Wednesday 29 December 2021

ठाणे जिल्ह्यातील गरजू कष्टकरी महिलांना केंद्र - राज्य शासनाच्या योजनेच्या मार्फत बनविणार उद्योजक - 'डॉ. आदर्श भालेराव'

ठाणे जिल्ह्यातील गरजू कष्टकरी महिलांना केंद्र - राज्य शासनाच्या योजनेच्या मार्फत बनविणार उद्योजक - 'डॉ. आदर्श भालेराव'


कल्याण, बातमीदार : दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत.जीवनात प्रगती करण्याचे शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. महिलांची प्रगती आणि सक्षमीकरणासाठी (Mahila Sashaktikaran) शिक्षणापेक्षा जास्त परिणामकारक काय असू शकते? आर्ट ऑफ लिविंगने शिक्षणाद्वारे देशातील काना कोपऱ्यातील ग्रामीण मुली आणि महिलांना समान दर्जाने सक्षम बनवले आहे. 

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमामुळे देश विदेशातील महिलांना आर्थिक स्वतंत्र बनवले आहे, ज्यामुळे त्या सामाजिक अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. या महिला सकारात्मक परिवर्तनाचे प्रतिनिधी बनून इतर महिलांना शिक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःची ओळख प्राप्त करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. 

पण तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. 

सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबित्व यातून स्त्रियांची सुटका व्हायची असेल तर गरज आहे महिला सक्षमीकरणाची (सबलीकरण / सशक्तीकरण). प्रथम ‘आपण सक्षम आहोत’ याची खात्री स्त्रियांनी बाळगणे गरजेचे आहे. आपण स्त्री आहोत या आत्मग्लानीमध्ये कधीही राहू नका. जेंव्हा तुम्ही आत्मग्लानीमध्ये येता तेंव्हा ऊर्जा, उत्साह आणि सामर्थ्य गमावता. अध्यात्मिक मार्ग एकमेव मार्ग आहे जेथे तुम्ही आत्मग्लानी आणि अपराधीपणावर मात करू शकता. आत्मग्लानी आणि अपराधी भावना, दोन्ही मध्ये तुम्ही आपल्या मनाचा छोटेपणा अनुभवता - ज्यामुळे तुम्ही आपल्या आत्म्यापासून दूर जाता. स्वतःला दोष देणे बंद करून आपली स्तुती - कौतुक करणे सुरू करा. ‘स्तुती करणे दैवी गुण आहे, होय नां? मी स्त्री आहे, अबला आहे, असा विचार सुद्धा करू नका. या आंतरिक असमानातेमुळे काहीही घडणार नाही. उभे रहा, तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी गरजेचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. नक्कीच समाजामध्ये बदल घडायलाच हवा. परंतु आत्मग्लानीमध्ये राहून तुम्ही हा बदल करू शकत नाही.” 

जर  समाज्यात बदल घडवायचं असेल तर महिला सबलीकरण / सशक्तीकरण | Women Empowerment  होण अत्यन्त गरजेचं आहे. 

महिलांना औद्योगिक क्षेत्रातील मशनरीचे ट्रेनिंग आणि रोजगार निर्माण करण्यासाठी प्रहार  Social Problems Anti-Injustice Legal Guidance Center कल्याण च्या माध्यमाने  महिला रोजगार मार्गदर्शन अभियान 2022 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती  संचालक 'डॉ. आदर्श भालेराव' यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ज्या तरुण तरुणी व गरजू कष्टकरी महिला बचत गट महिला यांना  उद्योग क्षेत्रात आपल पाऊल टाकून उद्योगाची शुरुवात करण्याची इच्छा आहे अश्या इच्छुकानी प्रहार Social Problems Anti-Injustice Legal Guidance Center च्या माध्यमाने  महिला रोजगार मार्गदर्शन अभियान 2022  सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावे अशी माहिती देण्यात आली.

प्रत्येक महिलेत सुप्तगुण असतात. त्या सुप्तगुणांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असते. स्वयंपूर्णा संस्थेच्या वतीने अशा महिलांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विचाराने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,

महिलांनी उद्योजिका होताना शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी महिलांनी ऑनलाइन उद्योग आधार काढण्याची गरज आहे. उद्योग सुरू केल्यानंतर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे 

कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार आहे. परंतु कर्ज घेताना उद्योजिकांनी आत्मविश्वासाने स्व:तचे विश्लेषण करीत तुम्ही काय करू शकता, हे पटवून देण्याची गरज आहे. 

गरीब गरजू महिलांना मानसिक आधार देऊन स्वयंपूर्ण होण्यासाठी बचत गटांच्या विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्याना आवडीचा व्यवसाय निवडता येईल व्यवसाय साठी भांडवल उभे करण्यासाठी  केंद्र - राज्य शासनाच्या अनेक योजनेचा योग्य लाभ कोणत्या प्रकारे घेता येईल  योग्य मार्गदर्शन  करण्यात येणार अशी माहिती 'डॉ. आदर्श भालेराव' यांनी दिली. 

ठाणे, कल्याण भिवंडी डोंबिवली टिटवाळा बदलापूर शहापूर मुंब्रा, मुरबाड, अंबरनाथ शहरात महिलांची बेरोजगारी संख्या वाढती आहे. शहरातील कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे जॉब महिलांना देण्यासाठी तसेच महिलांना उद्योग क्षेत्रातील मशनरी बाबत तंत्रज्ञान देऊन कामाच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी रोजगार मार्गदर्शन अभियान 2022 आयोजित करण्यात येणार  आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील महिला, तरुण-तरुणींना रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व्हाट्सएप नंबर कल्याण "9892715554" या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...