कोरोनाशी एकाकी झुंज देणाऱ्या मुरबाडकरानां आणखी नवे एक संकट नको - चेतनसिंह पवार
मुरबाड (मंगल डोंगरे) : संपूर्ण जग हादरुन सोडणा-या कोरोनाशी मुरबाडकर एक झुंज देत असताना, कल्याण -नगर या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणा-या अपघातात झालेली वाढ पाहता,काँंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी कोरोना नंतर पुन्हा मुरबाड करांवर नवीन संकट नको म्हणून
गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, ठाणे यांना ईमेल तसेच दुरध्वनी व्दारे कल्याण-अहमदनगर महामार्गावरील (मुरबाड ते उमरोली पि.) रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याबाबतचे निवेदन काॅंग्रेस पक्षाचे वतीने देण्यात आले. यावेळी आपल्या आखत्यारीत येत असलेल्या कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील (मुरबाड ते उमरोली पि.) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी स्वार अथवा मोठ्या वाहनाचे देखील गंभीर स्वरुपाचे अपघात होवुन जिवित हानी तसेच तालुक्यांतील नागरिकांची आर्थिक हानी होवु शकते. कोरोनाच्या ह्या महाभयंकर रोगाशी नागरिक एकाकी झुंज देत असताना अजुन आपल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडुन एखाद्या संकटाचे निमंत्रण मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी नको. असे प्रतिपादन यावेळी चेतनसिंह पवार यांनी केले . व आपण सदरच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे विनंती केली.
No comments:
Post a Comment