Sunday 30 April 2023

सोयगाव परिसरात मुसळधार 'जरंडीला गारपीट' - 'नदीला पूर' !

सोयगाव परिसरात मुसळधार 'जरंडीला गारपीट' - 'नदीला पूर' !

सोयगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जरंडी च्या खडकी नदीला पूर 

सोयगाव, प्रतिनिधी, ता.३०... सोयगाव सह परिसरात रविवारी सायंकाळी सहा ते सात वाजता तासभर मुसळधार पावसाने तडाखा दिला दरम्यान वादळी वाऱ्याचा तडाख्यात सोयगाव परिसरात वृक्ष उन्मळून पडली आहे त्यामुळे सोयगाव परिसरात सायंकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली होती.

.                उन्हाळ्यात जरंडी च्या खडकी नदीला पूर

   सोयगाव परिसराला सलग पाचव्या दिवशी अवकाळी च्या मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी पुरता खचून गेला असून वादळाचा तडाख्यात उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान वादळी वाऱ्याने जरंडी, निंबायती बहुलखेड, रामपुरा तांडा माळेगाव पिंप्री या गावांना वादळ चा तडाखा बसून घरांवरील पत्रे उडाली आहे एक तासांच्या पावसाने जरंडी मंडळात दाणादाण उडवून दिली.

-------जरंडीसह परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा अधिक होता दरम्यान जरंडी परिसरात वीस मिनिटे गारपीट झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली होती.

-----खडकी नदीला पूर
जरंडी परिसरातील धिंगापूर निंबायती या भागात अवकाळीच्या पावसाचं जोर अधिक होता त्यामुळे जरंडीच्या खडकी नदीला पूर आल्या मुळे गावाचा संपर्क तुटला होता... जरंडी च्या खडकी नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती गारपिटीने जरंडी ला चांगला च तडाखा दिला आहे रात्री उशिरा पर्यंत वादळी वारा आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानी चा आकडा हाती आला नव्हता......

शेताच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी !

शेताच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी !

जालना, अखलाख देशमुख, दि ३० : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्याच्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत आमदार संतोष दानवे देखील होते. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

      भोकरदन , जाफराबाद  तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने  अतोनात नुकसान झाले.  कृषिमंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार संतोष दानवे यांनी आज भोकरदन तालुक्यातील विरेंगाव व महोरा शिवारातील नुकसान झालेल्या कांदा व जाफराबाद तालुक्यातील सावंगी शिवारातील ज्वारी पिकाची पाहणी केली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकही नुकसानग्रस्त पंचनामा पासून वंचित राहू नये अशा ही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हताश न होता, धीर धरावा  सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला. 

    दरम्यान नुकसानीची पाहणी करीत असताना आज देखील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.  आणखी दोन - तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

      या पाहणी दौऱ्यात तहसीलदार सुरुप कंकाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाना कापसे, भोकरदन तालुका कृषी अधिकारी स्वाती कागणे, जाफराबाद तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे शेख नजीर, हुकूम राजपूत, भाऊसाहेब जाधव, वामनराव लहाने आदींची उपस्थिती होती.

एक मे कामगार दिनानिमित्त *फ्रेंच राज्य क्रांतीचे* स्मरण आवश्यक !

एक मे कामगार दिनानिमित्त *फ्रेंच राज्य क्रांतीचे* स्मरण आवश्यक !  

लेखन - अमृत महाजन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आयटक

'एक मे' ज्याला जागतिक कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील म्हणतात, हा दिवस कामगार व त्यांच्या चळवळींनी केलेल्या संघर्षांची आणि मिळवलेल्या यशाची आठवण करतो. हा कामगार दिन जगातील ८० देशांमध्ये दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. 

