राज्यात रुग्णसंख्येत घट ! परिस्थितीत सुथारणा !! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ % !!!
मुंबई : महाराष्ट्रात आज ४२,३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ % एवढे झाले आहे.
आज राज्यात २२,१२२ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ३६१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,०१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,२७,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
No comments:
Post a Comment