मा. न्यायालय व महसूल मंत्र्यांचे आदेश असतानाही काल्हेर ग्रामपंचायतीची टाळाटाळ; गुरुचरण व स्मशान भूमीवरील अतिक्रमणे कायम, तक्रारदार करणार जनहित याचिका !!
(भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायत, काल्हेर,येथील जमीन सर्वे नंबर २५१/१ गुरुचरण, जमीन सर्वे नंबर २५१/२ स्मशान भूमी व जमीन सर्वे नंबर २५८/१/अ/१ गुरुचरण या जमिनीवर "भू"माफियानी अतिक्रमण करून केलेले अनधिकृत बांधकामे)
भिवंडी, दिं,१०/६/१०२६,अरुण पाटील (कोपर)
राज्यातील सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत व ग्राम पंचायत क्षेत्रातील गुरुचरण (गायरन) जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे आदेश मा.उच्च न्यायालय व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिले आहेत. मात्र तरी देखील भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत, काल्हेर ही त्यांच्या हद्दीत असलेल्या गुरुचरण (गाय रान) जमिनीवर व स्मशान भूमीच्या जमिनीवर "भू"माफियांनी अतिक्रमण करून केलेली अनधिकृत बांधकामे हटविण्या बाबत टाळा टाळ करत आहे. या बाबत तक्रारदार यांनी गेल्या कित्येक वर्षा पासून पाठ पुरावा करूनही अतिक्रमण हटत नसल्याने व योग्य कारवाई होत नसल्याने अखेर तक्रारदार आता मा.उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.
या विषया बाबत तक्रारदार यांनी पुन्हा दिं,२७/२/२०२६ रोजी मा.गट विकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी यांना लेखी निवेदन दिल्याने त्यांनी ग्राम पंचायत, काल्हेर यांना तत्काळ चौकशी करून ग्राम पंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा स्वयंमस्पष्ट अभिप्रायासह अहवाल संबंधित अर्जदारास सादर करावा असे निर्देश दिले आहेत.मात्र आज पर्यंत तसे झाले नाही.
मात्र त्या अनुषंगाने काल्हेर ग्राम पंचायतीने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना बांधकामे हटविण्या बाबत थातूर मातुर नोटिसी बजावल्या आहेत.परंतु संबंधित "भू" माफियानी तथा बांधकाम धारकांनि/व्यावसायिकांनी सदर नोटिसिना केराची टोपली दाखवत बांधकामे हटविण्यासं नकार दिल्याचे समजले आहे.
सविस्तर हकिगत अशी.की, काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण, व स्मशान भूमीच्या जमिनीवर "भू" माफियांनी तथा बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करून खुलेआम अनधिकृत बांधकामे केली असून त्या बाबत काल्हेर ग्राम पंचायतीने संबंधित बांधकाम व्यावसायिक/ धारकांना केलेले अनधिकृत बांधकामे हटवण्या बाबत नोव्हेंबर २०२५ मध्ये नोटीसी निर्गमित केल्या आहेत.
मात्र आज पर्यंत संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांनी काल्हेर ग्रामपंचायतीच्या नोटीसीना कोणताच प्रतिसाद दिला नाही. तरी देखील काल्हेर ग्रामपंचात कमिटी व ग्राम सेवक तथा ग्राम विकास अधिकारी श्री .रमेश राठोड यांनी या बाबत आज पर्यंत कोणतीच ठोस "तोडक" कारवाई केली नसून सदर अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याने यात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
तसेच या काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षापासून मागील तारखेच्या (बॅक (डेट) परवानग्यांनी बांधकामे झाली आहेत व सद्या सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांमधुन होत आहे. मुख्य म्हणजे वरील सर्वे नंबरच्या बाजूला असलेल्या सर्वे नं २५० या जागेत अनधिकृत बांधकामा बाबत एम .एम.आर.डी. ए.या प्राधिकरणाने नोटीसही बजावली आहे.जर भविष्यात तोडक कारवाई झाल्यास तर सर्वसामान्य रहिवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.व ते आज ना उद्या होणारच आहे त्यामुळे त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता निर्माण झाला आहे.त्यामुळे आता भविष्यात होणाऱ्या अशा पुढील सर्व अनधिकृत बांधकामांना नोटिसी बजावून त्यांची सबळ कागदपत्रे तपासूनच योग्य सदनिकांना घरपट्टी आकारणी व ८/अ हा उतारा द्यावा असे जानकारांचे म्हणणे आहे.