त्याची पार्श्वभूमी अशी..... १ मे १८८६ रोजी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर संघटनेने *आठ तास काम आठ तास आराम आठ तास परिवाराचे संगतीत जीवन* अशी कामगार जीवनाची दिवसाची दिनचर्या असावी म्हणून शिकागोत प्रचंड रॅली काढून मागणी केली. चिडलेल्या उद्योगपती वर्ग व त्यांचे सोजीरांनी त्यांचेवर हल्ला केला. त्यात काही कामगार मारले गेले. पुढे अमेरिकन उद्योगपतींच्या सरकारने रॅलीतील पुढाऱ्यांना जेलात टाकले. त्यांच्या कोर्टाने त्यांना कठोर शिक्षा सुनावल्या.. हा झाला कामगार दिनाचा इतिहास !! या संघर्षात ना जात, धर्म, ना पंथ आडवा आला !! त्यांनी फक्त जगातील कामगारांनो एक व्हा ! इन्कलाब जिंदाबाद !! अशा तऱ्हेच्या घोषणा देण्यात आल्या. भांडवलदार वर्गाला सतत कामगार कष्टकरी लोकांची भीती भेडसावते, त्यातूनच आठ तासाचा दिवस हा हक्क मंजूर करण्यात आला..  कामगारांच्या मूलभूत मागणीमध्ये जगात कुठेही तडजोड नाही. म्हणून जगातील ८० देशात हा दिवस साजरा केला जातो.

हिंदुस्थानातही लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानची स्थापना झाल्यानंतर आणि कॉम्रेड सिंगारवेलू चेट्टीयार यांनी या उत्सवाचे नेतृत्व केल्यानंतर १ मे १९२३ रोजी लोकांनी हा दिवस भारतात कामगार दिवस म्हणून पाळण्यास सुरुवात केली.... कामगार दिनानिमित्त सरकारने प्रत्येकाला राष्ट्रीय सुट्टी द्यावी, असा ठराव मांडण्यात आला. ती देखील मागणी मंजूर झाली. अर्थात कष्टकऱ्यांचा ह्या दैदिप्यमान लढयाची बीजे ५ मे १७८९ ला फ्रेंच राज्यक्रांतीने झाली. हेही लक्षात घेतले पाहिजे तोवर मानवी इतिहासात जगात फक्त सत्ताधारी वर्गाचे वर्चस्व होते. बहुसंख्या कष्टकरी श्रमिक यांना कुठे स्थान राहत नव्हते. त्यांनी जैसे ठेविले तैसेच राहावे लागेल असा त्रिकालाबाधित  सत्याचा दावा प्रस्थापित वर्गाने चालवला होता. तो समज फ्रेंच राज्यक्रांती नंतरच्या १०० वर्षांनी कामगार वर्गाने केलेली शिकागोच्या चळवळीने मोडीत काढला.

*फ्रेंच राज्य क्रांतीची पार्श्वभूमी*

फ्रान्समध्ये अठराव्या शतकात सरंजामदार, सरदार, राजे, धर्मगुरू ही चांडाळ चौकडी जनतेवर मनमानी करत होती. अशावेळी रुसो यांच्या नेतृत्वाखाली ५ मे १७८९ ला फ्रान्सची राज्य क्रांती झाली. या क्रांति ने कामगारांना स्वातंत्र्य, समता, तथा विश्वबंधुत्व तत्वे दिली तर जागतिक कामगार कामगार दिनाने 'एकजूट करा.. संघर्ष करा' मूलमंत्र दिला, यामुळे हक्क मिळू शकतात व शोषणाला लगाम घालू शकतो हा एक आत्मविश्वास दिला. फ्रेंच राज्य क्रांतीने जमीनदार, सरंजामशाही,  सरदार आणि धर्म गुरूंची सत्ता उखडून फेकली
फ्रेंचचा राजा १४:वा लुई असे म्हणत असे की, देश व देशाची  सत्ता व्यक्तिगत त्याच्याच मालकीची आहे.

त्याच्या काळात जनतेकडून जास्तीचे कर वसूल करून एकीकडे जनतेचे शोषण केले जात असे, तर सुखी कुलीन वर्ग व पादरी कर देत नसत. उलट त्यांना राजा सवलती देत असे,  परिणामी संपूर्ण बोजा साधारण वर्गावरच पडतं असे. वाढती असमानता याने सोळाव्या लुईने फ्रान्सच्या कष्टकरी जनतेला जणू शापच दिला होता. त्याचे राजवटीत फ्रेंच जनता दोन वर्गात विभाजित झाली होती, त्यात विशेषाधिकार प्राप्त कुलीन लोग और पादरी यांचा वर्ग होय. यात .सरदार लढत.. तर पादरी प्रार्थना करत जनतेला प्रस्थापित वर्गाची सत्ता मजबूत करणारा पुराण मतवादी तथाकथित सदाचार शिकवत. ऐशोआरामात जीवन जगत, दुसरीकडे जनता ज्यादा करांचा बोजा पेलत।" अशी स्थिती फ्रेंच जनतेची होती.

