Sunday 31 May 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या संबोधनातील काही मुद्दे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या संबोधनातील काही मुद्दे.



'मिशन बिगीन अगेन' मोहीम सुरू करायची आहे

'लॉकडाऊन' शब्द कच-याच्या डब्यात फेका

3 जूनपासून अनलॉकला सुरूवात

3 जूनपासून मॉर्निंग वॉक आणि
आऊटडोर व्यायामाची परवानगी

5 जूनपासून सम - विषम तारखेला दुकाने सुरू करण्याची मुभा

8 जूनपासून सरकारी, खाजगी
कार्यालयं मर्यादित लोकांसह सुरू करणार

8 तारखेपासून वृत्तपत्र घरपोच देण्याची परवानगी, वृत्तपत्र वितरीत करणा-या मुलांची काळजी घेणं अनिवार्य

ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये

राज्यात 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

राज्यात 200 रुग्ण व्हेंटिलेटरवर

लॅब आणि चाचण्या वाढवण्याची प्राथमिकता

राज्यात ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याचे प्रयत्न

लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्या

आतापर्यंत 16 लाख मजुरांना रेल्वे आणि एसटी बसेसमधून परराज्यात पाठवलं

अंतिम वर्षाच्या मुलांना वर्षभरातील सरासरी काढून गुण दिले जाणार

शहरात ऑनलाईन शिक्षणाचा विचार, जिथे शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती आहे तिथला आढावा घेणार

वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले ५० हजारांचे सोने केले परत.

वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले ५० हजारांचे सोने केले परत.


चिखली,पुणे -
चोऱ्या, विश्वासघात, पैशांसाठी हाणामारी, पैशांमुळे नात्यांमध्ये पडणारी दरी अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. एखादी किरकोळ वस्तू सापडली तरी तिला लपवून ठेवण्याचे प्रकार देखील घडत आहेत.

अशात एका वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्याने त्यांना सापडलेले ५० हजार रुपयांचे सोने मूळ मालकाला परत करून समाजात नैतिकता, विश्वास, चांगुलपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले.
शिवानंद चौगुले असे या प्रामाणिक व्यावसायिकाचे नाव आहे. शिवानंद हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावचे रहिवासी आहेत.

मागील अनेक वर्षांपासून ते पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. मागील सुमारे २५ वर्षांपासून ते शहरात वृत्तपत्र आणि दूध वितरणाचे काम करत आहेत.

नुकतेच शिवानंद यांना त्यांच्या दुकानात एक सोन्याचे ब्रेसलेट सापडले. ते कुणाचे आहे, कोणकोण दुकानात आले होते, असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

त्याअनुषंगाने त्यांनी चौकशी देखील सुरू केली. काही वेळाने चौकशी सुरू असताना त्यांच्या एक ग्राहक प्रतिमा कुलकर्णी या शिवानंद यांच्या दुकानात आल्या.
त्यांनी त्यांचे 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट हरवल्याची माहिती शिवानंद यांना दिली आणि त्यांचे ब्रेसलेट कुठे दिसले का? अशी चौकशी सुद्धा केली.

त्यानंतर शिवानंद यांनी कुलकर्णी यांचे सोन्याचे ब्रेसलेट त्यांना दुकानात सापडल्याचे सांगत ब्रेसलेट कुलकर्णी यांच्या ताब्यात दिले.

शिवानंद यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल आणि आपली किमती वस्तू आपल्याला सुखरूप परत मिळाल्याबद्दल कुलकर्णी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.

आदिवासींच्या नशीबी डबऱ्याचे पाणी, करोडोंच्या पाणी योजना कुचकामी, शहापूर तालुक्यातील भवायह स्थिती?

आदिवासीच्या नशीबी डब-याचे पाणी, करोडोच्या पाणी योजना कुचकामी, शहापूर तालुक्यातील भयावह स्थिती?




कल्याण (संजय कांबळे) धरणांचा तालुका, नद्यांचा गाव अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करित असून जंगल आणि नद्यांचा राजा माणला जाणारा आदिवासी समाज आज हंडाभर पाण्यासाठी कोरड्या ठक्क नदीच्या पात्रात छोटे डबरे खोदून पाणी मिळवत असून त्यामुळे करोडो रुपये खर्च करून विविध प्रकारच्या पाणी योजना नेमक्या कोठे आणि कोणासाठी राबविण्यात आल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

ठोणे जिल्ह्यातील शहापूर तालुका नेहमीच टंचाई ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. भातसा सारखे मोठे व अनेक छोटेमोठे धरणे या तालुक्यात आहेत. येथील पाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आदी शहरांना पुरविले जाते पण नदीच्या काठावर वसलेले अनेक गावे. वाड्या वस्त्या आजही कोरड्या आहेत या लोकांची पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून शासनाकडे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, विंधन विहिरी व कुपनलीका घेणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विषेश दुरुस्ती, नवीन योजना गाळ काढणे आदी विविध प्रकारच्या योजनांवर करोडो रुपये खर्च केले. पण आजही महिलांच्या डोक्यावरिल हंडा हटला नाही. त्यामुळे या योजना कुचकामी ठरल्या की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायत आहेत तर २३७ गावे आहेत यातील अनेक गावे आणि वाड्या वस्त्या पाडे पाणी टंचाई भयानक आहे
या तालुक्यातील काळू नदीचे काठावर वसलेल्या वाघेवाडी ही आदीवाशी वस्ती मड गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. गावात नळ योजना, बोअरवेल आहे. पण ही वाडी या पासून कोसो दुर ना नळ योजना ना बोअरवेल, काळू नदीच्या पात्रात छोटे छोटे डबरे खणायचे आणि त्यात जमा झालेले पाणी गाळून हंडा भरायचा, ना टिसीएल ना शुध्दिकरण यंत्रणा, या पाण्यावरच जीवन जगायचे, घोटभर पाण्यासाठी तासोनतास डबके कधी भरेल याची वाट बघत बसायचे, शुध्द पाणी म्हणजे काय? ते कसे असते? हेच यांना माहिती नाही. गावातील पुढा-याना बोअरवेल किंवा आमच्या वाडिला नळ कनेक्शन द्या म्हटल्यावर तुम्हाला त्यांची काय गरज, नदी आहे ना तूमच्या साठी अशी उतरे दिली जातात असे डब-यातून पाणी पिणारे शांताराम जाधव, तुकाराम जाधव,, श्रीमती भुरी संजय टोपले या आदीवाशीनी सांगितले तसेच केवळ पावसाळ्यात नदी भरल्याने मनसोक्त पाणी मिळते पण उन्हाळ्यात नदी आटत असल्याने असे नदीत डबरे काढून पाणी भरले जाते असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे दरवर्षी प्रत्येक तालुक्यात पाणीटंचाई विभाग संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये योजनांवर लाखोंच्या खर्चाची तरतूद केली जाते ती कोठे जाते, की केवळ योजनांचे कागदी घोडे नाचवले जातात. यावरुन पाणी नक्की कुठे मुरते, पैसा कुठे जिरतो याचा प्रत्येकाने शोध घ्यायला हवा, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विचार केला तर प्रश्न पडतो खरेच शहापूर, मुरबाड, कल्याण अंबरनाथ तालुक्यात "विकास" झाला आहे? 

घंटागाडी कर्मचारी वर्गास गोसावी परिवाराचा एक हात मदतीचा !

घंटागाडी कर्मचारी वर्गास गोसावी परिवाराचा एक हात मदतीचा..
"धान्य वाटून केला वाढदिवस साजरा"


नासिक (अण्णा पंडित) सध्या कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आहे व दिवसेंदिवस हे वाढत चालले आहे. शासन कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच पाचव्या याकरिता लॉकडाऊनची घोषणा ही करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत आपली देश सेवा करणारे डॉक्टर
पोलिस व मनपा सफाई कर्मचारी,पत्रकार, हे अहोरात्र सेवा देत आहेत. 
   

तसेच आपल्या परिसरातील रोज नियमित येणारे व आपला कचरा गोळा करून घेऊन जाणारे आरोग्य कर्मचारी देखील आपल्या प्राणाची पर्वा न करता सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत कचऱ्याच्या गाडीत कचरा विलगीकरणाचे काम करताना आपणास दिसून येतात. आपण कचरा टाकताना देखील तोंडाला रुमाल बांधून जात असतो मात्र हे कर्मचारी दिवसभर या दुर्गंधी मध्ये काम करत असतात.
ही पण आपलीच माणसे आहेत. याच अनुषंगाने ही गंभीर बाब लक्षात घेता नाशिक पाथर्डी फाटा परिसरातील गोसावी परिवारातील चित्रा गोसावी यांनी आपला 50 वा वाढदिवस साजरा करताना या कर्मचारी वर्गास मदतीचा हात पुढे केला. व त्यांना एक महिन्याचे किराणा धान्य वाटप करण्यात आले. आपण देखील समाजाप्रती संवेदनशील आहोत आपण समाजाचे देणेकरी आहोत. हे समाजभान जाणून पत्रकार योगेश गोसावी यांच्या मातोश्री चित्रा गोसावी यांनी आपला 50 वा वाढदिवस सफाई कामगारांना एक महीना पुरेल एवढे धान्य वाटून अनोख्या पद्धतीने साजरा केला. चित्रा गोसावी आणि त्यांचे पती दिनकर गोसावी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व असुन त्यांच्या या समाजकार्याचे कौतुक समाज माध्यमातून होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
_______________________

दोन गटांतील हाणामारी प्रकरणी १३ जणांवर दरोड्याचा प्रयत्न तर ६ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल !

दोन गटांतील हाणामारी प्रकरणी १३ जणांवर दरोडयाचा प्रयत्नाचा तर ६ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल.

चाकण,पुणे – दोन दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दरोड्याचा प्रयत्न आणि खुनाचा प्रयत्न असे अत्यंत गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेत नावे निष्पन्न झालेल्या ११ जणांसह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत तपास अधिकाऱ्यांनी घटना घडल्या पासून माध्यमांनी वेळोवेळी विचारणा केल्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये राजकीय पक्षांचे वजनदार पदाधिकारी, एक नगरसेवक, एक माजी सरपंच अशा पदाधिकाऱ्यांचा समवेश असल्याची बाब समोर येत आहे. दरम्यान या वादात दोन जन गंभीर जखमी आहेत; तर काही जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

चाकणपासून जवळच असलेल्या एका मळ्यात हा गंभीर वादाचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर पोलिसांत एकमेकांच्या विरोधात गंभीर तक्रारी दाखल झाल्यानंतर यातील निष्पन्न झालेल्या संशयित आरोपींनी पलायन केले आहे.

दरम्यान या धक्कादायक घटनेत केवळ एकाच बाजूचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी जोरदार राजकीय प्रयत्न झाले. मात्र यातील धक्कादायक वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने दोन्ही कडील तक्रारी घेऊन सुमारे तेरा जणांवर दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुमारे सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान रात्री प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन्हीकडील तक्रारी दाखल केल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वजन वापरल्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे दोन गटातील या अत्यंत टोकाच्या वादात न्यायाची भूमिका घेणाऱ्या मंडळींवरच अन्याय होत असल्याची जनभावना आहे.

