Tuesday, 3 February 2026

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

ठाणे प्रतिनिधी: ता.३,

पत्रकारिता, प्रभावी निवेदन, चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन तसेच सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान रविवारी, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 या भव्य कार्यक्रमात करण्यात आला.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड करण्यात आलेल्या १३० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला माननीय श्री. विजय जाधव साहेब (उपसंचालक, नागरी संरक्षण, नवी मुंबई–ठाणे, गृह विभाग, महाराष्ट्र शासन), सुप्रसिद्ध मालिका व चित्रपट निर्माता श्री. दीपक जोशी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना श्री. दीपक जोशी यांनी माध्यमे, चित्रपट व मालिका यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी निर्मित केलेल्या विविध मालिका व चित्रपटांतून सामाजिक आशय मांडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे, प्रभावी निवेदक म्हणून अनेक कार्यक्रमांना सुसंस्कृत दिशा देणारे, तसेच चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनातून सामाजिक प्रश्न अधोरेखित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणाऱ्या श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा हा सन्मान तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्यास प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे, पुरस्कारार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या कार्याचा झालेला हा गौरव माध्यम व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

रायगडमध्ये कॉंग्रेस किंग मेकर : हर्षवर्धन सपकाळ

रायगडमध्ये कॉंग्रेस किंग मेकर : हर्षवर्धन सपकाळ 

रायगडमध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा : महेंद्रशेठ घरत 

दिबांच्या जन्मभूमीत कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मैदानात !

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद ! 

उरण  दि ३, (विठ्ठल ममताबादे) : लोकनेते दिबांच्या जन्मभूमीत जासई येथे कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ३) आले होते. यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांतांमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. 

यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, " रायगडमध्ये कॉंग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी कॉंग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही आहे. केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे, पण दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील." असे ते म्हणाले.यावेळी महेंद्ररशेठ घरत म्हणाले कि " जासई  उरण तालुका ही दिबांची जन्मभूमी आहे. दिबांची कामगिरी देशपातळीवर अभिमानास्पद आहे. अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिलेले नाही, येथील भूमिपुत्र हे कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भूमिपुत्रांनी विजयी करून सरकारचा निषेध करावा, तेव्हा सरकार जागे होईल. महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा मला शंभर टक्के विश्वास आहे. जासई, चिरनेर हे आमचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता येईल." जासई जिल्हा परिषद मतदार संघात डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून ऍड. अविनाश ठाकूर हे कॉंग्रेसचे उमेदवार उभे आहेत.पंचायत समितीसाठी जासई - निर्मला घरत, चिर्ले - प्रियंका मढवी, पंचायत समिती उमेदवार कविता पाटील, प्रारंभी गावंड हे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. 
जासई, दिघोडे, कोप्रोली येथील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, प्रभारी डॉमनिक डिमेलो, माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे,  उपाध्यक्ष रामनाथ पंडित, जयवंत पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखा घरत, शेकापचे नरेश घरत, संतोष म्हात्रे,सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, कामगार नेते रवी घरत, बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी पिरकोन येथे स्नेह भोजनाचा आस्वाद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला.

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?
कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

कल्याण | प्रतिनिधी
कल्याण तालुक्यातील मौजे नव गाव परिसरात वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वन व्यवस्थापन समिती व ठेकेदारांकडून शासनाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून, याकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दिनांक 22/12/2026 रोजी या गैरप्रकाराबाबत “बातमीदार माझा” या चॅनलच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. मात्र इतके गंभीर प्रकरण समोर येऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कामे निकृष्ट दर्जाची असूनही ती अद्याप सुरूच आहेत. वनसंपदेचे नुकसान होत असताना आणि शासनाचा पैसा वाया जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

“महाराष्ट्रात लोकशाही आहे की हुकूमशाही?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून विचारला जात असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

हेडलाईन्स - कल्याण तालुक्यात घडलेल्या वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा !!

** हेडलाईन्स....

कल्याण तालुक्यात घडलेल्या वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा !!

सविस्तर वृत्तांत ...