शेतकरी त्यांच्या उत्पन्नातील उरलेला 20% हिस्सात अत्यंत हलाखीत जीवन जगत असे. त्यांना कष्ट करून भरघोस उत्पन्न जरी आले तरी त्यांना शेती परवडत नसे ...त्यातून फ्रेंच राज्यक्रांती झाली हे सत्य आहे, त्यानंतर औद्योगिक क्रांती  रासायनिक क्रांती सामाजिक आर्थिक क्रांत्या झाल्या. तरीपण कष्टकरी कामगारांची पिळवणूक व शेतकऱ्यांची लूट याचे वास्तव बदललेले नाही. म्हणून एक मे कामगार दिवस व पाच मे फ्रेंच राज्यक्रांती यांची आठवण कामगार वर्गाला करणे अनिवार्य आहे. एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानमित्ताने संपूर्ण देशभर सभा मिरवणुका परिसंवाद संघर्षाचे निर्धार केले  जात आहेत, या निमित्ताने देशात व विदेशात जेथे कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहे त्या सर्व कामगारांना बंधुत्वाचा पाठिंबा शुभेच्छा !! किमान १०,००० रु  निवृत्ती वेतन, योग्य वेतन, रोजगार शाश्वती निवारा, सन्मानाचे जीवन, अन्न व आरोग्य सुरक्षा यासाठी संघर्ष देत आहेत, त्याबरोबर तरुणांना काम मिळावे महागाई रोखण्यात यावी. आरोग्य शिक्षणावर पूर्ण खर्च सरकारने करावा या सुद्धा कामगार वर्गाचा मूलभूत मागण्या आहेत. भारतात कामगार, शेतकरी यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत असून  जगातील कामगारांनो एक व्हा ! इन्कलाब जिंदाबाद !! या घोषणा देताना कामगारांमध्ये ज्या धर्म पंथ जात आधाराने त्यांना विभाजित करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. 

शेतकऱ्यांच्या चळवळीला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येऊन अन्नदात्याच्या आंदोलना चा अवहेलना करण्यात आली त्यांच्या रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले. कामगारांनी लढून मिळवलेले २९ कामगार कायदे रद्द करून चार कामगार संहिता मोदी सरकार लादत आहे. ज्यात कामगारांचे हक्क संकुचित केले जात आहेत, संघटित सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून संघटित कामगारांचे खच्चीकरण केले जात आहे. सरकारी उद्योगधंदे विक्रीस काढून त्यातील कामगारांची संख्या कमी केली जात आहे. नवीन कामगार भरती ठप्प आहे. त्याचबरोबर बेलगाम कंत्राटीकरण करून कामाचे तास वाढवले गेले आहेत आणि येथेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस उद्दिष्टांना पद्धतशीरपणे सुरुंग लावला जात आहे. जीएसटी च्या रूपाने जनतेकडून भरमसाठ कर  वसूल केले जात आहेत पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, बी बियाणे, शेती उपयोगी औषधे, मानवी औषधे, काम साहित्य, जीवनावश्यक वस्तू सर्वच महाग होत चाललेले आहे, त्यात तळागाळातील असंघटित संघटित कामगार भरडला जात आहे .निवडक कार्पोरेट घराणे यांची मालमत्ता आकाशाला गवसणी घालू लागलेली आहेत ही फ्रेंच राज्य क्रांतीचे वेळची सामाजिक आर्थिक स्थितीची आठवण करून देत आहे म्हणून मे दिनाच्या निमित्ताने तमाम कष्टकरी जनतेला शेतकरी जनतेला आवाहन की, राखेतून फिनिक्स पक्षी जिवंत व्हावा त्याप्रमाणे कष्टकरी वर्गाने उभे राहणे गरजेचे आहे त्यासाठी जगातील कामगारांनो, एक व्हा ! धर्मजात पंथ बाजूला सारा !! सर्व धर्म जात पंथातील कष्टकऱ्यांनो एक व्हा इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा घेऊन शिकागोतील कामगारांचा बलिदानाच्या लाल झेंडा पुन्हा उभा करा. हे आवाहन

कॉम्रेड अमृत महाजन - +91 98605 20560

पंतप्रधानांचा "मन की बात" द्वारे देशवासीयांसोबत शतकीय संवाद..!