सोलापूरच्या उपमहापौराला अटक करण्यापूर्वीच 'शिंकली माशी' ! तपास अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश.

सोलापूरच्या उपमहापौराला अटक करण्यापूर्वीच 'शिंकली माशी' ! तपास अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश.


पुणे – सांगवीतील एकच फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक केल्याच्या प्रकरणात एक वर्षापासून पोलिसांना हवा असलेला सोलापूरचा विद्यमान उपमहापौर राजेश काळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला खरा, पण कुठे तरी ‘माशी शिंकली’ आणि अटक होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला केवळ नोटीस देऊन सोडून दिले. या प्रकरणी तपास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असल्याने वरिष्ठांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत काळे याला कोणत्याही आजार अथवा आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र अटकेची प्रक्रिया सुरू असताना त्याला अचानक शिंका येऊ लागल्या आणि ताप आला. ही कोरोनाची लक्षणे असल्याने आरोपीला नोटीस देऊन संध्याकाळी पाचच्या सुमारास सोडण्यात आल्याची सारवासारव करण्यात येत आहे. काळे याने कोरोनाच्या लक्षणांचा बहाणा करून पळ काढला आणि पोलिसांनी त्याला मदत केली, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही गोष्ट वरिष्ठाच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी तपास अधिकारी फौजदार आर. एस. पन्हाळे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

उपमहापौर काळेने एक फ्लॅट अनेकांना विक्री केल्या प्रकरणी मे २०१९ मध्ये गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो फरार होता असे पोलिसांचे म्हणणे होते, पण दुसरीकडे काळे सोलापूर उपमहापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान होता. सांगवी पोलिस उपमहापौर काळे याला ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले होते. सांगवी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काळे यांना रात्री ताब्यात घेतले आणि त्याला पिंपरी-चिंचवडला घेऊन आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये आणल्यानंतर काळे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा काळेला कोणताही आजार अथवा कोरोनाची कोणतीही लक्षणे डॉक्टरांना आढळून आली नाहीत. सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत काळेची चौकशी व अटकेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मात्र काळेला अचानक ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणे असल्याचे कारण पुढे करत काळे याला अटक करण्यापूर्वीच आज (शनिवारी) संध्याकाळी पाच वाजता नोटीस बजावून सोडून देण्यात आले.

अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळेला ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळेने कोरोनाची लक्षणे वाटत असल्याचे पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवून काळेला नोटीस देऊन सोडून दिले. काळेला खरंच ताप, शिंका, खोकला आला होता का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

ताब्यात घेतल्यापासून काळेला सोडून देण्यापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मागवला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर काळे याचा मोबाईल फोन बंद असल्याने या प्रकरणात पोलिसांवरील संशय आणखीच बळावला आहे. काळेला कोरोनाची लक्षणे असली तरी त्याने फोन बंद ठेवण्याचे कारण काय, यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Saturday 30 May 2020

'वंदे भारत' उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात !

वंदे भारत' उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात.

मुंबई - वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईटसच्या माध्यमातून ३४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे.उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७५० इतकी आहे.

दि.७ जून २०२० पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

तिथे गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.

आलेल्या नागरिकांचे कडक कॉरंटाईन होईल यावर प्रशासनाचे कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.

वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे.

जठरात अडकलेली उघडी 'सेफ्टीपीन' दुर्बीणीद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश.

जठरात अडकलेली उघडी 'सेफ्टीपीन' दुर्बीणीद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश.


पिंपरी – एका ५५ वर्षीय पुरुषाने नकळतपणे गिळलेली ‘सेफ्टीपीन’ एन्डोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून बाहेर काढण्यास पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाच्या डाॅक्टरांना यश मिळाले आहे.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ५५ वर्षीय पुरुष रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल होण्याच्या तीन दिवसापूर्वी जेवण करताना नकळत या रुग्णाने ‘सेफ्टीपिन’ गिळली होती.

रुग्णाचा एक्सरे केला असता ही सेफ्टी पिन जठरामध्ये अडकून बसली असल्याचे सिद्ध झाले. म्हणून तातडीने या रुग्णाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी ती सेफ्टी पिन उघडी असल्याचे दिसून आले. जठरात उघडी असलेली ही सेफ्टी पिन जठराला इजा करू शकते म्हणून ती लवकर बाहेर काढणे गरजेचे होते.

शल्य चिकित्सक डॉ. विरेंद्र आठवले यांच्या देखरेखीखाली या रुग्णाची मेडिकल
गेस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल डहाळे यांनी तातडीने एन्डोस्कोपी केली व कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता उघडी ‘सेफ्टीपिन’ बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.
सदर रुग्ण सुखरूप असून त्यांना दोन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत शल्य चिकित्सा विभागाने प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अश्या गुंतागुंतीच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात करण्यात येत असून आमच्याकडे अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील यांनी या प्रक्रियेत सहभागी डॉक्टरांचे कौतुक केले.

पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जण अटकेत !

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जण अटकेत !

विश्रांतवाडी, पुणे - खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण आठ जणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच आरोपींकडून गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि दोन आलिशान मोटारी व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेने विश्रांतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी ( वय-३६, रा. भोसरी), आझाद शेखलाल मुलाणी ( वय-३०, रा. चिखली), आदेश दिलीप ओकांडे ( वय-२१, रा. निगडी), मुबारक बबन मुलाणी ( वय-३८, रा. चिखली), संदीप किसान गरुड ( वय ४०, रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय ४३, रा. मुळशी), सिराज राजू मुलाणी ( वय-२२, रा. मुळशी) आणि विनोद नारायण माने ( वय-२६, रा. मुळशी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील शिपाई सोमनाथ खडसोळे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर मुलाणी आणि जमीर मुलाणी हे खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात बंदिस्त होते. त्यांची शुक्रवारी रात्री पॅरोलवर सुटका करण्यात आली.

त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि मित्र मोटारी आणि दुचाकींसह तोंडाला मास्क न लावता व सोशल डिस्टन्सचे पालन न करता विश्रांतवाडीच्या दिशेने निघाले होते. ही रॅली विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर आरडाओरडा करीत जात होती.

त्यावेळी विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांच्या पथकाने तातडीने रॅलीचा पाठलाग केला. फुलेनगरजवळ आरटीओ चौकात ही रॅली अडवून वाहनांची तपासणी केली.

त्यावेळी एका गाडीतून एक गावठी पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, लोखंडी बार आणि फॉरचूनर, स्कॉर्पिओ आणि एक स्विफ्ट कार जप्त केली. अटक केलेल्या आरोपींविरोधात बेकायदा गर्दी जमवून दंगल माजविण्याचा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कोविड 19 आणि जमावबंदी कायद्याच्या भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

कल्याणच्या या शाळेचे झाले कारागृह....! नवीन कैद्यांना नवीन कोंडवाडा.

कल्याणच्या या शाळेचे झाले कारागृह....! नवीन कैद्यांना नवीन कोंडवाडा.


कल्याण , प्रतिनिधी
आधारवाडी कारागृहात कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांसाठी शेजारील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे.कारागृह प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेलमधील कैद्यांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत.मात्र शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांना नियमित कारागृहात पाठवले जात नसून बाहेरून येणाऱ्या कैद्यामुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांची व्यवस्था कारागृहाच्या बाहेरच करण्याचा निर्णय आधारवाडी कारागृह प्रशासनाने घेतला आहे. 

नवीन कैद्यांना त्याच परिसरातील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था केली आहे. या शाळेला चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीने भरलेल्या आधारवाडी कारागृहातील काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी अद्यापि हजारों कैदी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्यासाठी नियम पाळणे गरजेचे असून कारागृहामधील कैद्याची संख्या कमी केल्याशिवाय सुरक्षित राहणे, नियम पाळणे शक्य नसल्यामुळे काही कैद्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी कारागृहातील कैद्याची संख्या फारशी कमी झालेली नाही. नव्याने येणाऱ्या कैद्यामुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असल्यामुळे या कैद्यांच्या सुरक्षेसाठी नव्या कैद्यांची व्यवस्था या शाळेत करण्यात आली आहे.

उत्खनन सुरू असलेली अयोध्या नसून सम्राट अशोक कालीन बुध्दनगरी साकेत असल्याचा बुध्दिस्ट इंटर नॅशनलचा दावा.

उत्खनन सुरू असलेली अयोध्या नसून सम्राट अशोक कालीन बुद्धनगरी साकेत असल्याचा बुद्धिस्ट इंटर नॅशनलचा दावा.


बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) सध्या देशात कोरोना मूळे लॉकडाऊन आहे.संपुर्ण देश व जग कोरोनाने हैराण झाले आहे.संपुर्ण जग शांत असताना राम मंदिर ट्रस्ट मात्र मंदिर निर्माण कामात व्यस्त आहे. त्यासाठी जमीन समतल करण्यासाठी खोदकाम करत असताना सम्राट अशोक कालीन बुद्ध नगरी साकेत सापडली.असा दावा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या माध्यमातून केला जात आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की राम मंदिर बाबरी मशीद या वादा बाबत काही दिवसापूर्वी सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे शासनाने मंदिर ट्रस्ट निर्माण करून विवादित जागा ट्रस्ट ला देऊ केली. जग शांत असताना व कोरोना महामारीचे संकट देशावर आले असताना घाई घाईत राम नवमीच्या मुहूर्तावर मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यात आले.त्यासाठी जमिनीचे खोदकाम सुरू झाले असता त्या ठिकाणी बौद्ध कालीन वस्तू मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. व अजून सापडत आहेत . ही जागा पूर्वीची साकेत नगरीची असून बुद्ध तीन वेळा तिथे प्रवचन करण्यासाठी आले असल्याची नोंद चिनी प्रवासी फा हेन याने नोंद करून ठेवली आहे. तसेच बौद्ध धमाचे मुख्य केंद्र साकेत असल्याचे सुध्दा फा हेन चे म्हणणे आहे. त्याठिकाणी सम्राट अशोकाने धम्म स्तंभ उभारला असून तो पुष्य मित्रा शुंग द्वारा नष्ट केला गेला आहे.खोद कामात सापडलेल्या स्तंभला शंकराची पिंड असल्याचा दावा केला जात आहे मात्र हे सारे खोटे असून राम जन्म भूमीत रामाच्या अस्तित्वा बाबत या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामात एकही पुरावा सापडत नाही.याचा अर्थ ती अयोध्या नसून ती सम्राट अशोक कालीन ऐतिहासिक बुद्ध नगरी साकेत असल्याचे सिद्ध होत आहे.बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आमची मागणी आहे की,मंदिर निर्माण कार्य त्वरित थांबवून सदरची जागा पुरातत्व खात्याकडे वर्ग करावी व इन कॅमेरा त्या जागेचे उत्खनन करावे व ज्या गोष्टी सापडतील त्या जगा समोर आणाव्या.तसेच शासन निवेदन देऊन ऐकत नसेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्ट व युनोमध्ये जाण्याची तयारी सुद्धा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करत आहे.
रायगड जिल्हा अध्यक्ष कासे सर यांनी माहिती देताना सांगितले की केवळ न्यायालयीन लढाईने हा प्रश्न सुटणार नसून त्या साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.त्यासाठी तमाम बौद्ध बांधवाना नम्रपणे आवाहन करण्यात येते की ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे तसेच आपण सर्व बौद्ध बांधव एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे करू या. बुद्ध ही भारतीयांची विरासत असून तमाम sc, st,,obc यांची विरासात आहे .त्यामुळे या लढाईत बहुजन समाज आपल्याला मदत करेल ,मात्र ढाल बौद्ध समाजाला व्हावे लागेल.आम्ही आमच्या विरासातीसाठी प्राणाची बाजी लावण्यासाठी तयार आहोत असेकासे सर पुढे म्हणाले.

पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून टेलिमेडिसीनची सेवा !

पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून टेलिमेडिसीनची सेवा !



पिंपरी ३० मे २०२० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेच्या ॲपचे लोकार्पण महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
महापालिका भवनातील कोरोना वाॅर रूम मध्ये झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर,उपमहापौर तुषार हिंगे,पक्षनेते नामदेव ढाके,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ पवन साळवे,डाॅ वर्षा डांगे,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

या सुविधेमध्ये नागरिकांमध्ये दिसत असलेल्या ताप, खोकला, थकवा, वेदना इत्यादी लक्षणांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नावली आहे. तसेच संबंधित नागरिकाने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने कुठे कुठे प्रवास केला आहे इत्यादी माहिती ॲपमध्ये संकलित केली जाते. सदर माहितीचे विश्लेषण करून नागरिकांना कोरोनाचा कितपत धोका आहे, याची माहिती दिली जाते. या टेलिमेडीसीन सुविधेचा उपयोग करून नागरिक तज्ञ डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकतात. नागरिकांनी ॲपच्या माध्यमातून डॉक्टरांची वेळ घेतल्यानंतर त्या वेळेमध्ये नागरिक डॉक्टरांशी संवाद साधू शकतात. यामुळे नागरिकांना घरबसल्या योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरोना साथीमुळे घराबाहेर पडता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये घरातच राहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इंडस इंड बँक आणि सकाळ रिलीफ फंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.

अजितदादांनी 'त्या' फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटात केली सही !

*....अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली.*

मुंबई : अजितदादा पवार ( Ajit Pawar ) चर्चगेट येथील आपल्या ‘प्रेमकोर्ट’ या खासगी निवासस्थानी होते. तेवढ्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा फोन येतो. टोपे एका फाईलसंदर्भात अजितदादांना माहिती देतात. थोड्या वेळातच एक अधिकारी ती फाईल घेऊन इमारती खाली येतो.
अजितदादांनी ( Ajit Pawar ) शिपायाला पाठवून दिले, अन् अधिकाऱ्याकडील ती फाईल वर मागवून घेतली. फाईल समोर येताच अजितदादांनी एका मिनिटातच सही केली, अन् शिपायाकरवी परत त्या अधिकाऱ्याकडे पाठवून दिली.

‘अजितदादांना ( Ajit Pawar ) फाईल वाचून सही करायला वेळ लागेल’ असे इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या अधिकाऱ्याला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. अजितदादांनी एका मिनिटांत सही केली होती, अन् पाच मिनिटांच्या आत ती फाईल परत संबंधित अधिकाऱ्याच्या हातात आली होती.

लोकांच्या हिताचा निर्णय असेल तर फार रवंथ लावायचा नाही. धडाक्यात निर्णय घेऊन मोकळे व्हायचे, हा अजितदादांचा ( Ajit Pawar ) स्वभाव अनेकांना ठाऊक आहे. आपल्या स्वभावाला साजेशा अशा पद्धतीनेच अजितदादांनी ( Ajit Pawar ) फाईलचा विषय झटकन मार्गी लावून टाकला.

त्यानंतर ते अधिकारी रात्री मुख्यमंत्र्यांकडे फाईल घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांकडे कामाचा मोठा व्याप आहे. ‘कोविड’ संदर्भात सतत लोकांचे फोन येत असतात. ऑनलाईन बैठका चालू असतात. पण ही फाईल महत्वाची होती. फाईल आल्याचे समजताच त्यांनी त्यावर जेमतेम दहा – पंधरा मिनिटांत स्वाक्षरी केली.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज शनिवारी ही बातमी लिहित असताना शासकीय आदेश (जीआर) जारी करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाचक ही बातमी वाचत असतील तेव्हा जीआर जारी झालेलाही असेल.

या अतिशय महत्वाच्या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचा लाभ राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 12 कोटी जनतेला मिळू शकणार आहे.

‘कोरोना’ आपत्तीमुळे लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे केवळ ‘कोरोना’च नव्हे, तर अन्य सगळ्या आजारांवर सुद्धा मोफत उपचार झाले पाहीजेत, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची दुर्दम्य इच्छा होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याशी चर्चा केली, अन् त्यांची संमती मिळविली.

मंजुरीचे सोपस्कार पार पडले, अन् आज त्या योजनेच्या अंमलबजावणीचा आदेश जारी होण्याचा मार्ग मोकळा झाला.

या निर्णयामुळे राज्यातील सर्व लोकांना फायदा होणार आहे. विशेषतः ‘कोविड’च्या या काळात काम करणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी व इतर सगळ्या कर्मचाऱ्यांनाही मोफत लाभ मिळणार आहे. पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना अगोदर खर्च करावा लागायचा, आणि नंतर पैसे मिळायचे. आता पूर्णपणे मोफत लाभ मिळणार आहे. यापूर्वी 85 टक्के लोकांचा योजनेत समावेश होता. आता 100 टक्के लोकांना सामावून घेण्यात आले आहे

– राजेश टोपे, आरोग्य मंत्री
या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचा लाभ राज्यातील सगळ्या लोकांना घेता येणार आहे. पूर्णपणे नि:शुल्क स्वरूपात लोकांना ही सुविधा मिळणार आहे. तब्बल 1200 आजारांचा यांत समावेश आहे. राज्यातील निवडक 1000 रूग्णालयांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.


रायते विभाग हायस्कूलच्या शिक्षकांची महाराष्ट्र राज्यातून समुपदेशक म्हणून निवड !

रायते विभाग हायस्कूलच्या शिक्षकांची महाराष्ट्र राज्यातून समुपदेशक म्हणून निवड !


कल्याण (संजय कांबळे) विद्यार्थ्यांना मोफत /नि :शुल्क मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी भारतीय समाज उन्नती मंडळांच्या पद्मश्री आण्णासाहेब जाधव या संस्थेच्या रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेचे शिक्षक कल्पेश मनोहर शिंदे यांची महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने समुपदेशक म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देशातील कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण विभागाने अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन तै अडिज महिन्यांनंतर देखील कोराचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे आता शाळांचे काय, त्या कधी सुरू होणार सुरू झाले तर सोशलडिस्टींग चे काय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते कसे भरुन काढायचे यावर शासन विचार विनिमय करित आहे. यातून डिजिटल शिक्षण हा एक पर्याय पुढे आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन हे पण पुढे आले.
यानुसार ज्ञानगंगा घरोघरी समुपदेशक आपल्या दारी ही अभिनव कल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची बुध्दिमता, आवड निवड, मानसिक कल, अभिक्षमता, अभिरुची, व्यक्तीमत्व आणि शरीरयष्टी या सप्तसुत्री चा वापर करुन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा मुळ हेतू असून याचा लाभ तळागाळातील, ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी समुपदेशक प्रयत्न करणार आहोत.
यातून इयता आठवी ते बारावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. इ १० वी कल व अभिक्षमता चाचणी व निकाल २०२०, दहावी बारावी नंतर काय, करिअर च्या विविध वाटा, मानसिक गोंधळ, अस्वस्था, आणि कोरोना प्रादुर्भाव यावर मार्गदर्शन व समुपदेशन होईल यासाठी शासनाने कल्याण तालुक्यातील रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेचे शिक्षक कल्पेश मनोहर शिंदे यांची निवड केली आहे तरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या ७०४५८१५७०३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोना मुक्तीच्या पार्श्र्वभूमीवर मुभा रूरल डेव्हलपमेंट अॅंड एज्युकेशन सोसायटी तर्फे माणगांव पोलीसांना पीपीई किट वाटप !

कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्यूकेशन सोसायटी तर्फे माणगांव पोलिसांना पीपीई किट वाटप !


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) माणगांवात कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना सामाजिक बंधीलकीतून रोजगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्यूकशन सोसायटी माणगाव या संस्थेच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ चा मुकाबला करणाऱ्या माणगांव पोलीस व वाहतूक सेवेतील पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी १५ पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटी माणगांव मार्फत व रायगड मधील माणगांव येथील सामाजिक , शेक्षणिक व ज्यांना रोजगार , नोकरी नाही अश्या बेरोजगारांना मुंबई, पुणे , महाड , रोहा या ठिकाणी नोकरी मिळवून देण्याचे व मार्गदर्शनाचे काम करते. कोविड १८ योध्याना सुरक्षा म्हणून १५ पीपीई किटचे वाटप होडगाव गावाचे दानशूर व्यक्तिमत्व असणारे आमचे मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटी संचालित शिवम काॅंमप्युटर एज्युकेशन सेंटर माणगाव या संस्थेचे सह संस्थापक सुशिलदादा कदम व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त श्री गोरक्षनाथ नवनाथ मंदिर ढालघर मठाचे अध्यक्ष जेष्ठ गुरुबंधू शांताराम बाळू खाडे उर्फ (खाडे महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामदास इंगवले यांच्या कडे एकूण १५ पीपीई किट देण्यात आले.
या कार्यक्रमात मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. मुरलीधर वाणी व शिवम काॅंमप्युटर एज्युकेशन सेंटर चे संस्थापक श्री भालचंद्र खाडे ,सेल टॅक्स आॅफीसर रायगड विभाग सतीश सावंत, मुरलीधर कदम, जयदास म्हस्के, होडगांव ग्रुप ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री शंकर खाडे , रूपेश खाडे,मा. मुख्याध्यापक सचिन कदम उपस्थित होते.
माणगावात कोविड १९ योध्याना पीपीई किट मिळाल्याबद्दल सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातून संस्थेचे कौतुक होत आहे. माणगावात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून जास्त धोका असलेल्या पोलीस व वाहतूक कर्मचाऱ्यांना सदरचे किट मिळाल्याबद्दल पोलीस यंत्रणेने संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.
फोटो कॅप्शन - पोलीस व वाहतूक कर्मचारी यांना पीपीई किटचे वितरण करताना मान्यवर दिसत आहेत.

