Monday 31 October 2022

ईडी सरकारने शेतकऱ्याला सुद्धा लुटायचं सोडलं नाही, नुकसान पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात ४०० रुपये !

ईडी सरकारने शेतकऱ्याला सुद्धा लुटायचं सोडलं नाही, नुकसान पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात ४०० रुपये !


अहमदनगर, अखलाख देशमुख, दि ३१ : राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी उशीरा का होईना राज्य सरकारला शहाणपण सुचले आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले. मात्र या नुकसान भरपाईत शेतकऱ्यालाच लुटण्याचे काम होत आहे. ही घटना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात आढळून आली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी बेधुंदपणे शेतकऱ्यांकडून पाहणीसाठी पैसे मागत आहेत. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे ज्यातून उघडउघड लुटमार करण्याची हिंमत अधिकाऱ्यांना झाली आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा. अन्यथा आपलं सरकार हे बळीराजाच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे यावर निश्चितपणाने शिक्कामोर्तब होईल.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...