पंतप्रधानांचा "मन की बात" द्वारे देशवासीयांसोबत शतकीय संवाद..!

*खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर येथे असंख्य महिलांसह सहभागी.*

जळगाव/मुक्ताईनगर, अखलाख देशमुख,  दि ३० : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऑल इंडिया रेडियो वर प्रसारित होणाऱ्या ऐतिहासिक *मन की बात* या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या लाईव्ह कार्यक्रमाचे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असता महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन माननीय प्रधानमंत्री यांचे विचार एकले. 

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण सर, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, माजी नगराध्यक्ष सौ.नजमा तडवी, नायब तहसीलदार झांबरे, प्राचार्य वडस्कर ई. प्रमुख उपस्थित होते.

कोकणाची वाट लावू नका ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन - प्रकाश आंबेडकर

कोकणाची वाट लावू नका ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन - प्रकाश आंबेडकर 

कोकणातील बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनला घालवण्यातही आमची मोठी भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की, कोकणाची वाट लावू नका. कोकणात आजही ९५ % शुध्द ऑक्सिजन आहे. इथलं वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी इथे नव्याने जन्माला येतात.

 त्यामुळे ही शुद्धता तशीच टिकली पाहिजे. राहिला कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर मी सर्वांना आठवण करून देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, पूर्ण वेळ मिळाला तर मी कोकणचा कॅलिफोर्निया करू शकतो. ते खोटं नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला. 

त्यावेळी त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं. प्रदूषणकारी उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते.

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिनाचे १ मे रोजी सकाळी ८.०० वाजता आयोजन !

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिनाचे १ मे रोजी सकाळी ८.०० वाजता आयोजन !
 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि.  ३० :  महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त १ मे २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ होणार आहे.
मुख्य शासकीय समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.२५ ते ९.०० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ९.०० वाजेनंतर आयोजित करावा असे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जव्हार तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धान्य वाटप !

जव्हार तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धान्य वाटप !        
जव्हार, जितेंद्र मोरघा :

 महाराष्ट्र निर्माण सेने तर्फे अविनाश जाधव यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याचे औचित्य साधून धान्य वाटप करण्यात आले. हे धान्य पाथर्डी, रामखिंड जव्हारच्या शिवनेरी नगर परिसरात वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळ, गहू, हरभरे, साखर या जीवनावश्यक वस्तूचा समावेश होता. या वस्तू वाटप करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक निलेश घोलप, तालुकाप्रमुख गोपाळ वझरे, शहर प्रमुख नवीन घोलप,तसेच राज पहाडी, मेहुल अहिरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेश मेळावा !

वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेश मेळावा !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत पहिली च्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पहिली इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा फुल देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आले.यावेळी रंगीबेरंगी फुगे, टोप्या, फुले,खाऊ चे वाटप करुन चिमुकल्या पावलांचे प्रथम शाळेतील पावलांचे ठसे कागदावर घेतले.

या अशा अनोख्या पद्धतीने स्वागत केल्या मुळे विद्यार्थ्यां मध्ये प्रचंड उत्साह दिसला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष  प्रदीप वाघ यांनी सर्व पालकांना मार्गदर्शन केले व नवीन विद्यार्थ्यांचे फुले व पुस्तके देउन स्वागत केले.

या कार्यक्रमाला  प्रदीप वाघ उपसभापती, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, नितिन पिठोले शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य,  गणेश खादे, ग्रामपंचायत सदस्य, हर्षदा खादे ग्रामपंचायत सदस्य, निलेश गांगवे, सदानंद मेरे,कुंदन चौधरी, श्याम फसाळे शिक्षक अंगणवाडी कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

आयुष्यभर गावात सफाई काम करणाऱ्या कामगार महिलेवर शौचालय मिळावे म्हणून उपोषणाची पाळी !

आयुष्यभर गावात सफाई काम करणाऱ्या कामगार महिलेवर शौचालय मिळावे म्हणून उपोषणाची पाळी !