सांगली येथील फ्लॅट विक्रीत फसवणूक, सोलापूरच्या उपमहापौरांना अटक‌ !

सांगवी येथील फ्लॅट विक्रीत फसवणूक,सोलापूरच्या उपमहापौरांना अटक !


पिंपरी - सांगवी येथील एक फ्लॅट ४ ते ५ जणांना विकल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना सांगवी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून अटक करण्याची कारवाई सुरू होती. फसवणुकीचा हा प्रकार २०१८-२०१९ या कालावधीतील आहे. सांगवी पोलिसात काळे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.


या प्रकारणामध्ये आणखी काही जणांचा समावेश असून यापूर्वीच काहीजणांना अटक झाली आहे. सांगवी पोलिस उपमहापौर काळे यांना ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात आले होते. सांगवी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काळे यांना ताब्यात घेतले.

रात्री उशिरापर्यंत त्यांच्या अटकेची कारवाई सुरू होती. सांगवी परिसरातील एक फ्लॅट राजेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ ते ५ जणांना विकल्याचे प्रकरण समोर आले होते. फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

जेष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे दु:खद निधन ‌!

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं निधन !



ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं दीर्घ आजारांमुळे वयाच्या ६०व्या वर्षी ठाण्यात दुःखद निधन झाले. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचे त्यांनी संपादन केले होते.

मृदू,लाघवी स्वभावाच्या ललिता बाईंनी सिनेपत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तवआणि सत्याचा पुरस्कार त्यांनी आपल्या बातम्यांत केला. त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते. नूतन, स्मिता पाटील, माधुरी दिक्षित, रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल, मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर आदींचा उल्लेख करावाच लागेल. त्यांनी स्मिता, स्मित, मी:स्मिता पाटील, नूतन, "तें'ची प्रिया प्रिया तेंडुलकर ही पुस्तकें रसिकांना आवडली होती. आणि अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यांनी उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. सध्या त्या दीप्ती नवलचं चरित्र लिहीत होत्या. त्यांच्या मागे विधीज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी हा परिवार आहे.

*त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो.*

गरोदर महिलेच्या मदतीला धावले - आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी !

गरोदर महिलेच्या मदतीला धावले - आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी



कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका क्षेत्रातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गरोदर महिलेचा प्रसुती चा सपूर्ण खर्च उचला कडोमपा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी लॉक डाऊन काळात कचोरे प्रभागातील महिला प्रसुती साठी कळवा हॉस्पिटलमध्ये येते गेली असता कळवा रुग्णायलाय तिची प्रसुती केली नाही त्यामुळे महिलेला कळवा ते कल्याण पर्यत चालत यावं लागलं याची माहिती स्वराष्ट्र माझा न्युज चॅनल चे संपादक अंबादास (आदर्श) भालेराव यांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना दिली असता तत्काळ आयुक्तांनी कल्याण कचोरे प्रभाग 45 मध्ये राहणारी महिलेची दखल घेत डॉ प्रशांत पाटील याच्याशी संपर्क केला त्याच्या मदतीने कल्याण पश्चिम येतील खाजगी वैष्णवी हॉस्पिटलमध्ये रुग्ण सबा शेख याची प्रसुती ( सिजर ) दिनांक 30 मे 2020 रोजी मोफत केलं. वैष्णवी हॉस्पिटल चे डॉक्टर यांनी महिला लॉक डाऊन काळात मोफत उपचार देऊन माणुकीच धर्म पार पाडला आहे. उपचार दरमन्यात सोनवणे ग्रुप चे संचालक अमित सोनवणे यांनी ही महिलेला उपचारा साठी मदत केली होती.
यामध्ये त्याच्या परिसरातील राहणारे श्रमिक पत्रकार संघाचे महिला अध्यक्ष सुवर्णा कानवडे यांनी महिले ला सकाळी 6 च्या सुमारास दाखल केले असता 8 च्या दरमन्या गरोदर महिलेने एक मुलीला जन्म दिला. सुवर्णा कानवडे यांनी योग्य वेळी मदत करून उपचारासाठी मदत केली महिलेचे नातेवाईक पती हे लॉक डाऊन मुळे गावी अडकल्याने महिला उपचार दरमन्या सोबत कोणी नव्हते त्याकरिता माणुसकी धर्म म्हणून सुवर्णा कानवडे याने पुढाकार घेतला.


लॉक डाऊन काळात दुर्बल घटकातील गरोदर महिला कोणतेही हानी होऊ नये व रुख्मिनी व शास्त्री नगर रुग्णालयात ICU व NICU सेवा नसल्यामुळे मा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी महिलेचा पूर्ण उपचार खाजगी रुग्णालयात केला आहे.
कल्याण तालुक्यातील खाजगी रुग्णालयाची अवस्था पाहून तत्काळ रुख्मिनी व शास्त्री नगर हॉस्पिटलमध्ये ICU ,NICU सेवा सुरू करण्याचे आदेश मा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत

कल्याण शहरात आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी याच्या कार्यकीर्ती मध्ये स्वराष्ट्र माझा च्या पाठपुरावा मूळे शासकीय रुग्णालयात रुख्मिनी व शास्त्री नगर रुग्णालयात लवकर ICU, NICU सुविधा सुरू होणार.
आता कल्याण मधील रुग्णांना मुबई कडे किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेण्याची वेळ येणार नाही.
स्वराष्ट्र माझा न्युज चॅनल च्या पाठपुरावा मूळे पालिका क्षेत्रात वेळेवर एक आई व बाळाचा जीव वाचविल्या मूळे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कर्तव्य निष्ठ असल्याचे सिद्ध केले.

कोरोना विषाणू मुक्तीच्या लढाईत पोलिस हवालदार दिपक हाटे शहिद माणगावसह संपूर्ण गोरेगावात शोककळा !

कोरोना विषाणू मुक्तीच्या लढाईत पोलीस हवालदार दिपक हाटे शहिद झाल्यामुळे माणगांवसह संपूर्ण गोरेगांवात शोककळा !


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणू मुक्तीच्या राष्ट्रीय लढाईत रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या गोरेगांव विभागातील नागावचे सुपुत्र एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस हवालदार दिपक जयराम हाटे हे मुंबई बांद्रा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार ऑडरली या अत्यंत जोखमीच्या पदावर कार्यरत होते. त्यांचे कोरोना विषाणू मुक्तीच्या राष्ट्रीय लढाईत शुक्रवार दिनांक २९ मे २०२० रोजी निधन झाले. कोरोना विषाणू मुक्तीच्या राष्ट्रीय लढाईत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे ते मुबंई येथील नायर रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्यावर त्यांचा मृत्यू झाला.
काळकथीत पोलीस हवालदार दीपक हाटे रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या गोरेगांव विभागातील नागाव या गावचे सुपुत्र होते. त्यांच्या या अकाली निधनानंतर संपूर्ण नागांव गावावर, गोरेगांव विभागावर आणि संपूर्ण माणगांव तालुक्यावर दुःखाची शोककला पसरली असून. संपूर्ण गोरेगाव परिसर दुःखामध्ये बुडाला आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने पोलीस खात्यासह बौद्ध समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
काळकथीत पोलीस हवालदार दीपक हाटे बांद्रा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार ऑडरली या पदावर कार्यरत होते. ते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या अगदी जवळचे सहकारी होते. पोलीस स्टेशन मध्ये ऑर्डरली या पदावर कार्यरत असताना त्यांनी पोलीस खात्यातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्या प्रामाणिकपणे निभावल्या आहेत. कर्तव्यात कधीही कसूर न करता नेहमी कर्तव्य तत्पर असलेले नेहमी सर्वांशी हसून खेळून वागणारे दिपक हाटे हे पोलीस खात्यातील सर्वांचे आवडते व्यक्तीमत्व होते. ते सुरवातीला मुंबई येथील मलबार हिल पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
काळकथीत पोलीस हवालदार दिपक जयराम हाटे यांच्या निधनाची दुःखद वार्ता सोशल मीडियाच्या आणि सामाजिक माध्यमातून समजल्यावर सर्वांना अतीव दुःख झाले. त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस सहकारी, मित्र परिवार, हितचिंतक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्यांचे आप्तेष्ट आणि नागाव हितवर्धक स्थानिक व मुबंई या भावकीचे पदाधिकारी, गोरेगांव विभागातील सर्व शाखांचे पदाधिकारी, माणगांव तालुक्यातील सर्व सामाजिक व धार्मिक संघटनांचे आजी माजी, विद्यमान पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी अत्यंत दुःखद आणि जड अंत करणाने आपल्या लाडक्या भावाला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याच प्रमाणे गोरेगाव विभाग पंचशील बौद्धजण सेवा संघ अध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव, सामाजिक कार्यकर्ते विकासदादा गायकवाड, विश्वस्त अशोक साळवी, संदीप साळवी, चंद्रमणी साळवी, दिलीप साळवी, त्यांचे भाऊ सुभाष हाटे, बिपीन हाटे, श्रीकांत हाटे, बबन हाटे, तसेच सर्व स्थानिक व मुबंईकर पदाधिकारी यांनी शहीद कोवीड योद्धा दीपक जयराम हाटे या लाडक्या भावाला श्रद्धांजली वाहिली.

Friday 29 May 2020

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार !

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

*खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार*

*अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स साठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह*

मुंबई दि.२९ : कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निदेश मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले.

कोविड 19 विषाणू प्रादर्भावाबाब्त करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. कोविड 19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई किट पुरविण्यात यावेत, असे श्री. ठाकरे यांनी निदेश दिले. येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड 19ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि शासनाची रुग्णालये ही कोविड 19 साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारांसंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दिल्या.
जगात आणि देशात अन्यत्र कोविड 19 मुळे मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण 5 ते 7 टक्के असताना राज्यातील मृत्यू दर 3.3 टक्के आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोविड 19 प्रादुर्भावापूर्वी कोविड विषाणू चाचाणीसाठी राज्यात केवळ 2 सध्या शाळा होत्या केवळ 2 महिन्यात आपण राज्यात 72 प्रयोगशाळा सुरू करू शकलो येत्या आठवड्यात नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील, या कामगिरीबद्दल प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर उपचारासाठी नेमण्यात आलेल्या 11 तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृतीदलाचे केंद्राने आणि अन्य राज्याने कौतुक केले आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या डॉक्टरांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला आहे. तो सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकत असल्याने कोविड 19 मुळे होणार्‍या मृत्यूची टक्केवारी रोखण्यात आपल्याला यश आले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्याचा रुग्ण दुपटीचा दर (डबलींग रेट) कालावधी तीन दिवसांवरुन १४ दिवसांवर आला आहे आणि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 31 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
येत्या सोमवारपर्यंत मुंबईत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेकरिता उपलब्ध होत आहेत. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारलेले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (आयसीयू २०० बेड्स १००० बेड्सची जम्बो सुविधा), महालक्ष्मी येथे सध्या युद्धपातळीवर सुरु. असलेले कोरोना केअर सेंटरचे (CCC) काम, नेस्को गोरेगाव येथे येथे ५३५ बेड्सची जम्बो सुविधा, रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेल्या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH) यांची उभारणी यासर्वांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळे घेतला.
खाजगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेण्याचे निदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता महापालिकेकडे रुग्णांसाठी अधिक चांगल्याप्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये करण्याचे तसेच प्रत्येक बेडला युनिक आयडी देण्याची सूचना श्री. ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.
यावेळी उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई, परिवहन मंत्री श्री. अनिल परब, मुख्य सचिव श्री. अजोय मेहता, महापालिका आयुक्त श्री. आय. एस. चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***

प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहिका तैनात करणार; टाटा आमंत्रा आणि डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाची विनामूल्य चाचणी !

