Tuesday 29 June 2021

राज्यात रिकव्हरी रेट पोहचला ९६ टक्क्यांवर ! तर दिवसभरात २३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

राज्यात रिकव्हरी रेट पोहचला ९६ टक्क्यांवर ! तर दिवसभरात २३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !



मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात एकूण 8 हजार 085 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण 8 हजार 623 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 21 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (मृत्यूदर) 2.01 टक्के आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 58 लाख 09 हजार 548 इतकी झाली आहे.

राज्यात सध्या 1 लाख 17 हजार 098 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 60 लाख 51 हजार 633 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 06 लाख 21 हजार 377 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...