Tuesday 30 August 2022

थकित पगार मिळू लागल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे ! कॉम्रेड अमृत महाजन

थकित पगार मिळू लागल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे ! कॉम्रेड अमृत महाजन 


जळगाव, प्रतिनिधी... आज खरया अर्थाने नवीन वाढीव पगार १ महिन्याचा का होईना पगार जमा झाले आहेत अजून थकीत पगार पडत आहेत. सरकारकडे निधीची मागणी केली परंतु तेव्हढा निधी सरकार देवू शकले नाही. पण नवीन वेतन श्रेणी नुसार हा पगार पडला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने १५ ऑगस्ट पासुन मंत्रीमंडळ तयार झाले त्या दिवसापासून आवाज उठवला शेवटी २७ ऑगस्ट अमळनेरचे श्रीपत पाटील व नऊ हुतात्मे यांचा शहीद दिवस पासून कामबंद सुरू केले आणि आता मागील काळाचा फरक ही भेटेल आणि नाही भेटला तर लढाई सुरूच राहील परंतु नवीन दराने पगार पडू लागल्याने कर्मचाऱ्यांचे खूप मोठं समाधान चळवळी मुळे झाले आहे म्हणून सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात येत आहे असे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नेते काम्रेड अमृतराव महाजन यांनी काढले. आहे त्यात महाराष्ट्र राज्य 
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक चे राज्य अध्यक्ष प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, राज्य सेक्रेटरी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष मिलींद गणवीर, सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगुर्डे जिल्यातील तमाम हितचिंतक पत्रकार व संघटनेतील सहकारिंचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...