४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा.......
"मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी"
मुंबई : करोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंर्त्यांनी केंद्राकडे केली.
महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची मागणी उद्धव ठाकरे यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. राज्यातील करोनाची साथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, आणखी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. राज्यात दररोज तीन लाख जणांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे. अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रातही अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय पथकांनी वेळोवेळी दिलेले सल्ले व मार्गदर्शनाप्रमाणे राज्य करोनाची लढाई लढत आहे.
मधल्या काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती.
No comments:
Post a Comment