प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहिका तैनात करणार; टाटा आमंत्रा आणि डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाची विनामुल्य चाचणी. 

_पालिका आयुक्त -डॉ . विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती_


कल्याण , प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमिवर महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती देणेकामी महापौर विनिता राणे व पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .या पत्रकार परिषदेत महापालिकेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करणेसाठी महापालिकेचे डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय (36 बेड्स + 6 आय.सी.यू.बेड्स) हे डेडिकेटेड कोवीड सेंटर म्हणून जाहिर केले असून, या व्यतिरिक्त बाज आर.आर.हॉस्पिटल डोंबिवली (56 बेड्स), निऑन हॉस्पिटल, कल्याण शिळरोड (28 बेड्स) आणि होलिक्रॉस हॉस्पिटल कल्याण पश्चिम (70 बेड्स) यांचेशी सामंजस्य करार केलेला आहे.

सद्याच्या परिस्थितीमध्ये महापालिकेत डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे महापालिकेने आय.एम.ए., निमा, कॅम्पा या संस्थांमधील डॉक्टरांचे सहकार्य मिळविले आहे.दिनांक ९ एप्रिल, २०२० पासून महापालिकेने तापाचे दवाखाने सुरु केले असून, सदर दवाखान्यात तापाचे क्रिनिंग सुरु केले असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

महापालिकेचे पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १० तापाचे दवाखाने सुरु केले असून पालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय आणि टाटा आमंत्रा येथील रुग्ण यांची कोविड तपासणी महापालिकेमार्फत मोफत करण्यात येते. असल्याचे पालिका आयुक्त यांनी यावेळी सांगितले.

मेट्रोपोलिस लॅबने देखील दहा हजार कोवीड-१९ च्या मोफत चाचण्या करुन देण्याचे मान्य केले आहे, तसेच शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजना सामंजस्य करार केलेल्या तीन दवाखान्यांनाही लागू करण्यात आलेली असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगीतले .

पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टची तपासणी केली जाते आणि ९५ टक्के केसेस आयसोलेट केलेल्या व्यक्तींमधून सापडतात अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे रुग्ण आल्यावर त्याची तपासणी करावी सदर रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली तरच असा रुग्ण महापालिकेकडे संदर्भित करावा आणि त्यांचे रुग्णालयात विलगीकरणासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना रुग्णालयांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रुग्णवाहीकांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महानगरपालिकेने आर.टी.ओ.कडे १०० रुग्ण वाहिकांची मागणी केली असून प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहीका उपलब्ध रहातील तसेच सदर रुग्णवाहीकांवर व्हेईकल ट्रॅकींग सिस्टिम बसविली जावून त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिला जाणार असल्यामुळे रुग्णवाहीका कुठे कार्यरत आहे याची माहिती/लोकेशन मिळू शकेल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

या व्यतिरिक्त महापालिका परिवहन सेवेच्या दोन मिनीबसचे रुपांतर रुग्णवाहीकेत करण्यात आले असून अशा एकुण १० मिनी बसचा वापर रुग्णवाहीका म्हणून करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.महापालिका पथकांमार्फत घरोघरी सर्व्हेक्षणाचे काम सुरु असून सुमारे ८.३० लाख नागरीकांचे सर्व्हेक्षण केले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.महापालिकेने २४X७ यावेळेत वॉर रुम स्थापन केली असून यातील हेल्‍पलाईन क्रमांकाद्वारे लोकांना सर्व प्रकारची माहिती पुरविली जाते.

GIS मॅपिंग प्रणालीद्वारे चार कोविड रुग्णालयांमधील बेड्स ची उपलब्धता, दाखल झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची आकडेवारी, हॉट्सपॉट एरियाबाबतची माहिती डॅशबोर्डद्वारे दर्शविली जाते. असे प्रतिपादन पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.

शिक्षणासाठी दूरदर्शनचे १२ तास तर रेडिओचे २ तास द्या ; वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारकडे मागणी !

शिक्षणासाठी दूरदर्शनचे १२ तास तर रेडिओचे २ तास द्या ; वर्षा गायकवाड़ यांची केंद्र सरकारकडे मागणी !



मुंबई - विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरदर्शनचा १२ तर रेडिओचा २ तासांचा वेळ राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत केंद्र सरकारला मागणी करणारे पत्र पाठविले आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा जून महिन्यात सुरू होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने प्रत्यक्ष शाळा न सुरू करता, आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टीव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे देण्याची तयारी केली असल्याचे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केले आहे.

त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून २ तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचं प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,’ असे गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.पैकी या पॅकेजची सविस्तर माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १२ नवीन टिव्ही चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

सोडा पिण्यासाठी आलेल्यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल !

सोडा पिण्यासाठी आलेल्यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल !


भुसावळ प्रतिनिधी :-पंधरा बंगला भागातील जलालशाह बाबा दर्गा समोर सप्या यांच्या दुकानांवर गेले व त्याला पिण्यासाठी सोडा मागितला असता दुकानांवर उभे असलेल्यांनी अश्लील शिवीगाळ केली.तसेच याचा राग मनात ठेवून रात्री जमाव करून दगडफेक केली व घराचे नुकसान केल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील पंधरा बंगला भागातील जलालशाह बाबा दर्गा समोरील सप्या यांच्या दुकानांवर आकाश निकम व मानलेला मुलगा सागर भोंसले दोघे दिनांक 28 मे 2020 रोजी 9:30 वाजेच्या दरम्यान गेले व सप्याला पिण्यासाठी सोडा मागितला असता दुकानांवर उभे असलेले उमर हबीब शेख,रिहान बाबूलाल शेख,पकिरा युसूफ शेख यांनी दोघांना अश्लिल शिवीगाळ केली त्याचा राग मनात ठेवून रात्री 11:30 वाजेच्या सुमारास युसूफ शेख पूर्ण नाव माहीत नाही,पकिरा युसूफ शेख,अमीर युसूफ शेख,शहारूख युसूफ शेख,हबीब शेख पूर्ण नाव माहीत नाही,
उमेर हबीब शेख,तैसीफ हबीब शेख, बाबूलाल शेख पूर्ण नाव माहीत नाही,
रिहान बाबूलाल शेख,असिफ बेग उर्फ बाबा काल्या असलम बेग,इब्रान शेख पूर्ण नाव माहीत नाही,हुसेन शेख पूर्ण नाव माहीत नाही,जाकीर हुसेन शेख,
इतेशाम शेख पूर्ण नाव माहीत नाही, इंद्रिस शेख पूर्ण नाव माहीत नाही अशांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून घराच्या कंपाउंड मध्ये प्रवेश करून घराच्या दरवाज्या बाहेरून शिवीगाळ केली तसेच घराचे दरवाजे, खिडक्यांवर दगडफेक करून काचा फोडून घराच्या कंपाऊंडचे तसेच लोखंडी गेटचे व घराबाहेरील कुलरचे,एसी.चे कॉप्रेसरचे तसेच घराला लागून असलेले स्वस्त धान्य दुकानाच्या शटरचे व खिडकीच्या काचा फोडून करून दहशत माजविला आहे म्हणून सौ.नंदा प्रकाश निकम यांनी दिनांक 29 मे 2020 रोजी 4:09 वाजेला स.फै.इरफान काझी दिलेल्या फिर्यादी नुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु.र.न.574/2020 भा.द.वि.कलम 143,147,148,504, 506,269,188,452,427 ,51(b),37(1),37(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास

म्हारळ गावात दुसरा कोरोना रुग्ण, ग्रामस्थांची चिंता वाढली !

म्हारळ गावात दुसरा कोरोना रुग्ण, ग्रामस्थांची चिंता वाढली!


कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या एम आय डिसी काॅलनीत कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला असून यामुळे म्हारळ गावातील ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाळा जवळ आल्याने वेळीच या बाबतीत कडक उपाययोजना न केल्यास येथील परिस्थिती भयावह होऊ शकते.
कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावदेवी मंदिर परिसरात एक पोलीस शिपाई कोरोना पाॅझिटिव आढळून आला होता. याच्या माध्यमातून कोरोनाने गावात शिरकाव केला आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले तर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोंनटाईन करण्यात आले आहे. या एकाच पेशंट मुळे ग्रामपंचायत हादरून गेली होती. कारण म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीत लोकसंख्येची घनता अधिक आहे. येथील लोक सोशलडिस्टींग पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सुदैवाने आतापर्यंत येथे कोरोनोचा शिरकाव झाला नव्हता. पण आता तो झाला आहे. यानंतर पुन्हा आज म्हारळ ग्रामपंचायतीचे जवळ असलेल्या एम आय डि सी मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आज यांचा ड्रायव्हर कोरोनाचा पाॅझिटिव आला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीची चिंता वाढली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे त्यामुळे हे वेळीच रोखले नाही तर मात्र भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून नांगरिकानी आता तर शहाणे होऊन प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था होईल.

लॉकडाऊन मुळे या वर्षी माणगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत !

लाॅकडाऊन मुळे या वर्षी माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत !
शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाची गरज


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे या वर्षी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर महाबीज निर्मित जया भाताचे बियाणे पेरणी साठी कोणाकडेच उपलब्ध नसल्याने या वर्षी आपल्या शेतात नेमके कोणते भाताचे बियाणे पेरावे या विचाराने माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
रायगड जिल्हाला भाताचे कोठार असे संबोधले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड आणि माणगांव इत्यादी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतात मोठ्या प्रमाणात जया भाताचे पीक घेतात. कारण रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेनुसार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या जिल्ह्यातील उपरोक्त सर्व तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. आणि ते पुढील तीन ते चार महिने शेतात तसेच साचून राहते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आपापल्या शेतात लवकर तयार होणारे म्हणजे हळवे भाताचे बियाणे न पेरता जरा उशिरा तयार होणारे म्हणजे गरवे भाताचे बियाणे अर्थात जया या वाणाची निवड करून ते पेरतात.
कारण जया या भाताला बाजारात विक्रीसाठी चांगला दर मिळतो. जया वगळता बाकी कोलम,रतना, आयरट,टायचण, सोना, कर्जत, इंद्रायणी इत्यादी सर्व प्रकारच्या भाताला बाजारात विक्री करताना अत्यल्प दर मिळतो. या शिवाय वरिल भाताचे पीक लवकर तयार होत असल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसामुळे वरील सर्व प्रकारची पीके कापण्यास विलंब होतो. आणि परिणामी लवकर तयार झालेले भात पावसामुळे वेळेवर कापायला न मिळाल्याने या भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाळ्या पुर्वी आपापल्या शेतात पेरणीसाठी जया या भाताची निवड करतात. परंतू सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट सेवेवर या चा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तमाम रायगड जिल्ह्यात या वर्षी सर्व कृषी सेवा केंद्रावर जयाचे भात बियाणे उपलब्ध नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आपल्या शेतात या वर्षी नेमके कोणते बियाणे पेरावे या विवंचनेने चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अशी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश देशमुख यांनी वाढदिवस लावला सत्कर्मी !