रावेर, प्रतिनिधी.. तालुक्यातील वघोडा बू येथील ,श्रीमती दुर्गाबाई बाबूराव रल यानी १९९० पासून आपल्या गावात ग्रामपंचायत अंतर्गत सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत, अत्यंत कमी पगारावर त्यांनी काम केले, राहणीमान भत्ता ही त्यांना दिलेला नाही, तर कायदेशीर वेतन न देता तसेच प्रा. फंड वेळेवर भरणा न करता, हक्काचे घरकुल सुद्धा दिले नाही, यावरून सफाई कामगारांच्या बाबतीत पंचायतीचा दृष्टिकोन बरोबर नाही हे दिसून येते, त्यांना तात्पुरती निवास व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतच्या शेडमध्ये व्यवस्था करून दिली, तेथे त्या गेल्या पंचवीस वर्षापासून  राहत आहेत त्यांच्या मुलांची लग्न, पतीचे निधन त्याच ठिकाणी झाले. आता सरकारने "प्रत्येक घरी शौचालयाची योजना" आनलेली आहे. वाघोदा गावामध्ये सुद्धा ती योजना राबवली जात आहे. असे असताना सफाई कर्मचारी वयोवृध्द महिला यांनी शौचालय बांधण्यासाठी २० फुटावर खड्डे खोदले असता त्यांना शौचालय बनवण्यासाठी ग्राम पंचायत मज्जाव करीत आहे, ज्या कामगारांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी मल मूत्र साफ केले, अशा कामगारांना वयोवृध्द झाल्या नंतर शौचालय नाकारणे म्हणजे अन्याय अत्याचार होय, मानवी हक्काच्या उल्लंघन आहे तरी सफाई कर्मचाऱ्यास सेवा निवृत्तीनंतर हाल होऊ नये म्हणून शौचालय बांधून द्यावे. शौचालय बांधून न दिल्यास जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक मे कामगार दिनी त्या उपोषणाला बसतील असे असा इशारा देणारे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक तर्फे कॉम्रेड अमृत महाजन यांनी दिले आहे अशी माहिती कर्मचारी महासंघाच्या पत्रकार देण्यात आली आहे. श्रीमती यांच्या उपोषणाला वाल्मिकी समाजाचे सरपंच श्री शंकरदरी संजय  कंडारे दिलीप आदिवाल राजकुमार डावरे यांनी पाठिंबा दिलेला आहे निवेदनाच्या प्रती कार्यवाहीसाठी... 

महाशय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) जळगाव जिल्हा परिषद 

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जळगाव शहर जळगाव याना देण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भिवंडी - वळ पाडा येथील दुर्घटना ग्रस्त इमारतीला भेट, बचाव पथकाला दिल्या विशेष सुचाना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भिवंडी - वळ पाडा येथील दुर्घटना ग्रस्त इमारतीला भेट, बचाव पथकाला दिल्या विशेष सुचाना !
 
भिवंडी दि,३०, अरुण पाटील (कोपर) :
        भिवंडी येथील वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार रात्री (दि. २९)  रोजी रात्री ११ वाजता भेट दिली. या वेळी बचाव पथकाला दिल्या विशेष सूचना तसेच बचाव पथकाच्या कामाची माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येईल व जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
           भिवंडीत अनधिकृत व धोकादायक तसे अती धोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असतो,त्यातच इमारत दुर्घटना घडल्याच्या देखील अनेक घटना भिवंडीत घडल्या असून या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.भिवंडीतील अति धोकादायक इमारतींचा लवकरात लवकर सर्वे करून अति धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिल्या.
           भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येइल. माणसांच्या जिवापेक्षा दुसरे काही महत्वाचे नाही असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

कोकण सुपुत्र दिपक फणसळकर "भारतरत्न गौरव श्री" पुरस्कार-२०२३ ने सन्मानित !

कोकण सुपुत्र दिपक फणसळकर "भारतरत्न गौरव श्री" पुरस्कार-२०२३ ने सन्मानित !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                  आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद वआदर्श मुंबई वृत्तपत्राच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य संपादक डॉ. संजय भोईर व उपसंपादक नवनाथ कांबळे, सहसंपादक भालचंद्र पाटे - पूनम पाटगावे यांच्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या आदर्शकांचा गौरव " भारतरत्न गौरव श्री पुरस्कार " प्रदान करून मुंबईत करण्यात आला.

