Monday, 9 February 2026

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा 

** २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व राज्यांतील जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय कार्यालये, कामगार कार्यालये व ई-कार्यालयांसमोर धरणे आंदोलन.

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : भारतीय मजदूर संघाचे (BMS) तीन दिवसीय २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन धर्मनगरी जगन्नाथ पुरी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध क्षेत्रांतील हजारो प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनात कामगारांच्या हिताशी निगडित गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर सखोल चर्चा व मंथन करण्यात आले.

अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय अध्यक्ष  एस. मलेशम यांनी देशातील कामगारविरोधी धोरणांवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व राज्यांतील जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय कार्यालये, कामगार कार्यालये व ई-कार्यालयांसमोर धरणा आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनाच्या माध्यमातून कामगार हितांचे संरक्षण, कामगार संहितांमधील (Labour Codes) आवश्यक सुधारणा, तसेच “सरकार जागे व्हा” या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.कालावधी २०२६–२०२९ साठी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी पुढील तीन वर्षांसाठी नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची सर्वसम्मतीने घोषणा करण्यात आली. एस. मलेशम (तेलंगणा) — अखिल भारतीय अध्यक्ष, सुरेंद्र कुमार पांडे (छत्तीसगड) — महामंत्री बी. सुरेंद्रन — संघटन मंत्री,

तसेच महाराष्ट्रातील अनिल ढुमणे यांची अखिल भारतीय सचिव म्हणून , मोहन येणुरे क्षेत्रीय सहसंघटक, जयंत देशपांडे, असंघटित क्षेत्र प्रमुख, शर्मिला पाटील व तृप्ती आळती महिला विभाग प्रमुख निवड जाहीर करण्यात आली.विविध मागणींबाबत सरकार ने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी जिल्ह्याधिकारी कार्यालय समोर आंदोलन  करून 'सरकार जगाव' देशभर करण्याचा निर्णय करण्यात आला आहेत. 

याशिवाय अधिवेशनात कंत्राटी कामगार क्षेत्रातील आव्हाने व कामगार सुरक्षेसंदर्भातील विशेष ठराव देखील मंजूर करण्यात आले. या २५ फेब्रुवारी सरकार जगाव आंदोलनात कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून न्याय हक्कां करिता संघर्ष  करावा असे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे. 

महामंत्र्यांचे वक्तव्य
नवनियुक्त महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“भारतीय मजदूर संघ येत्या काळात समाजाच्या शेवटच्या टोकावर उभ्या असलेल्या कामगाराच्या सन्मान व अधिकारांसाठी आपला संघर्ष अधिक तीव्र करेल. आमचे ध्येय केवळ मागण्या मांडणे नसून, राष्ट्रनिर्मितीत कामगारांचा सन्मानजनक सहभाग सुनिश्चित करणे हे आहे."  अधिवेशनाचा समारोप देशव्यापी, संघटित व सातत्यपूर्ण संघर्षाच्या दृढ संकल्पाने करण्यात आला. अशी माहीती सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.


कोट (चौकट ):- 

अधिवेशनातील प्रमुख संकल्प व ठराव:- 

अधिवेशनात कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी खालील महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले—

१)कामगार कायद्यांचे सार्वत्रिकीकरण :
कोणताही भेदभाव किंवा अपवाद न ठेवता सर्व श्रेणीतील कामगारांवर कामगार कायदे समानपणे लागू करण्यात यावेत.
२)ठेका प्रथेतील सुधारणा :
ठेका कामगारांचे शोषण कायमचे थांबवण्यासाठी विद्यमान कायद्यांत कठोर सुधारणा करण्यात याव्यात.
३)आंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान :
आंगणवाडी सेविका व मदतनीस यांना “मानधन”ऐवजी शासकीय कर्मचारी दर्जा, योग्य वेतन व संपूर्ण सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत.
४)त्रिपक्षीय यंत्रणेची पुनर्बहाली :
सरकार, नियोक्ता व कामगार यांच्यातील त्रिपक्षीय संवाद यंत्रणा पुनरुज्जीवित करून ती नियमित व प्रभावी करण्यात यावी.
५)भरती प्रक्रिया :
शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील ‘जनरल भरती’वरील बंदी तात्काळ उठवून युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
६)कामगार संहिता :
सोशल सिक्युरिटी कोड व वेज कोड तातडीने आणि प्रभावीपणे अंमलात आणण्यात यावेत.
७)स्कीम वर्कर्स :
सर्व स्कीम वर्कर्सना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा.
पी फ , ई.एस.आय,  पेन्शन,  ग्रेजुएटी,  बोनस मिळावे