येथील तलाठी सजा काल्हेर, व मौजे काल्हेर मधील जमीन सर्वे नंबर ,२५१/१ गुरुचरण काल्हेर, व २५१/२ स्मशान भूमी - काल्हेर या जागेत "भू" माफियानी अतिक्रमण करून केलेल्या अनधिकृत बांधकामान बाबत तक्रारदार यांनी मा.तहसीलदार,भिवंडी यांना दिं,३१/०१/२०१३, मा.उपविभागीय अधिकारी यांना दीं. २/२/२०१३व तलाठी सजा - काल्हेर यांना दीं, ११/२/२०१३ रोजी पत्र दिले आहे. तसेच ग्राम पंचायत काल्हेर यांना दिं. १३/५/२०१६ व दिं,२८/३/२०२२ रोजी दोन पत्र देवून व २१/६/२०२२ रोजी स्मरण पत्र दिले आहेत.
तसेच त्यानंतर देखील मा.विभागीय कोकण आयुक्त, कोकण भवन,नवी मुंबई यांना दिं ,१६/३/२०२६, रोजी मा.मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO), ठाणे, यांना व जिल्हाधिकारी, ठाणे डॉ.श्री.कृष्णनाथ पांचाळ साहेब यांना दिं,१३/४/२०२६ रोजी तसेच मा.तहसीलदार, भिवंडी, श्री. अभिजीत खोले साहेब,यांना दिं,५/६/२०२६ रोजी, निवेदन सादर केले आहे.यांना देखील ग्रामपंचायत, काल्हेर, व ग्राम सेवक काल्हेर हे घाबरत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या विषया बाबत काल्हेर ग्रामपंचायतिचे ग्राम सेवक तथा ग्राम विकास अधिकारी श्री.रमेश राठोड साहेब हे एप्रिल,२०१८ रोजी रुजू झाले तेंव्हा पासून ते आज पर्यंत जवळपास आठ वर्षापासून (८वर्ष) त्यांना वारंवार प्रत्यक्षात भेटून या गुरुचरण व स्मशान भूमीच्या जागेवर"भू" माफियानी केलेले अतिक्रमण हटवण्या बाबत व अनधिकृत बांधकामानवर कारवाई करण्या बाबत वारंवार विचारणा केली.मात्र आज पर्यंत श्री.रमेश राठोड साहेबांन कडून कारवाई तर झालीच नाही व त्या विषया बाबत समाधान कारक उत्तरही मिळू शकले नाही. उलट मी हातोडी घेऊन बांधकाम तोडू का? असे "उद्धट"उत्तर श्री.रमेश राठोड यांनी तक्रारदार यांना दिल्याने तक्रारदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
त्यामुळे आता त्या ठिकाणी तेरा वर्षा पूर्वी सुरू असलेली अनधिकृत बांधकामे आज मितीस पूर्ण होऊन तेथील सदनिकांना अधिकृत "घर पट्टी" आकारनीही होऊन त्या ठिकाणी रहिवाशी राहू लागली आहेत. ही सर्व बांधकामे मागील तारखेच्या (बॅक डेट) बनावट व बोगस परवानग्यांनी पूर्ण केल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून त्यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यात ग्रामपंचायतींनी कागदपत्रांची शहानिशा "न"करताच घर पट्ट्या लावल्या त्यामुळे ग्रामपंचायतीनेच मोठ्ठा आर्थिक व्यवहार करून या मागील (बॅक डेट) परवानग्या दिल्याचा संशय ग्रामस्थ मधून व्यक्त होत आहे.त्यामुळे येथील सर्व अनधिकृत बांधकामांना लावलेल्या "घर"पट्ट्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
यात विषयात "भू" माफियानी गुरुचरण (गायरान) व स्मशान भूमीच्या जमिनीवर अतिक्रमण करून केलेली अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त झाली तर या सर्व घर - फ्लॅट धारकांनचे होणारे नुकसान कोण भरून देणार व त्याला जबाबदार कोणाला धरायचे असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे.
या विषयाबाबत तक्रारदार यांनी या पूर्वीच ग्राम पंचायत विभाग जिल्हा परिषद ठाणे यांना दिलेले पत्र.
(१) दिं,१३/५/२०१६ रोजी पत्र .
(२) दिं, १४/१०/२०२२ रोजी स्मरण पत्र सादर केले होते.
तसेच या बाबतचे स्मरण पत्र.
(३)दिं,२३/६/२०२२ रोजी पंचायत समिती भिवंडी,
(४)दिं, १९/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद ठाणे,
(५) दिं, १४/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी ठाणे,
तसेच जमीन सर्वे नं २५८/१/अ/१ महाराष्ट्र शासन ,गुरुचरण या जागेवर झालेल्या अतिक्रमणा बाबत गोपाल रामभाऊ पाटील रा. काल्हेर यांनी २४/३/२०२५ रोजी व जगदीश लालचंद्र पाटील, रा.कोपर यांनी २२/४/२०२५ रोजी पंचायत समिती,भिवंडी यांना पत्राद्वारे कळविले होते.
