Wednesday 29 June 2022

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन !

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन !


बुलडाणा, बातमीदार, बातमीदार दि.29 : भारतीय कल्याण परिषदेमार्फत दरवर्षी 6 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना कठीण प्रसंगात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. सदर अर्ज हा ICCW या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज डाऊनलोड करून 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे सादर करावा.

 अर्जासोबत अर्जदार ज्या शाळेमध्ये शिकत आहे. त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा पंचायत/जिल्हा परिषद प्रमुख, राज्य बालकल्याण परिषदेचे अध्यक्ष किंवा सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समकक्ष पदाचे सरकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा समकक्ष पदाचे पोलीस अधिकारी यांपैकी दोन सक्षम अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. जन्माचा दाखला, वर्तमानपत्राचे कात्रण, किंवा प्रथम खबरी अहवाल, किंवा पोलीस डायरी नोंद, घटनेचा लेखा जोखा तसेच सहाय्यक दस्तऐवजसह प्रस्ताव तयार करावा.या पुरस्कारसाठी उल्लेखनिय कार्य केलेली घटना 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान घडलेली असावी. पुरस्कारासाठी निवड ही ICCW द्वारा निवड केलेल्या समितीमार्फत होणार आहे. कोणत्याही कारणास्तव नामंजुर केलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जाणार नाही. पुरस्काराचे वितरण देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे. 

                                                              पुरस्कार व स्वरूप -

भारत पुरस्कार 1 लक्ष रूपये, धृव पुरस्कार, मार्कडेय पुरस्कार, श्रवण पुरस्कार, एकलव्य पुरस्कार व अभिमन्यु पुरस्कार 75 हजार रूपये, सामान्य पुरस्कार 40 हजार रूपये असे आहे.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...