Wednesday, 29 September 2021

परम संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी आपल्या 75 व्या जन्मोत्सवा निमित्त संपूर्ण मानव जातीला, "अंतरी जागृत राहा, संपर्कात राहा, काळजी घ्या" हा संदेश दिला.



परम संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी आपल्या 75 व्या जन्मोत्सवा निमित्त संपूर्ण मानव जातीला, "अंतरी जागृत राहा, संपर्कात राहा, काळजी घ्या" हा संदेश दिला. !!

सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष परम संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या हीरक जयंती चा समारंभ अध्यात्म, दिव्य प्रेम आणि असीम कृपेच्या वर्षावाचा उत्सव होता, जो की 20 सप्टेंबर 2021 ला साजरा केला गेला. अध्यात्मिक गुरु तसेच ध्यानाभ्यास विषयावर आधारित पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक संत राजिदंर  सिंह जी  महाराज म्हणतात की,  आज या गोष्टीची आवश्यकता आहे की आपण आपल्या वास्तविक रूपाला म्हणजेच आत्मिक रूपास जाणावे आणि आपल्या अंतरी प्रभूशी जोडले जावे. आपले हे विचार त्यांनी तीन दिवसीय विशेष ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले, ज्यास विश्वभरातील लाखो लोक पाहात होते.
या शुभ प्रसंगी समस्त मानवतेला संत राजिदंर सिंह जी महाराजांनी आपला सर्वव्यापी आणि उभार देणारा संदेश, " अंतरी जागृत रहा, संपर्कात रहा आणि काळजी घ्या" असा दिला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की ध्यान-अभ्यासाद्वारे आपण स्वतःला आत्मिक स्वरूपात अनुभवतो, जो की चेतन आहे आणि प्रभूचा अंश आहे. जेव्हा आपण एकदा याची अनुभूती घेतो की आपण एक आत्मा आहोत, तेव्हा आपली इच्छा होते की आपण प्रभु चे प्रेम आणि प्रकाशाशी जोडले जावे. जेव्हा आपण एकदा प्रभूशी अंतरी जोडले जातो, त्यानंतर आपणास असा अनुभव होतो की प्रभु केवळ माझ्यातच नव्हे तर बाकी सर्व जीवांमध्ये सुद्धा आहे. तेव्हा, आपण प्रेमपूर्वक प्रत्येकाची काळजी घ्यावयास लागतो. चला तर! आपण सर्व प्रभूच्या मार्गाचे  अनुसरण करण्याचा  प्रयत्न करूया, जो आपणास परत प्रभूशी एकरूप करेल. संत राजिंदर सिंह जी महाराजांनी आपला हा विश्व कल्याणकारी लाईव्ह संदेश नेपरविले, अमेरिकेहून युट्युब वर दिला.
संत राजिंदर  सिंह जी महाराज आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अध्यात्मिक गुरु आहेत. ते संपूर्ण विश्वभरात ध्यानाभ्यासाद्वारे आंतरिक आणि बाह्य शांती आणण्याकरिता  प्रयत्नशील असतात. आजच्या आधुनिक युगामध्ये संत राजिंदर सिंह जी  महाराजांना 30 पेक्षा अधिक वर्षांपासून संपूर्ण विश्वात शांती, प्रेम आणि मानव एकतेचे संदेश प्रसारक म्हणून ओळखले जाते.  
एक वैज्ञानिक असल्याने संत राजिंदर सिंह जी महाराजांनी विज्ञान आणि त्याच्या निष्कर्षांच्या उदाहरणातून अध्यात्मिक शिकवणूक समजावितात. म्हणून संपूर्ण विश्व आज याचा स्वीकार करत आहे की कशाप्रकारे विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

संत राजिंदर सिंह जी महाराजांचे संपूर्ण जीवन आणि कार्य प्रेम आणि निष्काम सेवेची निरंतर चालणारी एक यात्रा आहे. आणि जगभरातील लाखो लोकांच्या मानवी जीवनातील खऱ्या उद्देशाला प्राप्त करण्यास मदत करते. ते सर्व समाज आणि धर्मातील लोकांना ध्याना -भ्यासाची विधी शिकवून पिता परमेश्वराची अनुभूती करवितात. याचं करिता त्यांचा पावन संदेश विश्वभरातील लोकांमध्ये आशा, प्रेम, मानव एकता आणि निष्काम सेवे च्या प्रति जागृती निर्माण करतो. ते ध्यानअभ्यास विषयावरील लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचे विश्व प्रसिद्ध लेखक सुद्धा आहेत. याकरिता त्यांना विविध देशांद्वारे अनेक शांती पुरस्कारांबरोबरच 5 डॉक्टरेट च्या मानत पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

सावन कृपाल रूहानी मिशनची आज संपूर्ण विश्वभरात 3,200 पेक्षा अधिक केंद्र स्थापित आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्वभरातील 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. याचे मुख्यालय विजय नगर, दिल्लीमध्ये आहे तसेच आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिकेत स्थित आहे.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...