म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच निलेश देशमुख यांनी वाढदिवस लावला सत्कर्मी!



कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील युवा नेते निलेश शिवाजी देशमुख यांनी त्यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कामे करून साजरा केल्याने त्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत असून असेन इतरांनीही केले तर कोरोनावर सहज मात करता येईल असे जाणकारांना वाटते.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद निलेश देशमुख यांनी भूषविले असून त्यांचे वडील कै शिवाजी देशमुख हे देखील अनेक वर्षे म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्याच्या कडून मिळालेल्या समाजकार्याचे धडे त्यांचे पुत्र निलेश देशमुख हे गिरवीत असून रेशन कार्ड, विद्यूत जोडणी, पुर, किंवा काही अपघात प्रत्येक वेळी निलेश देशमुख मदतीसाठी तयार असत.
आता त्यांचा वाढदिवस, तो साजरा न करता त्या पैशातून गोरगरिबांना, विधवा, निराधार, गरजू लोकांना ५०० धान्याची पाॅकिट, देऊन सगळ्या परिसरात सॅनिटायझर ची फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करुन थांबले नाहीत तर आयुष मंत्रालय प्रमाणित आयुर्वेद औषध मंत्रालय प्रमाणित आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या वाटप करण्यात आले यामुळे प्रतिकार शक्ती वाढते असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असे देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लाॅकडाऊण च्या काळात वाढदिवसाच्या निमित्ताने निलेश देशमुख यांनी केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

Thursday 28 May 2020

स्वदेश फाउंडेशन तर्फे माणगाव, महाड आणि श्रीवर्धन रुग्णालया मध्ये १००० पीपीई किटचे वाटप.

स्वदेस फाऊंडेशन तर्फे माणगाव ,महाड आणि श्रीवर्धन रुग्णालया मध्ये १००० पीपीई किटचे वाटप.


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) स्वदेस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे कोरोना पासून बचाव कण्यासाठी १००० पीपीई किटचे वाटप नुकतेच करण्यात आले.
स्वदेशफाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार व वरिष्ठ समन्वयक नयन पोटले यांच्या हस्ते माणगाव उपजिल्हा रुग्णालया ला ४०० पीपीई किट तहसिलदार प्रियांका आयरे व डॉ. प्रदीप इंगोले यांना सुपूर्त करण्यात आले. महाड ग्रामीण रुग्णालय ला ३०० पीपीई किट तहसिलदार चंद्रसेन पवार व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जगताप यांना देण्यात आले.तर श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. सोनम, डॉ. अली, औषध निर्माता निलेश पवार यांच्या कडे माणगाव उपजिल्हा रुग्णालय ला ३०० पीपीई किट देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वदेस फाउंडेशन करीत असलेल्या कामाचे कौतुक करून स्वदेस फाउंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व स्वदेस टीमचे श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी व महाड तहसीलदार चंद्रसेन पवार व माणगाव तहसिलदार प्रियांका आयरे मॅडम यांनी विशेष आभार मानले.

Wednesday 27 May 2020

रमाई म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सावली. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. पददलितांच्या आई, रमाईंचे २७ में १९३५ रोजी निधन झाले. स्मृतीदिनानिमित्त रमाईंना विनम्र भावशब्दांजली....रविंद्रदादा जाधव

रमाई म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. पददलितांच्या आई, रमाईंचे ‎२७ मे ‎१९३५ रोजी‎ निधन झाले. स्मृतिदिनानिमित्त रमाईंना विनम्र भावशब्दांजली....- रविंद्रदादा जाधव 


नाशिक (प्रतिनिधी) -अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. उपस्थितीतांना मार्गदर्शनपर छोटेखानी भाषणात रविंद्रदादा जाधव म्हणाले की.....महामानव डॉ. बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी सोसलेल्या गरिबीच्या चटक्यांचा, प्रसंगी आपल्या ईच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही. रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब महार कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांना प्रेमाने रामी म्हणायच्या. रमा लहानपणापासूनच खूप समझदार, प्रेमळ आणि घरकामात खूप हुशार होत्या. बालपणीच त्यांचे आई-वडिल मरण पावले. लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली रमा तिच्या भावंडासोबत मामाकडे मुंबईला राहायला आली.



त्या काळामध्ये अगदी अल्पवयात लग्न व्हायची. रामजी सुभेदार यांनी भिवासाठी रमाची निवड केली. रमा अवघ्या नऊ वर्षांच्या असताना १९०७ मध्ये मुंबईतील भायखळा येथे त्यांचा भीमरावांशी विवाह झाला. रामी. बाबांची रामू, रामजी बाबांची लाडकी सून रमा झाली.
महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी अभिवादन प्रसंगी केले ते पुढे म्हणाले की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई किंवा पत्नी असू शकते. बाबासाहेबांना रमाईंची साथ नसती तर कदाचित भिवाचा भीमराव झाले नसते. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे. युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्र्यांच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी, सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.
बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही. रमाईची मुले औषधांविना मरण पावली. रमाईने अपार कष्ट केले. शेणाच्या गोवऱ्या थापल्या. त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी तसेच बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खर्च करीत. एक काडीपेटी महिनाभर चालवित. रमाईला शेजारच्या महिला दागिण्यांवरून चिडवित असत. तेंव्हा रमाई म्हणत, ‘माझा दागिणा म्हणजे माझं कुंकू. माझं सौभाग्य असे आहे की ज्याची ख्याती साऱ्या विश्वाला ठाऊक आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठेपणाचं असं नेमक्या शब्दात वर्णन करणाऱ्या रमाईंचं हृदय किती संवेदनशील असेल याची आपणास प्रचिती येते. त्यांच्यातील या सोशिक वृत्तीमुळेच बाबासाहेब आंबेडकर घडू शकलेत. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईंना नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा बाबासाहेबांनाच मिळालेला फेटा लुगडं म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी ही शोकांतिका. एक बॅरिस्टर आपल्या पत्नीला एक लुगडं घेऊन देऊ शकत नव्हते. त्याच बाबासाहेबांमुळे आज आपण चांगले वस्त्र अंगावर परिधान करीत आहोत.
रमाबाई खूप धार्मिक होत्या. रमाईंनी एकदा पंढरपूरला जाण्याचा हट्ट केला तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते तिथे जाण्यापेक्षा आपल्या उभयतांच्या पुण्याईने, स्वार्थत्यागाने, दलितांच्या सेवेने आपण दुसरे पंढरपूर निर्माण करू आणि आज आपल्या पुढे ते दीक्षाभूमीच्या रूपात नागपूरमध्ये मोठ्या अभिमानाने आणि डौलाने उभे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्या-वाचण्यास शिकल्या. त्यानंतर बाबासाहेबांच्या सोबतीने त्यासुद्धा समाजजागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजन करीत असत. त्यांच्या समोर भाषणे देऊन दलित चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांना प्रेरीत करीत असत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेण्यासाठी दूरदेशी असताना रमाई आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरिबीचे चटके सोसत संसार सांभाळला. अशा पददलितांच्या आई - रमाईंचे ‎२७ मे ‎१९३५ रोजी‎ वयाच्या ३७व्या वर्षी निधन झाले. माता रमाईंना आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली चा कार्यक्रम अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रविंद्रदादा जाधव यांनी भुषवले तर प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तर महाराष्ट्राचे नेते वसंतराव वाघ, ममता पुणेकर, जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण, जिल्हा सहचिटणिस मनिषा म्हसदे, जिल्हा उपाध्यक्ष मनिषा पवार, महेश जाधव, विनोद भोसले, प्रकाश कुमावत, वैशाली जाधव, मंगला बच्छाव, विशाल पाटील, कल्पना जगताप, आदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर अभिवादन सभेचे सुत्रसंचालन मनिषा म्हसदे यांनी केले शेवटी ममता पुणेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करुन छोटेखानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
----------
*... ✍️ महेंद्र तथा अण्णा पंडित.*
राज्य-सचिव, *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.*

विद्युत महामंडळाच्या खांबांना "गंजाचा" कोरोना सडलेले पोल बदलले नाहीत तर पावसाळ्यात वित्तीय व जिवीत हानी !

विद्यूत मंडळांच्या खांबाना 'गंजाचा' कोरोना सडलेले पोल बदलले नाही तर पावसाळ्यात जीवीत व वित्त हानी?


कल्याण (संजय कांबळे) 
वर्षानुवर्षे मागणीकरुनही गावोगावी सडलेले, गंजलेले पोल, जमिनीलगत लोंबकळत असलेल्या विद्यूत तारा, वायरच्या ओझ्याने वाकलेले पोल, कनेक्शन चा पुंजका असे चित्र ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात दिसत असून या खांबाना "कोरोना" झाला की असे उपहासात्मक बोलले जात आहे. यावर वेळीच उपचार (बदलले) केले /गेले नाही तर मात्र येत्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जिवीत किंवा वित्त हानी होऊ शकते हे सर्व यंत्रणांनी लक्षात घ्यायला हवे.