उरण मध्ये भाजपचा सुपडा साफ ; महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत !

उरण मध्ये भाजपचा सुपडा साफ ; महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत

महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

मतदारांनी भाजपला नाकारले. निवडणुकीतून चित्र झाले स्पष्ट.

महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र आल्याने झाला विजय.

महाविकास आघाडीच्या नियोजन बद्ध प्रचाराला आले यश.

भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज.

उरण  दि ९, (विठ्ठल ममताबादे) :
उरण मध्ये ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक झाली असून ४ जिल्हा परिषद पैकी ३ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. तर ८ पंचायत समिती सदस्य पदा पैकी ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा मिळून १२ जागापैकी १० जागेवर महाविकास आघाडी निवडून आली आहे. भारतीय जनता पार्टीचा १ जिल्हा परिषद सदस्य व १ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत.या निकालामूळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(श्री शरदचंद्र पवार गट ), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षाचे मिळून उरण मध्ये महाविकास आघाडी तयार करण्यात आली. भाजपला प्रत्यूतर देण्यासाठी महाविकास आघाडी तयार करून नियोजन बद्ध प्रचार करण्यात आला त्यामुळे उरण मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागेवर विजय मिळविता आला आहे.या  निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले असून भाजप ला स्पष्ट पणे नाकारले आहे. या निवडणुकीमुळे भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यात सुरवातीपासूनच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा अटी तटीचा सामना रंगला होता. उरण तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असल्यामुळे हेच चित्र निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिसून आले. उरण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वाधिक मताने निवडून आले असून त्या नंतर भाजपच्या उमेदवारांचा नंबर लागतो.आमदारकीच्या निवडणुकीत आ. महेश बालदी यांना चांगली मते मिळाली असल्यामुळे तीच मते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळतील असा विश्वास भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होता. मात्र त्यांचा हा अंदाज खोटा ठरला. मतदारांनी तो अंदाज खोटा ठरविला.उरण मध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून या निकाला वरून २०२९ चा आमदारकीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल असा आशा तशा भावना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या.

भाजपच्या अपयशाची कारणे :- 
1)फाजील आत्मविश्वास :- पदाधिकारी कार्यकर्त्यांना अति विश्वास होता कि कोणत्याही परिस्थितीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील. जिल्हा परिषद व पंचायत समिती वर सत्ता आमचीच असेल या अविरभावात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते होते.
2):- जनतेला गृहीत पकडले :- मतदार हा काहीही करून भाजपलाच मतदान करेल अशी विचार धारणा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्याची होती. नेहमी प्रमाणे याही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेला गृहीत पकडल्याने भाजपचा मोठा पराभव पाहायला मिळाला.
3)योग्य उमेदवार नसणे :- भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी योग्य उमेदवार न दिल्याने त्याचा जोरदार फटका भाजपला बसला आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य पात्रतेचे उमेदवार उभे केले असते तर विजय हा भाजपचा असता. मात्र तसे झाले नाही.
4)जनसंपर्क कमी पडणे :- मुळातच सर्वच पक्षाना निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ कमी पडला. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रचार करून मतदार, नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी उत्तम जनसंपर्क ठेवायला पाहिजे होते. पण भाजपच्या उमेदवार कडुन पाहिजे तसा प्रचार, जनसंपर्क झाले नाही.नियोजन बद्ध प्रचार भाजपला करता आले नाही. त्यामुळे भाजपला अपयश आले आहे.
5)आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर नाराजी :- भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर उरण मधील जनता नाखुष होती. उरणच्या जनतेला आमदार महेश बालदी यांचे नेतृत्व मान्य नसल्याने त्याचा फटका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या भाजप तर्फे उभ्या असलेल्या उमेदवारांना बसला आहे.

उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते:- 

 चिरनेर जिल्हा परिषद 

ऍड अविनाश विजय ठाकूर (महाविकास आघाडी ) 14932

देवेंद्र विनायक पाटील (भाजप ) 11169 

संतोष श्याम गावंड (अपक्ष ) 156

अविनाश जयवंत पाटील (अपक्ष ) 104

रत्नाकर हरिश्चंद्र म्हात्रे (अपक्ष ) 88

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा) 354.

विजयी उमेदवार - ऍड अविनाश  ठाकूर

=====================================

नवघर जिल्हा परिषद 

प्रेरणा कुणाल पाटील (महाविकास आघाडी )10617 

प्रभावती राजाराम भोईर (भाजप )6198 

सोनाली तुषार गायकवाड (वंचित बहुजन आघाडी ) 173 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा) 449

विजयी उमेदवार - प्रेरणा कुणाल पाटील 

======================================

जासई जिल्हा परिषद 

जे डी जोशी (भाजप ):- 8811 

डॉ मनिष पाटील (महाविकास आघाडी )10803 

संतोष दत्तू भालेकर (अपक्ष )154 

NOTA (वरील पैकी एकही नाही (नोटा) 309 

विजयी उमेदवार - डॉ मनिष पाटील 

======================================

चाणजे जिल्हा परिषद 

सिद्धी सागर कडू (महाविकास आघाडी) - 8437 

रीना जितेंद्र घरत (भाजप )10069 

मालती संतोष भगत (आम आदमी पार्टी ) 273 

NOTA (वरील पैकी एकही नाही ) (नोटा ) 482

विजयी उमेदवार - रीना जितेंद्र घरत 

======================================

नवघर पंचायत समिती 

परेश धनाजी ठाकूर (महाविकास आघाडी )- 4341

ऍड. रजनीकांत गणेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 346 

हरेश गंगाधर भोईर (भाजप) 3968

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा ) 307 

विजयी उमेदवार - परेश धनाजी ठाकूर 

======================================

भेंडखळ पंचायत समिती 

कुंदा भूषण पाटील( माकप)686 

मिलिंद काशिनाथ पाटील (भाजप )3136

दिपक सुरेश भोईर (महाविकास आघाडी )4270 

भावेश भारत भोईर(शिवसेना )167 

शिवाजी यशवंत ठाकूर (अपक्ष )52 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा ) 163 

विजयी उमेदवार - दिपक सुरेश भोईर 

======================================

जासई पंचायत समिती 

मनीषा बळीराम घरत (भाजप )4035

निर्मला नरेश घरत (महाविकास आघाडी )4165 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा)180 