दिनांक 22/12/2026 रोजी कल्याण तालुक्यात मौजे नव गाव येथे वनविभागाचा भोंगळ कारभार येथील वन व्यवस्थापन समितीने चव्हाट्यावर आणून कशाप्रकारे शासनाचा निधी हडपण्याचा प्रयत्न होतो हे नागरिकांना 'बातमीदार माझा' या चॅनलच्या माध्यमातून दाखवून जनजागृती केली होती, परंतु याबाबत शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलेही ठोस पाऊल न उचलता अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व संताप व्यक्त होत आहे. 

यात अधिकारी व ठेकेदार यांच्यात काही संगनमत असल्याची नागरिकांची शंका आहे, यासाठीच संबंधित ठेकेदार तसेच अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ते निकृष्ट दर्जाचे बांधकाम अजूनही सुरू आहे. स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी खालच्या दर्जाचे काम करणारे ठेकेदार व त्यांना अभय देणारे अधिकारी यामुळे महाराष्ट्रात ठेकेदार यांची मनमानी वाढली असून त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

ठाणे, प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवडण्यात आलेल्या १३० “हिर्‍यांमध्ये” उल्लेखनीय कार्यामुळे मा.श्री. विजय जाधव साहेब (उपनियंञक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह – ठाणे, गृह विभाग विशेष, महाराष्ट्र शासन) यांचा कौतुक सन्मान रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 मध्ये करण्यात आला.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नागरी संरक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, जनजागृती, स्वयंसेवक प्रशिक्षण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्पर मदत देण्यासाठी श्री.जाधव साहेब यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई समुह, ठाणे विभागात नागरी संरक्षण कार्य अधिक सक्षम झाले असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे, मान्यवर, पुरस्कारार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्री. विजय जाधव साहेब यांचा झालेला हा गौरव नागरी संरक्षण विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !

जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !

ठाणे (शांताराम गुडेकर) :

          ठाणे जिल्ह्यातील मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी  विद्यार्थांच्या अंतर्गत असणाऱ्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. प्रशांत तांदळे सर यांनी केले .या कार्यक्रमात इयत्ता बारावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ देखील करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. बी.एल. जाधव सर यांचा सत्कार करून करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी. सागर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थींना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

               या वेळी  विविध स्तरावर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कु. करण भोईर, वृषाली, जानवी ढमाले, कामिनी बोंबे या खेळाडूंचे तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर कोळीगीते, हिंदी आणि मराठी सिनेमातील गाण्यांवर विद्यार्थांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश घरत सर यांनी केले. यावेळी प्रा. शेख शफीक सर, प्रा. रसिका लोकरे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कु.भार्गवी पितांबरे, कु.रुचिका झंझड, कु.जिन्यासा पाटील, कु सुप्रिया जाधव, कु.आरती पवार, कु.ऋतुजा सोनवणे, कु.साक्षी जाधव, कु.मनीष पवार यांनी उत्तम सादरीकरण केले. आणि शेवटी प्रा.तांदळे सर यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

Monday, 2 February 2026

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' मार्फत विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 'करिअरच्या संधी' या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून तळोजा येथील श्रीकेम लॅबचे उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश कटगिरी उपस्थित होते. त्यांनी नवी मुंबईतील तळोजा, तुर्भे आणि पातळगंगा यांसारख्या मोठ्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या रोजगाराच्या संधींची सविस्तर माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कटगिरी म्हणाले की प्रशिक्षित असणे काळाची गरज आहे.जर उद्योगांमधील संधींचे सोने करायचे असेल, तर तरुण पिढी केवळ पदवीधर असून चालणार नाही, तर ती तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. फार्मा सेक्टरमधील संधी बाबत त्यांनी माहिती दिली. त्यांनी औषध निर्माण कंपन्यांमधील (Pharma Companies) संशोधन आणि विकास (R&D), उत्पादन विभाग (Production) आणि गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) या विभागांतील कामकाजाची आणि तेथील नोकरीच्या संधींची माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड काढून टाकावा आणि स्वतःच्या कौशल्यांवर (Skills) काम करावे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून, कौशल्य आत्मसात केल्यास नोकरी मिळवणे सोपे होते, असे आवाहन त्यांनी केले. 
उपप्राचार्य तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अनिल पालवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी डॉ. गुरुमीत वाधवा, चेतना तुंबडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...