सध्या सर्वच शासकीय, निमशासकीय यंत्रणा कोरोनोच्या वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा यात गुंतला आहे. व ते गरजेचे देखील आहे. पण काही दिवसावर पावसाळा आला आहे. या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतात यामध्ये पुर, विज पडणे, विजेचे खांब कोसळणे, तारा तूटने, झाडे पडणे आदी आपत्ती येत असतात. आताचा विचार केला तर गावागावात विद्यूत मंडळांचे गंजलेले, सडलेले पोल हा गंभीर विषय समोर येत आहे.
विद्यूत मंडळाने कित्येक वर्षापुर्वी अगदी गाव, वाड्या वस्त्या, पाड्यात लाईट पोहचवली आहे. काही खांबाना ३०/४० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे ते जमीनीलगत सडलेले गंजलेले आहेत. तर काही पोल दाट लोकवस्ती असलेल्या भागात उदा म्हारळ, वरप कांबा मोहना, खडवली आदी ठिकाणी आहेत. एकाच पोलवरून हजारो कनेक्शन घेतल्याने तेथे वायरची जाळी तयार झाली आहे आहेत, अनेक ठिकाणी विद्यूत वाहक तारा जमिनी लगत लोंबकळत आहेत. यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. म्हारळ येथे अंगावर विजेची तार पडून नागरिकाचा जीव घेला होता, वाहोली येथे दोन आदीवाशींना शाॅक लागुन जीव गमवावा लागला होता. कांबा, उंबार्डे, सापाड बांधणेपाडा येथे शेतकऱ्यांचे बैल गाय, म्हैस शाॅक लागून मेले होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत.
सध्या सडलेले पोल, लोंबकळत असलेल्या विद्यूत तारा, वाकलेले खांब हे जिल्हय़ातील सर्व गावात कमी अधिक प्रमाणात आहेत शहापूर तालुक्यात११० ग्रामपंचायत आणि २३६ गावे आहेत, मुरबाड १२७ ग्रामपंचायती, कल्याण ४६ ग्रामपंचायती १२४ गावे, भिवंडी १२१ ग्रामपंचायती, आहेत या सर्व भागात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी याकडे विद्यूत मंडळांच्या अधिका-यानी लक्ष देऊन संभाव्य होणारी जिवीत व वित्तहानी रोखावी अशी मागणी ग्रामस्थांनमधून केली जात आहे.
या संदर्भात विद्यूत मंडळांच्या कल्याण ग्रामीण उभारणी विभागाचे उप कार्यकारी अभियंता डि डी धुवे यांना विचारले असता ते म्हणाले "हि बाब लक्षात घेऊन टिटवाळा, गोवेली खडवली, मोहना, मांडा या परिसरातील ४०/५० पोल बदलले, शिवाय कंन्टेसर, ट्रास्नफार नवीन टाकले, तारेवर येणारी झाडे तोडली, आदी कामे केली, तरिही आम्ही काळजी घेईन" 

गोदरेज हेअरडायने वयोवृध्दांना प्रदान केलेले चिरतारुण्य गेले लॉकडाऊन मुळे वयोवृध्दांचे खरे स्वरुप समोर आले !

गोदरेज हेअरडायने वयोवृद्धांना प्रदान केलेले चीर तारुण्य गेले आणि लाॅकडाऊन मुळे वयोवृद्धांचे खरे स्वरूप समोर आले !


         बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड ) विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या या अधुनिक युगात माणसाने सर्व क्षेत्रात प्रगती करून उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येकाची लाईफस्टाईल चेंज झाली आहे. बदलत्या युगा बरोबर माणसाने स्वतः मध्ये कालानुरूप बदल घडवून आणले. सद्याच्या या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनाचा मानवी शरीरावर आणि त्याच्या एकूणच जीवनशैलीवर परिणाम झालेला दिसून येतो आहे. या मध्ये प्रामुख्याने सांगायचे तर मानवी मनावरील मानसिक ताण तणाव, आहार, विहार, आर्थिक विवंचना आणि आयुरारोग्य इत्यादी कारणांमुळे मानवी जीवनात उद्भवणार्या शारीरिक समस्या या मध्ये अकाली केस गळणे, केस पांढरे होणे इत्यादी समस्यांना सद्या सर्वांना सामोरे जावे लागत आहे. 
      सद्याच्या परिस्थितीत मानवी जीवनातील मधील प्रमुख समस्या म्हणजे अकाली केस पिकणे म्हणजे केस पांढरे होणे या समस्येने सद्या सर्वांना ग्रासले आहे. या समस्येवर उपाय म्हणून सद्या बाजारात मिळणारी गोदरेज हेअरडाय या हेअरडाय च्या वापरामुळे समाजातील अनेक वयोवृद्धांना चीर तारुण्याचे वरदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे अलिकडे समाजातील वयोवृद्ध व्यक्ती निसर्ग नियमाच्या नियत वयोमानानुसार केस पांढरे होऊन वृद्ध झाल्याचे नैसर्गिक संकेत दिसून येत नाहीत. कारण ते न चुकता वारंवार आपल्या डोक्यावरील व दाढीचे पांढरे केस लपवण्यासाठी त्यांना सलून मध्ये जाऊन हेअरडाय करून घेतात त्यामुळे ते वयोवृद्ध असूनही नेहमीच चीर तरूण दिसतात. मात्र सध्या शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लाॅकडाऊन मुळे बाजारातील सर्व हेअर कटिंग सलून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व वयोवृद्धांचे चीर तारुण्य गेले आणि त्यांचे पांढरे केस आणि पांढर्या दाढ्यांच्या माध्यमातून निसर्ग नियमाने नैसर्गिक  खरे स्वरूप जगासमोर आले आहे.

Tuesday 26 May 2020

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' ला ५०१ फळांचा नैवेद्य

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' ला ५०१ फळांचा नैवेद्य


पुणे - ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब,आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी ५०१  फळांचा फळांचा नैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला.

याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे ‘श्रीं’ना फळे व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशयाग देखील झाला. फळे व फुलांच्या आकर्षक सजावटीसोबतच श्री गणेशाला फुलांचा पोशाख करण्यात आला.

त्यामध्ये मुकुट, अंगरखा, शुंडाभूषण यासह विविध अलंकार फुलांमध्ये साकारण्यात आले होते. 

भक्तांनी ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com, फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅप येथे श्रीं चे ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश‌ नाईक !!

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश नाईक !!


कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६ हा प्रभाग अनेक समस्यांनी त्रस्त प्रभाग आहे, इथे अनेक प्रश्न जे अजूनही जसेच्या तसे आहेत.  प्रभागात बराचसा भाग हा चाळी‌त रहाणारा आहे. यात प्रामुख्याने 1)वालधुनी नदी पुराची समस्या ही वालधुनी नदीतील सातत्याने गाळ काढल्यास किवा या नदीचे रुंदीकरण व खोली करणाचे काम केल्याने पुराची तीव्रता कमी होऊ शकते.हे काम ईतक्या वर्षात होऊ शकलेले नाही. 2) सखल भागाच्या पुनर्विकासाची समस्या हा दर निवडणूकीत मुद्दा म्हणुन वापरला जातो. त्याला चालना मिळालेली नाही. 3)मोठे शहाड (कोळीवाडा) मिलिंद नगर येथिल गावठाण प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. या दरम्यान सर्व प्रमुख पक्ष्यांचे सरकार येऊन गेले आहे. 4)या प्रभागात गेल्या 2 वर्षापासुन बांधुन तयार असलेले आरोग्य केंद्र अद्यापि सुरू होऊ शकले नाही. बाकी अनेक समस्यांचे मी वेळो वेळी पाठपुरावा केल्याने निराकरण झाले आहे. 


               या प्रभागात अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते असूनही प्रभागातील समस्यांचे निराकरण न‌ झाल्याचे दिसून आल्याने प्रभागातील एक उच्चशिक्षित तरुण आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव गणेश नाईक यांनी त्यांचे मार्गदर्शक परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सहकारी श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे, इ. यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक समस्यांना वाचा फोडून त्या वर काम केले. अशीच एक समस्या परिसरातील लाईट पोल विषयी प्रभागात असलेल्या लाईट पोलना २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या लाईट पोलांवर कमालीचा ताण आला आहे तर काही पोल धोकादायक सुध्दा झाले आहेत म्हणून संपूर्ण लाईन अंडरग्राऊंड करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे पाठपुरावा केला तसेच गणेश नाईक स्वत: आर्किटेक्ट असल्याने नकाशा सहित निवेदन दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन परिसरात काम सुरू झाले. या कामाला गती मिळून पुढील काळात हे काम पूर्ण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.                                 
आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सहसचिव गणेश नाईक, मार्गदर्शक, सहकारी सुनील उतेकर, श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे आभार मानले व भविष्यात प्रभागात प्रत्येक समस्येसाठी आधी होतो, आहोत तसेच पुढेही कार्यरत रहाणार असे जनतेला आश्र्वासन दिले.

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश‌ नाईक !!

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश नाईक !!


कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६ हा प्रभाग अनेक समस्यांनी त्रस्त प्रभाग आहे, इथे अनेक प्रश्न जे अजूनही जसेच्या तसे आहेत.  प्रभागात बराचसा भाग हा चाळी‌त रहाणारा आहे. यात प्रामुख्याने 1)वालधुनी नदी पुराची समस्या ही वालधुनी नदीतील सातत्याने गाळ काढल्यास किवा या नदीचे रुंदीकरण व खोली करणाचे काम केल्याने पुराची तीव्रता कमी होऊ शकते.हे काम ईतक्या वर्षात होऊ शकलेले नाही. 2) सखल भागाच्या पुनर्विकासाची समस्या हा दर निवडणूकीत मुद्दा म्हणुन वापरला जातो. त्याला चालना मिळालेली नाही. 3)मोठे शहाड (कोळीवाडा) मिलिंद नगर येथिल गावठाण प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. या दरम्यान सर्व प्रमुख पक्ष्यांचे सरकार येऊन गेले आहे. 4)या प्रभागात गेल्या 2 वर्षापासुन बांधुन तयार असलेले आरोग्य केंद्र अद्यापि सुरू होऊ शकले नाही. बाकी अनेक समस्यांचे मी वेळो वेळी पाठपुरावा केल्याने निराकरण झाले आहे. 


               या प्रभागात अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते असूनही प्रभागातील समस्यांचे निराकरण न‌ झाल्याचे दिसून आल्याने प्रभागातील एक उच्चशिक्षित तरुण आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव गणेश नाईक यांनी त्यांचे मार्गदर्शक परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सहकारी विनोद शिरवाडकर, श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे, इ. यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक समस्यांना वाचा फोडून त्या वर काम केले. अशीच एक समस्या परिसरातील लाईट पोल विषयी प्रभागात असलेल्या लाईट पोलना २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या लाईट पोलांवर कमालीचा ताण आला आहे तर काही पोल धोकादायक सुध्दा झाले आहेत म्हणून संपूर्ण लाईन अंडरग्राऊंड करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे पाठपुरावा केला तसेच गणेश नाईक स्वत: आर्किटेक्ट असल्याने नकाशा सहित निवेदन दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन परिसरात काम सुरू झाले. या कामाला गती मिळून पुढील काळात हे काम पूर्ण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.                                 
आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सहसचिव गणेश नाईक, मार्गदर्शक, सहकारी सुनील उतेकर, विनोद शिरवाडकर,श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे आभार मानले व भविष्यात प्रभागात प्रत्येक समस्येसाठी आधी होतो, आहोत तसेच पुढेही कार्यरत रहाणार असे जनतेला आश्र्वासन दिले.

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश‌ नाईक !!

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश नाईक !!



प्रतिनिधी, कल्याण
कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६ हा प्रभाग अनेक समस्यांनी त्रस्त प्रभाग आहे, इथे अनेक प्रश्न जे अजूनही जसेच्या तसे आहेत. या प्रभागात बराचसा भाग हा चाळी‌त रहाणारा आहे. 


