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व वर्ग शिक्षक, स्पेशल शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सदर केलेले सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम एकापेक्षा एक असे दर्जेदारपणे सादर झाले. कुपारी नृत्य, महाराष्ट्र माझा, सारे जहाँसे अच्छा, ईशस्तवन ह्या कार्यक्रमांमधून शाळेच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा रसिकांना अनुभवायला मिळाला. यामागे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची मेहनत फार मोलाची ठरली आहे.यावेळी पालकांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले . मनापासून कौतुक केले . विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याने अप्रतिम गिटार वादन करुन गायन केले असा शाळेचा सर्वाधिक बक्षिसे पटकावणारा आदर्श व हुशार विद्यार्थी
कु. नमित वाघावले,मोठ्या कौशल्याने पियानो वादन करणारी कु. श्रेयशी मुंढे आणि जय महाकाली या गाण्यावर दमदार नृत्याविश्कार सादर करणारा कु. दीप कडू या तिन्ही सोलो कार्यक्रम सादर करणारे आणि सर्व सामुहिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या चिमुकल्या बालकलाकारांनी तुफान गर्दी करुन जमलेल्या पालकांना, कलाप्रेमी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन त्यांची वाहवा मिळवली. प्रत्येक कार्यक्रम सादर होताना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता हिच खरी शाबासकीची थाप विद्यार्थ्यांना मिळाली. 

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे आदर्श कलाशिक्षक  मिलिंद ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत केले. शाळेचे सुप्रसिद्ध संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सांगितिक बाजू उत्तमप्रकारे सांभाळली.शाळेच्या गुणी व मेहनती शिक्षिका श्रीम आश्रया शिवकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख उत्तमप्रकारे करुन दिली.श्रीम योगसाधना पाटील यांनी सर्व मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. श्रीम. उज्ज्वला तांडेल, श्रीम. वंदना कपूर आणि श्रीम. सौम्या पाटील यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीचे वाचन उत्कृष्टतेने केले. किशोर म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे फलक लेखन सुंदर हस्ताक्षरात केले. श्रीम. रिना ठाकूर,श्रीम सरिता पाटील, गजानन पाटील, श्रीम नंदा डिगे, घनश्याम पाटील,  वसंत कडू, शिवाजी गुरव, पारवे दादा,श्रीम मयुरी म्हात्रे,सर्व विभागातील शिपाई दादा, आया आणि महिला सफाई कामगार, सिक्युरिटी कर्मचारी यांनी सुद्धा उत्तम मेहनत घेऊन या कार्यक्रमास सहकार्य केले.

रायगडचा खरा डॉन महेंद्रशेठ घरत : श्रीरंग बर्गे

रायगडचा खरा डॉन महेंद्रशेठ घरत : श्रीरंग बर्गे

रायगडमध्ये आम्ही शान राखली : महेंद्रशेठ घरत

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : "रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा व पैशांचा प्रचंड वापर करणाऱ्या महायुतीच्या झंझावातासमोर भलेभले धाराशाही झाले असताना काँग्रेसने लढलेल्या ३ पैकी २ जागा जिल्हा परिषदेवर प्रचंड बहुमताने जिंकून काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यामुळे  कामगार नेते तथा जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हेच खरे डॉन आहेत. कॉंग्रेसमध्ये मंत्री, आमदार, खासदार झाल्यानंतर अनेकांनी कॉंग्रेसलाच सोडचिठ्ठी दिली; परंतु कॉंग्रेसशी निष्ठावंत राहून महेंद्रशेठ रायगडची खिंड लढवत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे," असे प्रतिपादन श्रीरंग बर्गे यांनी अलिबाग येथे केले. ते 'अलिशान कप'च्या उदघाटनप्रसंगी अलिबाग-सोगाव येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले, "महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना आपल्या चाणक्य नीतीने ऐनवेळी भावना घाणेकर यांना उमेदवारी जाहीर करून उरणचे आमदार महेश बालदी यांना 'पळता भूई थोडी केली' व उरण नगर परिषदेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महेश बालदी यांच्यावर मात करत त्यांची घमेंड उतरविली. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधत स्वतः माघार घेऊन काँग्रेसच्या वाट्याच्या तीन जागा शिवसेना, शेकापला सोडून पुढची रणनीती आखली. उरण मतदारसंघाचा ट्रेंड ठरविणाऱ्या उरण पंचायत समितीवर ७.१ असे घवघवीत यश संपादन करून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी २०२९ ची आमदार महेश बालदी यांची वाट बिकट केली आहे, किंबहुना विधानसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा केला आहे. चिरनेर, जासई जि. प. मतदारसंघात तरुण तडफदार उमेदवारांना उमेदवारी देऊन युवकांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे, हे तरुणाईला दाखवून दिले."

रायगडमध्ये कॉंग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन जागा लढविल्या आणि दोन जागा जिंकल्या. रायगड हा मतदारसंघ दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले आणि दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचा आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे, अशावेळी रायगडमधील यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे रायगडमध्ये आम्ही काँग्रेसची शान राखली, असे अभिमानाने म्हणू शकतो," असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत अलिबाग-सोगाव येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते प्रकाश झोतात आयोजित केलेल्या 'अलिशान कप'चे उदघाटन झोकात झाले. अखंडपणे सोगावमध्ये सलग १३ वर्षे क्रिकेट सामने भरवून येथील तरुणांनी  आपल्यातली जिद्द दाखविली आहे. 

यावेळी ते पुढे म्हणाले, "क्रिकेटचा मी चाहता आहे. मी फक्त क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करत नाही, तर गावोगावी मैदाने मिळवून देतोय, अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर यांच्या नावाने हक्काचे मैदान हवे. राजाभाऊ ठाकूर यांच्या पराभवामुळे आमचा 'गड आला, पण सिंह गेला' असे मला वाटते. बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्या विचारांची कास धरून रायगड आपल्याला पुन्हा  कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांनी आतापासूनच पुढची तयारी सुरू करावी."  
राजाभाऊ ठाकूर म्हणाले, "मी खचलेलो नाही, मॅच फिक्सिंग झाली. फिल्डिंगमध्ये कमी पडलो, परंतु मी शेवटपर्यंत लढणारच आहे. ठाकूर घराण्याची मान उंचावणारच."
सुनील थळे म्हणाले, "हार-जित होते, शिस्तप्रियता हवी, येत्या काळात राजाभाऊ निश्चितच त्यांचा करिष्मा दाखवतील."

यावेळी एसटी कॉंग्रेसचे श्रीरंग बर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, राजाभाऊ ठाकूर, ऍड.प्रवीण ठाकूर, सुनील थळे, रवींद्र ठाकूर, ऍड.उमेश ठाकूर, नगरसेवक समीर ठाकूर, माजी सरपंच जगन्नाथ पेडवी, माजी उपसरपंच अशोक नाईक, अनिल जाधव, विलास गायकवाड, अनिता शिंदे, सानिका घाडी आदी उपस्थित होते. यावेळी अवघ्या पाच वर्षांच्या शिवांश याने लाठीकाठी स्पर्धेची चमक प्रेक्षकांसमोर दाखवून क्रीडाप्रेमींची मने जिंकली. त्याची इंडोनेशिया येथे लाठीकाठी स्पर्धेसाठी निवड झाल्याने, तसेच ९१ वर्षांच्या कुतुबुद्दीन कप्तान यांचा सत्कार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आला.

पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन

पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन  ** पाणी सत्याग्रह आणि समतानगरमधील भेटीच्या आठवणींची ...