विजयी उमेदवार - निर्मला नरेश घरत 

======================================
चिर्ले पंचायत समिती 

ज्योस्त्ना अजित पाटील( भाजप) 5231 

प्रियांका दिपक मढवी (महाविकास आघाडी )6241

NOTA वरील पैकी एकही नाही (नोटा )225

विजयी उमेदवार - प्रियांका दिपक मढवी 

======================================

केगाव पंचायत समिती

परीक्षित प्रकाश ठाकूर( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )566

राजेंद्र आत्माराम ठाकूर (भाजप )3498

महेश महादेव म्हात्रे (महाविकास आघाडी )4035

NOTA (वरील पैकी एकही नाही (नोटा ) 154 

विजयी उमेदवार - महेश महादेव म्हात्रे 

======================================
 चाणजे पंचायत समिती 

कैलास मोरेश्वर भोईर (भाजप )4751 

अक्षय महेश म्हात्रे (शिवसेना )1620 

ऍड सागर सदानंद कडू(महाविकास आघाडी )- 4329

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )308 

विजयी उमेदवार - कैलास मोरेश्वर भोईर 

======================================

चिरनेर पंचायत समिती 

कविता रूपेश पाटील (महाविकास आघाडी )8247 

साक्षी सुजित पाटील (भाजप) 5222 

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )284

विजयी उमेदवार - कविता रुपेश पाटील 

======================================

आवरे पंचायत समिती 

सुषमा चंद्रकांत गावंड (मनसे )1076

समिधा निलेश म्हात्रे (भाजप )4249

प्रारंभी अविनाश गावंड (महाविकास आघाडी )7414

NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )312 

विजयी उमेदवार - प्रारंभी अविनाश गावंड 

======================================

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

उरणमध्ये कॉंग्रेसचा शंभर टक्के विजय‌ !!

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाचा करिष्मा 

उरण दि ९,(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसने दोन जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या होत्या. त्या दोन्ही जिंकून कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी करिष्मा केला आहे. 
जासई जिल्हा परिषदेच्या गटातून डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून ऍड. अविनाश ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला. 

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत. रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. आज बॅरिस्टर अ. र. अंतुले साहेब यांची जयंती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मारलेली बाजी कौतुकास्पद आहे. त्यामुळे अंतुले साहेब आणि आणि दि. बा. पाटील साहेब यांना महाविकास आघाडीचा विजय समर्पित करत आहोत."

धगधगती मुंबईच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा; २०२६ चे पुरस्कार जाहीर !!

धगधगती मुंबईच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा; २०२६ चे पुरस्कार जाहीर !!

** जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार तर सिनेअभिनेते विजय पाटकर, योगेश चिकटगावकर, के.के.शेलार,रमेश कदम यांचाही पुरस्कारांमध्ये समावेश

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा तसेच नवप्रेरणा कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४–५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

धगधगती मुंबई हे वृत्तपत्र गेली सोळा वर्षे अखंडपणे जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारे माध्यम म्हणून कार्यरत आहे. मुद्रित वृत्तपत्रासह यूट्यूब चॅनल व ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून सोशल मीडियावर वेगळे वलय निर्माण करत सर्वसामान्यांचा आवाज म्हणून धगधगती मुंबई ओळख निर्माण करत आहे. 

या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले जात असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवून देणे, उपचारादरम्यान रुग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अनाथाश्रम व वृद्धाश्रमांमध्ये दरवर्षी दोन ते तीन वेळा अन्नदान व वस्त्रदानाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. हे सर्व सामाजिक कार्य वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच शक्य होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

दरम्यान, धगधगती मुंबई २०२६ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सामाजिक सेवेबद्दल समाजरत्न पुरस्कार धारावीचे समाजसेवक रमेश कदम, समाजभूषण पुरस्कार उन्नतीचे चेअरमन हनुमंत रांजणे आणि कोपरखैरणे येथील समाजसेवक वसंत जाधव (सर) यांना जाहीर झाला आहे. 

शैक्षणिक रत्न पुरस्कार प्रताप महाडिक, साहित्यरत्न पुरस्कार डॉ. शांताराम कारंडे, युवा राजकीय रत्न पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेवक गणेश सकपाळ (घणसोली), उद्योगरत्न पुरस्कार सौ. अनुजा कौतिक दांडगे (महाराष्ट्र बाजार पेठ) तसेच उद्योजक के. के. शेलार यांना देण्यात येणार आहे. 

वैद्यकीय रत्न पुरस्कार नवी मुंबईतील प्रसिद्ध हाडवैद्य डॉ. सचिन वरखडे आणि एमबीबीएस डॉ. सुरज प्रकाश पाटील यांना जाहीर झाला आहे. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना कलारत्न पुरस्कार तर लोककलावंत योगेश चिकटगावकर यांना कला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 

कायद्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी नवी मुंबईतील अ‍ॅड. मनीषा योगेश चव्हाण यांना कायद्यारत्न पुरस्कार, सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांना सहकारत्न पुरस्कार, तर दलित मित्र पुरस्कार मुंब्रा-ठाणे येथील ज्येष्ठ नगरसेवक राजन नारायण कीने यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच उत्कृष्ट संस्था म्हणून सुका व ओला कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापनाबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या संगम प्रतिष्ठान या संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय नवरात्री उत्सव काळात DDM न्यूजच्या माध्यमातून पॉडकास्ट घेतलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.सदर सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.

बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न !!

बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न !!

ठाणे, प्रतिनिधी : नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या विद्यार्थ्यांसाठी “आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणामध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग” या विषयावर दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय जनजागृती व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री विजय जाधव (उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे), श्री यासीन तडवी (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका) तसेच सौ. मीनल वानखेडे (उपप्राचार्या, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

*बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न* !!!
ठाणे : नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या विद्यार्थ्यांसाठी “आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणामध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग” या विषयावर दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय जनजागृती व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री विजय जाधव (उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे), श्री यासीन तडवी (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका) तसेच सौ. मीनल वानखेडे (उपप्राचार्या, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या शिबिरात नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती देऊन विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये प्रथमोपचार, आग विझवण्याच्या पद्धती, कृत्रिम श्वसन, आपत्कालीन उचल पद्धती आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या तीन दिवसीय शिबिरात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा TDRF चे प्रमुख श्री यासीन तडवी, नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग गढरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री बिमल नथवाणी (क्षेत्र-१), श्री कमलेश श्रीवास्तव (क्षेत्र-३), श्री कॅरमबीर सिंग भुर्जी (क्षेत्र-४), श्री हनुमान चौधरी (विभागीय क्षेत्ररक्षक, मानपाडा-डोंबिवली) तसेच स्वयंसेवक श्री रोहित सिंग राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सत्रांमध्ये श्री बिमल नथवाणी आणि श्री हनुमान चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी शिबिराच्या समारोपप्रसंगी माननीय आमदार तथा मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे श्री संजय केळकर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्गाने नागरी संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी श्री यासीन तडवी यांनीही विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपत्ती सजगता वाढवून आपत्ती निवारणासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन केले.

महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. मीनल वानखेडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच नागरी संरक्षण व TDRF पथकाचे आभार मानून भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर व प्रगत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी महाविद्यालय पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

या शिबिरात महाविद्यालयातील १२० विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्गातील उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार व ऋषिकेश लबदे यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मा. जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या स्वाक्षरीचे “Successfully Completed” प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या शिबिरात नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती देऊन विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये प्रथमोपचार, आग विझवण्याच्या पद्धती, कृत्रिम श्वसन, आपत्कालीन उचल पद्धती आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या तीन दिवसीय शिबिरात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा TDRF चे प्रमुख श्री यासीन तडवी, नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक श्री आननसिंग गढरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री बिमल नथवाणी (क्षेत्र-१), श्री कमलेश श्रीवास्तव (क्षेत्र-३), श्री कॅरमबीर सिंग भुर्जी (क्षेत्र-४), श्री हनुमान चौधरी (विभागीय क्षेत्ररक्षक, मानपाडा-डोंबिवली) तसेच स्वयंसेवक श्री रोहित सिंग राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सत्रांमध्ये श्री बिमल नथवाणी आणि श्री हनुमान चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी शिबिराच्या समारोपप्रसंगी माननीय आमदार तथा मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे श्री संजय केळकर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तरुण वर्गाने नागरी संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी श्री यासीन तडवी यांनीही विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपत्ती सजगता वाढवून आपत्ती निवारणासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन केले.

महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. मीनल वानखेडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच नागरी संरक्षण व TDRF पथकाचे आभार मानून भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर व प्रगत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी महाविद्यालय पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

या शिबिरात महाविद्यालयातील १२० विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्गातील उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार व ऋषिकेश लबदे यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मा. जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या स्वाक्षरीचे “Successfully Completed” प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Sunday, 8 February 2026

कासा खडक ते खंदेरी किल्ला हे सागरी अंतर अवघ्या ५ तासांत पोहत गाठण्याचा स्वराजचा नवा विक्रम !!