या प्रभागात अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते असूनही प्रभागातील समस्यांचे निराकरण न‌ झाल्याचे दिसून आल्याने प्रभागातील एक उच्चशिक्षित तरुण आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव गणेश नाईक यांनी त्यांचे मार्गदर्शक परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सहकारी श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे, इ. यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक समस्यांना वाचा फोडून त्या वर काम केले. अशीच एक समस्या परिसरातील लाईट पोल विषयी प्रभागात असलेल्या लाईट पोलना २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या लाईट पोलांवर कमालीचा ताण आला आहे तर काही पोल धोकादायक सुध्दा झाले आहेत म्हणून संपूर्ण लाईन अंडरग्राऊंड करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे पाठपुरावा केला तसेच गणेश नाईक स्वत: आर्किटेक्ट असल्याने नकाशा सहित निवेदन दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन परिसरात काम सुरू झाले. 
आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सहसचिव गणेश नाईक, मार्गदर्शक, सहकारी सुनील उतेकर, श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे आभार मानले व भविष्यात प्रभागात प्रत्येक समस्येसाठी आधी होतो, आहोत तसेच पुढेही कार्यरत रहाणार असे जनतेला आश्र्वासन दिले.

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश‌ नाईक !!

समाजासाठी धडपडणारे युवा नेतृत्व आर्किटेक्ट गणेश नाईक !!



कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६ हा प्रभाग अनेक समस्यांनी त्रस्त प्रभाग आहे, इथे अनेक प्रश्न जे अजूनही जसेच्या तसे आहेत. या प्रभागात बराचसा भाग हा चाळी‌त रहाणारा आहे. 


या प्रभागात अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते असूनही प्रभागातील समस्यांचे निराकरण न‌ झाल्याचे दिसून आल्याने प्रभागातील एक उच्चशिक्षित तरुण आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव गणेश नाईक यांनी त्यांचे मार्गदर्शक परिसरातील जुने सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सहकारी श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे, इ. यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक समस्यांना वाचा फोडून त्या वर काम केले. अशीच एक समस्या परिसरातील लाईट पोल विषयी प्रभागात असलेल्या लाईट पोलना २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या लाईट पोलांवर कमालीचा ताण आला आहे तर काही पोल धोकादायक सुध्दा झाले आहेत म्हणून संपूर्ण लाईन अंडरग्राऊंड करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे पाठपुरावा केला तसेच गणेश नाईक स्वत: आर्किटेक्ट असल्याने नकाशा सहित निवेदन दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन परिसरात काम सुरू झाले. 
आर्किटेक्ट, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सहसचिव गणेश नाईक, मार्गदर्शक, सहकारी सुनील उतेकर, श्रीकांत प्रभू, सतिश मोरे, दिलीप दादा गायकवाड, पंकज डोईफोडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे आभार मानले व भविष्यात प्रभागात प्रत्येक समस्येसाठी आधी होतो, आहोत तसेच पुढेही कार्यरत रहाणार असे जनतेला आश्र्वासन दिले

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि परिक्षेचे राजकारण !!!

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि परीक्षेचे राजकारण !!!



महेंद्र (अण्णा) पंडित, मुंबई
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने भारताला आणि महाराष्ट्राला ही सोडले नाही , कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 4 वेळा लॉकडाउन वाढवल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था , विद्यापीठे बंद करण्यात आले. ज्याचा फटका सर्व सामान्य जनतेला व विद्यार्थ्यांना बसला. ज्यात अनेक लहान व मोठ्या मुलांचे समावेश होतो. ज्यात हे विद्यार्थी मुंबई किंवा महाराष्ट्रातील विविध भागात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.अशातच राज्यभर परीक्षा कधी होणार अशी चर्चा सुरू झाली. कारण शाळा आणि महाविद्यालये केव्हा सुरू होणार असा प्रश्न पालकांना व विद्यार्थ्यांना पडला होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जाणार ? परीक्षा घेण्याचे स्वरूप काय असेल? याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना फटका तर बसणार नाही ?  असे एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. म्हणून शैक्षणिक संस्था सुरू झाल्या तर लाखों मुलांच्या परीक्षेबाबत कशाप्रकारे व्यवस्थापन व नियोजन करायचे याबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि युनियन ग्रांट कमिशन (UGC) यांच्यात चर्चा व बैठका सुरु झाल्या. त्याच वेळी देशात आणि महाराष्ट्रात विध्यार्थी,पालक आणि शैक्षणिक संस्था या सुद्धा गोंधळाच्या परिस्थितीत होते व त्याचा सामना करत आहेत. कारण परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे ठोस पावले तोपर्यंत उचलली गेली नव्हती, म्हणून पालक व विद्यार्थी वर्गांसह महाराष्ट्रातील जनता चिंतेत व ताणतणाव खाली होते. 
म्हणूनच युनियन ग्रांट कमिशन (UGC) ने देशभरातील विद्यापीठांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केले. त्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने परीक्षा घेण्यासंदर्भात  समिती स्थापन करत राज्यपाल नियुक्त कुलगुरूंच्या राज्य समितीचे प्रमुख म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री.सुहास पेडणेकर , तसेच राज्य समिती सदस्य कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री. देवानंद शिंदे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री.नितीन करमळकर आणि SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती.शशिकला वंजारी यांचा समावेश करण्यात आला होता. जेणेकरून ही राज्य समिती परीक्षा घेण्याबाबतचे धोरण, उपाय योजना आणि त्याचे व्यवस्थापन कसे असेल?याबद्दलचा अभ्यास करून राज्य शासनास अहवाल सादर केला. त्याच दरम्यान *महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन* आणि राज्यातील अनेक विविध विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून उच्च तंत्र शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारला निवेदनाद्वारे, मेलद्वारे आणि काहींनी शिक्षणमंत्री यांच्याशी फोनवर चर्चा करून सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कारण राज्यभर आपात्कालीन व भीषण परिस्थिती असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नये म्हणून  राज्य सरकारवर दबाव वाढत होता. कारण राज्य समितीचे अहवाल आल्याशिवाय सरकार कोणतेही पावलं उचलणार नव्हते आणि एप्रिल महिन्यात राज्य समितीचे अहवाल प्राप्त झाल्यावर उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून परीक्षेबाबत पुढील प्रमाणे धोरणात्मक निर्णय जाहीर केले. यामध्ये त्यांनी अंतिम वर्षाचे अंतिम सेमिस्टर (सत्र ) परीक्षा सोडून इतर सर्व परिक्षाला ग्रेड देऊन पास करणार. , 50% सरासरी गुणांच्या आधारे ग्रेडिंग देण्यात येईल,ज्या विद्यार्थ्यांना वाटते आपल्याला कमी गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा असेल, ग्रेडेशन मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविणार परंतु जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल.ज्या विद्यार्थ्यांना ATKT लागली असेल त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर 120 दिवसात त्यांची परीक्षा घेण्यात येईल., UGG नियमाप्रमाणे अंतिम वर्ष व अंतिम सत्राची परीक्षा 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात येईल., उन्हाळी सुट्टी बाबत निर्णय संबंधित विद्यापीठे UGC नियमाप्रमाणे घेतील., UG/PG/Diploma चे प्रॅक्टिकल परीक्षाबाबत ऑनलाईन जर्नल द्वारे घेण्यात येईल., UG आणि PG च्या कॉमन इन्ट्रन्स टेस्ट ( CET ) बाबत निर्णय येत्या 8 दिवसात घेण्यात येईल., लॉकडाउनचे 45 दिवस हे हजेरी म्हणून ग्राह धरण्यात येतील आणि जरी हे दिवस पकडून काही मुलांचे हजेरी पूर्ण झाली नाही तर संबंधित विद्यापीठाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी सूचना देण्यात आली. येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचे परीक्षेबाबत प्रश्न सोडवण्यासाठी सेल स्थापन करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना देण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक दिलासा आणि सर्व शंकेचे निरसन करण्यासाठी समुपदेशन केंद्र जिल्ह्याप्रमाणे चालू करण्याचे सांगितले आहे. स्वायत्त विद्यापीठांनी UGC शी नियमाप्रमाणे राज्य शासनाच्या वेळापत्रक प्रमाणे सुसंगत निर्णय घ्यावा., डिप्लोमा कोर्सेसच्या 6th सेमिस्टर परीक्षा घेण्यात येणार आहे., ग्रीनझोन मध्ये असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने स्वतःचे परीक्षा वेळापत्रक तयार करून परीक्षा घ्यावे., 15 ऑगस्ट पर्यंत सर्व परीक्षेचे निकाल जाहीर होतील.आणि 1 सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू हॊणार अशी भूमिका घेत शिक्षणमंत्री यांनी ऑनलाईन संवादाद्वारा घेतलेल्या कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली.
परंतु असे असताना राज्यातील लाखों विद्यार्थी आणि पालक हे प्रचंड ताणतणाव खाली व चिंतेत होते व परीक्षा देण्याबाबत मानसिकरीत्या तयार नाहीत असे चित्र आहे. कारण जर परीक्षा देताना मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण असेल व मुलांचा जीव धोक्यात का घालायचे अशी भीती पालकांना सतावत आहे , मग आता प्रश्न असा निर्माण होतो की, जर उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी हीत केंद्रित ठेवून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्याचा काम केले आहे व राज्य समितीच्या अहवालाचा दाखला घेत त्यांनी निर्णय जाहीर केले असल्याने त्यावर आता राजकारण करण्याची काय आवश्यकता आहे ? कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की, जर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग राज्यभरात वाढत गेला आणि राज्यात Covid-19 च्या परिस्थितीत काही बदल न झाल्यास 20 जूनला राज्य समिती अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल अशी भूमिका घेतली होती. 
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, काय आपल्याकडे परीक्षा घेण्याबाबत तेव्हढी सक्षम यंत्रणा आहे ? अध्यापक वर्ग आणि महाविद्यालयीन कर्मचारी काम करण्यास तयार होतील ? याचे व्यवस्थापन व नियोजन कसे केले जाईल हे अजून प्रश्न अनुत्तरीत आहेत. असे असताना राज्यपाल , विरोधक आणि काही शिक्षण क्षेत्रातील मान्यवर लोक परीक्षा घेतली पाहिजे अशी भूमिका का घेत आहेत. यात जी मंडळी परीक्षा घेण्याबाबत आग्रही भूमिका घेत आहेत त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का? अशी शंका उपस्थित होते. कारण आपण लाखों विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून त्यांना वेठीस कसे धरणार? याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसेल व कोरोना बाधितांची संख्या वाढत असेल तर अशा वेळी परिस्थितीत पूर्ण नियंत्रणात आल्यावर परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य सरकारने केले पाहिजे व यावर जे कोणी राजकारण करत असेल तर त्यांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन राजकारण थांबवले पाहिजे. 

आपला ,
सुनील शिरीषकर 
पीएचडी संशोधक (टिस मुंबई)
महासचिव (महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन)
M - 8097585304

महाआघाडीतील विसंवाद यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा विजय होणार मोठ्या मताधिक्याने !! कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, ...