Friday 31 July 2020

ठाणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच सर्व सामान्यांच्या मदतीकरिता अग्रेसर !!

ठाणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच सर्व सामान्यांच्या मदतीकरिता अग्रेसर !!


सध्या उल्हासनगरात वाढती रुग्ण संख्या तसेच ह्या आजाराविषयी मनात असलेली भिती व प्रशासनाकडून मिळत नसलेले योग्य मार्गदर्शन यामुळे सर्व सामान्य नागरिकांची परवड सुरूच आहे.
योग्य उपचाराकरिता उल्हासनगर महापालिकेतील अपुरी व्यवस्था यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, ठाणे जिल्हा वेळोवेळी आवाज उचलीत आहे अर्जांच्या माध्यमातून आयुक्तांना वेळोवेळी जाणीव करून दिली, तसेच कुठे रुग्णांवर अन्यायकारक बिल लावले तिथे जाऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून त्याला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत व करत आहेत.
असेच उल्हासनगर शहरातील एक रहिवासी सुनील बळीराम घोरपडे सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये औषध उपचारासाठी दाखल झाले सुरवातीला त्यांच्या कडून १०,०००/- रुपये अनामत रक्कम म्हणून घेतले व त्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत दाखल करून घेतले व त्यांना २२ जुलै २०२० रोजी ६७,०००/- बिल देऊन डिस्चार्ज देण्यात आला पण त्यांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांच्या कडे ती रक्कम भरण्यास पैसे नसल्याने त्यांना  वाढीव दोन दिवस ठेवून घेतले तर यांनी उधारी करून आणखी १०,०००/- रुपये भरले त्यावेळी त्यांना डिस्चार्ज दिला, पण रुग्ण सुनील बळीराम घोरपडे महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत दाखल असल्याने त्यांनी अन्याय विरुद्ध लढणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांच्या कडे आपली तक्रार नोंदवून जे वीस हजार सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटलने अन्याय कारक रित्या घेतले ते परत करावेत अशी मागणी केली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील व सचिव सुनील शिरीषकर यांनी याची दखल घेत आयुक्तांना पत्र देत सुनील बळीराम घोरपडे यांचे पैसे परत देऊन सदर हॉस्पिटल वर कारवाई करावी असे नमूद केले आहे.
सुनील बळीराम घोरपडे यांनी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...