कासा खडक ते खंदेरी किल्ला हे सागरी अंतर अवघ्या ५ तासांत पोहत गाठण्याचा स्वराजचा नवा विक्रम !!

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : जीवनात जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर हमखास यश मिळते, याची प्रचिती उरण, बाजारपूर येथे राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय स्वराज सोनाली संतोष पाटीलने दिली आहे.स्वराजने कासा खडक ते खंदेरी किल्ला हे तब्बल १८ कि.मी.चे सागरी अंतर ५ तास ६ मिनिटांत पोहून पार करत हा धाडसी पराक्रम केला. तो उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिक्षण घेत असून, त्याने आपल्या आईकडून मिळालेला जलतरणाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेला आहे.

याआधीही स्वराजने उरणमधील मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे १२ कि.मी.चे सागरी अंतर ४ तास २५ मिनिटांत पोहून पूर्ण केले होते. उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावात तो नियमित आणि कठोर सराव करत असतो.

शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी कासा खडक येथून स्वराजने आपल्या सागरी मोहिमेला सुरुवात केली. काळोख, समुद्रातील प्रचंड लाटा, सोसाट्याचा वारा तसेच मोठमोठी जहाजे अशा अनेक अडथळ्यांवर मात करत त्याने अवघ्या ५ तास ६ मिनिटांत खंदेरी किल्ला गाठून इतिहास घडवला आहे . स्वराज हा कमी वयात कमी वेळेत पोहून विक्रम करणारा पहिला जलतरणपट्टू ठरला आहे.  

या धाडसी कामगिरीसाठी स्वराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढ्या लहान वयात इतका मोठा सागरी पराक्रम करणारा स्वराज हा उरण तालुक्याचा अभिमान ठरला आहे. त्याच्या या यशामागे कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा कारणीभूत ठरला आहे. विशेषतः त्याच्या आईने दिलेले मार्गदर्शन आणि जलतरणाची परंपरा पुढे नेण्याची प्रेरणा यामुळेच स्वराज हे यश मिळवू शकला आहे.

या मोहिमेदरम्यान स्वराजच्या सुरक्षिततेसाठी बोट, प्रशिक्षक, तसेच सहकारी जलतरणपट्टू यांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याच्या आरोग्यावर आणि वेळेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती असूनही स्वराजने कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने पोहणे सुरू ठेवले, हे विशेष उल्लेखनीय आहे.

भविष्यात आणखी मोठी सागरी आव्हाने पेलण्याचा स्वराजचा मानस असून इंग्लिश चॅनेलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्वल करण्याचे स्वप्न तो पाहत आहे. त्याच्या या यशामुळे अनेक लहान मुलांना जलतरणाकडे व खेळाकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे.

स्वराज पाटीलचा हा विक्रम म्हणजे जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांचे जिवंत उदाहरण असून “योग्य मार्गदर्शन आणि मेहनत असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही” हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

खानदेश मित्र मंडळ उरण तर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण !!

खानदेश मित्र मंडळ उरण तर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण !!


उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री राजकारणातील 'दादा' अजितदादा पवार यांचे बारामतीत विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याने महाराष्ट्रातील जनतेवर शोककळा पसरली आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबाबत खानदेश मित्र मंडळ उरणच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी शोक व्यक्त केला आहे. उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये खानदेश मित्र मंडळ उरणच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून अजितदादा यांचे कार्य व विचार अजरामर राहतील, देश समाज त्यांना कधीच विसरणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी खानदेश मित्र मंडळ उरणचे कार्याध्यक्ष सुनील चौधरी,उपाध्यक्ष कैलास भामरे, खजिनदार वामनराव राठोड, सल्लागार संजय पाटील, सभासद भरत पाटील, सभासद रविंद्र पाटील, लता सूर्यवंशी, दत्तू महाले सुनील झोपे, संदीप पाटील, भरत चव्हाण, दिनेश पाटील आदी सभासद उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा  ** २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील...