Saturday 24 October 2020

टेंभी बोईसर येथे अवधूत पंडित यांच्या निवासस्थानी पहिला नवचंडी यज्ञ संपन्न !!

टेंभी बोईसर येथे अवधूत पंडित यांच्या निवासस्थानी पहिला नवचंडी यज्ञ संपन्न !!


मुंबई (उत्कर्ष  शांत्ताराम गुडेकर) :
                 अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते. दुर्गामातेचे सातवे स्वरूप श्रीशक्ती-सिध्दकालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.

              टेंभी बोईसर येथे श्री.अवधूत पंडित यांच्या  घरी माता महालक्ष्मी च्या समोर AVEER ENTERTAINMENT PRIVATE LIMITED कंपनीचा पहिला नवचंडी यज्ञ संपन्न झाला. सकाळी साडे अकरा वाजता यज्ञास प्रारंभ झाला श्री.पंढरीनाथ मंडलिक गुरुजी मुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी करण्यांत आले. प्रथम परिसरातील सर्व देवतांना आमंत्रण देण्यांत आले. यजमनाना  पंचगव्य देऊन यजञोपवीत देण्यात आले. नंतर स्वस्ति वाच करून सर्व देवतांचे नामस्मरण करून कार्यक्रमाचा संकल्प करण्यांत आला त्यानंतर गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर पुण्याहवाचन करून देवाकडे कार्य सिद्दी चे मागणे मागण्यात आले. पुढे मातृका  पूजन म्हणजे शक्ती पूजन करण्यात आले त्यानंतर नांदी श्राध्द करून कार्य सिद्धी साठी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे पूजन व आशीर्वाद घेऊन आचार्यवरण करण्यांत आले नंतर सर्वतोभद्र मंडळ स्थापन करून ६२ देवतांचे पूजन करून ब्रम्ह्याची स्थापना करण्यात आली. महालक्ष्मीचे पूजन करून दोन्ही देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, शोडोष उपचाराने पूजन करण्यात आले त्यानंतर अग्नी स्थापन करून हवनास प्रारंभ झाला प्रथम पारंपरिक पद्धतीने सर्व उपचार करून गणेशाच्या अथर्वशीर्ष पठणाने आहुत्या देण्यांत आल्या त्यानंतर नवग्रह ब्रम्हा ह्यांच्या  आहूत्या मृत्युंजयाच्या आहुत्या देण्यांत आल्या नंतर मुख्य चंडी यज्ञास सुरवात करण्यांत आली त्यामध्ये पायस, पुरण, बेल पत्र, दुर्वा तसेच हवनिय द्रव्य यांच्या एक हजार आहूत्या देण्यात आल्या. नंतर परत महालक्ष्मी मातेच्या एकशे आठ आहुत्या देण्यात आल्या नंतर पूर्णाहुती मध्ये साडी चोळी नारळ फळ नैवेद्य व इतर पदार्थांचा समावेश करून पूर्णाहुती करण्यांत आली, पुढे आरती तीर्थ प्रसाद ग्रहण करून पांच ब्राम्हणांना ब्रम्ह भोज देण्यात आले तद्नंतर यजमान आणि पाहुणे मंडळींचा भोजनाचा कार्यक्रम पार पडला ब्रम्हवृंनदाना यथोचित दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले उपस्थित पाहुण्यांचा श्रीफळ चूनरी देऊन योग्य सत्कार केला तसेच उत्तर पूजन  करून अग्नीचे विसर्जन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास पत्रकार समीर खाडिलकर (नाट्य- सिने निर्माता, सदस्य- महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र  शासन), विकासक संदिप परब, शांत्ताराम गुडेकर, शरद पंडित(वडिल), विपुल पडित(भाऊ) आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...