या बाबत ग्राम पंचायत, काल्हेर यांनी दिं,२७/५/२०२५ रोजी मा. उपअधीक्षक भूमी अभिलेखा, भिवंडी यांच्या मार्फत रोवर मशिनच्या साहाय्याने वरील सर्व जमिनीची शासकीय मोजणी करून हद्द निश्चित केली होती.त्यात वरील सर्व जमिनीवर अतिक्रमण होऊन अनधिकृत बांधकामे झाल्याचे निश्चित झाले आहे.
त्या अनुषंगाने ग्रामपंचायत काल्हेर कमिटीने त्या बाबत नोटिसी खालील प्रमाणे निर्गमित केल्या आहेत.
(१) स्थानिक पोलीस स्टेशन, नारपोली,भिवंड
(२) अनधिकृत अतिक्रमण धारक.
प्रति, मारुती अपार्टमेंट/बांधकाम धारक,
(३)प्रति, आरोही बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
(४)प्रति, रिद्धी सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
(५) प्रति,मौर्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.फेज ८, बि. नं ३,४ तसेच या बिल्डरला एम.एम.आर.डी ए.प्राधिकरणाने देखील नोटीस बजावली आहे.
(६) प्रति,मौर्या बिल्डर्स
(७)प्रति, पॅरिस प्रकाश पाटील.
या सर्वांना दिं,११/११/२०२५ व दिं, १२/११/२०२५ रोजी नोटीसी निर्गमित करून त्यात असे म्हटले आहे की, वरील सर्व जागेमध्ये आपले अतिक्रमित बांधकामे आढळून येत असल्याने सदर नोटीस मिळताच ३ दिवसांच्या आत आपण सदर बांधकाम काढून घ्यावे अन्यथा सदर बांधकाम ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्राम पंचायत मार्फत निष्कासित करणेत येईल व त्यासाठी येणारा खर्च जमीन महसूल अधिनियम कायद्यानुसार आपणा कडून वसूल करणेत येईल याची नोंद घ्यावी असे म्हणण्यात आले आहे.
त्यानंतर तक्रारदार यांनी पाठपुरावा म्हणून सन २०१३ पासून ते आज पर्यंत तत्कालीन मा.गट विकास अधिकारी व मा.विस्तार अधिकारी, पंचायत समिती भिवंडी व विद्यमान मा.गट विकास अधिकारी श्री.गोविंद खामकर साहेब यांना व मा.विस्तार अधिकारी श्री. राजू भोसले साहेब या सर्वांना आजपर्यंत प्रत्यक्षात शंभर ते दीडशे वेळा वारंवार भेटून कारवाई बाबत विचारणा केली असता त्यांनी देखील समाधानकारक उतर दिले नाही.
तसेच आजपर्यंत जवळपास सहा/सात महिने झाले असतान देखील ग्रामपंचायत कमिटी, काल्हेर यांनी देखील संबंधित "भू" माफियांवर कोणतीच ठोस कारवाई अथवा पाठपुरावा केला गेला नसल्याने अखेर या बाबत तक्रारदार याने व्यथित होऊन ग्राम पंचायत - काल्हेर येथे ग्राम विकास अधिकारी तथा जण माहिती अधिकारी यांच्याकडे दिं,२४/११/२०२५ रोजी माहितीचा अधिकार दाखल केला,मात्र मुदत संपूनही माहिती मिळाली नसल्याने या बाबत पुन्हा व्यथित होऊन तक्रारदार यांनि विस्तार अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दिं,१६/०१/२०२६ रोजी दाखल केले, व त्यातही मुदत संपून गेल्या नंतरही माहीत उपलब्ध करून दिलीं नाही.त्यामुळं या अनधिकृत बांधकामा बाबत खरी माहिती "न"देता ती लपवण्याचा प्रयत्न केल्याने त्या बाबत मा. गट विकास अधिकारी, भिवंडी श्री.खामकर साहेबांनी यात लक्ष घालने आवश्यक आहे.
या विषयात ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी कारवाई करत नाही ,माहिती देत नाही ,माहिती लपविण्याचा प्रयत्न करत असल्याने यात ग्राम विकास अधिकारी यांनी आर्थिक व्यवहार तर केला नाही ना? असा संशय ग्रामस्थांन मधून निर्माण होत आहे.जर ग्रामपंचायत कमिटीने संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना खुला पाठिंबा देवून कोणतीच ठोस कारवाई केली नाही तर त्या बाबत स्वतः तक्रारदार हे मा.ग्रामपंचायत काल्हेर व संबंधित "भू" माफिया व बांधकाम धारक यांच्या विरोधात एक जन हित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.