                   कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रसिद्ध संपादक डॉ. सुकृतजी खांडेकर, ( संपादक प्रहार ), डॉ. पवन अग्रवाल आंतरराष्ट्रीय ( व्याख्याते ), उपेंद्र सावंत ( मा. नगरसेवक ), सुवर्णा करंजे (मा. नगरसेविका ) बाळासाहेब हांडे (पत्रकार ) श्री.अनिल पांगारे प्रसिद्ध समाज सेवक, पूजा दळवी, अशोक भोईर , वर्षा यादव,विनोद मोहीते , सचिन पाटगावे , सहिष्णूता कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात उद्‌घाटक डॉ. सुकृतजी खांडेकर यांनी प्रिंट मिडीया व डिजीटल मिडीयाचे महत्व सांगून. आदर्श मुंबईचे मुख्य संपादक डॉ. संजय भोईर व संपूर्ण टीमचे कौतुक केले. स्वागताध्यक्ष डॉ.पवन अग्रवाल यांनी आदर्श मुंबईचा आजवरचा प्रवास मांडला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती डॉ. श्रीकांत बाभुळगावकर व बाळासाहेब हांडे यांच्या सामाजिक / वैद्यकीय कार्याचे कौतुक केले.

             कार्यक्रमात श्री. दिपक फणसळकर -पूणे, सौ. पूनम पाटगावे - कोल्हापूर, अमित मोहिते - पूणे, सौ. मीरा पाटील - नवी मुंबई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सांगली, सोलापूर, बीड, यवतमाळ, नाशिक, पूणे, ठाणे, मुंबई इ. ठिकाणांहून आलेल्या पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, डॉ. श्रीपाल कांबळे, गौतम एन. डांगळे, सतीश पांडे यांनी परिश्रम घेतले. शैक्षणिक व सामाजिक तसेच इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत असलेले, कोकण सुपुत्र सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील, लांजा तालुक्यातील, धुधंरे गावचे सुपुत्र दिपकजी शंकर फणसळकर यांना "भारतरत्न गौरव श्री" पुरस्कार-२०२३ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यापूर्वीही फणसळकर यांना अनेक राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हा विचार मनात ठेवून दिपक फणसळकर सतत जमेल ते सामाजिक काम करण्यात अग्रेसर आहेत. फणसलकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर हार्दिक हार्दिक अभिनंदन होत असून अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाची आढावा बैठक संपन्न !

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाची आढावा बैठक संपन्न !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाची आढावा बैठक पार पडली. 

   कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, नियोजन संचालक सुभाष नागरे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, विस्तार संचालक दिलीप झेंडे, आत्मा संचालक दशरथ तांबाळे, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, लातूरचे कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर तसेच मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.
 
  आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिने काटेकोर नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत दिले. सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रा.श्री.कमलाकर मोरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती !

प्रा.श्री.कमलाकर मोरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब राजाराम मोरे यांनी स्थापन केलेल्या  निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य (N.G O) मंडळाचे राज्याध्यक्ष मा.श्री.प्रमोददादा सुभाष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य (N.G.O) च्या मुंबई जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने पर्यावरण संरक्षण, संवर्धन, शिक्षण, संशोधन, वृक्षारोपण आणि तत्संबंधीची जनजागृती, तसेच या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मंडळाचे राज्याध्यक्ष मान. श्री. प्रमोद दादा मोरे यांनी प्रा.श्री. कमलाकर मोरे यांची मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
             प्रा.श्री.मोरे सर यांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय काम, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाला सातत्याने केलेले सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण संतुलन आणि संवर्धनाबाबत दिलेले योगदान शिवाय वाढत्या जंगलतोडी विरुद्ध उठवलेला आवाज, जंगलतोड रोखण्यासाठी युट्युब, फेसबुक तसेच वर्तमानपत्रातून समाजात केलेले आवाहन विद्यार्थी व तरूणांमध्ये केलेली पर्यावरण संबंधीची जागृती इ. योगदान लक्षात घेऊन "मुंबई जिल्हाध्यक्ष पदी "२०२३-२६ या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. प्रा.श्री. कमलाकर मोरे यांना राज्याध्यक्ष मा.श्री. प्रमोददादा मोरे ( निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य (N.G O ) यांनी तत्संबंधीचे नियुक्ती पत्र प्रदान केले आहे.

Saturday 29 April 2023

यावल तालूक्याती पाडळसा, बामणोद, पिळोदा, म्हैसवाडी शिवारात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी...

