औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : खा. इम्तियाज जलील संचलित दुआ फॉन्डेशनच्या वतीने आमखास मैदान येथे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले, अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थिंताना मार्गदर्शन केले. तसेच नाणेफेक करुन क्रिकेट स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी खा. इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस महासंचालक निसार तांबोळी, रेल्वे महामार्गाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, एल.जि. गायकवाड, भारत राजपूत, सतीश ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment