Thursday 30 April 2020

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेकडून गोरगरिबांना मदतीचा ओघ सुरूच

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेकडून गोरगरिबांना मदतीचा ओघ सुरूच 
कल्याण, सचिन भोईर
कोरोना या विषाणूने थैमान घातल्याने सरकारने २४ मार्च पासून संचारबंदी लागू केली आहे त्याला आज गुरुवार ३०/०४/२०२० एक महिन्याच्या वर कालावधी झाला आहे, त्यामुळे बेरोजगार झालेले तसेच हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेवर, नागरिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे अशी परिस्थिती संपूर्ण देशात निर्माण झाली असून अशा वेळी मुंबई जवळील एक औद्योगिक शहर कल्याण येथील मिलिंद नगर, प्रभाग क्रमांक १६ या परिसरातील दानशूर व्यक्तिमत्व  कामगार नेते, नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, व सामाजिक उपक्रमातील सहकारी  सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सुरेंद्र आढाव, आर्किटेक्ट गणेश नाईक, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, संजय भोईर, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, गणेश पाटील, रवी भोईर, संदिप मोरे, उन्मय पाटील, ललिता पाटील, स्वाती पाटील यांनी परिसरातील, प्रभागातील (मिलिंद नगर, भवानी नगर, त्रिमूर्ती कॉलनी, इ.) नागरिकांना दानशूर व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलेल्या प्रमाणे या अडचणीच्या दिवसात कोणीही उपाशी राहू नये यासाठी स्वतः ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण प्रभागात जातीने लक्ष घालून अन्नदान केले.
विशेष म्हणजे आज कोळी समाजाचे अध्यक्ष देवानंद भोईर यांनी स्वतः उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले व सांगितले आमच्या समाजातील एक बांधव गोरगरीब व गरजवंत नागरिकांसाठी जे काही करतोय त्याचा मला व आमच्या समाजाला अभिमान आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...