यावल तालूक्याती पाडळसा, बामणोद, पिळोदा, म्हैसवाडी शिवारात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी...

यावल, अखलाख देशमुख, दि ३० : दि.२८ एप्रिल २०२३ रोजी जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची यावल तालुक्यातील पाडळसा, बामणोद, पिळोदा व म्हैसवाडी शिवारात येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. 

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे यावल तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आश्वासन देऊन धिर दिला. यावेळी मौजे पिळोदा (यावल) येथे आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमास सदिच्छा भेट देऊन, स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यास नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, चंद्रकांत तळेले, प्रशांत सरोदे, कमलाकर सरोदे, अजय पाटील, मयूर चौधरी, राजू पाटील, दिनकर भंगाळे, निलेश बऱ्हाटे, पराग बऱ्हाटे, अनंत फावडे, तलाठी टी.सी. बरेला, तलाठी सूर्यवंशी अप्पा, कृषी सहाय्यक आगीवाल, प्रशांत सरोदे, अशोक चौधरी, बाळू पाटील, प्रभाकर सरोदे, चंद्रकांत चौधरी, मयुर मधुकर चौधरी, प्रशांत चौधरी, जितेंद्र चौधरी, सुजित चौधरी, हिरालाल चौधरी, शरद पाटील, विलास तुळशीराम चौधरी, सुरेश पाटील, रवींद्र दत्तात्रेय चौधरी ई. उपस्थित होते.

बाजार समित्यांच्या निवडणुकीत मविआने मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा - जयंत पाटील

बाजार समित्यांच्या निवडणुकीत मविआने मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा  - जयंत पाटील 

बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या आठ - दहा महिन्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शिवाय बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्न देखील शिंदे सरकारने केला. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे. 

१४८ बाजार समित्यांपैकी ७५ पेक्षा जास्त बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने हे घवघवीत यश महाविकास आघाडीच्या मागे उभे केले आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला भेगा पडल्या अशी टीका करण्यात आली परंतु ही वज्रमूठ अभेद्य आहे आणि फार मोठया क्षमतेची आहे, हे आमच्या विरोधकांना कळले असावे असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे हे शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी दाखवून दिला आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. पदवीधर मतदानात सुशिक्षित लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेनेच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि आज ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणारे सदस्य, सोसायटी सदस्य, व्यापारी या सर्वच घटकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला आहे याशिवाय राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना राष्ट्रवादीचे सर्व गड अभेद्य ठेवण्यात यश मिळाले असून राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांचे जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.

वृत्तांकन - अखलाख देशमुख 

अंभई येथे दवाखान्या समोरच तळे साचले रुग्णांचे हाल *ग्राम पंचायत ने लक्ष देण्याची गरज !

अंभई येथे दवाखान्या समोरच तळे साचले रुग्णांचे हाल *ग्राम पंचायत ने लक्ष देण्याची गरज ! 

सिल्लोड, अखलाख देशमुख, दि २९ : सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे सलग दोन दिवस मुसळधार पाऊस आहे. यामुळे येथील नागरी दवाखाना परीसरात पाणीच पाणी जमा झाले आहे. 

प्रत्येक वेळेस पाउस पडतो आणि नागरी दवाखान्यासमोर तळे साचते आणि रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी कसरत करावी लागते. ह्या पाण्याची योग्य विल्हेवाट होणे गरजेचे आहे, यामुळे संबंधित ग्राम पंचायत कार्यालयाने याची दखल घेऊन येथील परिसर व्यवस्थित करून पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी अंभई येथील नागरिकांची मागणी आहे.

भिवंडीतील वळ पाडा भागातील तीन मजली इमारत कोसळली, ४० ते ५० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. एन डी आर एफ जवानांचे शर्थीचे प्रयत्न !

भिवंडीतील वळ पाडा भागातील तीन मजली इमारत कोसळली, ४० ते ५० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. एन डी आर एफ जवानांचे शर्थीचे प्रयत्न !

भिवंडी, दि,२९, अरुण पाटील (कोपर)
          भिवंडी तालुक्यातील वळपाडा भागातील वर्धमान कॉम्प्लेक्स येथील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास  घडली आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली ४० ते ५० नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत खाली वाणिज्य वापराचे गाळे व वरती नागरिक राहत होते. घटनास्थळी अग्निशमन दल, एन डी आर एफ जवानांचे बचाव कार्य सुरू आहे.
          घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत दहा जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या वरच्या तीन मजल्यावर भाडेकरू राहत होते. घटनेच्या वेळी या गोडाऊनमध्ये ३० ते ३५ जण काम करत होते. दुपारी अचानक इमारत कोसळल्याने कामगारांसह इमारतीत राहणारे एकूण ४० ते ५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
          घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह मदत व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि अतिशय काळजीपूर्वक ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. इमारतीच्या गोदामात काम करणाऱ्या एका मजुराने माध्यमांना सांगितले की, आमच्यापैकी काहीजण जेवणासाठी गोडाऊनमध्ये थांबले होते. त्यानंतर अचानक इमारत कोसळल्याचा आवाज आला आणि आम्ही गोदामातून धावत सुटलो त्यामुळे आम्ही वाचलो, तर आमचे अनेक सहकारी मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
          १) सोनाली परमेश्वर कांबळे - वय-२२ वर्ष, २) शिवकुमार कांबळे वय २६ वर्ष ३) मुक्तार रोशन मंसुरी वय २६ वर्ष ४) चिकू रोहित सिंग वय - ५ वर्ष, ५) प्रिन्स रोहित सिंग व ३ वर्ष ६) विकासकुमार मुकेश रावय - १८ वर्ष ७) उदयभान मुनिराम यादव- वय २५ वर्ष ८) अनिता वय ३० वर्ष यांची सुखरूप सुटका केलेली आहे, त्यात अनुक्रमांक ३ ते ८ यांस उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालय_ भिवंडी येथे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच १) नवनाथ सावंत वय ३५ वर्ष हे मयत झालेले आहेत.

जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी...

जळगांव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील येवती व रेवती येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी...

जळगांव, अखलाख देशमुख, दि २९ : जिल्ह्यात अवकाळी *पाऊस व वादळी वाऱ्यामुळे* झालेल्या नुकसानीची *बोदवड* तालुक्यातील *येवती व रेवती* येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) श्री.जितेंद्र पाटील यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. 

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे *बोदवड* तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आश्वासन देऊन धिर दिला.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह उपविभागीय अधिकारी (प्रांत) जितेंद्र पाटील, येवती सरपंच शांताराम वाघ, अनिल अहिर, भिमराव पाटील, सुनिल माळी, योगेश कादेल, मयूर बडगुजर, विक्रम वरकड, मधुकर महाजन, भगवान महाजन, मनोहर पाटील ई. उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्यात मारली मुसंडी !

वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्यात मारली मुसंडी !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २९ : हमाल मापारी वर्गातून वंचित बहुजन आघाडीचे शेख मुनीर हे विजयी झाले. ते गंगापूर तालुका महासचिव सौदागर रईस यांचे बंधू आहेत.

याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा पश्चिम व कन्नड तालुका यांच्या वतीने नवनिर्वाचित सदस्याचा  जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात  प्रामुख्याने पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश भाऊ बन,महासचिव शामभाऊ भारसाकळे ,जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, सौदागर रईस  महासचिव धम्मराज संघकीर्ती, मुक्तार सय्यद, कन्नड तालुका अध्यक्ष देविदास राठोड, यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मा. भाऊराव गवई यांनी दिली आहे.

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटिबध्द - पालकमंत्री गुलाबराव पाटील

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटिबध्द - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, अखलाख देशमुख, दि २९ : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

  

गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गावांमध्ये होत असलेल्या वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल. 

जळगाव तालुक्यातील नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकरी, ग्रामस्थ यांचेशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी राऊत, महावितरणचे श्री. आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित गावांचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक आदि उपस्थित होते. 

यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करण्याचीही सुचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. बेळी, निमगांव व नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टॅकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी चिंचोली परिसरात वादळी वाऱ्याने कंटेनर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या ठिकाणी असलेल्या बिहार येथील कामगारांची भेट घेऊन त्यांना तात्पुरता निवारा व जेवणाची व्यवस्था करण्याबाबतही यंत्रणेला सांगितले.
  
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी सांगितले की, ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्यात येत असून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत त्यांची   नावे घरकुलांच्या ड यादीत असल्यास त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल. तसेच महसुल व कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल असेही सांगितले.

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...