Tuesday 30 November 2021

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य करणारे रघुनाथ पांडुरंग वीर सेवानिवृत्त !! "डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केला सपत्निक सत्कार"

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य करणारे रघुनाथ पांडुरंग वीर सेवानिवृत्त !! "डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केला सपत्निक सत्कार"


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या तीस वर्षाच्या सेवाकाळात १३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन अतिरिक्त मुख्य कार्यकारी, एक मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या शासकीय वाहनांवर सारथ्य केलेले जिल्हा परिषदेचे वाहन चालक रघुनाथ पांडुरंग वीर मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी त्यांच्या कामाचा गौरव करत सहपत्नीक त्यांचा सन्मान केला आणि निवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्याला शुभेच्छा दिल्या. 

उस्मानाबाद जिल्हातील परांडे तालुक्यातील कुम्बेजा हे त्यांचे गाव. ७८ च्या दुष्काळात त्यांचे वडील ठाण्यात आले आणि वीर कुटुंबीय ठाण्यात स्थायिक झाले. सुरुवातीला श्री. वीर खाजगी वाहन चालवीत असत. त्यावरच त्यांचे उदरनिर्वाह सुरु होते. १९९१ च्या भरतीत ते शासकीय सेवेत वाहन चालक पदावर रुजू झाले. वाहन चालक म्हणून काम करताना सर्वात प्रथम त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवले येथे काम केले. त्यानंतर १९९८ पर्यंत मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य केले. त्यानंतर ते आजतागायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य करत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख पद आहे. अशा जबाबदार पदाच्या व्यक्तीकडे काम करताना शिष्टाचार महत्त्वाचा असतो. गेल्या तीस वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी या शिष्टाचाराचे काटेकोर पालन केले. त्यामुळे प्रत्येक सी.ई.ओ नी त्यांच्या कामाचे कौतुक केले. सगळ्यांशी सलोख्याने वागणे आणि कामातील नम्रतेमुळे त्यांच्या कौटुंबिक अडचणीमध्ये अनेक सी.ई.ओ नी त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. 


तब्बल तीस वर्षाची सेवा बजावत असताना अनेक सुख-दु:खाचे क्षण आल्याचे  वीर सांगतात. आम्ही वाहन चालक म्हणजे कामाची नियोजित वेळ नसणे, वेळेचे बंधन नसणे असा आमचा पेशा. त्यामुळे कुटुंबाला वेळ देताना तारेवरची कसरत असायची पण माझ्या सुविद्य पत्नी मीरा वीर हिने मला नेहमीच पाठबळ दिल्याची भावना. वीर व्यक्त करताना ते भावूक झाले होते.

त्यांच्या या सेवानिवृत्ती बद्दल व पुढील काळात सुख समाधान लाभावे म्हणून कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, मुरबाड पंचायत समितीचे रमेश अवचार यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...